(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहाररहस्य ५

    छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत,
    अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते.

  • आहारातील बदल भाग ५८ – चवदार आहार -भाग १९

    मिरी मिरची असं प्रत्येक पदार्थाबद्दल लिहायचं झालं तर शेकडो पदार्थ सुचतील, पण ज्यांना तिखट पदार्थांच्या दरबारात मानाच्या खुर्च्या आहेत, त्यांना सलाम तर केलाच पाहिजे ना ! त्यातीलच एक मानाचे पान आल्याचे.

    चहापासून बटाटावडा आणि चटणीपासून भाजीपर्यंत सर्वांना हवे असणारे आले पित्ताला वाढवणारे आहे. याची विशिष्ट अशी चव आणि स्वाद देखील मनाला प्रसन्न करतो.

    उपवासाच्या विविध व्यंजनामधे जिऱ्याच्या जोडीला आल्याचा मान असतो. पचायला मदत करणारे, अजीर्ण दूर करणारे, पोटाची फुगारी, आमाचा अवरोध दूर करणारे म्हणून आले प्रसिद्ध आहे.

    आजीबाईच्या बटव्यातील एक हमखास उपयोगी पडणारे औषध म्हणजे, आल्या लिंबाचे सेंदेलोण पादेलोण हिंग घालून तयार केलेले पाचक.

    नुसते नाव घेतले तरी तोंडात लाळेचे लोट तयार होतायत, तर प्रत्यक्षात जीभेवर आले की लाळेचे फव्वारेच तयार होतील.तयार झालेल्या या लाळेमुळे पित्त आणि आल्यामुळे कफाचे अजीर्ण, आणि वात लगेच कमी होतो.

    म्हणजेच तीन्ही दोष कमी व्हायला आले धावून आले ! ???

    आले पोटात आत जावून काम करतेच, पण कुठेही लचकले, मुरगळले, तरी पहिला घरगुती उपचार आठवतो, तो म्हणजे आल्याचा लेप ! पायाची टाच दुखत असू दे किंवा गुडघ्याला सूज असू दे, आले वाटून लावले कि हमखास वेदना कमी होतात. स्वभावतःच गरम असल्यामुळे, लेप लावण्यापूर्वी पुनः गरम करावे लागत नाही.

    लेप लावल्यावर आल्याचा तिखटपणा त्वचेवर क्षोभ उत्पन्न करतो, दाह होतो, उष्ण गुणांनी पदार्थ प्रसरण पावतो, याच नियमांनी त्वचेअंतर्गत असलेल्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. तिथला रक्तपुरवठा वाढवला जातो. त्यामुळे त्या अवयवाला तात्पुरत्या स्वरूपात जास्तीची मदत मिळते आणि वेदना कमी केल्या जातात.

    अशीच प्रक्रिया प्रत्येक मसाल्याच्या पदार्थाच्या लेपाने होते. फक्त वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा. कारण काही मसाले त्वचेवर फोड देखील उत्पन्न करतात. पण जायफळ, दालचिनी, कांदा हे मसाले त्वचेवर लेप लावून वेदना कमी करण्यासाठी सेफ झोन मध्ये आहेत.

    प्रत्येक मसाला चवीला, तिखट लागला तरी तो प्रत्येक वेळी पित्त वाढवेलच असे नाही. जशी लवंग ! चवीला तिखट असली तरी पित्त कमी करण्यासाठी तिला वैद्यांच्या दुनियेत मानाचे स्थान आहे.

    चवीप्रमाणेच एखादा पदार्थ स्पर्शाला थंड असला तरी पित्ताला कमी करतो असेही नाही. जसे फ्रीजमधील मिरची .

    आल्यापासूनच पुढे सुंठ बनवली जाते. चांगले जून झालेले आले, चुना लावून वाळवले जाते. आणि सुंठ बनते. आले जरी पित्ताला वाढवणारे असले तरी, सुंठ मात्र पित्ताला कमी करते.

    अनुभव आणि वाढलेले वय स्वभावातला तिखटपणा कमी करतोच ना ! फक्त माणसात तेवढा दिसत नाही, जेवढा आल्यात आहे.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    19.11.2016

  • आजचा आरोग्य विचार – भाग आठ

    खरं आहे हे ! आज जी विकतची काही मऊ मऊ पांघरुणे मिळतात, त्यात कृत्रिमरीत्या तयार केलेली फर वापरली जाते. त्यात जे रंग डाय करण्यासाठी वापरले जातात, ते पण अॅलर्जी वाढवतात, असे लक्षात येत आहे. सहज हातात धरून झटकली तरी ही फर वाऱ्यावर उडताना नुसत्या उघड्या डोळ्यांना दिसते.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग तेरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषधं काम करत नाही - भाग चार

    काही वेळा चिकित्सा पत्रके पाहून असे वाटते की, रोग परवडला पण औषधे आवर. एका औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे, तिसरे... चौदा चौदा औषधे दिवसभरात. एखादा रूग्ण सकाळ दुपार रात्रीच्या फेऱ्यात कमीत कमी वीस वेळा तरी औषधं घेत असेल ! परत एवढ्या वेळा पाणी प्यायचे. बरं पाणी कमी प्यायले तर अंगाचा भडका होईल, एवढी उष्णता वाढते. करायचे तरी काय ? आणि जेवायचे तरी कधी ?

    बरं औषध बंद करायची पण भीती वाटते, न जाणो चुकुन काही झाले तर ? कोणतातरी रिपोर्ट वाढला, कमी झाला तर ? रोगाविषयी एवढी भीती निर्माण करून ठेवली जाते की, औषधांचे दुष्परिणाम झाले तरी चालतील, किंबहुना ते गृहीतच धरले जातात.

    भारत सरकारने जीवनावश्यक म्हणून अत्यंत आवश्यक असलेल्या औषधांची जी यादी प्रसिद्ध केलेली आहे, त्यात फक्त दीडशे ते दोनशे औषधे प्रकारची औषधे असतील. पण मार्केटमधे आज किमान पन्नास साठ हजार प्रकारची मिश्र औषधे विकली जात आहेत. ब्रुफेन सारखी काही औषधे तर प्रगत राष्ट्रामधे चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच बॅन झालेली आहेत. पण भारतात मात्र ही औषधे आज भी धडल्ले से बेची जा रही है. डाॅक्टरांच्या चिठीशिवाय काऊंटरवर सुद्धा विकली जात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. सावध आपणच रहायला हवे. सरकार तरी किती ठिकाणी लक्ष ठेवणार ना ?

    औषधकंपन्याचा प्रचंड नफा हे या मागील खरे राजकारण आहे. जेनेरीक मेडीसीन आणि कंपन्यांनी बनवलेल्या औषधांच्या दरामधे असलेला फरक लक्षात घेतला, की समजेल किती नफा कंपन्या मिळवतात ते !

    येनकेण प्रकारे औषधे विकायची त्यासाठी वाट्टेल ते प्रकार अवलंबायचे, हे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे षडयंत्र गेली कित्येक वर्षे सुरू आहे.

    असो.

    एक विनोद म्हणून सांगावासे वाटते. आजारी पडलो की, डाॅक्टरांकडे जायचे, त्यांची जी फी असेल ती फी कुरकुर न करता द्यायची, कारण डाॅक्टर जगला पाहिजे. सांगितलेल्या सर्व तपासण्या करायच्या, कारण पॅथाॅलाॅजिस्ट जगला पाहिजे. परत डाॅक्टरांकडे जाऊन जी औषधे लिहून दिली जातात, ती केमिस्ट कडून विकत आणायची, कारण केमिस्ट जगला पाहिजे.
    आणि...
    ....... आणलेली सर्व औषधं तशीच ठेवून द्यायची कारण........
    .....
    ....
    ...
    ..
    .
    आपण जगलो पाहिजे.

    विनोदाचा भाग सोडला तर परिस्थिती फार गंभीर आहे. नवीन औषधे शोधून शोधणार तरी किती ? मुळ द्रव्ये तर तेवढीच आहेत. त्यातील मुलद्रव्यांमधे, थोडाफार तर तम भावात फरक करून नवीन औषध करण्या पलीकडे गाडी पुढे जात नाहीये. मंदी येऊ नये, यासाठी सुद्धा काही वेळा विशिष्ट रोगाविषयी "हॅवाॅक" निर्माण केला जातो. याच्यामागे देखील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे भीती निर्माण करायची आणि आपला माल खपवायचा !

    हे लिहिलेलं सुद्धा काहीजणांना "अति" कॅटेगरीमधील वाटेल. पण शेवटी सत्य कटू असते. कुठेतरी कोणाला तरी बोचणारच !
    इलाज नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.04.2017

  • याला जीवन ऐसे नाव भाग १०

    ज्या पदार्थात पाणी जास्त तो टाकावू. आणि ज्या पदार्थात पाणी कमी तो टिकाऊ असे लक्षात येते.

    चार पदार्थ घरात बनवले आहेत.
    आमटी भात चपाती आणि भाकरी.
    हे पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवले आहेत. सर्वात पहिला फुकट जाणारा पदार्थ आहे आमटी. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत आमटीला आंबूस वास येऊ लागतो. दुसऱ्या दिवशी रात्री भात फुकट जातो. तिसऱ्या दिवशी रात्री चपातीला वास येतो. चौथ्या दिवशी तर बुरशी येते. पण भाकरी मात्र पाचव्या दिवशीपर्यत तश्शीच असते.

    असं का झालं ?

    त्याचं उत्तर त्या पदार्थातील पाण्यात आहे. ज्या पदार्थात पाणी जास्त तो टाकावू.

    ज्या पदार्थामधे पाणी जास्ती तिथे जंतुसंसर्ग जास्त. आजच्या भाषेत इन्फेक्शन ! या सूक्ष्म जंतुना देखील जगायला पाणी लागतेच ना.

    या चार पदार्थांमधे नेमकं काय झालं असेल ?

    आमटीमधे पाणी जास्त असल्यामुळे जंतुसंसर्ग पटकन होतो. म्हणून ती लवकर नासली. भातामधे त्यामानाने पाणी कमी. म्हणून जंतुसंसर्ग जरा उशीराने झाला. म्हणून आमटीनंतर फुकट गेला.

    आता राहिली चपाती आणि भाकरी.

    चपाती फक्त एक वेळा तव्यावर भाजली जाते, तर भाकरी दोन वेळा. भाकरीपेक्षा चपाती कमी वेळ भाजली जाते म्हणून लवकर फुकट जाते.

    भाकरी एवढे दिवस का टिकली ?
    खमंग भाजल्यामुळे !
    भाकरी एकदा तव्यावर आणि परत अग्निवर थेट भाजली जाते.

    जेवढे जास्त भाजले जाते, ज्यावर अग्निसंस्कार जास्ती, तेवढे त्यातील पाणी कमी होत जाते. पाणी कमी तेवढे टिकाऊ.

    भाकरी जास्त दिवस टिकली कारण पाणी एकदम कमी केले गेले. भाकरी दोन वेळा भाजली जाते, शिवाय भाकरीत तेलही घातले नाही, त्यामुळे ती आणखीनच सुकी, खडखडीत होते. टिकते.

    म्हणून आपला वैश्विक सिद्धांत परत सिद्ध होतो, ज्या पदार्थात पाणी जास्ती तो टाकावू. आणि ज्या पदार्थात पाणी कमी तो टिकावू.

    शरीराचे देखील तसेच आहे. गरजेपेक्षा पाणी जास्ती झाले तर जंतुसंसर्ग होणारच ! आधीच शरीरात पाणी जास्ती असते, त्यात गरज नसताना आणखी घेतले तर होईल ना लोच्या !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    17.12.2016

  • किचन क्लिनीक – शेंगभाज्या – शेवग्याची शेंग

    किचन क्लिनीक – शेंगभाज्या – शेवग्याची शेंग

    शेंगभाज्या

    आता पर्यंत आपण पुष्कळ फळ भाज्या पाहिल्यात आता आपण एक वेगळा भाज्यांचा गट पाहूयात ज्यांना आपण शेंगभाज्या म्हणतो.

    शेवग्याची शेंग

    तर प्रथम पाहूयात आपण सर्वांच्याच आवडीची शेंग भाजी ती म्हणजे शेवगा.ह्या शेवग्याच्या शेंगांची भाजी,आमटी,लोणचे असे वेगवेगळे प्रकार केले जातात.कधीकधी ह्या कोवळ्या शेंगा तळून खायला देखील रूचकर लागतात.

    ह्या शेंगा शेवग्याच्या भल्या मोठ्या उंच वृक्षावर लागतात.ह्या शेंगा चवीला तिखट,कडू व उष्ण असतात आणी त्या शरीरातील कफ व वात दोष कमी करतात व पित्त दोष वाढवितात.

    जसा ह्यांचा उपयोग रुचकर स्वयंपाक करायला होतो त्यांच प्रमाणे ह्याचा वापर घरगुती उपचारात देखील केला जातो.कसा ते पहायचे ना:

    १)२ कोवळ्या शेंगा तुकडे करून १/२ लिटर पाण्यात उकळून आटवून १/२ ग्लास शिल्लक ठेवावे त्यात १ चमचा मध व १/४ चमचा सुंठपूड घालावी व हे पाणी सकाळी व संध्याकाळी ४ वाजता प्यावे असे केल्याने सांधेदुखी,ठेच लागून झालेली दुखापत,कंबरदुखी ह्यात आराम मिळतो.

    २)अर्धांगवायूचा झटका आलेल्या व्यक्तींच्या जेवणात शेवग्याच्या शेंगांची आमटी अथवा भाजी ठेवावी.

    ३)मासिक पाळी उशीरा येणे,ओटीपोटात दुखणे,स्त्राव कमी होणे अशा तक्रारी असणा-या स्त्रीयांना शेवग्याच्या शेंगांचा सूप त्यात जिरे घालून द्यावा.

    ४)कृमिंचा त्रास असणा-या व्यक्तिंना शेवग्याच्या जून शेंगा वाफवून रोज सकाळी ती खायला द्यावी व नंतर त्यावर तासाभराने २५मिली एरंडेल तेल प्यायला द्यावे.

    शेवग्याच्या शेंगा खाण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जगण्याचे साधे सोप्पे नियम – भाग दोन

    नियम एक.
    कोणताच नियम पाळू नये. भाग दोन.

    दूध म्हणजे विष नाही, दही म्हणजे विष नाही, गुळ म्हणजे विष नाही, पाणी म्हणजे विष नव्हे, पण हे पदार्थ प्रमेहामधे रोगाचे कारण सांगितलेले आहे. हे विसरून चालणार नाही. म्हणजे हे पदार्थ बंद करायला हवेत असं नाही. आपली प्रकृती आपली पचनशक्ती जर कफाकडे जाणारी, कफ वाढवणारी असेल, तर या पदार्थांचा वापर करताना युक्तीचा वापर करायला हवा. हे सर्व पदार्थ पचायला जड आहेत. हे पदार्थ खाल्ले आणि काहीच व्यायाम केला नाही तर मात्र गडबड होणार हे नक्की.

    सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खावे, दोन मुख्य जेवणे या वेळेत झाली, की त्याचे पचन सूर्य करतो, पचन सोपे होते, हा नियम झाला, पण एखादे वेळी दोनापैकी एक जेवण झालेच नाही, आणि सूर्यास्तानंतर खूप भूक लागली तर काय करावे ?
    मस्त जेवावे.
    फक्त अशा वेळी लक्षात ठेवावे की, सूर्यासारखा, पचनाला मदत करणारा अग्नी हा अत्यंत महत्त्वाचा घटक शरीराला पचनासाठी वापरता येणार नाही, तेव्हा फार लोड येईल असे खाऊ नये. जे काही खाऊ ते चापून खाण्याऐवजी हातचे राखून खावे, मटण चिकन, श्रीखंड, गुलाबजाम असे पचायला जड होणारे जेवण तर अजिबात नको. ही युक्ती हवी.
    असे जड जेवण घेतले तर त्याचे पचन पूर्ण होण्यासाठी तसाच व्यायाम, तसेच कष्ट, तशीच मेहनत करायला हवी. नाहीतर सगळेच ओमफस्स !

    संकष्टीला दिवसभर उपवास करून रात्री उशीरा चंद्रोदय झाल्यावर मोदकाचे जेवण जेवावे, या संकल्पनेमधे आपण नियम मोडलाच. पण दिवसभर उपाशी आहोत, स्वतः ठरवून, जाणून बुजुन, व्रत म्हणून, मनाला संयम घालून दिवसभर उपवास करून रात्री जेवलात तर ते क्षम्य ठरू शकते. पण ते सुद्धा महिन्यातून एक वेळ नियमाला हा अपवाद आहे. आम्ही अपवादाचा नियम केला की, सत्यानाश !

    चातुर्मास करताना, या चार महिन्यात "देव झोपतो", अशी आपली संकल्पना आहे. या चार महिन्यात देवच जर झोपला, तर शरीराचे सर्व व्यवहार आपल्यालाच पहावे लागणार आहेत, उगाच काही मोठे निर्णय घेण्याची चूक करू नये, याचे भान राखून आपण आपले व्यवहार करावेत, ही युक्ती आहे. हे आपल्या लक्षात असावे, म्हणून चातुर्मासामधे काही विशिष्ट व्रते सांगितली जातात. एखाद्या वेळी एखादा उपवास चुकुन मोडला, म्हणून लगेच, " आता उपास मोडलाच आहे, भजी खाऊन घेऊया" असा विचार करणे ही चुक आहे.

    तारतम्य बाळगणे, योग्य अयोग्याचा विचार करणे ही युक्ती असते. एखादी कृती दुसरा करतोय मग मी का नको ? असा विचार करणे चूक आहे असे नाही, पण त्यासाठी मला, जशाच्या तसा "दुसरा" बनणे आवश्यक आहे.

    व्यायामाचे तेच आहे. व्यायाम जरूर करावा, पण कोणी करू नये, हे पण शास्त्रात सांगितलेले आहे.

    प.पू. रामदेव स्वामी महाराज शीर्षासन करून हातावर चालतात, मग मला का नाही जमणार असे एखाद्यानं ठरवले आणि तसं करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ? नाक तोंड फुटेल बाकी काही नाही. यासाठी तसा अभ्यास, तसे सातत्य, पहिल्यापासून हवे, तर जमेल. नाहीतर नाही.

    शेवटी नियम हे आपल्याला मर्यादा समजावी म्हणून सांगितलेले असतात. तसेच्या तसे ते तंतोतंत पाळणे आणि सगळे नियम धाब्यावर बसवणे, दोन्ही चुकच !
    युक्ती वापरली की, सगळ्याचा उपभोग घेता येतो. त्याचा हेतु योग्य असला की झालं.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    11.04.2017

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग बारा

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे चौपन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग बारा

    जगण्याचे साधे सोपे नियम सांगताना ग्रंथकार पुढे म्हणतात,
    बुडण्याचा भय असेल, अशा छिद्र असलेल्या किंवा फुटक्या नावेत बसू नये, किंवा जे झाड पडणारे असते, त्यावर चढू नये.
    यात आपलेच नुकसान होणार हे नक्की असते.

    आजच्या काळानुसार जी बॅक बुडणारी आहे, त्यात पैसे ठेवू नयेत, किंवा कमी काळात दाम दुप्पट वगैरे फसव्या योजनेत पैसे गुंतवू नयेत. मल्टीलिंक मार्केटिंग हा परदेशी फंडा आहे. आपली गुंतवणुक सोडवून घेण्यासाठी दुसऱ्याला आत गुंतवायचे असा सरळ सरळ अर्थ म्हणजे एम एल एम.

    कमी पाणी असलेल्या एका विहिरीत पडलेल्या बोकडाला वर येण्यासाठी, एक बोकड धडपडत असतो. पण वर येता येत नाही. "व्वा, पाणी किती गोड आहे, पिऊन तर बघा !" असे आमिष इतरांना दाखवल्यावर, काठावरून जाणाऱ्या दुसऱ्या बोकडाला, पाणी चाखून बघावेसे वाटते. म्हणून दुसरा बोकड इतर कोणताही विचार न करता, आत उडी मारतो. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून पहिला बोकड केव्हा विहिरीबाहेर पडतो, ते दुसऱ्याला कधी कळतच नाही, मग तीच युक्ती दुसरा बोकड, तिसऱ्या बोकडासाठी वापरतो याला म्हणतात, मल्टी लिंक !
    यात प्राॅडक्ट म्हणून काहीही साधन वापरले जाऊ शकते. मग ती बदकाच्या पिसाची गादी असेल, नाहीतर भादरलेल्या बोकडाची दाढी असेल, नाहीतर एखादे लाॅकेट असेल वा लोहचुंबक असेल, खेळण्यातली गोल्डन डाॅल असेल वा एखादे दंतमंजन असेल. झटपट पैसे मिळवण्यासाठी काहीही फंडे वापरले जातात, पश्चात ताप होऊ नये, यासाठी सावध तो सुखी, हे सूत्र लक्षात ठेवावे.

    मातीचे ढेकूळ, दगड वा फळ मारून, (आपल्या किंवा इतरांच्या ) झाडावरचे फळ तोडू नये.
    हा मारलेला दगड परत आपल्याच डोक्यावर पडण्याचा संभव असतो, वा कुणाचे तरी नुकसान करणारा असतो. कुणा व्यक्तीचे नाही झाले तरी झाडाचे नक्कीच होते. गरज नसताना दुसरे कच्चे फळ पडणे, झाडावरील घरट्यातील पक्ष्यांच्या पिल्लांना धोका पोचणे, किंवा पलीकडील घराची कौले फुटणे यापैकी काहीही होऊ शकते. अगदीच काही नाही झाले तर असा शेजारी किंवा झाड मालक जेव्हा पाठ धरून बोंबलत येतो तेव्हा सैराट होऊन धावताना आपल्याला इजा होऊ शकते.

    परवानगी घेऊन अथवा न घेता कोणाच्याही घरात, दाराचा वापर न करता अन्य मार्गाने घुसू नये.

    दुसऱ्याच्या घरात आपण एकट्यानेच कोणाला सांगितल्या शिवाय, किंवा कोणी सांगितल्याशिवाय खुर्चीवर वा उच्च आसनावर बसू नये.

    नंतर खुर्ची सोडावी लागली तर ते दुसरे दुःख कोणते नसते. विशेषतः व्यासपीठावर बसणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे.

    झोपी गेलेल्यास उठवू नये, हे पण ग्रंथकार लिहितात. पण ही सूचना शाळा काॅलेजमधे वर्गात झोपा काढणाऱ्यांसाठी सांगितलेली नसून, अति श्रमाने जो दमलेला आहे, किंवा ज्याला खरोखरच विश्रांतीची गरज आहे, अशा मंडळींकरीता आहे हे सूज्ञांनी लक्षात घ्यावे.

    रात्रभर वाॅटसप चालवून दमल्याभागल्यांसाठी हा नियम लागू होत नाही. अशा मंडळीना उठवताना नाकी नऊ येतात. यांना उठवण्यासाठी हळुच यांच्या कानात म्हणावे, "मोबाईलला लाॅक टाकायला विसरला आहेस, की स्वारी टुणकन उठून बसेल बघा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १२.०९.२०१७

  • आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग पाच

    आरोग्याचा विचार करता, भारताचा विचार करता, चिकित्सेची मुख्य पद्धत आयुर्वेद असायला हवी होती. पण आज भारताच्या या “अल्टीमेट” चिकित्सा पद्धतीला “अल्टरनेटीव्ह” ठरवली गेली. दुय्यम दर्जा दिला गेला.

  • किचन क्लिनीक – शिंगाडा – (कमलकंद)

    किचन क्लिनीक – शिंगाडा – (कमलकंद)

    उपावासा साठी प्रसिध्द असा हा पदार्थ.काही जण हा कंद नुसता उकडून देखील आवडीने खातात किंवा मग ह्याच्या पिठाचा वापर वेगवेगळे उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.

    हा काळा जाडसर साल असणारा कंद अातून मात्र पांढरा शुभ्र असतो.जसा ह्याचा उपयोग स्वयंपाकात केला जातो तसाच ह्याचा घरगुती उपचारात देखील वापर केला जातो.

    शिंगाडा चवीला गोड तुरट असतो व थंड असतो त्यामुळे तो शरीरातील वात व कफ दोष वाढवितो तर पित्त दोष कमी करतो.

    चला मग ह्याचे घरगुती उपचार पहायचे ना:

    १)अम्लपित्तामध्ये १ टेबल संपून शिंगाडा पीठ + १ कप दूध+ १ कप पाणी घालून खीर करावी व त्यात खडीसाखर घालून रोज ४ तासांनी एकदा हि खीर थंड करून खावी.

    २)पित्तामुळे अतिभूक लागून काही व्यक्ती खुप खातात त्यांना शिंगाड्याच्या पिठाचा तुपावर परतून केलेला शिरा खायला द्यावा.

    ३)शरीरात रक्त कमी असल्यास १ मोठा चमचा शिंगाडा पीठ व १ काळा खजूर तुपावर परतून गोळा बनवावा व असा गोळा रोज सकाळी उपाशी पोटी खावा व मग त्यावर तासभर काही ही खाऊ नये.

    ४)डोळ्याची आग होणे,डोळे लाल होणे ह्या तक्रारींवर शिंगाडा पीठ तूपावर परतून रात्री चघळून खावे हा प्रयोग २ महीने करावा.

    ५)आतड्यातून अन्न लवकर पुढे सरकल्यास संडासला साफ न होणे,वारंवार दुर्गंध युक्त संडास होणे,पातळ भसर संडासला होणे ह्या तक्रारी सुरू होतात.त्यावेळी शिंगाडा पीठाची भाकरी मसूरच्या कढणासह खावी ह्याने आतड्याची गती नियंत्रणात रहायला मदत होते.

    शिंगाडा पीठ अतिमात्रेत खाल्ल्यास संडासला घट्ट होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४