लेखसंग्रह

पाकिस्तानमधील काही उल्लेखनीय नाम परिवर्तन

Category:

 

पाकिस्तानच्या राजकारणात एक अत्यंत असामान्य गोष्ट असलेल्या ह्या नामकरणाचे नक्की काय कारण असेल ??? – धुरंधर चित्रपटाने पाकिस्तानचे नेतृत्व आतून खूप हादरून गेले असेल व जगापुढे आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असेल ?

लेखसंग्रह

आचार्य अत्रे कट्टा, ठाणे

Category:

 

कैक दशकांची परंपरा असलेली ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टा (व्याख्यानमाला) ! जिथे वपु, पुल पासून विविध शास्त्रज्ञ, अनेक पदमश्री व्यक्ती व्याख्यान देण्यासाठी येऊन गेलेल्या ! या कट्ट्याच्या संस्थापिका व समाजसेविका आणि लेखिका असलेल्या श्रीमती संपदा वागळे यांचा एकेदिवशी फोन आला आणि त्यांनी थेट आदेशवजा सूचना केली की, “यावेळी तुम्ही कट्ट्यावर व्याख्यान द्यायला येणार आहात, सायबर क्राईम जागृतीबद्दल.”

लेखसंग्रह

भारतीय ज्ञानाचा खजिना

Category:

 

भारतीय ज्ञानाचा खजिना’ नावाचं प्रशांत पोळ ह्यांनी लिहिलेलं अतिशय महत्वपूर्ण पुस्तक वाचलं. सदर पुस्तकाचं प्रकाशन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी केलंय आणि पुस्तकाला मा. मोहन भागवतांची प्रस्तावना आहे. सदर पुस्तकातून मुस्लिम आक्रमक भारतात येण्या आधीच्या संपूर्ण कालखंडात सर्व जगात आपला कसा दबदबा होता, आपण ज्ञानाच्या, संपत्तीच्या आणि समृद्धीच्या बाबतीत जगात कसे सर्वश्रेष्ठ होतो ह्यावर संशोधन करून प्रशांत पोळ ह्यांनी अभ्यासपूर्णपणे मांडलेलं आहे. पुस्तकातून उलगडलेली काही अद्भुत माहिती अशी

लेखसंग्रह

ज्ञानाला विवेकाची जोड

Category:

 

ज्ञानाला विवेकाची जोड असेल तरच त्यातून प्रज्ञा निर्माण होऊ शकते. आणि जोपर्यंत प्रज्ञा ही व्यक्तीच्या व्यावहारिक आणि सामाजिक सुरक्षा आणि विकास यात रूपांतरित होत नाही तोवर ती कोळशामधील आग आहे एवढेच. केवळ कोळसा खाली ठेवून अन्न शिजणार नाही.

लेखसंग्रह

मोबाइल टॉवर’ चे दुष्परिणाम 

Category:

 

मोबाइल फोन आपल्याला सर्वात जवळचा झालेला आहे, म्हणून त्याच्यापासून फार नुकसान व्हायला हवे का? परंतु जास्त त्रास तर टॉवरपासून आहे. कारण मोबाइलचा वापर आपण एकसारखा करत नाही, परंतु टॉवर मात्र अहोरात्र रेडिएशन पसरवत असतात, प्राणीमात्रावर त्याचे दुष्परिणाम होत असतात.

कथा

मोठा देव कोण बरे?

Category:

 

एकदा काय झालं! अग्नीदेव, वरुणदेव, वृषभदेव आणि करहणमाता (अन्नदेवता) यांच्यात झगडा सुरू झाला. अग्नीदेव म्हणाले, ‘ते काही नाही, मीच या धरतीवरील मोठा देव आहे.’ वृषभदेव आपली मान डोलवत- डोलवत म्हणाले, ‘नाही नाही. मीच या धरतीवरील मोठा देव आहे.

कथा

होळीविषयी लोककथा

Category:

 

गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात. तेव्हा भृगु महाऋषी त्या द्वारपालाला शाप देतात, “तुम्ही तीन जन्म पृथ्वीतलावर उन्मत्त असे राक्षस होऊन पडाल तेव्हा द्वारपालांनी शरण येऊन भृगु महाऋषीस उःशाप मागितला. भृगु ऋषी म्हणाले “तुम्ही राक्षस होऊन पडल्यावर श्रीविष्णु तुमचा उद्धार करतील व तुम्ही पुन्हा द्वारपाल व्हाल तेव्हा ते पृथ्वीतलावर हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप असे दोन राक्षस होऊन पडले. हे दोन्ही भाऊ उन्मत्त व महाअंतुरबळी युद्धिष्ठर असे बनले.

कथा

कहाणी आकाशदिव्यांची

Category:

 

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा देव देखील दिवाळी साजरी करायचे. देव, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, पन्या आभाळात दिवाळीची मजा करायचे.पृथ्वीवरच्या माणसांना, मुलामुलींना देखील देवांची दिवाळी बघायला मिळायची. त्यावेळीची ही गोष्ट.

कथा

वसुबारस’ची कहाणी

Category:

 

आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती, तिला एक सून होती. गाई-गुरं होती. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळी-मुगाळी वासरं होती. एके दिवशी काय झालं, आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी सकाळी म्हातारी उठली, शेतावर जाऊ लागली.

कथा

धनतेरस

Category:

 

आश्विन वद्य त्रयोदशीचा दिवस ‘धनतेरस’ या नावाने वाखाणला जातो. तेरस याचा अर्थ तेरा! म्हणून त्रयोदशीला बोली भाषेत तेरस म्हणू लागले.

धनतेरस ह्या दिवसाला बायकांची दिवाळी असेही म्हणतात. कारण या दिवशी प्रभातकाली घरातील सर्व स्त्रिया व मुली अभ्यंगस्नान करतात. धनतेरस या सणामागे प्राचीन काळची एक कथा जडलेली आहे.) प्राचीन काळी यमुना नदीच्या काठी हरीतपूर नावाची एक नगरी होती. तेथे हंस नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो मोठा शूर व प्रजाहितदक्ष होता.