वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सन २००८ ऑगस्ट मध्ये घडलेल्या ‘निकिता मेहता’ घटनेचा मागोवा घेऊन हा लेख लिहिण्याचा प्रपंच.
ह्या केसमध्ये गर्भपात विषयक वादात कायद्याला डावलून निसर्गानेच पूर्णविराम दिला. परंतु त्यातील मूळ प्रश्न मात्र कायमच राहिला. जगातील विविध देशांमध्ये हा विषय निरनिराळ्या रूपात चर्चिला जातो. ह्याच अनुषंगाने निकिता मेहता सारख्या केसेसमध्ये पुढे जन्मभर वादविवाद नको म्हणून गर्भपातासारख्या विषयावर जनता संवेदनशील होते.
व्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाहीचा पाया असल्यामुळे माझ्या वीस वर्षाच्या अनुभवांवरून मला असे वाटते की, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीस असले पाहिजे. प्रेम, विवाह, मातृत्व, घटस्फोट आणि गर्भनिरोध ह्यांसारखे निर्णय अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाचे असून त्यामधे इतरांनी ढवळाढवळ करू नये. धर्माचा उपसर्ग तर त्यास आजिबात येऊ देऊ नये. वैज्ञानिक प्रगतीचे उद्दिष्ट आणि उपयोग दोन्ही केवळ मानवी-जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने असावे. त्याचप्रमाणे आपल्या खाजगी जीवनात कोणी कोणता निर्णय घ्यावा ह्या बाबतीत किमान कायद्याचा किंवा सरकारचा हस्तक्षेप असू नये. सुख हेच जीवनाचे अंतिम सत्य असल्यास दु:खदायक श्रद्धा अनैतिक ठरू शकते.
स्वत:चे सुख अधिक महत्वाचे की, नव्याने या जगात प्रवेश करणारा जीव? ह्या जीवाचे आगमन झाल्यावर त्याला जन्मभर दु:खच भोगावे लागणार असल्यास त्याला जन्म देण्याचे प्रयोजन तरी काय? नवा जीव जन्माला घालणे हीच मानवी जीवनाची सार्थकता समजणे कितपत योग्य आहे? नव्याने ह्या जगात येणाऱ्या जीवाला निरोगी आणि सुखी आयुष्य लाभावे ही अपेक्षा आई-वडिलांसाठी अवास्तव म्हणता येईल का?
निकिता मेहताचे गर्भपात प्रकरण कोर्टाने फेटाळले आणि काही दिवसांतच निकिताचे बाळ पोटातच गेले, जन्मण्याआधीच नाहीसे झाले. ह्या संदर्भातले कायदे आज काही नव्याने झालेले नाहीत. प्रश्न आहे तो केवळ लोकांच्या भावनेपोटी असे कायदे बदलावेत का? पूर्ण आरोग्यमय असलेले बाळ आपल्या पोटी जन्माला यावे अशी प्रत्येक मातेची स्वाभाविक अपेक्षा असते. त्यात काहीही चूक नाही पण दुर्दैवाने काही व्यंग असलेले, मतिमंद बाळ जन्माला येणार हे आधी कळले तर कोणतीही आई त्याला जन्माला घालण्यास स्वेच्छेने तयार होणार नाही. सामाजिक दडपणाखाली असे मूल जन्माला घालणे ही गोष्ट वेगळी. अशा वेळी समाज किंवा इतर नातेवाईक फक्त सल्ले देण्याचे काम बजावत असतात. यापेक्षा अधिक अपेक्षा त्यांच्याकडून न केलेलीच बरी. अशा वेळी कायद्याचा आधार घेऊन गर्भपात करणे योग्य राहील असे माझे व्यक्तिगत मत आहे. इतरांच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आत्म्याचे अमरत्व वर्णन करणे व आपल्या घरातील प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यावर आत्म्याच्या अमरत्वाचे भान विसरणे ही तर नेहमीचीच बाब !
ह्या जगात कितीतरी अनैतिक गोष्टी चालतात. मुलामधे जन्मजात दोष, शारीरिक अथवा मानसिक दोष खूप जिकीरीचे आहे. आपला समाज अशा मुलांबाबत प्रगल्भ नाही. आपल्यानंतर आपल्या बाळाची काळजी घेणारा कोण ही चिंता अशा मुलांच्या पालकांना नेहमीच असते. काही मुले स्वबळावर जीवनाला आकार देतात. पण त्यासाठी त्यांच्या आजूबाजूचे कौटुंबिक, सामाजिक वातावरण सक्षम असावे लागते. न्याय देऊन न्यायालयाचे काम संपुष्टात येते. पण त्या कुटुंबाला खूप मोठ्या मानसिक संघर्षाला तोंड द्यावे लागते. ह्या बाबतीत आयुर्वेदातील ‘श्रेयसी प्रजेचा’ मुद्दा अत्यंत महत्वाचा ठरतो. त्याचा उहापोह नक्कीच व्हायला हवा. म्हणून हा लेख प्रपंच.
मार्गाधारे वर्तावे विश्व हि मोहरे लावावे !
या भावार्थ दीपिकेतील वचनाप्रमाणे आप्तस्वकीयांनाही त्याच मार्गाने जाण्यास प्रवृत्त करावे. गरज निर्माण झाली की शोधाशोध किंवा संशोधन सुरु होते. म्हटलेच आहे की, ‘गरज ही शोधची जननी आहे.’ प्रचंड महागाईच्या काळात अनेक अपत्यांना जन्म देण्यापेक्षा ‘एक किंवा दोन अपत्येच पुरेत’ असा बहुतेकांचा निर्णय असतो. म्हणून होणारी संतती सदगुणी, सुंदर, दीर्घायु, बुद्धिमान, आरोग्यसंपन्न व व्यंगरहित असावी. ‘श्रेयसी प्रजेचे’ वर्णन करताना महर्षी चक्रपाणी म्हणतात.
श्रेयसी प्रजा इच्छतो इति अत्र श्रेयसी प्रजा
गुणवान पुत्रो, गुणवती च कन्या अभिप्रेतो !
गुणवान अपत्यप्राप्ती ‘क्वालिटी अश्युरन्स’ हेच ध्येय ठरविल्यावर नियोजन आणि व्यवस्थापन ओघाने आलेच. गर्भस्थापनेचे व गर्भावस्थेचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन करणे ही माता पित्यांची जबाबदारी ठरते.
सामर्थ्यवान व निर्दोष वीर्य असलेला पुरुष, अविकृत रज, गर्भाशययुक्त स्त्री व श्रेष्ठ दर्जाचा पोषक आहार यामुळे ‘श्रेयसी प्रजा’ निर्माण होते. ऋतुकालानुसार उत्तम जमिनीत पोषक द्रव्यांचा वापर करून शेतीबागायत केली तर त्याचे फळही उत्तम मिळते. त्याचप्रमाणे सुयोग्य दिन गर्भस्थापनेसाठी निवडणे आवश्यक ठरते.
रजोदर्शनापासून सोळा रात्रींपैकी फक्त दहा रात्रीच गर्भाधारणेस प्रशस्त आहेत. रजोदर्शनापासून ४, ५, ६, ७, ८, ९, १०, १२, १४, १५ ह्या दहा रात्रीत मैथुन केल्यास व्यंगरहित संतती प्राप्ती होते. समरात्री समागम केल्याने पुत्रप्राप्ती व विषम रात्री समागम केल्याने कन्याप्राप्ती होते असे आयुर्वेदाचे मत असले तरी ह्यावर अधुनिक पद्धतीने संशोधन झालेले नाही, म्हणून तूर्त हा वादाचा विषय आहे.
ऋतुकाली चौदाव्या रात्री संग केल्याने अत्यंत धर्मनिष्ठ, कर्मनिष्ठ, परोपकारी, दृढनिश्चयी, आत्मानुभवी महापुरुष जन्माला येतो. पंधराव्या रात्री समागमामुळे पतिव्रता कन्या जन्माला येते. सोळाव्या रात्री व्यवाय केल्याने सर्व प्राणिमात्रांचे पालनपोषण करणारा सर्वाधारभूत चक्रवर्ती राजा जन्माला येतो.
शुभ वार - व्यंगरहित संततीसाठी - सोम, बुध, गुरु, शुक्र
शुभ तिथि – प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील चतुर्थी, षष्ठी, अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा व अमावस्या अशा दहा तिथि गर्भधारणेसाठी वर्ज्य आहेत.
दोन्ही पक्षातील उरलेल्या वीस तिथि गर्भाधानासाठी शुभ आहेत.
अशुभ नक्षत्रे – रेवती, अश्विनी, पुण्य, अश्लेषा, मघा, चित्रा, मृग, मूळ ही नक्षत्रे गर्भाधानासाठी योग्य नाहीत.
मध्यम नक्षत्रे - भरणी, कृतिका, आद्रा, पूर्वा, पूर्वा आषाढा, पूर्वा भाद्रपदा, विशाखा ही सात नक्षत्रे मध्यम स्वरुपाची आहेत.
सर्वश्रेष्ठ नक्षत्रे - रोहिणी, पुनर्वसु, उत्तरा, हस्त, स्वाती, अनुराधा, उत्तराषाढा, श्रवण, घनिष्ठा, शततारका, उत्तरा भाद्रपदा ही अकरा नक्षत्रे गर्भधानासाठी सर्वश्रेष्ठ मानली आहेत.
शुभ मास - वसंत ऋतूतील दोन महिने व हेमंत – शिशीरातील चार महिने असे एकूण सहा महिने गर्भधानासाठी योग्य आहेत. इतर ऋतूंमधे प्रजास्थापनेसाठी व व्यंगरहित संततीसाठी मैथुन करू नये.
गर्भाधान व्यवस्थापन - विवाहानंतरच्या काळात गर्भाधानास योग्य अशा निवडलेल्या दिवसांच्या तीन महिने अगोदर स्त्री आणि पुरुष दोघांचीही वमन – विरेचन, स्नेहन / स्वेदनपूर्वक शरीरशुद्धी करावी. वमन - विरेचनानंतर संसर्जन क्रम विधिवत करावा. त्यानंतर पूर्ण आहार सुरु करावा. पंधरा दिवसांनी आस्थापन व अनुवासन बस्ति द्यावा. हे सर्व उपक्रम तज्ञ वैद्याच्या मार्गदर्शनाखाली करावे.
गर्भाधान - गर्भाधानासाठी सुनिश्चित दिवशी दोघांनीही उद्वर्तनादी सुगंधी द्रव्याचा वापर करून शुचिर्भूत व्हावे. श्वेत वस्त्रे परिधान करावीत. धूप, उदबत्ती, कापूर, इ. लावून घरात सुगंध पसरवावा. आनंद देणारे संगीत लावावे. मन प्रफुल्लित, आनंदित, प्रसन्न राहील असे वातावरण निर्माण करावे. मधुर, सात्विक असा आहार घ्यावा. शयनमंदिरात भडक रंग, हिंस्त्र प्राण्यांची चित्रे नसावीत. भिंती पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या असाव्यात. डोके पूर्वेकडे येईल अशी शय्येची रचना असावी. पूर्वरात्र उलटल्यावर पादप्रक्षालन करून पुरुषाने उजवा पाय, स्त्रीने डावा पाय शय्येवर ठेवून चढावे. स्त्रीने पुरुषाच्या डाव्या बाजूला असावे. त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने समागम करावा.
आहारssचार चैष्टिभि: यादृशीभि समन्तितौ |
स्त्रीन्युसौ स्मुपेयातां तयो पुत्रोsपि तदृश ||
आहार, आचार, विचार व चेष्टा इत्यादिकांनी युक्त होऊन स्त्री-पुरुष ज्या भावनेने एकत्र येत असतील तशीच संतति त्यांना निश्चित प्राप्त होईल.
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
कुंभार व्हायचे ठरवणाऱ्या माणसाला काहीतरी घडवायचे असते मातीतून. त्याच्या बोटांची आणि मातीची दोस्ती पटकन् जमते. हा त्याचा अंगभूत गुण असतो (संचित. म्हणजेच गुणसूत्रांबरोबर आलेले वैशिष्ट्य). पण हा माणूस उत्तम कुंभाराकडे शिकतो सुद्धा.
कोलंबसने १४९२ साली अमेरिकेचा मार्ग शोधल्यापासून, युरोपमधे या नवीन जगाविषयीचे कुतूहल चाळवले गेले होते. युरोपातल्या त्या काळच्या धार्मिक आणि सरंजामशाही वातावरणाला सामान्य जनता विटली होती. कर्मठ परंपरांनी धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी झाली होती. सरंजामशाहीमुळे, मुठभर गर्भश्रीमंतांच्या हातात सार्या जमिनीची मालकी एकवटली होती आणि उरलेली जनता कष्टाच्या व दारिद्र्याच्या ओझ्याखाली पिचत होती. त्यामुळे एका सर्वस्वी नव्या अशा जगाचे दरवाजे अचानक उघडल्यावर, जुन्या जोखडातून सुटका करून घेऊन नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी लोक धावले नसते तरच नवल !
युरोपातून नवीन जगात येताना हे लोक आपल्याबरोबर परंपरा, धार्मिक रुढी, रीतिरिवाज, कायदेकानून यांच्याच बरोबर, नवीन जमिनीचा ध्यास देखील घेऊन आले. नवीन जगामध्ये जमीन मिळवणं हा एक जगण्याचा महामंत्रच झाला. जमिनीच्या आधारे लोकांना एक उपजीवीकेचे साधन मिळाले तसेच त्यायोगे त्यांना संपत्तीसाधन करता येऊ लागलं. येवढेच नव्हे तर जमिनीच्या मालकी हक्काद्वारे सामाजिक जीवनाची वरची पायरी गाठता येऊ लागली. युरोपातल्या रीतिरिवाज आणि कायदेकानूनांच्या आधारे, जमिनीच्या मालकी हक्कानुसार, लोकांना अनेक सामाजिक हक्क मिळू लागले. अनेकदा जमिनीच्या मालकी हक्कानुसार पुरुषांना मतदानाचा हक्क मिळू लागला.
युरोपातून येऊन वसाहती करून राहिलेल्या रहिवाशांचा शेतीव्यवसायाकडे कल होता. त्यामुळे जमीन वाटपाला महत्व आले होते. त्यावेळी जमीन मिळवण्याचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात होते आणि एकंदरीतच, युरोपपेक्षा या नवीन जगात जमीन मिळवणे सोपे होते. जमिनीवर मालकी हक्क सांगण्यासाठी जमिनीचे सर्वेक्षण व नोंद करणारी सर्वमान्य पद्धत असणे आवश्यक होते. सुरवातीच्या जमिनीच्या सर्वेक्षणाच्या पद्धती फारच ढोबळ होत्या. केवळ नदी, ओढे, झाडांच्या आधारे केलेल्या जमीन सर्वेक्षणात खूप त्रुटी असायच्या आणि जमीन वाटपाचे पर्यवसान भांडणात आणि कोर्टातल्या खटल्यात होणं ही नित्याची बाब होती.
१७७६ सालच्या अमेरिकेन क्रांतीमुळे जमीन वाटपाच्या पद्धतीला आणखी वेगळंच वळण मिळालं. पश्चिमेला प्रचंड मोठी जमीन नव्यानेच उपलब्ध झाली होती. ही जमीन केंद्रीय सरकारच्या अखत्यारीतील असल्यामुळे, १७८५ साली एक कायदा करुन, सरकारने जमीन सर्वेक्षणाची नवी पद्धत रूढ केली. चौकडीच्या (grid) स्वरूपात जमिनीची वाटणी करावी आणि प्रत्येक गावाच्या वाटणीला ३६ तुकडे यावेत, अशी साधारण योजना मंजूर झाली. सुरवातीला या कायद्यानुसार कमीत कमी ६४० एकराचा जमिनीचा तुकडा, एकरी १ डॉलर या भावाने लिलावात विकला जावा, अशी तजवीज होती. परंतु कमीत कमी ६४० एकर जमिनीचा तुकडा विकण्याच्या अटीमुळे, ही जमीन बर्याच सामान्य शेतकर्यांच्या आवाक्या बाहेरची होती. परंतु धनाढय मंडळी मात्र सरकारवर दबाव आणून, एकरी १ डॉलर पेक्षा देखील कमी दराने मोठमोठे जमिनीचे तुकडे मिळवून गिळंकृत करू लागली.
त्यावेळी अमेरिकन राजकारणात, Federalist आणि Anti-Federalist असे दोन पक्ष होते. Federalist पक्षाच्या मते, जमिनीचा भाव अधिक असणे महत्वाचे होते. त्यामुळे सरकारी तिजोरीत पैशाची भर पडण्यास मदत झाली असती. तसेच जमिनीचे छोटे छोटे तुकडे करण्यापेक्षा, थोड्याच पण धनाढ्य लोकांच्या हातात जमिनीचे मालकी हक्क एकवटणे सोईस्कर ठरले असते. या उलट Anti-Federalist पक्षाच्या मतानुसार, अमेरिकन समाज शेती प्रधान राहील अशी अपेक्षा होती. त्यामुळे थोडयाशाच श्रीमंतांच्या हातात जमिनीचे हक्क एकवटण्यापेक्षा, अनेक छोटया किंवा मध्यम शेतकर्यांच्या हातात जमिनीची मालकी असणे महत्वाचे होते. या विचार सरणी प्रमाणे, जमिनीच्या किंमती सामान्य माणसाला परवडतील अशा असणे जरूरीचे होते.
पुढे सरकारने जमीन वाटपासंदर्भात बरेच प्रयोग करून पाहिले. जमीन विकत घेण्यासाठी कर्जाची सोय केली, कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रफळाची अट, ६४० एकरांवरून ८० एकरांपर्यंत खाली आणली आणि जमिनीचा दर एकरी १ डॉलर वरून २ डॉलरपर्यंत वाढवून बघितला.
१८६१ ते १८६५ च्या अमेरिकन यादवी युद्धामुळे राज्या राज्यांमधले ताण तणाव अधिक उघडपणे दृष्टीस पडू लागले. पश्चिमेकडे होणारा विस्तार, देशाची आर्थिक घडी आणि गुलामगिरी या प्रश्नांवर, उत्तरेकडच्या औद्योगिक आणि दक्षिणेच्या शेतीप्रधान राज्यांमधे युद्धाला तोंड फुटले. दक्षिणेकडची राज्ये फुटून निघाल्यामुळे देशाच्या राजकारणात मोठाच बदल झाला. सरकारने पश्चिमेकडच्या विकासासंदर्भात आणि जमिनीच्या वाटपासंदर्भात अधिक उदारमतवादी धोरण स्विकारले. परिणामस्वरूप, १८६२ साली Homestead Act पास झाला. या कायद्यानुसार कोणाही घरचा २१ वर्षांहून अधिक वयाचा पुरुष अथवा स्त्री, १६० एकर जमिनीवर पूर्णपणे विनामूल्य हक्क सांगू लागला. अट एवढीच की त्या जमिनीवर त्या शेतकर्याने कमीत कमी ५ वर्षे रहावे आणि तिथे झाडं तोडून जमीन साफ करणे, जमिनीची मशागत करून ती शेतीलायक करणे, घर आणि जनावरांसाठी गोठे बांधणे, अशा सुधारणा कराव्यात. जर जमिनीवर अधिक लवकर हक्क प्रस्थापित करायचा असेल, तर ६ महिन्या नंतर एकरी १.२५ डॉलर एवढी रक्कम भरली, की काम झाले !
पुढे देखील, १९ व्या शतकाच्या उरलेल्या दशकांमधे, सरकारने विविध कायदे सुधारणा करून जमिनीचे वाटप चालूच ठेवले. १८७३ च्या Timber Culture Act नुसार, शेतकर्यांना ४० एकर जमिनीवर झाडे लावण्याच्या मोबदल्यात १६० एकर जमीन मोफत मिळू लागली. जसजसं पश्चिमेला जावं, तसतशी जमीन अधिकाधिक रुक्ष होत गेली होती. त्यामुळे तिथल्या जमिनीसाठी वेगळे कायदेकानून असणे जरूरी होते. १८७७ सालच्या Desert Lands Act नुसार, शेतकर्यांना एकरी १.२५ डॉलरच्या भावाने, ६४० एकर जमीन मिळत होती. अट इतकीच, की त्यांनी तीन वर्षांत तेथे जलसिंचनाची व्यवस्था करावी. Homestead Act मुळे विविध प्रकारचे लोक जमिनी घेण्यासाठी पुढे आले आणि त्यांनी जमिनीचा वापर वेगवेळ्या कारणांसाठी केला. परंतु इतर Acts मुळे, शक्यतो मोठया प्रमाणावर जमिनी विकत घेऊन, त्यांचा वापर चराऊ कुरणांसारखा करण्याचा उद्योग मोठया प्रमाणावर सुरू झाला.
१९०२ सालच्या Reclamation Act नुसार मोठमोठे जलसिंचनाचे प्रकल्प सुरू करण्यावर भर देण्यात आला. याचं फलस्वरूप म्हणून पश्चिमेकडच्या रुक्ष जमिनीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न सुरू झाले. या कायद्यानुसार, त्या भागात जमिनीचा ताबा घेतलेल्या लोकांचाच पैसा १० वर्षांपर्यंत वापरून, सरकारने ह्या जलसिंचनाच्या प्रकल्पांना हातभार लागेल, अशी योजना केली होती. या कायद्यामुळे, विसाव्या शतकातल्या सरकारच्या जमीन वाटपाच्या धोरणातील बदलाची नांदी झाली.
या नवीन धोरणानुसार, शेतकर्यांना केवळ जमिनीचे वाटप न करता, त्या जमिनीचा त्यांना अधिकाधिक उपयोग कसा करता येईल, यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला. पुढे १९३४ च्या Taylor Grazing Act नुसार Homesteading ची प्रथा पूर्णपणे बंद झाली. यामुळे देशाच्या जमिनीवर खाजगी लोकांचा मालकी हक्क वाढला आणि त्या जमिनींवर यशस्वी होण्यासाठी लोकांना अधिकाधिक संधी मिळतील याची काळजी घेण्यासाठी सरकार अधिकाधिक कटीबद्ध झाले.
अमेरिकन वेस्ट म्हटलं की सर्वसाधारण वेस्टर्न चित्रपटांनी दाखवल्याप्रमाणे, घोडदौड करून तुफान गोळीबार करणार्या काऊबॉइजचं चित्र आपल्या डोळ्यां समोर तरळून जातं. परंतु खरा इतिहास काही इतका रंजक किंवा आकर्षक नाही. चित्रपटांनी रंगवलेल्या भव्यदिव्य काल्पनिकतेपेक्षा वास्तव अगदीच साधेसुधे व रूक्ष होते. अफाट आणि अविकसित अशा “वेस्ट़”ला काबुत आणण्याचे काम खरं तर तीन साध्या सुधारणांनी केलं – नांगराचा लोखंडी फाळ, काटेरी तार आणि इकडून तिकडे सहज नेण्यासारखी पवनचक्की.
प्रेअरीवरचे गवत म्हणजे उंच सळसळणारे. पण या गवताची मुळे खूप लांबवर पसरून जमिनीला घट्ट पकडून राहणारी. त्यामुळे प्रेअरीवरची जमीन खोदायची म्हटली की या मुळांनी जखडून ठेवलेल्या घट्ट जमिनीशी झटापट करावी लागायची. १९ व्या शतकाच्या सुरवातीचे नांगरांचे लाकडी फाळ, ही टणक जमीन आणि त्यातला गवताच्या मुळांचा गुंता, यांच्याशी टक्कर घेता घेता मोडून पडायचे. किंवा अगदीच नांगर मोडला नाही तर ही जमीन नांगराण्यासाठी चक्क आठ दहा बैल लावावे लागायचे. १८३७ साली जॉन डीर या माणसाने लोखंडाचा मोठा सुबक असा फाळ बनवला आणि प्रेअरीवरची जमीन अमेरिकन शेतकर्यांच्या कह्यात आली.
चहूदिशांना अफाट पसरलेल्या या जमिनीवर गाई, गुरं काबूत ठेवायची, म्हणजे एक दिव्यच असायचं. पूर्वेकडच्या किनारपट्टीसारखी इथे प्रेअरीवर जंगले नव्हती, किंबहुना एकंदरीत झाडांचीच कमतरता, त्यामुळे लाकडाची कुंपणं घालणं शक्य नव्हतं. मग १८७४ साली, जोसेफ ग्लीडन नावाच्या माणसाने लोखंडाच्या तारेला, तारेचेच छोटे छोटे टोकदार तुकडे जोडून काटेरी तार तयार केली. त्या काळी या काटेरी तारेचे वर्णन मोठं समर्पकपणे “हवेपेक्षा वजनाला हलकी, व्हिस्कीपेक्षा ताकदवान आणि मातीपेक्षा स्वस्त” असं करण्यात आलं होतं. यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी या तारेने जनावरांच्या चराऊ कुरणांना कुंपण घालण्याचं काम चोख बजावून मोठीच मोलाची कामगिरी बजावली.
तिसरी महत्वाची सुधारणा म्हणजे हलक्या पवनचक्क्या. या साध्या पवनचक्क्या, लाकडी खांबांनी केलेल्या ३०-४० फूट उंचीच्या चौकटीवर उभ्या रहायच्या. प्रेअरीच्या मोकळ्या आकाशाखालचा भणाणता वारा या पवनचक्क्या गरगरा फिरवत रहायचा. त्यांच्या सहाय्याने, जमिनीत जागो जागी खणलेल्या बोअर वेल्स (विहिरी) मधून काढलेल्या पाण्यावर शेकडो, हजारो एकरांवर शेती भाती पिकू लागली. सुमारे १९३० पर्यंत या पवनचक्क्या म्हणजे प्रेअरीवरच्या प्रत्येक फार्मचं जणू अविभाज्य भागच झाला होता. पुढे मग विजेवर चालणार्या मोटारींनी या पवनचक्क्यांची जागा घेतली. परंतु अजूनही बर्याच ठिकाणी या जुन्या छोटया पवनचक्क्या फार्मवर शोभेसाठी किंवा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जपून ठेवलेल्या आढळतात.
पण मध्यमवर्गीय बुध्दीजीवी लोकांनी आपली विचारसरणी बदलली नाही तर लवकरच पुन्हा परकिय राजवट किंवा असामाजिक विचारांचे लोक सत्ता बळकावून देशाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत.
अंधांना नेहमीच मार्ग दाखवावा लागतो असे नाही.अनेक अंधानी जगाला जगायला व जगवायला शिकविले.अंध असूनही तिने देशासाठी पदक जिंकले, तरीही देशातील जनता रीलवर नाचणाऱ्या पोरींनाच लाईक करणार.
ब्रिटन मधील हरफोर्डशायर येथे 'ऑन वे' या नावाचे गाव असून हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ या रूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध झाले आहे. देशातील हा पहिला महाराष्ट्र शासनाने राबवला असून या प्रकल्पामुळे महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावला आहे. या योजनेंतर्गत भिलारमधील नव्या भूखंडावर सुमारे साडेतीन एकरावर हे ‘पुस्तक गाव’ विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये विविध प्रकारची साहित्य दालने असतील. त्यात शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती यातून मिळेल. अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई-बुक्स व आॅडिओ बुक्सही उपलब्ध असतील. तसेच या योजनेत निवडलेल्या घरांमध्ये विविध प्रकारची पुस्तके ठेवली गेली असून, त्याद्वारे वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरांमध्ये तसे पूरक वातावरण तयार केले केले गेले आहे.
‘पुस्तकाचे गाव’ या प्रकल्पाची वैशिष्ट्ये...
साहित्यिकांच्या भेटीद्वारे रसिकांशी सातत्यपूर्ण संवाद लेखन, वाचन, संपादन, मुद्रितशोधन याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा होतील शैक्षणिक सहलींसाठी अनुकूल वातावरण, साहित्यिकांच्या भेटी ठरवता येतील. गावात कायमस्वरूपी कविकट्टा व अभिवाचन कट्टा असेल गावातील सार्वजनिक जागा ग्रामपंचायत, समाजमंदिर, शाळा येथे वाचनकट्टे तयार करण्यात येणार आहे.
घरांचे वाचनालय.. गावाचे ग्रंथालयात रूपांतर...
महाराष्ट्र शासनाने भिलार या गावाला या पायलट प्रोजेक्टसाठी निवडले असून, यासाठी ग्रंथालय, पुस्तके व यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून भिलारकडे उच्च दर्जाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाणार आहे. तर रोजगार व आर्थिक स्थैर्य ही लाभणार आहे. त्यामुळे भिलारमधील घरांचे छोट्या वाचनालयात तर गावाचे मोठ्या ग्रथांलयात रूपांतर झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
केस मुलायम व्हावे यासाठी केसांची काळजी घेणे गरजेचे असते. वेळोवेळी केसांचा मसाज करावा लागतो. परंतु मसाज योग्य पद्धतीने न झाल्यास त्याचा फायदा होत नाही.
तेलाने मसाज करण्यासाठी लागणारे साहित्य
- खोबरेल तेल, कॉटन(कापूस), गरम पाणी, टॉवेल, शँम्पू इत्यादी.
प्रथम खोबरेल तेल थोडे कोमट करुन घ्यावे. केसाचे दोन भाग करुन कापसाच्या साहाय्याने सगळ्या केसांच्या मुळाशी तेल चांगल्या प्रकारे लावावे.
१५ मिनिटे गोलाकार मसाज करावा. एका कानापासून दुसर्याु कानापर्यंत क्रॉस मसाज करावा.
थोडे-थोडे केस घेऊन संपूर्ण केसांचा गरम तेलाने मसाज करावा.
मानेपासून कांद्यापर्यत खालच्या दिशेने मसाज करत यावा.
अधून-मधून डोक्याचे पॉईट दाबावे या क्रियेला पंचिंग असे म्हणतात.
१५ मिनिटे व्यवस्थीत मसाज झाल्यावर गरम पाण्यात टॉवेल भिजवून केसांना गुंडाळून थोडा वेळ वाफ घ्यावी या क्रियेला स्टीम असे म्हणतात
मसाज झाल्यानंतर केस शँम्पूने स्वच्छ धुवावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
….पण तो म्हणाला” हे माझं शेवटचं लॉटरीचे तिकीट आहे .आजच्या दिवसाची सर्व तिकीट खपली असून ,एकच आता बाकी आहे. हे संपलं की मी लवकरच मालकाकडे जाऊन हिशोब देऊ शकतो “ .त्याचे हे बोलणं ऐकून ,का कोणास ठाऊक पण माझ्या मनात त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आणि कळत नकळत का होईना मी लॉटरीचे तिकीट विकत घेतलं आणि पर्समध्ये ठेवून दिले .
चिंचेचा उपयोग आपल्या स्वयंपाकात बऱ्याच प्रमाणामध्ये केलजातो.आमटी,भाजी,चटणी,
पाक,सरबते,तसेच आता तर इमली जेली देखील मिळू लागली आहे.चाट चे पदार्थ तर चिंच खजुर चटणी शिवाय कल्पनाच केली जाऊ शकत नाही.
अगदी बाई गरोदर असेल तर तिला देखील चिंचा खाव्याशा वाटतात का विचारले जाते.
चिंचेचा मोठा वृक्ष असतो साधारण पणे आवळ्याच्या पानां प्रमाणे बारीक पाने असतात.तसेच त्याला लागलेली कच्ची चिंच हिरवी मातकट रंगांची टणक असते व पिकल्यावर ती पुर्ण मातकट रंगांची होते व आतील बी टणक व त्यावर कठीण आवरण असणारी होते.
कच्ची चिंच आंबट,उष्ण,पित्त,रक्त,कफ दुषित करणारी असून वातनाशक आहे.
पिकलेली चिंच आंबट,गोड,उष्ण,वात,कफनाशक व पित्तकर आहे.
आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूया:
१)तोंडास घाण वास येणे,जीभेवर साका जमणे,तोंडास चव नसणे ह्यात जेवणा सह कच्ची चिंच व सैंधव घालून केलेला ठेचा खावा.
२)अजीर्ण होऊन मळमळ होणे,उल्टी होणे ह्यात पिकलेली चिंच सैंधव लावून तोंडात धरून चघळावी.
३)लघ्वीची जळजळ,पोटात वात धरणे ह्यात २ चमचे चिंचेचा कोळ+१ चमचा मध+१चमचा साखर हे मिश्रण घ्यावे.
४)किटक चावलेल्या ठिकाणी चिंचोका भाजून अग्र नुसता उगाळून दंश भागी लावावा.
५)१ कि चिंच २ लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावी व सकाळी कोळून गाळून त्यात २ किलो साखर घालावी व पाक करावा.हे तयार सरबत ४ चमचे १ ग्लास पाण्यात मिसळून रात्री घेतल्यास बद्धकोष्ठाचा त्रास कमी होते.
चिंच अतिमात्रेत खाल्ल्यास अम्लपित्त होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आजच्या व्यस्त जीवनामध्ये महिलांना आपल्या आरोग्याविषयी अत्यंत जागरूक असणे गरजेचे झाले आहे. आज महिलांमध्ये हृद्यविकार, मधुमेह, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर, हाडांचे विकार, रक्तदाब या सारखे विविध गंभीर विकार उद्भवत आहेत. त्यामुळे अकाली मृत्यु होण्याचे प्रमाण वाढले आहे. या ‘सायलंट किलर’ ठरणाऱ्या विकारांचे वेळीचं निदान झाल्यास त्यापासून आपला बचाव करणे शक्य आहे यासाठी वेळोवेळी हेल्थ चेकअप करून घेणे गरजेचे झाले आहे.
सामान्य आरोग्य तपासणी
महिलांनी नियमित एक किंवा दोन वर्षातून एकदा आपल्या शरीराचे चेकअप करून घ्यावे. यामुळे भविष्यात होणाऱ्या रोगांचे निदान वेळीचं होण्यास मदत होते.
याशिवाय तीन किंवा चार वर्षातून एकदा थायराइड टेस्ट (टीएसएच, टी 3, टी -4) जरूर करून घ्या असे केल्याने थायराइड ग्रंथी संबंधीत विविध रोग होण्यापासून रक्षण करता येते.
हाडांची तपासणी
वाढत्या वयाबरोबर आपली हाडे कमजोर होऊ लागतात. हाडे ठिसुळ बनल्याने अनेक रोगांना निमंत्रण मिळते यासाठी हाडांचे चेकअप करने गरजेचे आहे. महिलांनी आपली बीएमडी म्हणजे बोन मिनरल डेंसिटी टेस्ट ची तपासनी वयाच्या ५०शी नंतर करून घ्यावी.
ब्रेस्ट कॅन्सरचा चेकअप
बहुतांश वेळेला स्त्रीला स्वत:ला स्तनांचा कर्करोग झाला आहे हे कळतच नाही. जेव्हा कळतं तेव्हा उशिर झालेला असतो. आज भारतीय स्त्रियांना होणा-या कर्करोगाच्या प्रकारांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वात जास्त आहे स्तनांचा कर्करोग हा असा आजार आहे की, ज्याचे जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर यावर उपाय करणे शक्य होते. यासाठी वयाच्या पस्तीशी नंतर वर्षातून एकदा मेमोग्राफी टेस्ट व क्लीनिकल ब्रेस्ट चेक-अप करणे तर 35 वर्षाच्या आतिल स्त्रियांनी किमान दोन वर्षाआड तज्ञांकडून क्लीनिकल ब्रेस्ट चेक-अप करुन घ्यावी. या टेस्टमुळे सुरवातीच्या अवस्थेमध्येचं ब्रेस्ट कॅन्सरला ओळखून त्याला अटकाव करण्यास मदत होते.
डायबिटीज चेकअप
डायबिटीज म्हणजेचं मधुमेहापासून रक्षण करण्यासाठी वयाच्या 30शी नंतर वर्षातून एकदा ब्लड ग्लूकोस टेस्ट करून घ्या. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कळते आणि डायबिटीज आणि त्याच्या दुष्परीणामापासून रक्षण करण्यास मदत होते.
ह्रदय तपासणी
महिलांनी वयाच्या तिशी नंतर वर्षातून एकदा ब्लड प्रेशर स्क्रीनिंग टेस्ट आणि ECG टेस्ट करून घ्यावी. यामुळे विविध हृद्यरोगांपासून रक्षण करता येते. याशिवाय ३५ वर्षानंतर दर पाच वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉल स्क्रीनिंग टेस्ट जरूर करून घ्या.
रिप्रोडक्टिव/सेक्सुअल हेल्थ
प्रजनन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी वयाच्या २१-६५ वर्षानंतरच्या प्रत्येक स्त्रीने ३ वर्षातून एकदा तरी पॅप टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. पॅप स्मिअर टेस्ट करून सर्वाइकल कॅन्सर, गर्भाशयाच्या कॅन्सरचे वेळीचं निदान करता येते.
तर वंधत्वाची समस्या होऊ नये म्हणून १८ ते ४० वयाच्या महिलांनी नियमित ‘पीसीओएस’ संबंधी हेल्थ चेकअप करून घ्या. ‘पीसीओएस’ हे सध्याच्या काळात वंध्यत्वाचे एक सर्वाधिक प्रमुख कारण बनले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti