वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जेव्हा आपला दृष्टिकोन सकारात्मक असतो तेव्हा आपण तक्रारी न करता, आहे त्या परिस्थितीचा आपल्या ध्येयाप्रती सदुपयोग करून घेऊ शकतो. कितीही कठीण काळ असला तरी त्यावर मात करून आपण आपलं भविष्य घडवू शकतो. जेव्हा आपण सकारात्मक लहरी आपल्या जीवनात निर्माण करतो तेव्हा आपण सकारात्मक घटना आपल्या आयुष्यात आकर्षित करतो आणि त्याचा आपल्या ध्येयाप्रती उपयोग होतो.
प्रातः स्तुवे परशिवां ललितां भवानीं त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्याम्।विश्वस्य सृष्टि-विलय-स्थितिहेतुभूतां
विद्येश्वरीं निगमवाङ्गमनसाविदूराम्॥४॥
प्रातः स्तुवे - प्रातःकाळी अर्थात सूर्योदयाच्या देखील पूर्वी, डोळे देखील उघडण्याच्या आधी, मी स्तुती करतो.
परशिवां- पर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. शिव म्हणजे अत्यंत पवित्र. अत्यंत श्रेष्ठ आणि पवित्र असणारी.
ललितां- अत्यंत लालित्यपूर्ण असणारी.
भवानीं- भव म्हणजे भगवान शंकर. त्यांची चैतन्यशक्ती ती भवानी.
त्रय्यन्त- कोणत्याही वेदांचे संहिता, आरण्यक, ब्राह्मण आणि उपनिषद असे चार भाग असतात. उपनिषद हा चौथा भाग असल्याने त्याला, तीनच्या नंतर असणारा म्हणून त्रय्यन्त म्हटले. अर्थात त्रय्यन्त म्हणजे उपनिषद ,वेदान्त.
वेद्यविभवां- वेद्य म्हणजे स्पष्ट करण्याचे, जाणवून देण्याचे. तर विभव म्हणजे वैभव . अर्थात वेदांत तत्वज्ञानी जिचे वैभव स्पष्ट करते अशी. त्याद्वारे जिला जाणता येते अशी.
करुणानवद्याम्- करुणा अर्थात दया. अनवद्या अर्थात निर्दोष. सामान्य व्यवहारात दये मध्ये समोरच्याला आपल्यापेक्षा हीन समजणे आणि त्याच्यावर उपकार करणे. हा भाव असतो. तो दोष नसलेली दया म्हणजे वात्सल्याने आई परिपूर्ण आहे.
विश्वस्य - विश्वाच्या. सृष्टि-निर्मिती.
विलय- प्रलय, विनाश.
स्थिति- संचालन.
हेतुभूतां - या सगळ्याचे मूळ कारण असणारी.
विद्येश्वरीं- सर्व प्रकारच्या विद्या अर्थात ज्ञानाचे अधिष्ठान असणारी. निगम- वेदादि शास्त्रे, वाङ्गमनसा- वाणी आणि मनाने
विदूराम्- प्राप्त होणे असंभव असलेली.
अशा आई ललितांबेचे मी स्तवन करतो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
भगवान श्रीरामचंद्रांनी लंकेवर चढाई करण्यापूर्वी सेतुबंधासाठी आणि लंका विजयासाठी विशेष अनुष्ठान स्वरूपात ज्या स्थानाची निर्मिती केली ते लोकोत्तर स्थान म्हणजे श्रीक्षेत्र रामेश्वर.
गेल्याच आठवड्यात माझा एक मित्र त्याने घेतलेल्या ब्रेक वरून परत आला आणि एव्हढा दमलेला का दिसतो आहेस असे विचारल्यावर म्हणाला की “गेले ४ दिवस रग्गड चाललो, वाटेल तिथे मिळेल तेव्हा मिळेल ते खाल्ले. रोज काही ना काही कारणांमुळे जागरणे झाली. वेगळ्या जागेमुळे झोप पण नीट झाली नाही. शिवाय विमानप्रवासाची दगदग पण खूप झाली. कधी एकदा घरी पोहोचतो आणि स्वच्छ आंघोळ करून घरचे जेवतो असे झाले होते.” मनात आले की असला त्रासदायक ब्रेक घ्यायचाच कशाला.

सर्पगंधाचा सरळ सदाहरित १-३ फूट उंच क्षुप असतो.ह्याची पाने ३-७ इंच लांब व २-२१/२ इंच रूंद अण्डाकार अथवा भालाकार व तीक्ष्णाग्र असतात.पानांचा वरचा भाग गडद हिरवा व पृष्ठभाग हल्का हिरवा असतो.प्रत्येक काण्डपर्वातून ३-४ पाने निघतात.फुले पांढरी अथवा गुलाबी गुच्छामध्ये येतात.फळ मटराच्या आकाराचे कच्चे हिरवे व पिकल्यावर काळे होते.मुळ दृढ असून ४० सेंमी लांब व २ सेंमी व्यासाचे असते.
ह्याचे उपयुक्तांग मुळ असून हि चवीला कडू,उष्ण गुणाची,रूक्ष व निद्राजनन आहे.हि कफवातनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:
१)झोप येत नसल्यास रात्री झोपताना तुपा सोबत सर्पगंधा देतात.
२)चवीला कडू असल्याने सर्पगंधा कृमीघ्न कार्य करते.
३)सर्पगंधा उच्च रक्तदाबाच ही वापरतात.
४)कडू चव असल्याने सर्पगंधा आमपाचक व ज्वरनाशक आहे.
५)उष्ण असल्याने सर्पगंधा आर्तवजनन आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
एक मंदिर होत, प्रसिध्द मंदिर होत, त्या मंदिरात अनेक देश विदेशातील लोक यायचे, भक्तगन यायचे. त्यामुळे ते मंदिर खुपच चर्चेचे प्रसिध्दीचे होते. आणि मग काही दिवसांनी त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले. आणि मग ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला आपल्या मंदिरात देश-विदेशातील लोक, भाविक भक्त येतात. त्यामध्ये इंग्रजी बोलणारे भाविक भक्त वैगेरे असतात. तेव्हा आपल्या मंदिरातल्या सगळया लोकांना, कर्मचार्यांना पण इंग्रजी आल पाहिजे. त्यांनी लगेच फरमानच काढला. मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलच पाहिजे. कंम्पलसरीच आहे म्हणे….
झाल…..
आता काय,
आता त्या देवळात एक घंटा वाजवणार होता. त्याला हि कंम्पलसरी झाल ना. ते म्हणे मला काय इंग्रजीचा उपयोग आहे? मी का इंग्रजीत घंटा वाजवतो का ? आणि इंग्रजीत वाजविली काय अन मराठीत वाजवली काय, वाजणार घंटाच आहे. म्हणुन मी शिकलो नाही म्हणुन काय होतय… ट्रस्टी म्हणाले नाही, नियम म्हणजे नियम, सगळयांना इंग्रजी आलच पाहिजे.
आता त्या घंटा वाजवणाराच पन्नास-पंच्चावन वय त्याच, तो म्हणाला आता कधी शिकव ? त्याने सरळ ती घंटा वाजवायची नौकरीच सोडली.
बर आता नौकरी सोडली पण पोटापाण्यासाठी काहीतरी केलच पाहिजे. कराव तर काय कराव, मग त्याने विचार केला मंदिर प्रसिध्द आहे देश-विदेशातले भाविक-भक्त येथे येतात आणि मंदिराच्या आसपास कुठ चहा पिवाव तर काही व्यवस्था नाही. मग त्याने काय केले तर सरळ मंदिराच्या बाहेर एक चहाच टपर टाकल. आता मंदिरात अनेक भाविक-भक्त यायला लागले त्यामुळे गर्दी जास्त, जशी गर्दी जास्त तस चहाच टपर जोरात चालल. बघता बघता त्या चहाच्या टपराच त्याने एका छोट हाॅटेल केल. छोट हाॅटेल हि तुफान चालल. मग छोटया हाॅटेलच त्याने मोठ हाॅटेल केल. मोठ हाॅटेल सुध्दा भयानक चालल आणि बघता बघता त्याची तिन चार मोठी हाॅटेल झाली. आणि मग नंतर त्याने फाईव्हस्टार हाॅटेलच काढल. आणि अशा फाईव्ह स्टार हाॅटेलची साखळीच तयार केली. अन त्याच्या या फाईव्ह स्टार हाॅटेल मध्ये देष-विदेषातील भाविक-भक्त यायला लागले. निवासासाठी थांबायला लागले. त्या हाॅटेलच व्यवस्थापण, तिथल नियोजन हे सगळ बघायला लागले.
एका दिवशी त्या हाॅटेलला एक विदेशी शिष्टमंडळ उतरल आणि उतरलेल्या विदेषी शिष्टमंडळाला अस वाटल की या हाॅटेलच नियोजन, व्यवस्थापन इतक उत्तम आहे तेव्हा या हाॅटेलच्या मालकाला भेटाव. आणि त्यांनी त्या मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली.
मग हा आला भेटायला. आता ते सगळे इंग्रजीतुन बोलायला लागले अन हा पठठया मराठीतुन बोलायला लागला. मग एकजण म्हणाला अहो, एवढया फाईव्ह स्टार हाॅटेलचे मालक तुम्ही; अन तुम्हाला इंग्रजी येत नाही का ? तुम्ही इंग्रजी शिकला नाहीत का ? तसा हा पठठया म्हणाला इंग्रजी शिकलो असतो तर आत्तापर्यंत देवळात घंटाच वाजवत बसलो असतो……
यशाकडे नेणाऱ्या पुष्कळ वाटा असतात हो, एक दार बंद झाल तर त्या झोळीत दहा दार उघडलेली असतात. तुम्ही एकाच दारावर नका टकरा मारत बसु. आम्ही काय करतो एक दार बंद झाल ना, की तिथच हातपाय गाळुन शांत बसतो. काहीच नाही होणार आता, हा दरवाजा उघडच नाही…
दरवाजा स्वत:हुन नाही उघडणार; तुला उघडावा लागेल.
रस्ता तुझ्यापुढे नाही येणार; तुला स्वत:ला रस्ता निर्माण करावा लागेल नाहीतर शोधावा लागेल.
एक जिवंत नियम आहे-
सांगा म्हणजे कळेल,
मागा म्हणजे मिळेल,
शोधा म्हणजे सापडेल,
आणि ठोठवा म्हणजे उघडेल…
हे करणं ज्याला जमत त्याला यश मिळत…
शोधा म्हणजे सापडेल. दार ठोठवा म्हणजे उघडेल, कारण मागणार्याला मिळतं, शोधणार्याला सापडतं आणि दार वाजवणार्याला दार उघडतं.
विविध ताकदवान औषधांच्या निर्मितीत वापरली जाणारी, अश्वगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती असुन, सामान्यता भारतात मध्यप्रदेश व महाराष्ट्रात आढळून येते. भारताशिवाय स्पेन, मोरोक्को, इस्त्राईल, बलुचीस्थान व पूर्व आफ्रिकन देशांमध्ये उत्पादित केली जाते. ह्या वनस्पतीच्या झाडाला हातावर घासले असता घोड्याच्या मुत्रासारखा हिचा गंध येतो.
‘पागडी’ हा शब्द घरासंदर्भात वापरला जातो. मुंबईकरांच्या अतियंत जिव्हाळ्याचा असलेला हा शब्द, हल्लीच्या पुनर्विकास आणि त्यातून मिळणाऱ्या ओनरशिप घरांच्या काळात हळुहळू विस्मृतीत चाललाय. पण एकेकाळी मुंबईत कुठेही घर घ्यायचे असलं, की ते पागडीनेच मिळायचं. आजची वैभवशाली मुंबई घडवलीय, ती अशाच पागडीच्या घरात राहून कष्ट करणाऱ्या मुंबईकरांना. या अर्थाने ‘पागडी’ या शब्दाशिवाय मुंबईचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही.
दिनांक २८ मे म्हणजे एका तेजस्वी स्वातंत्र्यसूर्याची जयंती अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस. स्वातंत्र्यसमरातील ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यात स्वा. सावरकरांचं खूप वरचं स्थान आहे. ज्या व्यक्तिमत्वाला कोठी कोटी प्रणाम केले तरी कमी पडतील अशा या स्वा. सावरकरांच्या स्मृतीपुढे त्यांच्या या जन्मदिनी नतमस्तक होऊ या. कारण स्वा. सावरकर हे केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हेत तर ते म्हणजे मध्यान्हीचा तळपता क्रांती सूर्यच होते.
व्हेगन डायट. व्हेगन डायट म्हणजे प्राणिजन्य अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, अंडी हे पदार्थ देखील खाण्यास वर्ज्य मानतात.
Copyright © 2025 | Marathisrushti