(User Level: User is not logged in.)

मनोरंजन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मी नाटकाचे पार्श्वसंगीत करतो

    त्याचवेळी विजय तेंडुलकर लिखित ‘एक हट्टी मुलगी’ हे नाटक रंगभूमीवर आणण्याचे ठरले. निर्माते मोहन तोंडवळकर, संस्था ‘कलावैभव’. नाटकाचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे. प्रमुख भूमिकेत विनोदी अभिनेते म्हणून गाजलेले शरद तळवलकर. भेंडेंना पार्श्वसंगीताची जबाबदारी नंदू भेंडे या त्यांच्या मुलाकडे द्यायचं मनात होतं. परंतु जयंत सावरकरांच्या प्रयत्नांमुळे ते काम करण्याची संधी मला मिळली. अर्थात मला त्या कामाचा अनुभव नव्हता. प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत वापरतात एवढंच ठाऊक होतं. देवाचं नाव घेऊन सुरुवात केली. नाटकाच्या तालमी पाहताना आवश्यक तेवढ्या जागा निश्चित केल्या. मध्यांतराआधीच्या प्रसंगानुरूप मिश्र शिवरंजनीचा एक पीस कंपोझ केला. त्यात सतारीची आवश्यकता होती. के. के. जीजीना ( तबलजी आबान मिस्त्री यांचे गुरू) यांनी ते करायचं कबूल केलं. त्याचं रेकॉर्डिंग झालं आमच्या फॅमिली डॉक्टर सुंदरताई गावस्कर – केंकरे (प्रख्यात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची आत्या ) यांच्या घरी. रात्री दहानंतर हे रेकॉर्डिंग केलं होतं. इतर वादक कोण होते ते आठवत नाही. पण जीजीना साहेबांनी ‘आपने ये पीस बहुत खूबसुरत कंपोझ किया है। इसे मै मेरे प्रोग्रॅम में इस्तेमाल करूंगा,’ अशी दाद दिली.

  • भारतीय संगीतसृष्टीचा अजरामर सुवर्णकाळ: एस. डी. बर्मन आणि आर. डी. बर्मन यांचा सांगीतिक प्रवास

    भारतीय संगीतसृष्टीचा अजरामर सुवर्णकाळ: एस. डी. बर्मन आणि आर. डी. बर्मन यांचा सांगीतिक प्रवास

    भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात बर्मन घराण्याचे योगदान अतुलनीय आहे. वडील सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) आणि मुलगा राहुलदेव बर्मन (आर. डी. बर्मन उर्फ पंचम दा) या पिता-पुत्राच्या जोडीने मिळून भारतीय संगीताला पारंपारिक लोकसंगीताच्या सुरांपासून ते आधुनिक पाश्चात्य फ्युजनपर्यंतचा एक विहंगम प्रवास घडवून आणला. निसर्ग, अथांग सागर आणि मानवी भावनांचा मिलाफ या पिता-पुत्राच्या गाण्यांमध्ये प्रकर्षाने जाणवतो.

  • १९७० च्या दशकातील मनोरंजनाची साधने

    १९७० च्या दशकातील मनोरंजनाची साधने

    १९७० च्या दशकात आजच्यासारखे स्मार्टफोन, इंटरनेट किंवा सॅटेलाइट टीव्ही (डिश टीव्ही) नव्हते. त्यामुळे त्या काळातील मनोरंजनाची साधने अतिशय मर्यादित होती. पण जी काही होती, ती माणसांना एकमेकांशी जोडणारी होती. एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क असायचा.

  • ‘जिंगल म्हणजे नक्की काय?’

    ‘जिंगल म्हणजे नक्की काय?’ असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. जिंगल म्हणजे जाहिरातीचं गाणं किंवा जाहिरातीकरता बनवलेले संगीत. जिंगलचेही तीन प्रकार असतात. एक म्हणजे नुसतंच गाणं. दुसरा प्रकार- जिंगल कम् स्पॉट. (यामध्ये गाणं आणि निवेदनही असतं. याला ‘व्हॉइस ओव्हर’असं म्हणतात.) आणि तिसरा- नुसतंच पाश्र्वसंगीत व व्हॉइस ओव्हर! ही जिंगल्स दहा सेकंद, वीस सेकंद, तीस सेकंद, चाळीस सेकंद किंवा एका मिनिटाची असतात.

  • आतून कीर्तन वरून तमाशा !

    १९७४ साली ‘जय जगदीश हरे’ नाटकाच्या तालमीला अप्पासाहेब इनामदारही येत असत. त्यांचा मुलगा प्रकाश हा खलनायकाच्या मदतनिसाचं काम करीत असे. माझा प्रिय मित्र जयंत सावरकर माझ्या मित्राचं काम करायचा.

    एकदा लंच टाइममध्ये अप्पासाहेब म्हणाले, “मला ‘आतून कीर्तन वरून तमाशा’ या लोकनाट्याचे काही प्रयोग करायचे आहेत. त्यात शाहिराचं काम करशील का? ” हे लोकनाट्य मधुकर नेराळे (हनुमान थिएटरचे मालक) ‘जसराज थिएटर्स’ या संस्थेतर्फे पूर्वी सादर झालेलं होतं. (त्यावेळी हे लोकनाट्य फारसं चाललं नाही. पण नंतर ते ‘वैशाली थिएटर’ चे बी. पालांडे यांनी चालवायला घेतलं आणि त्याचे बरेच प्रयोग केले. ) दामू केंकरे दिग्दर्शित या लोकनाट्यात अप्पासाहेब स्वतः कीर्तनकाराची भूमिका करत असत. पूर्वरंगात शाहिराचं काम गायक नट प्रकाश घांग्रेकर हा करायचा व त्यातील कोतवालाची मुख्य विनोदी भूमिका नटवर्य शंकर घाणेकर करायचे.

  • संत कान्होपात्रा

    १९७४ च्या जानेवारीत अभिषेकी बुवा शिवाजी पार्कची जागा सोडून लोणावळ्याला गेल्यामुळे गाण्याच्या शिक्षणात खंड पडला होता. एकदोनदा मी तिथे गेलो. परंतु मनासारखं शिकणं होईना. तेव्हा त्यांच्याच परवानगीने मी नंतर पं. गोविंदराव अग्नि यांच्याकडे गाणं शिकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे साधना पालांडे (वैशाली थिएटरचे मालक बी. पालांडे यांची पत्नी) या गाणं शिकण्यासाठी येत होत्या. श्रीमती कान्होपात्राबाई, रजनी जोशी याही येत असत.

  • सौभद्र’ ची ऐतिहासिक जुगलबंदी

    सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’चे अधूनमधून प्रयोग होत होते. अधूनमधून नाट्यसंगीत मैफिलींसारखे कार्यक्रमही होत होते. मी जिथे रहातो (फॉर्जेट हिल) त्याच्यासमोर नवयुगनगर नावाची एक सोसायटी आहे. तिथे भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर रहात होते. त्यांच्या संस्थेत काम करायला मिळावं अशी इच्छा होती. पण योग येत नव्हता.

    १९७४ च्या डिसेंबर महिन्यात अण्णांचा फोन आला. त्यांनी भेटायला बोलावलं होतं. मी गेलो. त्यांनी विचारलं “सौभद्र’ नाटकात नारदाची भूमिका करणार का?” मी अर्जुन करत होतो. उंच असल्यामुळे नारद करण्याचा प्रश्न नव्हता.

  • एस. डी. बर्मन यांच्या अजरामर गाण्यांचे पडद्यामागील रंजक किस्से

    एस. डी. बर्मन यांच्या अजरामर गाण्यांचे पडद्यामागील रंजक किस्से

    भारतीय चित्रपट संगीताचे भीष्माचार्य सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) हे केवळ एक थोर संगीतकार नव्हते, तर त्यांचा आवाज म्हणजे थेट काळजाला भिडणारी एक अद्भूत अनुभूती होती. बर्मन दादा व्यावसायिक पार्श्वगायक नसले, तरी त्यांनी चित्रपटाच्या पार्श्वभूमीत (Background) स्वतः गायलेली गाणी कथेला आणि पात्रांच्या भावनांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जायची. गाण्यातील भाव आणि वातावरण हुबेहूब जिवंत ठेवण्याच्या त्यांच्या या संगीतवेडाचे पडद्यामागील काही अत्यंत रंजक आणि भावनिक किस्से

  • वाऱ्यावरची वरात

    मी नाटकाचे दौरे किंवा इतर काही कार्यक्रम नसले की, रोज अभिषेकी बुवांच्या घरी जात असे. ‘लाडकी लक्ष्मी’ नाटकाच्या गोव्याच्या दौऱ्यात एक दिवस सुट्टी होती. माघी पौर्णिमेचा दिवस. मंगेशीला मोठा उत्सव असतो. रात्रभर जागरण, पहाटे रथोत्सव. खूप उत्साही वातावरण असतं. आम्ही मंगेशीचे महाजन. आमचा मुक्काम मंगेशीहून जवळच्याच माशेल गावात होता. मी मंगेशीला पोहोचलो. म्हटलं, गोव्यात आहोत तर उत्सव पाहुया. बुवांच्या तिथल्या घरी गेलो. म्हटलं आई, भाऊला भेटावं. बघतो तर काय प्रत्यक्ष अभिषेकी बुवाच !

  • जिंदगी का सफर

    जिंदगी का सफर

    जीवन…..म्हणजे नक्की काय? कुणी जाणलंय?कुणाला कळलंय?सगळंच अतर्क्य! चौऱ्याऐशी दशलक्ष योनीतून एकदाच हा जन्म मिळतो.त्यापासून शोध घ्यावा की बोध? सारंच अनभिज्ञ!अकल्पित! जीवनाचा हा प्रवास की प्रवाह?……हे फक्त “आपले आयुष्य आपण वाहून नेण्यात की वाहवून जाण्यात” पणाला लावतोय,यावर ठरत असतं.गंध उगाळल्याशिवाय पाजळत नाही,हेच खरं!वाट्याला आलेलं आयुष्य कल्याणकारी होण्यासाठी त्यावर मेहनतीचा अखंड अभिषेक केल्याशिवाय पर्याय नाही.त्यातून फलनिष्पत्ती होईल की नाही,हे कर्मावर सोपवावं. निस्वार्थ परोपकारी वाटचालीतून परमार् प्रगट होतो. त्यासाठी लाभार्थी कोण? हे ठरवणंही आपल्या हातात नसतं.