(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • मराठी रंगभूमीवरचा विक्रमादित्य अभिनेता प्रशांत दामले

    प्रशांत दामले यांना मराठी रंगभूमीवरचा विक्रमादित्य अभिनेता म्हणले जाते. त्यांचा जन्म ५ एप्रिल १९६१ रोजी झाला. त्याच्या अभिनय कारककिर्दीला एकोणचाळीसहून अधिक वर्षे पूर्ण झाली. या काळात त्याने जवळपास आठ हजार नाटकांचे प्रयोग केले आहेत. मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील प्रशांत दामले यांची कारकीर्द १९७८ मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून प्रशांत दामले दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. यात एका मद्रासी माणसाची त्यांनी भूमिका केली होती. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. दरम्यानच्या काळात त्याला चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या, त्यांनी अनेक चित्रपटही केले. मात्र तेथे त्याचे मन रमले नाही. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ३७ चित्रपटांत आणि २६ नाटकांत अभिनय केला आहे. यातील "चार दिवस प्रेमाचे", "जादू तेरी नजर", "गेला माधव कुणीकडे", "एका लग्नाची गोष्ट", "ओळख ना पाळख", "प्रियतमा", "मोरूची मावशी", "लग्नाची बेडी", "लेकुरे उदंड झाली", "शूss कुठं बोलायवं नाही", "नकळत दिसले सारे" आणि "कार्टी काळजात घुसली" प्रमुख आहेत. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांमध्ये “अक्का”, “आई पाहिजे”, “आत्मविश्वास”, “आनंदाचे झाड’, “आम्ही दोघे राजा राणी”, “इना मिना डिका”, “एक रात्र मंतरलेली”, “एकदा पहावं करुन”, “खुळ्यांचा बाजार”, “घरंदाज”, “चल गंमत करु”, “चार दिवस सासूचे”, “तू तिथं मी”, “पसंत आहे मुलगी”, “पुढचं पाऊल”, “फटफजिती”, “बंडलबाज”, “बाप रे बाप”, “मधुचंद्राची रात्र”, “माझा छकुला”, “रेशीमगाठी”, “वाजवा रे वाजवा”, “विधिलिखित”, “सगळीकडे बोंबाबोंब”, “सगळे सारखेच” आणि “सवत माझी लाडकी” हे प्रमुख आहेत. दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत काम केले आहे. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका मालिका फार लोकप्रिय झाली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये मा.प्रशांत दामले यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्ड्‌स नोंदली गेली आहेत. त्यांमध्ये २४ डिसेंबर १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी २००१ ला मा.प्रशांत दामले यांनी एकाच दिवशी ५ प्रयोग करायचे ठरवलं अर्थात त्याचं नियोजनहि केलं होतं. सकाळी ७ वाजता पहिला प्रयोग सुरु झाला तो रात्री ११.५५ ला पाचव्या प्रयोगाचा पडदा पडला.हा प्रशांत दामले यांचे लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्ड झाले. यात गेला माधवचे २ प्रयोग, एका लग्नाची गोष्ट १ आणि चार दिवस प्रेमाचे २ प्रयोगांचा समावेश होता. प्रशांत दामले यांना सुंदर आवाजाची दैवी देणगी लाभली आहे. गायक-नट म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत. 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं' सारखं सुंदर नाट्यगीत गाणाऱ्या मा.प्रशांत दामलेंनी झी मराठीवरील सारेगमप स्पर्धासुद्धा जिंकली होती. प्रशांत दामले हे उत्तम निवेदक आहेत. अनेक गाण्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे, मुळातच खाण्याची आवड असलेले प्रशांत दामले गेली काही वर्ष झी मराठीवरील 'आम्ही सारे खवय्ये' कार्यक्रमाचे खमंग सूत्रसंचालन करतात.

    प्रशांत दामले यांची वेबसाइट
    www.prashantdamle.com
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मला सांगा सुख म्हणजे
    https://www.youtube.com/watch?v=mvf0L3x0LzA
    प्रशांत दामले यांची नाटके
    https://www.youtube.com/watch?v=JZl_zwm_IPI
    https://www.youtube.com/watch?v=PD-mBpCvTAw

  • लेखक जगन्नाथ कुंटे तथा स्वामी अवधूतानंद

    तीन वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पुस्तक लिहिले. या परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव अत्यंत रोमांचक आणि अचंबित करणारे आहेत. लेखकपणाचा कोणताही आव न आणता फक्त घटनेशी भिडण्याच्या त्यांच्या शैलीने वाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली.

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. के. पी. साळवे

    व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या साळवेंचा आंतरराष्ट्रीय अर्थकारणापासून जागतिक करव्यवस्थेपर्यंत गाढा अभ्यास होता. भारत हा सर्वाधिक करवसुली करणारा देश आहे, असे त्यांचे मत होते. इन्कम टॅक्स व प्रॉपटी टॅक्स कमी झाले पाहिजेत, याविषयी ते आग्रही होते. इंदिरा गांधी यांच्या कारकिदीर्त साळवे यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या संयुक्त समितीच्या शिफारशींनुसार, १९७५ साली भारतीय कर व्यवस्थेत महत्त्वाचे बदल झाले.

  • सहकार क्षेत्रातील जेष्ठ नेते वसंतदादा पाटील

    सहकार क्षेत्रात दादांचा प्रत्येक शब्द अंतिम मानला जात असे. वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले होते पण महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी – असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.

  • संगीत शाकुंतल

    संगीत शाकुंतल' या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला १३७ वर्षे झाली.

    ज्याला अस्सल मराठी संगीत नाटक म्हणून संबोधिता येईल अशा नाटकाचे आद्य प्रवर्तक अण्णासाहेब किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत. १८८० साली पुणे मुक्कामी मा.अण्णासाहेब किर्लोस्करांनी 'इंद्रसभा' नावाचे पारसी नाटक - उर्दू भाषेतील - पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी 'संगीत शाकुंतल' या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला. किर्लोस्करांनी कवी कुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले. आणि त्या मराठी `शाकुंतला'चा पहिला प्रयोग म्हणजे संगीत नाटकाची गंगोत्री होय. या प्रयोगात जवळपास शंभर पदे होती. आणि या पदांची रचना ओवी, लावणी, साकी, दिंडी इ. रूढ छंदांना अनुसरणारी होती.

    १३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्याच्या तंबाखू आळीत दसर्या्च्या मुहूर्तावर 'शाकुंतल'च्या पहिल्या तीन अंकांची रंगीत तालीम झाली. आणि रविवार ३१ ऑक्टोबर १८८० रोजी बुधवार पेठेतील भांग्या मारुतीसमोरच्या तांबेकरांच्या वाड्यात असलेल्या आनंदोद्भव नाटकगृहाच्या गच्च भरलेल्या तिन्ही मजल्यांसमोर शाकुंतलाचा पहिला प्रयोग झाला. पुढे पाच वर्षांनी म्हणजे १८८० मध्ये आणखी एका अंकाची भर घालून अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी याच ठिकाणी पाच अंकी ‘संगीत शाकुंतल’ सादर केले होते. याने व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली.

    भारतीय नाटशास्त्राचा पाया भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. रंगमंचावरील नेपथ्य, संगीत, नृत्य, वेषभूषा, रंगभूषा, अभिनय, दिग्दर्शन इथपासून रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिराचे बांधकाम कसे करावे, त्यासाठी भूमीची निवड, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम, पथ्ये भरताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला पाचवा वेद मानलं जातं. भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे जेव्हा इतिहासकाळात नाटके होत असत, तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी सुरुवातीला धृवागीतं वाजवली जात असत - ती वाद्यांवर वाजवली जात. त्यांत दोन प्रकार होते - निःशब्द धृवागीत आणि सशब्द धृवागीत. प्रथम निःशब्द धृवागीत वाजवले जात असे, जेणेकरून लोकांना कळावे, की आज इथे काहीतरी नाटक आहे. निःशब्द धृवागीताने एकप्रकारे सुरांचे गूढ असे वातावरण निर्माण होत असे. पण नाटक म्हणजे शेवटी शब्दसृष्टी. त्यामुळे निःशब्द धृवागीतानंतर सशब्द धृवागीत होत असे. त्यालाच आपण आज नांदी म्हणून ओळखतो.

    नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी असे. त्यानुसार 'संगीत शाकुंतल' नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. 'पंचतुंड नररुंडमालधर' ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्या स तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत असा अचानकपणे बदलून गेला.

    'संगीत शाकुंतला'ची नांदी.
    (राग : खमाज, ताल : धुमाळी, चाल : जय श्री रमणा भयहरणा)
    पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितो ॥
    विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥ ध्रु.
    कालिदास कविराज विरचित हें, गाती शाकुंतल रचितों
    जाणुनिया अवसान नसोनि महकृत्यभर शिरिं घेतो
    ईशवराचा लेश मिळे तरि मूढ यत्न शेवटि जातो
    या न्याये बलवत्कवि निजवाक्यपुष्पिं रसिकार्चन करितो ॥
    नांदीनंतर सूचकपद असे. शाकुंतलाच्या नांदीच्या सूचकपदाची झलक ही अशी.
    अष्टमुर्ती परमेश सदाशिव तुम्हां शिव देवो
    यदृपाविण विश्वचि हा भास हृदयी ठसवो

    सूचकपदातून नाटकाचं साधारण कथानक हे नटेश्वराच्या आयुष्यावर बेतून सांगितले जायचे. जणू काही नटेश्वराच्या जीवनामध्ये या घटना घडल्या आहेत, असे समजून त्याला उद्देशून हे सूचकपद म्हणायचे कारण ती असायची त्या नाटकाच्या एकूण कथासूत्राची सुरुवात. नाटकाचा मूळ उद्देश हा मनोरंजनाचा असल्याने नाटकाचे कथानक सूचकपदातून सांगितल्याने काही रसभंग होत नसे. उलट जमलेल्या लोकांना आज आपण कुठल्या कथानकावरचे नाटक पाहण्यासाठी जमलो आहोत, हे कळल्याने नाटकाचा आणि पदांचा आनंद लुटायला मदतच होत असे. जसे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायक माहितीतलाच राग सादर करणार असेल, तरी त्या-त्या दिवशीचा रसाविष्कार वेगळा असतो, तसेच कथानक आधी माहीत असले, तरी त्या दिवशी नाटक आणि मुख्य म्हणजे पदे कशी होतील याची उत्सुकता प्रेक्षकांत असेच.

    या नाटकातील पात्रे :राजा दुष्यंत, ,शकुंतला ,अनसूया,प्रियंवदा,गौतमी,शारंग्रव,शारद्वत,कण्व मुनी,नटी,सूत्रधार,विदूषक,मातली,सेवक,चोर,शिपाई

    संगीत शाकुंतलच्या नांदीची लिंक.
    https://www.youtube.com/watch?v=P_3YAYwVzhI

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • राज कपूर नंतरचे एकमेव ‘शोमॅन’ निर्माता, दिग्दर्शक सुभाष घई

    घई यांचा जन्म नागपूरचा, सुभाष घई यांनी हिरो’, ‘कर्ज’, ‘राम-लखन’, ‘खलनायक’ अशा चित्रपटांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीवर दशकाभराहून जास्त काळ अधिराज्य गाजविले. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९४५ रोजी झाला. हिंदी प्रेक्षकांची नाळ ओळखणारा निर्माता-दिग्दर्शक म्हणून सुभाष घईंची ओळख आहे. कालीचरण, कर्ज, मेरी जंग, हीरो, कर्मा, राम लखन, खलनायक, सौदागर, परदेस आणि ताल असे एकाहून एक मनोरंजक चित्रपट देणार्या घई यांचे चित्रपट म्हणजे मनोरंजनाची शंभर टक्के खात्री, असे प्रेक्षकांना वाटते.

    राज कपूर यांच्या नंतर ‘शोमॅन’ या पदावर आरूढ झालेले एकमेव मा.सुभाष घई. आपल्या विशिष्ट शैलीमुळे राज कपूर नंतर दुसऱ्या शोमनचा किताब मिळवणारे मा.सुभाष घई यांना अभिनेता बनयाचे होते. ते या मतावर ठाम राहिले असते तर निराश होऊन कधीच दिल्लीला परतले असते. परंतु अभिनेता ऐवजी दिशा बदलताच हिंदी चित्रपट सृष्टितील दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत त्यांना मानाचे स्थान मिळाले. ऐंशीच्या दशकात दिलीपकुमारला विधाता, कर्मा आणि सौदागर या चित्रपटातून संधी देणारे ते पहिले दिग्दर्शक होते. आपल्याच चित्रपटातून चेहरा दाखवण्याची हौस देखील त्यांनी पुर्ण केली.

    मुक्ता आर्ट्स या नावाने सुभाष घई यांची चित्रपट संस्था आहे. २००८ मध्ये मुक्ता आर्ट्स ही सुभाष घई यांची चित्रपट संस्था वळू या मराठी चित्रपटाद्वारे निर्मितीत उतरली व बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरली. उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित पहिला चित्रपट. वेगळा विषय, निराळ्या पद्धतीचे फिल्ममेकिंग, अतुल कुलकर्णी यांचा अभिनय, गिरीश कुलकर्णी यांचे संवाद यामुळे गाजलेला आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट गाजला. चित्रपटाशी निगडित सगळी तंत्रे शिकवणारा अभ्यासक्रम आसलेली एक प्रशिक्षण संस्था आपण सुरू करावी, हे सुभाष घई यांचे स्वप्न होते. व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनल या संस्थेच्या रूपाने प्रत्यक्षात आणली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • देव आनंद

    गाईड चित्रपटासाठी १९६५ साली नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाले , तर २००२ साली दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाले .त्यांनी निर्माता , अभिनेता , डायरेक्टर , नवकेतन फिम्सचा सहनिर्माता अशा अनेक प्रकारे काम केले.

  • ब्रिटिश अभिनेते डॅनियल क्रेग

    जेम्स बॉंड या जगप्रसिदध गुप्तहेराची भूमिका तब्बल पाच चित्रपटांच्या माध्यमातून निभावणाऱ्या डॅनियल क्रेगला खऱ्या गुप्तहेरांसाठी देण्यात येणाऱ्या ‘कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ सेंट मायकेल अॅन्ड सेंट जॉर्ज- सीएमजी’ (Companion of the Order of St. Michael and St. George -CMG) पुरस्कार गेल्या वर्षी डॅनियल क्रेग यांना देण्यात आला आहे.

  • अभिनेत्री अभिज्ञा भावे

    मुविंग आऊट या वेब सिरीज मधून तिने वेब दुनियेत पदार्पण केलं आणि प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अभिज्ञा भावेच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याचा दुसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला.

  • मराठी नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ नाट्यनिर्माते सुधीर भट

    सुयोग नाटसंस्था सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांनी १ जानेवारी १९८५ रोजी स्थापन केली. त्यांचा जन्म १३ जून १९५१ रोजी झाला. ‘मोरूची मावशी’ या आचार्य अत्रेलिखित पहिल्याच नाटकाने हजाराहून अधिक प्रयोगांचा विक्रम केला होता. या नाटयसंस्थेच्या माध्यमातून ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि हजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणा-या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली. सुयोग नाटयसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी एका लग्नाची गोष्ट, कबड्डी कबड्डी, चार दिवस प्रेमाचे, मोरुची मावशी अशा एकाहून एक सरस विक्रमी नाटकांची निर्मिती केली. नाटकांच्या तारखा वाटपात प्रचंड उलाढाल करणारे निर्माते म्हणून सुधीर भट नेहमीच चर्चेत राहिले. त्यांचे सुरुवातीला मोरुची मावशी हे नाटक प्रचंड गाजले.

    ‘ती फुलराणी’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ या नाटकांना सुध्दा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. मराठी नाटक सातासमुद्रापार युरोप, अमेरिकेत नेण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या नाटकांना परदेशातही उत्तम प्रतिसाद मिळाला. काही काळ नाटय़निर्माता संघाचे ते अध्यक्षही होते. अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाचेही प्रदीर्घ काळ ते सदस्य राहिले. नाटय़व्यवसायाच्या तक्रारी आणि गाऱ्हाणी शासनदरबारी मांडण्यात आणि त्यांची सोडवणूक करून घेण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे.

    जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन, नाटकांचे परदेश दौरे, नवे विषय हाताळणे आणि नाट्यप्रयोगांचे विक्रम ही त्यांची वैशिष्ट्ये होती. नटांची अत्यंत काळजी घेणारे, इंटिरियर डिझायनिंग करणारे, उत्तम खवय्ये आणि तेवढ्याच प्रेमाने खाऊ घालणारे म्हणून भट प्रसिद्ध होते. "मोरूची मावशी‘ हे नाटक प्रचंड गाजले. मात्र, "गांधी विरुद्ध गांधी‘ या नाटकाने व्यवसायात त्यांना खोट दिली. पण ते कधीच मागे हटले नाहीत. विजय चव्हाण, सुनील बर्वे, प्रशांत दामले यांची कारकीर्दही त्यांनी उभी केली.
    मराठी रंगभूमीचा शो मॅन म्हणूनही त्यांना ओळखले जात असे. सुधीर भट यांचे निधन १४ नोव्हेंबर २०१३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट