(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

  • नसती उठाठेव!

    'सामर्थ्य आहे चळवळीचे' ही समर्थांची उक्ती सर्वज्ञात आहे. निश्चितच चळवळीत सामर्थ्य असते. अशाच एका चळवळीच्या सामर्थ्यातून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

  • अमेरिकेतील छोटी गावे – भाग ४

    पालक देखील तेवढेच मनापासून शाळेत सहभागी होणारे. संध्याकाळचे जेवण पाच साडेपाच वाजताच आटोपून चर्चमधे choir प्रॅक्टीस (समूह - गान) करायला जाणे नित्याचेच. त्यामानाने शाळेतले कार्यक्रम कधीतरी होणारे, आणि म्हणून अधिक लोकप्रिय. आपल्या मुलांच्या शाळेतल्या बेसबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, फुटबॉल वगैरे टीम्सना पालकांचा उदंड प्रतिसाद असतो. आसपासच्या गावातल्या इतर छोट्या शाळांच्या टीम्स आल्या की सामने मोठे अटीतटीचे होतात. मोठमोठ्या व्यावसायिक खेळांच्या टीम्स प्रमाणे छोट्या छोट्या शाळांच्या टीम्सना देखील स्वत:ची जान पेहचान असते. ह्या टीम्स मग आपल्या गावाच्या नावापुढे आपल्या टीमचं नाव लावून स्वत:ची ओळख निर्माण करतात. जसं सू सेंटर वॉरियर्स, रॉकव्हॅली रॉकेट्स, डिक्सन सिटी ईगल्स वगैरे. प्रत्येक टीमचा युनिफॉर्म आणि रंगसंगती ठरलेली असते. त्यामुळे आपल्या शाळेच्या टीमला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या रंगसंगतीची जॅकेट्स किंवा टोप्या वापरून पालक, इतर कुटुंबीय आणि मित्रमंडळी अशा सामन्यांना आवर्जून उपस्थिती लावतात. खेळांप्रमाणेच शाळांचे band concerts देखील असेच भरपूर लोकप्रिय असतात. चार-सहा महिन्यांतून जेंव्हा कधी असा concert शाळेच्या सभागृहात किंवा जिम्नॅशियम मधे सादर होतो तेंव्हा मुलांचे आई वडील, आजी आजोबा, लहान भावंडं असा सगळा लवाजमा हजर असतो.

    सॉकरची प्रॅक्टीस गावातल्या मैदानावर होते तेंव्हा लहान मुलामुलींच्या टीम्स आजूबाजूच्या ग्राउंड्सवर खेळत असतात. मुलांचे आई-वडील, आजी-आजोबा, भावंडं घरनं येतांना गाडीतून घडीच्या खुर्च्या, सतरंज्या वगैरे घेऊन येतात. मग दोन ग्राउंड्सच्या मधल्या जागेत खुर्च्या, सतरंज्या टाकून हा सारा कुटुंब कबिला विसावतो. मोठी माणसं कौतुकाने आपल्या मुला/नातवंडांना खेळताना बघत असतात. लहान मुलं आसपास धावपळ करत असतात. उन्हाळ्याचे तीन-चार महिने आणि त्यातून मिळणारे मोजकेच लख्ख सूर्यप्रकाशाचे दिवस, खुली मोकळी हवा आणि निसर्गाशी जवळीक सगळे जण मनापासून उपभोगत असतात.

    मिडवेस्ट आणि ग्रेट प्लेन्सच्या बर्‍याचशा भागात गावांमधली अंतरं खूप. काही छोटी गावं तर इतकी दूर दूर असतात की तिथून कुठे जायचं म्हणजे अंतराचा हिशोब न करता तासांचाच हिशोब करावा लागतो. गावात असलंच तर एखादं छोटंस किराणामालाचं किरकोळ दुकान असणार. आठवड्याची किंवा पंधरवड्याची खाण्यापिण्याची सोय करायची म्हणजे अर्ध्या पाऊण तासावर जरा बर्‍याशा गावी जायचं. कपड्यांची वगैरे खरेदी करायची म्हटली तर दीड दोन तासांचा पल्ला गाठून एखाद्या बर्‍यापैकी मोठ्या गावात जायचं. मग या छोट्या गावातल्या मुला माणसांसाठी, साधी कपड्यांची खरेदी म्हणजे एक छोटंस काम न राहता तो एक सोहळाच बनतो. ठेवणीतले कपडे घालून, थोडंसं नटून सजून, धुळी चिखलानं भरलेली गाडी धुवून, लोक अशा मोठ्या गावात जातात. मग नुसतंच घाईघाईने खरेदी उरकून घरी परतण्यात काय मजा? मग कुठे नुसतं मोठ्या गावातल्या प्रशस्त रस्त्यावरून फिरणं, थोड्या मोठ्या आणि लखलखीत इमारती बघत रहाणं, खाणं पिणं, एखादा सिनेमा बघणं, ट्रॅक्टरच्या किंवा पिक-अप ट्रकच्या शोरूम्स मधे जाऊन नवीन ट्रक किंवा ट्रॅक्टर्स बघणं, असा भरगच्च कार्यक्रम असतो. लोक भल्या सकाळी आपल्या गावातून निघतात आणि दिवसभर अशी जीवाची चैन करून रात्री अंधार पडला की परत आपल्या खेडेवजा छोट्या गावाकडे परततात.

    -- डॉ. संजीव चौबळ

  • कोकणातील कातळशिल्पे

    मार्च 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुक्रमे 5 आणि एक आणि गोव्यातील एक ठिकाण अशा एकूण 7 कातळ खोदशिल्पे असलेल्या गावांचा समावेश करण्यात आला. कोकणाला खूप मोठा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ह्या कातळ खोद चित्रांच्या रूपाने तो पुढे येत आहे.

  • समन्वयाचा बोजवारा

    ब्रिटिशांनी भारतातून काढता पाय घ्यायला साठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे; परंतु त्यांनी जाताना आपल्या ज्या काही बऱ्या वाईट स्मृती इथे ठेवल्या त्यांचे ठसठशीत अस्तित्व आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवते. अशा अनेक स्मृतींपैकी एक म्हणजे त्यांनी या देशात रूढ केलेली प्रशासकीय व्यवस्था. ब्रिटन हा मुळातच भारताच्या तुलनेत एक चिमुकला देश, त्यामुळे खंडप्राय भारतावर हुकूमत गाजवायची असेल तर राज्यकर्त्यांना पूरक ठरणारी, मदत करणारी व्यवस्था इथल्या लोकांनाच हाताशी धरून उभी करणे त्यांना भाग होते.

  • आजचा आरोग्य विचार – भाग एक

    आरोग्य मिळवण्यासाठी माझं नेमकं काय चुकतंय ? मी पाश्चिमात्य विचारांच्या प्रभावाखाली कसा कधी आलो, आणि जे मूलतः भारतीय नाही, पण ज्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आहे, अशा अनेक गोष्टींना मी माझ्या रोजच्या जीवनात कसं सामावून घेतलंय,
    हे माझं मलाच विसरायला झालंय. त्याची आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.

  • किचन क्लिनीक – दालचिनी

    हा देखील गरम मसाल्यातील एक अत्यंत सुगंधी पदार्थ.आपल्यापैकी बरेच जण ह्याचा उपयोग जेवणातील मसालेभात,पुलाव,गरम मसाला ह्या मध्ये तर केला जातोच.पण चहा अथवा काॅफी बनवताना देखील दालचिनी वापरली जाते.

    दालचिनीचा वापर आपण घरगुती औषधामध्ये देखील करू शकतो.वाचून आश्चर्य वाटले का?
    दालचिनीचा व्रुक्ष नेहमी हिरवागार असतो.आणी आपण वापरत असलेली दालचिनी ही त्या झाडाच्या बुंध्याची त्वचा हो.ह्यात एक उडवशील सुवासिक तेल असते ज्याचा बराचसा उपयोग त्याच्या औषधी गुणधर्मामध्ये होतो.

    दालचिनी ही चविला कडू,गोड अशा मिश्र चवीची असते आणी उष्ण असते.ती शरीरातील वात आणी कफ दोष कमी करते आणी पित्त दोष वाढवते.

    आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूयात:

    १)दात किडून दुखत असल्यास दालचिनीच्या तेलात भिजविलेला कापूस दाता खाली धरावे वेदना कमी होतात.

    २)सर्दी,खोकला ह्या मध्ये सुंठ+दालचिनी+धणे घालून केलेला काढा प्यावा.

    ३)वारंवार पोटात क्रूमी होण्याची सवय असल्यास २ इंच दालचिनी +३० वावडींग दाणे+१ चिमूट हिंग पूड हे मिश्रण दररोज साधारण दहा ते पंधरा दिवस घ्यावे व वर कोमट पाणी प्यावे.हा प्रयोग दर तीन ते सहा महीन्यांनी परत करावा.

    ४)लिंबाच्या रसात दालचिनी उगाळून लावल्यास वांग आणी चामखीळ कमी होतात.

    ५)वाढत्या वया सोबत काहीजणांची लघ्वीची तक्रार वाढते जसे वारंवार थोडी थोडी लघ्वी होणे,लघ्वीवरचा ताबा सुटणे,किंवा झालेली लघ्वी न समजणे ह्यात १/२ चमचा दालचिनी पूड सकाळ संध्याकाळी गरम पाण्यासोबत घ्यावी.

    दालचिनीच्या अतिवापराने एसिडीटी,तोंडात उष्णतेचे फोड येणे,तसेच शरीरातील धातूंना क्षीणता येणे अशा तक्रारी उत्पन्न होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • प्रसारमाध्यमातून झिरपणारी ‘नग्नता’

    उदात्त प्रेम आज का निपजत नाही? पूर्वीची प्रेमगीते ही उदात्त होती, संस्कारक्षम होती, शरीर स्पर्शसुध्दा नव्हता. नग्नता मनाला शिवतही नव्हती. सौंदर्याचे आयाम इतके बदलले की केवळ नग्नतेच सौंदर्य शोधणं सुरु झाले. नग्नतेपलिकडेही काही सात्विक, सुंदर आहे, सत्य आहे, शिवासारखे आहे हे जाणवायला हवं तरच विकृती संस्कृतीवर मात करणार नाही.

  • वनस्पतींच्या बीजप्रसाराचे रहस्य

    बीजप्रसार: प्राणी जसे त्यांच्या अस्तित्वासाठी व वाढीसाठी अधिवास बदलू शकतात, तसे वनस्पतींना अधिवास बदलता येत नाही. आपला प्रसार बीजांद्वारे व्हावा या उद्देशाने वनस्पती उत्क्रांत झालेल्या आहेत. मात्र अंकुरणासाठी व वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असेल अशा ठिकाणी त्यांच्या बीजांचे आगमन व्हावे लागते.
    बीज म्हणजे व्यावहारिक भाषेतील बी. बीज म्हणजे भ्रूण स्वरूपातील वनस्पती असून ती संरक्षक बाह्यकवचाने आच्छादलेली असते. बीजाचे अंकुरण घडून आले की, त्याच जातीची वनस्पती निर्माण होते.

    १) आवृतबीजी असलेले फळ : नारळ
    २) अनावृतबीज असलेली फळे: सायकस
    ३) आवृतबीजी वनस्पती सु. २,५०,००० आहेत. या वनस्पतींना फुले येतात. फुलांतील अंडाशयापासून फळे बनतात. फळांच्या आत बीजे असतात. उदा., गवते, झुडपे, वृक्ष, महावृक्ष व वेली. सु. आठशे अनावृतबीजी वनस्पती आहेत. बहुधा अनावृतबीजी वनस्पती शंकू निर्माण करतात. उदा., सायकस, देवदार, पाईन इत्यादी.

    पण त्यांतील आकार, रंग, वासाचं वैविध्य असते.. नुसत्या फुलांच्याच नव्हे तर बियांच्यामधलं वैविध्य पाहून तर मती गुंगच होईल. ह्या बियांमध्ये, त्यांच्या पोतांत, रंगांत, आकारांत असतात. जणू कांही माणिकमोतीच. आणि या बियांमधल्या पंखपऱ्यांची विविध रुपं असतात. ह्यांचे रंग पाहून कोणीही हरखून जाईल अशाच आहेत. आकार, आकारमान व संरचना अशा बाबतींत वनस्पतींच्या बियांमध्ये फरक दिसून येतो. जहरी नारळाचे बीज सर्वांत मोठे असून त्याचा व्यास सु. ३० सेंमी. व वजन सु. १८ किग्रॅ. असते. याउलट, ऑर्किडच्या सुमारे आठ लाख बीजांचे वजन जेमतेम २५-२८ ग्रॅ. भरते. प्रत्येक वनस्पतीमध्ये बीजाच्या आकारमानानुसार बीजांची संख्या ठरते. नारळाचा वृक्ष मोठ्या फळामागे एकच बीज निर्माण करतो, तर ऑर्किडसारख्या वनस्पती लहान आकारांची लाखो बीजे निर्माण करतात. मात्र वनस्पतींचा आकार आणि बीजाचा आकार यांच्यात काहीही संबंध नसतो. उदा., रेडवुड या महावृक्षाचे बीज केवळ १•६ मिमी. लांब असते.

    भ्रूण: बिया पाण्यात ठेवल्यास त्या फुगतात. त्या सोलून पाहिल्यास बीजावरणाखाली असलेले वनस्पतीच्या भ्रूणाचे भाग दिसतात. भ्रूणाचे बीजपत्र, उपरिबीजपत्र, प्रांकुर (कोंब), अधोबीजपत्र आणि मूलांकुर (मोड) हे भाग असतात. गहू, बाजरी, मका इ.च्या बीजांमध्ये एक बारीक अक्ष म्हणजे भ्रूणाक्ष दिसून येतो. त्याला एकच बीजपत्र असते. एकच बीजपत्र असलेल्या वनस्पतींना ‘एकदलिकित वनस्पती’ म्हणतात. एरंड, वाटाणा, पावटा इत्यादींच्या बीजांमध्ये दोन बीजपत्रे असतात, त्या वनस्पतींना ‘द्विदलिकित वनस्पती’ म्हणतात.
    अनावृतबीजी वनस्पती : बहुतेक अनावृतबीजी वनस्पतींच्या बाबतीत प्रजननाचे कार्य त्यांच्यावर वाढणारे शंकू करतात. या वनस्पतींना फुले येत नाहीत. काही वृक्षांवर नर व मादी अशा दोन्ही प्रकारचे शंकू, तर काही वृक्षांवर फक्त नर शंकू किंवा मादी शंकू असतात. प्रत्येक शंकूमध्ये खवल्यासारख्या संरचना असतात. मादी शंकूच्या प्रत्येक खवल्याच्या वरच्या पृष्ठभागावर दोन बीजांडे तयार होतात. नर शंकूच्या खवल्यापासूनही बीजाणू तयार होतात आणि या बीजाणूंपासून परागकण तयार होतात.

    बीजप्रसार:
    पर्यावरण अनुकूल असताना म्हणजे योग्य तापमान व पुरेशी आर्द्रता असताना देखील काही वेळा बीजे अंकुरत नाहीत, असे दिसून येते. बीजांची ही सुप्तावस्था असते. बीजांच्या सुप्तावस्थेची दोन कार्ये असतात; (१) तयार होणारे रोप जगण्यासाठी पर्यावरणाची इष्‍ट स्थिती असताना अंकुरण घडवून आणणे आणि (२) एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपली सर्व संतती एकाच क्षणी नाश होऊ नये यासाठी बियांचे अंकुरण टप्प्याटप्प्याने घडवून आणणे. थोडक्यात बीजांची सुप्तावस्था पर्यावरणावर अवलंबून नसून ती बीजांची अवस्था असते.
    बीज प्रसार हेच खरी वनस्पतींचे वंश वृद्धी करण्यासाठी असणारी व्यवस्था आहे. त्यासाठी त्यांना आप आपल्या बीजात वैविद्धे आणून असणाऱ्या परिसराशी जुळवून घ्यावे लागते.
    (१) पाण्यामार्फत: नारळ; कमळ इ.
    (२) तडकल्याने : धोतरा; फुटाणी, अबोली, इ.
    (३) प्राण्यांमार्फत : लांडगा; शेळी, माणूस, वटवाघूळ, खार, पक्षी इ.
    (४) वाऱ्या मार्फ़त : गवत, धान्ये, ऑर्किड, व बहुसंख्य वृक्ष
    आता आपण वरील प्रत्येकाची उदाहरणासहित बीज प्रसारण कसे होते ते पाहू.

    (१) पाण्याद्वारे बीजप्रसारण: नारळ हे पाण्या द्वारे बीज प्रसाराचे उत्तम उदाहरण आहे. नारळाचे वृक्ष हे समुद्रकिनारी असल्यामुळे नारळ हे समुद्रात पडतात त्या ठिकाणापासून दूर वाहून नेले जातात व तेथे जाऊन रुजतात आणी बीज प्रसारण होते. तसेच कमळ, पाण लिली, हायड्रीला या सारख्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची बीजे पाण्याच्या लहरीं व वेगामुळे ते दूर वाहून जाऊन बीज प्रसारण होते.

    (२) तडकल्याने: हवामानातील तापमानाच्या फरकामुळे बिया तडकतात. धोतरा, फुटाणी, अबोली इ. बहुतेक वृक्षांच्या लांबसडक शेंगा ह्या हवेतील उष्णतेने वाळतात
    व फूटतात. त्यामुळे त्यांचे बीजप्रसारण होते. जसे कि मुरुडशिंग, गुलमोहर, बहावा, नीलमोहोर, पावटा, वाल, मटार इ.

    (३) प्राण्यांमार्फत : वाघनखी, लांडगा, आघाडा, गोखरू इ. काही बीजांवर किंवा फळांवर अंकुश किंवा तीक्ष्ण काटे असतात. लांडगा अथवा शेळी, अस्वल यांच्या केसाळ त्वचेमुळे त्यात बिया अडकतात व असे प्राणी दुसऱ्या क्षेत्रात जातात व बीजप्रसार करतात. उदा. विंचू व खाजकुयलीचे बीज.

    उंडी (Calophyllum) या वृक्षाचा बीजप्रसार वाटवाघुळांच्या मार्फत होतो. माणसे ज्या वेळी दाट शेतात किंवा दाट गवतात काम करतात त्यावेळी तेथे असलेल्या वनस्पतीच्या बिया त्यांच्या कपड्यावर चिकटतात व बीजप्रसार होतो. खारोटी पावसाळ्यासाठी बियांचा वेगवेगळ्या ठिकाणी साठा करून ठेवते आणी नंतर त्या जागा विसरून जाते. यामुळे त्या बिया पावसाळ्यात रुजतात. मुंग्यादेखील बीजप्रसार करतात. ज्या बियांपासून तेल मिळते अशा बिया मऊ व मांसल असतात. मुंग्या त्यांच्या वारुळात अशा बिया वाहून नेतात, त्यातील पोषक घटक खातात व त्यांना अखाद्य असलेला बीजाचा उरलेला कठीण भाग तसाच ठेवतात. त्यांपासून वनस्पती वाढतात.

    (४) पक्ष्यांमार्फत: चिमणी, खंड्या, पोपट इत्यादी पक्षी झाडांची फळे खातात व वहनही करतात. उदा. पेरू, डाळिंब असे करताना ते फळांच्या बिया खातात व काही न खाल्लेल्या बियाना चोची मारून टणक बिया मऊ करतात त्यामुळे बी उगवून यायला मदत होते.

    (५) वाऱ्यामार्फत बीजप्रसार: रूई, अर्जुन वृक्षांच्याच्या बिया, काटेसावर, गवत, इ.
    काही बीजे दूरवर वाऱ्यावर उडत जातात. अशा बीजांना पंख किंवा केसांचा झुपका असतो. पाईनच्या बीजांना पातळ व पापुद्र्यासारखे पंख असतात. शेवगा, कोयनेल व तामण यांच्या बीजांना पंख असतात. रुई व कापूस यांच्या बीजांच्या एका टोकाला केसांचा झुपका असतो. ऑर्किडच्या बिया धूलिकणांसारख्या हलक्या असल्याने वाऱ्यावर उडून जातात. काही बीजे फळांतच राहतात. अशा फळांना पंख असतात. उदा., साल, मधुमालती इ. ‘केंजळ’ वृक्षाचा ‘बिजोरा’ म्हणजे बियांचा गुच्छ आणि त्याचे लहानलहान पंख एकमेकांलगत असतो. एका मोठय़ा ‘बिजोरा’चा पसारा लालभडक असतो. कालांतरानं काळा पडतो. जमिनीवर पसरून मातीशी एकरुप होतो. ओर्चीड या मनमोहक फुलाच्या बियांचे प्रसारण सुद्धा वाऱ्यामार्फत होते. ‘बी’ हाताशी, नव्हे केसाशी धरून उडणाऱ्या ‘म्हाताऱ्या’ ही आपण कधीतरी पाह्य़ल्या असतीलच. निदान काटेसांवरीच्या नक्कीच. प्रत्येक म्हातारी म्हणजे पांढऱ्या केसांचा मऊ पुंजका असतो, त्याच्या टोकांशी कारळ्यासारखं काळं बी असतं. बाहेर पडताना या म्हाताऱ्याचे केस फुलून उलटे होतात आणि पांढऱ्या पॅराशूटसारख्या त्या धरतीवर विसावतात. निसर्गातील वैविध्य, रचनाचातुर्य, रंगाची योजना, हे झाडांत, फुलांत दिसते. तसे ते ‘बी’ मध्येही दिसते. पुनर्निर्मिती, वाढ, प्रसार, म्हणजे उत्पत्ति, स्थिति, विलय यांतून पुन्हा नवनिर्मिती अशा निसर्ग चक्रांतून निसर्ग वंशसातत्य टिकवत असते.

    बीजप्रसारण आणी पर्यावरण
    आपण पावसाळ्यात बरेच वेळा बघतो की एखाद्या वृक्षाखाली बऱ्याच बिया पडलेल्या असतात. त्यांचे अंकुरही उगवतात पण त्याचे वृक्षात रूपांतर होत नाही. कारण तेथे अन्न मिळवण्याची कठीण स्पर्धा असते. त्यामुळे त्या बिया आपोआप मारून जातात. वनस्पतींचे बीज प्रसारण हे पर्यावरण रक्षणाचे काम करते बीज दूरवर वाहून नेल्यामुळे ते नवीन परिसरात उगवते. यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होते. व हाच बीजप्रसारणाचा उद्देश असतो.

    संदर्भ :
    Dutta, A. C. A Class-Book of Botany, Calcatta, 1959. ISBN: 9780195637489

    मराठी विकिपीडिया परांडेकर, शं. आ.
    "Seed Dispersal" from William James Beal Originally published: 1898. गूगल बुक्स
    Seed Dispersal Theory and Its Application in a Changing World. R J Green. 2007
    गूगल . वरील बरेच लेख.
    सर्व फोटो गूगल वरून साभार

  • इस्राइल भारताचा खरा मित्र

    अस म्हणतात कि संकटाच्या काळी जो उभा रहातो तोच खरा मित्र. फायद्यासाठी कोणी मित्र होतात तर काही वेळ बघून जवळ येतात. तर काही पक्के मित्र रहातात. पण काही असे असतात कि जे एका हाकेवर धावून येतात. इस्राइल हा भारताचा असाच एक मित्र देश. बघयला गेल तर भारताच्या दृष्ट्रीने अगदी छोटा पण त्याची महती अशी आहे कि भले भले देश त्याच्यापासून वचकून आहेत.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग बारा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषध काम करत नाही - भाग तीन

    स्वतः ठरवून स्वतःच उपचार करणे हा आणखीन एक अति घातक प्रकार. कोणीतरी सांगितले म्हणून कुठेही, कोणत्याही नागरमुन्नळी सारख्या गावात सुद्धा स्पेशल गाड्या करून औषधे घेण्यासाठी लोक धावतात, याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या गाडीची काळजी घेतो, त्यात योग्य कंपनीचे, ऑईल, पेट्रोल, डिझेल घालतो. काही वेळा दुरुस्तीची वेळ आली तर त्या गाडीच्या स्पेशल मेकॅनिककडे नेतो. पण नशीबाने एकदाच मिळणाऱ्या या शरीरावर असे काही अत्याचारी औषधी प्रयोग करीत बसतो, की जणुकाही आपणाला आपले शरीर संपूर्णपणे कळलेलेच आहे.

    आपण कोणते औषध घेतोय, तो देणारा, तेवढा विश्वासार्ह आहे का, याची कोणतीही खातरजमा न करता, भोंदू वैद्य आणि बोगस डाॅक्टरांच्या मागे अक्षरशः धावतो, यात औषध देणाऱ्याला आपण शास्त्र बदनाम करीत आहोत, याचेही भान नसते. आणि घेणाऱ्याने आपली बुद्धी गहाण टाकलेली असते.

    प्रत्येक राज्याचे एक वैद्यकीय व्यवसाय नियामक मंडळ असते. जसे महाराष्ट्रात एमसीआयएम. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन हे सरकारने नेमलेले मंडळ आहे. या मंडळाकडे जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधित विद्यापीठाचे अधिकृत प्रशस्तीपत्रक सादर केले जाते तेव्हा, असे केल्यानंतर डाॅक्टरना वैद्यकीय व्यवसाय करण्याचा रितसर क्रमांक आणि प्रमाणपत्र मिळते. ते दवाखान्याच्या दर्शनी भागात लावलेच पाहिजे. असा नियम आहे. आपण रूग्ण म्हणून ज्यांच्याकडून औषधे घेणार आहोत, ते योग्य शिक्षण घेतलेले अधिकृत पदवीधर आहेत का, याची खात्री करून नंतरच त्यांची औषधे घ्यायची असतात. नाहीतर औषधांचे जे गंभीर दुष्परिणाम होतात, त्यांना सामोरे जावे लागते.
    आयुर्वेद, होमियोपॅथी, अॅलोपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध आणि युनानी या किमान पदवीधारकाकडून औषध घ्यावे, असा दंडक आहे.

    केवळ लक्षण सांगून, काही वेळा तर पूर्वीच्या डाॅक्टरनी केलेले निदान ऐकवून, स्वतःच पॅथाॅलाॅजीमधे जाऊन, रिपोर्ट करून, नेट वरून थोडीफार माहिती मिळवून, रोगाचे अचूक नावच सांगून, कोणत्याही पॅथीचे औषध घेणे ही खूप मोठी चूक होऊ शकते. यात मूळ शास्त्र बदनाम तर होतेच पण शरीराची जास्ती हानी होते, बोले तो, पूरी वाट लगती है । तेव्हा सावधान!!

    रुग्णाची अवस्था, रोगाची व्याप्ती, गंभीरपणा, रोगाचे भविष्यातील धोके, औषधांचे डोस, किती कालावधीसाठी औषध घ्यावे, पथ्यापथ्य इ. सर्व तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल ना ! केवळ वाॅटसपवरचे सल्ले, कुणातरी पुष्पादिदिवर विश्वास ठेवून, आंबट तिखट तेलकट बंद करा आणि आमची अमुक औषधे घ्या, टीव्ही वरील जाहीराती वाचून, शेजाऱ्यांचे ऐकून, घरी आलेल्या एजंटकडून औषधोपचार ठरवणे, हा चक्क मूर्खपणा आहे.

    अनेक वेळा आयुर्वेदीय औषधांमधे अॅलोपॅथीच्या औषधांची भेसळ केली जाते. त्यातही त्वरीत वेदनाशामक म्हणून स्टिराॅईड असलेली औषधे जास्त प्रमाणात दिली जातात, याचे परिणाम न सांगता सुद्धा थोबाडावर दिसतात. कानाखाली सूज येणे, औषध घेतल्यावर लगेचच दुख कमी होणे, औषध थांबवले की परत त्रास सुरू होणे, भूक खूप लागणे, तेच औषध मला परत परत घ्यावेसे वाटणे, ही सर्व स्टिराईड पोटात जात असल्याची लक्षणे आहेत. जी भविष्यात खूप हानीकारक ठरू शकतात.
    किडनी साफ करण्यासाठी लघवी होणारी औषधे, सेक्सची ताकद वाढवणारी, त्वचा विकार कमी करणारी काॅर्टीझाॅन मलमे, आवळा आणि कोरफड ज्युसच्या नावाने मिळणारे पाणी, कफ सिरपच्या नावाने मिळणारा साखरेचा पाक, नोनीचे मार्केटींग, एमेलेमच्या नावाखाली चाललेला टाॅनिकचा धुडगुस, जिममधे सुचवली जाणारी प्रोटीनची खिरापत, कित्ती किती अनावश्यक औषधे म्हणून सांगू...

    औषधांचा काळाबाजार हा प्रथितयश औषधांच्या तुलनेत कदाचित दोन ते तीन पट अधिक असू शकेल. असा अंदाज आहे.

    हे म्हणजे "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" अशी अवस्था होते. आधीच्या चुकीच्या औषधांचे दुष्परिणाम काहीवेळा सहा सहा महिने राहातात, आणि महत्वाच्या औषधाला गुण दिसत नाही, ही अवस्था तर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी होते. हे केवळ एकाच पॅथीमधे होत असे नाही तर सर्वच पॅथीमधे हा घोळ दिसतो. यावर सरकारचे लक्ष असेल नसेल, पण एक जबाबदार नागरीक म्हणून आपल्याला, आपल्या कुटुंबियांच्या हितासाठी, अनावश्यक औषधांचा अनावश्यक वापर टाळावा असा सल्ला द्यावासा वाटतो.

    नको त्या माणसाकडून, नको ती औषधे, नको त्या अवस्थेत घेतली की, परिणाम नको तेच दिसणार. आणखी दुसरं काय होणार ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.04.2017