जे जे स्कूल ऑफ आर्टस मध्ये असताना मला 1984 ला अंतरराज्य फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. दिल्ली येथे माझी फोटोग्राफी प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्याने खास निवड केली. दिवस होता 28 ऑक्टोबर 1984 प्रदर्शनाचा विषय होता प्रौढ शिक्षा. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या त्या वेळेच्या माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यावेळी प्रत्येक राज्यातून आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला गेला. त्यात माझा समावेश होता
June 16, 2026
२००० नंतरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी अधिक कॉर्पोरेट झाली. याच काळात ‘व्हॅम्प डान्स’ किंवा ‘स्पेशल गाणे’ या शब्दांची जागा अधिकृतपणे ‘आयटम नंबर’ (Item Number) या शब्दाने घेतली. हे गाणे आता चित्रपटाचा एक स्वतंत्र भाग मानले जाऊ लागले, ज्याचा वापर चित्रपटाच्या पहिल्या टीझर किंवा ट्रेलरच्या आधी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता (Hype) निर्माण करण्यासाठी केला जाऊ लागला.
August 24, 2026
सध्याच्या काळात आयटम सांग्सचे स्वरूप केवळ हिंदी चित्रपटसृष्टीपुरते किंवा केवळ चित्रपटगृहापुरते मर्यादित राहिलेले नाही. आता हे गाणे ‘पॅन-इंडिया’ (Pan-India) आणि ‘सोशल मीडिया रील्स ट्रेंड्स’ (Instagram Reels) च्या दृष्टीने तयार केले जाते.
September 2, 2026
१९८० चे दशक हे बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात मोठे संक्रमण मानले जाते. या दशकात चित्रपटातील पारंपरिक ‘व्हॅम्प’ किंवा स्वतंत्र डान्सरचे पात्र हळूहळू संपुष्टात आले. याचे मुख्य कारण म्हणजे, चित्रपटाच्या मुख्य नायिकांनी (A-list Heroines) स्वतःच ग्लॅमरस कपडे घालण्यास आणि पडद्यावर मादक व वेगवान गाणी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्या गाण्यांसाठी पूर्वी हेलन किंवा बिंदू यांना बोलावावे लागायचे, ती गाणी आता मुख्य अभिनेत्री स्वतःच करू लागल्या.
August 16, 2026
१९७४ साली ‘जय जगदीश हरे’ नाटकाच्या तालमीला अप्पासाहेब इनामदारही येत असत. त्यांचा मुलगा प्रकाश हा खलनायकाच्या मदतनिसाचं काम करीत असे. माझा प्रिय मित्र जयंत सावरकर माझ्या मित्राचं काम करायचा.
एकदा लंच टाइममध्ये अप्पासाहेब म्हणाले, “मला ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ या लोकनाट्याचे काही प्रयोग करायचे आहेत. त्यात शाहिराचं काम करशील का? ” हे लोकनाट्य मधुकर नेराळे (हनुमान थिएटरचे मालक) ‘जसराज थिएटर्स’ या संस्थेतर्फे पूर्वी सादर झालेलं होतं. (त्यावेळी हे लोकनाट्य फारसं चाललं नाही. पण नंतर ते ‘वैशाली थिएटर’ चे बी. पालांडे यांनी चालवायला घेतलं आणि त्याचे बरेच प्रयोग केले. ) दामू केंकरे दिग्दर्शित या लोकनाट्यात अप्पासाहेब स्वतः कीर्तनकाराची भूमिका करत असत. पूर्वरंगात शाहिराचं काम गायक नट प्रकाश घांग्रेकर हा करायचा व त्यातील कोतवालाची मुख्य विनोदी भूमिका नटवर्य शंकर घाणेकर करायचे.
July 4, 2026
त्याचवेळी विजय तेंडुलकर लिखित ‘एक हट्टी मुलगी’ हे नाटक रंगभूमीवर आणण्याचे ठरले. निर्माते मोहन तोंडवळकर, संस्था ‘कलावैभव’. नाटकाचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे. प्रमुख भूमिकेत विनोदी अभिनेते म्हणून गाजलेले शरद तळवलकर. भेंडेंना पार्श्वसंगीताची जबाबदारी नंदू भेंडे या त्यांच्या मुलाकडे द्यायचं मनात होतं. परंतु जयंत सावरकरांच्या प्रयत्नांमुळे ते काम करण्याची संधी मला मिळली. अर्थात मला त्या कामाचा अनुभव नव्हता. प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत वापरतात एवढंच ठाऊक होतं. देवाचं नाव घेऊन सुरुवात केली. नाटकाच्या तालमी पाहताना आवश्यक तेवढ्या जागा निश्चित केल्या. मध्यांतराआधीच्या प्रसंगानुरूप मिश्र शिवरंजनीचा एक पीस कंपोझ केला. त्यात सतारीची आवश्यकता होती. के. के. जीजीना ( तबलजी आबान मिस्त्री यांचे गुरू) यांनी ते करायचं कबूल केलं. त्याचं रेकॉर्डिंग झालं आमच्या फॅमिली डॉक्टर सुंदरताई गावस्कर – केंकरे (प्रख्यात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची आत्या ) यांच्या घरी. रात्री दहानंतर हे रेकॉर्डिंग केलं होतं. इतर वादक कोण होते ते आठवत नाही. पण जीजीना साहेबांनी ‘आपने ये पीस बहुत खूबसुरत कंपोझ किया है। इसे मै मेरे प्रोग्रॅम में इस्तेमाल करूंगा,’ अशी दाद दिली.
June 19, 2026
खरं तर ‘नयन तुझे जादुगार’ हे नाटक आधी ठरलं होतं. परंतु दारव्हेकर मास्तरांनी त्यांच्या संस्थेसाठी (रंजन कला मंदिर, नागपूर) प्रयोग करून झाल्यावर पुढे त्यात व्यावसायिकदृष्ट्या योग्य ते बदल केले आणि १९६७ साली ‘कलावैभव’साठी बसवलं. राज्य नाट्य स्पर्धेतल्या प्रयोगात ‘नयन तुझे जादुगार, थांबवी हे शरप्रहार’ हे एकच गाणं, एकदोन आदिवासी लोकांची गाणी आणि एक धुन एवढंच संगीत होतं. प्रसाद हा गायक असतो व ती भूमिका मला द्यायचं ठरलं होतं. त्यामुळे ‘उडुनि जा पाखरा’ हे गाणं आणि फुलवाचं काम करणाऱ्या कुमुद कामेरकरसाठी ‘नभी चंद्रमा धवल पौर्णिमा’ हे गाणं घालण्यात आलं. तिसऱ्या अंकात मास्तरांनी नायकासाठी एक भावगीत लिहिलं होतं.‘सोडुनि ही मयसभा, तोडुनी हे इंद्रजाल आज जायचे मना दूर दूर दूर’ हे पद लिहिलं गेलं होतं. अर्थात मुख्य नायक नरेन चव्हाण हा देखणा नट असला तरी तो गायक नव्हता. त्यामुळे ते माझ्याच वाट्याला आलं. म्हणजे मला तीन गाणी, कुमुदला दोन गाणी आणि लोकसंगीताची काही गाणी असं संगीत आलं.
June 22, 2026
१९५० च्या दशकातील भारतीय सिनेमा हा सामाजिक जाणिवा, स्वातंत्र्यसोहळ्यानंतरचा नवा भारत आणि कौटुंबिक मूल्यांवर आधारित होता. या काळात चित्रपटातील मुख्य अभिनेत्री (Heroine) ही अतिशय सुसंस्कृत, सोशिक, पारंपरिक साडी किंवा सलवार-कमीज नेसणारी आणि भारतीय सती-सावित्रीच्या प्रतिमेत बसणारी असायची. साहजिकच, अशा नायिकेला पडद्यावर मादक हालचाली करणे, पाश्चात्त्य शैलीत नाचणे किंवा क्लबमध्ये जाऊन मद्यधुंद गाणी गाणे पूर्णपणे वर्ज्य होते. या सामाजिक चौकटीतूनच बॉलिवूडमध्ये एका नव्या पात्राचा जन्म झाला, ज्याला ‘व्हॅम्प’ (Vamp) किंवा ‘खलनायिका/नर्तिका’ म्हटले गेले.
August 6, 2026
२०१० चे दशक हे बॉलिवूडमधील आयटम सांग्सच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि सर्वात स्पर्धात्मक दशक मानले जाते. या दशकात गाण्यांच्या लोकप्रियतेवरून दोन मोठ्या अभिनेत्री आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये उघड स्पर्धा पाहायला मिळाली.
August 28, 2026
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशा युती झाल्या ज्यांनी सिनेमाचा इतिहास कायमचा बदलून टाकला. अशीच एक अभूतपूर्व जुळणी म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दिग्गज संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी. १९७० आणि १९८० च्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीत संघर्ष करत होते आणि नंतर जेव्हा त्यांनी सुपरस्टारपद गाजवले, तेव्हा त्यांच्या पडद्यावरील व्यक्तिमत्त्वाला संगीताची खरी ताकद कल्याणजी-आनंदजी यांनीच दिली. आनंदजी आणि अमिताभ बच्चन यांच्यात केवळ व्यावसायिक संबंध नव्हते, तर अतिशय कौटुंबिक आणि आदराचे नाते होते. अमिताभ बच्चन जेव्हा जेव्हा गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जात, तेव्हा ते सर्वात आधी आनंदजींच्या पत्नीचे पाय छूकर आशीर्वाद घेत असत, इतकी आपुलकी त्यांच्यात होती.
August 2, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti