पानामधले महत्त्वाचे घटक झाले. पान, चुना, कात आणि सुपारी. हे सर्व पदार्थ एकमेकांना पूरक आहेत. यातील प्रत्येक पदार्थाचे काही विशिष्ट वेगवेगळे गुणधर्म आहेत. पण हे पदार्थ जेव्हा चावले जातात, एकमेकात मिसळले जातात, आणि सर्वात महत्त्वाचे, चघळले जात असताना, त्यात लाळ मिसळली जाते, तेव्हा या सर्वांचे मुलभूत गुणधर्म थोडे बदलून सौम्य होतात.
बालकांसाठी मातृस्तन्य सर्वोत्तम. आईचे नसेल तर दायीचे. नसेल तर गाईचे ! त्याच्यापुढे जाऊन म्हैशीचे दूध प्यायले तर कफ आणखीनच वाढेल. म्हणजे तेही नको.
अजूनही काहीजणांना नेमकेपणाने कळले नाही. दूध प्यावे की नाही ? प्यावेतर दूध कधी प्यावे ?
खरं सांगायचं तर आयुर्वेदीय दिनचर्येमधे तर सकाळी चहा पण नाही आणि दूध पण नको. दिनान्ते म्हणजे सायंकाळी चालेल. पण मग जेवणार कधी ? रात्री झोपतानासुद्धा दूध पिऊ नये. असा स्पष्ट कुठेही उल्लेख नाही. असल्यास लक्षात आणून द्यावा.
काल सांगितलेल्या खाण्याच्या भरगच्च 'शेड्युलमधे' दुध प्यायला योग्य वेळ उरतच नाही. म्हणून शहरात रहाणाऱ्यांनी दुधाच्या फंदात न पडलेलेच बरे. त्यांनी सुटीच्या दिवशी तरी धारोष्ण दूध जिथे मिळेल अशा गोशाळेत पूर्ण दिवस जाऊन रहावे. गाईची सेवा करावी. सहवास मिळवावा. गाईच्या पाठी धावावे. त्यांचे शेण गोळा करावे. ग्रंथामधे तर इतके स्पष्ट वर्णन मिळते की, गाईला जव खायला घालावेत. आणि शेणातून पडणारे जव गोळा करावेत. आणि फक्त तेवढेच आहार म्हणून खावेत. पाण्याच्या ऐवजी गोमूत्र प्यावे. प्रमेहामधे गाईचे दूध औषध नाही. उलट मधुमेह वाढतो. एवढे लक्षात ठेवले तरी पुरेल. प्रमेहाच्या सर्व रूग्णांनी आपल्या खाण्यापिण्यातून दुधापासून बनवलेले सर्व पदार्थ( साखर न घालतासुद्धा ) आणि दही बंद करावेत, आणि तीन महिन्यानंतर अनुभव घ्यावा.
आता मधुमेह न झालेल्या लोकांच्या लोकभावना लक्षात घेऊन, दूध कधी प्यायचे हे सांगायचे झाल्यास सकाळी धारोष्ण प्यावे. किंवा सायंकाळी धारोष्ण प्यावे. पण कटाक्षाने पोट रिकामे हवे. त्याआधी किमान दोन ते तीन तास तरी पोटात काही गेलेले नसावे. किंवा दूध प्यायल्यावर पुढे दोन तास काही खाऊ नये. अगदी धारोष्ण नाही मिळाल्यास गरम करून घ्यावे.
जेवणाच्या वेळी दूध घेतले तर पोट भरून जाईल. आणि पुनः विरूद्धान्नाचा दोष लागणारच. रात्रौच्या वेळी प्यायचे तर अग्नि नसताना पिणार म्हणजे पुनः पचनक्रियेवर ताण. तो पण दोष उत्पन्न होतो.
शहरातून विकत मिळणारे दूध हे अनेक गाईंचे एकत्र केलेले, किमान चार ते पाच दिवसापूर्वीचे शिळे, प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवलेले, अतीशीत केलेले असते.
तबेल्यात असणाऱ्या सर्व गाई निरोगी असतीलच, त्या कोणता चारा खात असतील, किती फिरत असतील, याची खात्रीदेखील देता येत नाही. आपल्याला जर निरोगी रहायचे असेल, तर आपण जे खाणार पिणार ते उत्तम प्रतीचे असायला नको का ?
समजलं नसेल तर परत एकदा सांगतो, दूध पचायला जड असते. कफ वाढवणारे असते. पटकन नासणारे असते. म्हणून दूध हे आहारीय द्रव्य म्हणून नको. पण औषधी म्हणून वैद्य सल्ल्यानुसार चालेल. मधुमेह असणाऱ्यांनी दूध पिणे नकोच.
इतरांनी दूध प्यायचेच असेल तर धारोष्ण किंवा सुखोष्ण. थंड फ्रीजमधले तर अजिबातच नको. अॅसिडीटी वाढल्यावर घेतले तर तात्पुरते बरे वाटेलही, पण अॅसिडीटी होऊ नये म्हणून नियमाने असे दूध पित असाल तर भविष्यात कफ आणि वात नक्की वाढणार.
ज्यांना दूध सहजपणे पचते, ज्यांना मनापासून आवडते, त्यांना दूध प्यायचे असेल तर ते हळद, सुंठ, धने, जिरे असे काहीतरी पाचक मसाले घालून प्यावे. जेवण आणि दूध यामधे किमान तीन तासाचे तरी अंतर हवे. नाहीतर पोटात राडा ठरलेला.
इति प्रमेहरोगांतर्गत दुग्धविषय समाप्तः ।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.01.2017
आहारामधे फळांचा वापर करावा. आहारानंतर फळ नको किंवा आहाराऐवजी फलाहार करावा. आज जेवणानंतर फळे खायची प्रथा पडली आहे. फळे पचायला जड असतात. जे पदार्थ पचायला जड ते अग्नि प्रखर असतानाच म्हणजे भूक कमी होण्याअगोदरच संपवावे.
बडिशेप, लवंग आणि वेलची म्हणजे वात पित्त आणि कफ असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. जसं वाताच्या शमनासाठी तेल, पित्तशांतीसाठी तूप आणि कफ कमी होण्यासाठी मध, अनुपान म्हणून किंवा थेट स्वरूपात वापरले जाते. तसेच पानामधले हे तीन घटक तीन दोषांना शांत करण्यासाठी वापरले जातात.
सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.
जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे त्रेपन्न
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग अकरा
घराबाहेर गेल्यावर स्नान, भोजन, जलपान आधी वाहनाला द्यावे. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रवास रथातून असे, त्यांची व्यवस्था आधी पहावी. केवळ सारथीच नव्हे तर घोडे आदि प्राण्यांचे पोटापाण्याचे आधी पहावे. कारण परतीच्या प्रवासामधे हे वाहन, वा चालक पुनः ताजेतवाने व्हायला हवेत, नाहीतर त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो.
अनोळखी ठिकाणी गेल्यावर माहिती नसलेल्या जलाशयात पोहायला अथवा आंघोळीला पण जाऊ नये. मगरीसारखे प्राणी आधी चाहुल लागू न देता हल्ला करतात. बाहुबली करतो, म्हणून बाहुंचे बळ दाखवून, नदीत पोहू नये. उंचसखल वाकड्यातिकड्या पर्वतावर चढू नये, या कड्यावरून त्या कड्यावर माकडासारख्या उड्या मारू नयेत. घसरून पडण्यामुळे, जीवाला धोका संभवू शकतो. पिक्चरमधे दाखवतात, ते सर्व खोटे असते, ब्लु व्हेलसारखे मोबाईल गेम तर प्रत्यक्षात मानसिकताच बदलवून टाकतात, याची जाणीव मुलांना वारंवार करून द्यावी.
पेटलेल्या अग्निसमोरुन जाऊ नये, अग्निकडे पाठ करून कधी बसू नये, अग्निच्या आणि अग्निच्या जवळ बसलेल्या माणसाच्या मधूनही कधी जाऊ नये. अग्निशी विनाकारण खेळ खेळू नये. आज मंकी जंपिंग, रिव्हर राफ्टींग, व्हॅली क्राॅसिंग सारखे साहसी प्रकार केले जातात, तेव्हा सावधगिरी बाळगली पाहिजे.
हे साहस करणे देखील एकवेळ परवडेल, पण प्रत्यक्षात कोणतेही साहस न करता, साहस केल्याचा आभास निर्माण करीत स्वतःचा स्वतः फोटो काढणे हे जास्ती खतरनाक असते. आजच्या मराठी भाषेत याला "सेल्फी" म्हणतात. नाकाला हात बोट न लावता, नाकावरची माशी कशी उडवायची याचे प्रात्यक्षिक किंवा नसलेल्या भुवया ताण ताण ताणून त्याची धनुकली करायची, आणि ओठ जेवढे होतील तेवढे डुकराच्या तोंडासारखे करायचे, आणि हे सगळं करताना, एका हाताने अधांतरी राहात, दुसऱ्या हाताच्या तीन बोटानी मोबाईल सांभाळत, करंगळी मागे उचलून एका बोटाने फोटो काढायचा. महाडेंजरस. ग्रंथकार ग्रंथ लिहित होते, त्यावेळी जर हा सेल्फी प्रकार पाहिला असता तर त्याच्यावर तीन चार श्लोक तरी रचले असते.
हे सर्व आपला जीव सुरक्षित रहावा यासाठी सांगितलेले आहे.
याचा अर्थ असा नव्हे की, साहस करूच नये, गिर्यारोहण करूच नये, नदीमधे पोहूच नये. हे सर्व करताना आधी आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा. आपल्या सोबत ( नंतर ओरड मारायला तरी ) कुणीतरी असावे. एवढेच. बाकी व्हा बाहुबली !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
११.०९.२०१७
कोणताही पूर्वग्रह दूषित ठेऊन हे वाचन करू नये. काही जणांच्या श्रद्धा, भावना, इगो, जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद, परंपरावाद आड येऊ नये. आपल्याला शुद्ध आरोग्य मिळवायचं आहे. त्यासाठी कोणते निकष कसे लावायचे, हे आपले आपणच ठरवायचे आहे. संवाद साधायचे असतील तर पूर्ण विषय समजून घेतल्यावर, जरूर बोलूया.
समर्थ म्हणतात,
पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण ।
उगाच ठेवी जो दूषण
तो दुरात्मा दुराभिमान
मत्सरे करी ।।
आजच्या काळात शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालणे जास्त महत्वाचे आहे.
जसे काम तसे तसा आहार.
कष्टाची, अतिकष्टाची कामे करणाऱ्याला, म्हणजे रस्त्यावर दगड फोड करणाऱ्या
लमाणी माणसाला जर सांगितले गेले, की
" तू रोज तुपभात खा, तुझ्या तब्येतीला तो चांगला आहे",
तर तो म्हणेल,
"काय यॅड लागलंय का, म्हणं तूपभात खावा." आमची लसणीची झणझणीत लाल चटणी, कांदा भाकर आणि कोंबडं बोकड लई ब्येस.
आणि प्रत्यक्षात देखील तेच सत्य आहे.
केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी ठरत नाही. तर व्यावहारिक स्तरावर काही पर्याय वेगळे असू शकतात.
म्हणजे
काम करून आपोआप फुकटचा घाम येतोय की, जिममधे जाऊन विकतचा आणावा लागतोय.
रोग म्हणून अंगातून घाम येतोय, की आपोआपच येतोय.
ऊन्हात काम आहे की एसी मधे.
ऊद्याची चिंता आहे की नाही.
शारीरिक श्रमाचे काम आहे की बौद्धिक क्षमतेचे.
परंपरेने आलेले, की ओढून ताणून आणलेले.
गरज म्हणून की हौस म्हणून.
जीभेसाठी की पोटासाठी.
जीवासाठी की जातीसाठी.
हट्टआग्रहाने खातोय की सहज बदल म्हणून,
मला हवंय म्हणून की मित्र खातोय म्हणून.
या सर्व गोष्टींचा विचार चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी करावाच लागेल. अगदी एका जातीतल्या, एका धर्मातल्या, एकाच घरातल्या दोन व्यक्तींसाठी सुद्धा !
विचार वेगळा करावा लागेल. लागतो.
इथे मी मुद्दाम नमुद करू इच्छितो की , जातीनुसार मांसाहार मी सांगत नाहीये, तर कर्मानुसार आहार ठरवावा.
मराठी भाषेत एक म्हण आहे, मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते. असं व्हायला नको. आपण प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा आणि आपला विकास करावा. शेवटी मत मांडणे म्हणजे मत लादणं नव्हे,
माऊली म्हणतातच, जो जे वांछील तो ते लाहो,
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
24.09.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 26-दीपं दर्शयामी-भाग तीन
जसे इंधन तशी काजळी.
जर दिवा तेलाचा असेल तर काजळीचे प्रमाण वेगळे. मेणाचा असेल तर वेगळे. राॅकेलचा असेल तर काजळी जास्ती आणि पेट्रोल जाळले तर काजळी एकदम कमी. स्पिरीटला काजळी धरणारच नाही, तर विमानातील इंधनाची ज्योतच दिसणार नाही. म्हणजे जसे इंधन तशी काजळी. भगवत गीतेमधे या अर्थाचा एक श्लोक आला आहे...
भक्ष्ययते यद् ध्वान्तम कज्जलम च प्रसूयते।
यद् दीपोज्वलेत कज्जली भवेत् ।
जायते तादृशी प्रजा।
झिरोचा बल्ब, एल ई डी बल्ब, ट्यूबलाईट, फ्लुरोसंट बल्ब, हॅलोजन, हाय मास्क बल्ब या प्रत्येकापासुन मिळणारा प्रकाश वेगवेगळा.
आपल्याला ज्या कारणासाठी प्रकाश हवा आहे, त्याप्रमाणे योजना हवी. फक्त मलाच वाचायचे आहे, किंवा लेखन करायचे असेल तर टेबल लॅम्प पुरतो ना ! तिथे हॅलोजन नको ! आता तर पेनच्या रिफिलच्या टोकापुरताच उजेड पाडणारी पेन पण निघाली आहेत.
या प्रत्येक यंत्रणेला लागणारी विद्युत उर्जा देखील वेगवेगळी असते. काही ठिकाणी एसी करंट, काही ठिकाणी डीसी करंट काही ठिकाणी स्टॅबीलायझर, काही ठिकाणी अॅडेप्टर, तर काही ठिकाणी फक्त मायक्रोचीप पुरते. तसेच आहे. दिव्यातील इंधन जसे असेल तसे परिणाम आपणास मिळतात.
जो दिवा देवासाठी तसाच तो देहासाठी समजून घ्यावा. जशी काजळी दिव्यामधे तशी देहामध्ये देखील काजळी बनते. आपल्या अन्नाचा दर्जा जसा असेल, तशी काजळी बनण्याचे प्रमाण कमी जास्त होईल.
खाल्लेल्या अन्नातून चांगले आणि वाईट असे दोन भाग तयार होतात. चांगल्या उत्तम प्रतीचा आहार जर आपण सेवन केला तर तयार होणारे प्राॅडक्ट उत्तम प्रतीचेच असणार. मध्यम प्रतीचा आहार घेतला तर मध्यम प्रतीचे प्राॅडक्ट तयार होणार. आणि हलक्या प्रतीचे अन्न घेतले तर हलक्या दर्जाचे प्राॅडक्ट तयार होणार.
आड्यात जे असेल तेच पोहोऱ्यात येणार ना !
बिर्याणी करायची असेल तर तांदुळ बासमतीचाच हवा. साधा भात करायचा असेल तर तांदुळ मसूरी किंवा कोलम हवा. आणि पेज करायची असेल तर उकडा तांदुळ उत्तम असतो. आपल्याला कोणते प्राॅडक्ट बनवायचे आहे ते ठरवले तर तांदुळ कोणता वापरायचा ते निर्णय बदलतात.
तसेच शरीर पुष्ट करायचे असेल तर आहाराची योजना वेगवेगळी हवी. केवळ मांसधातु वाढवायचा असेल तर आहार वेगळा, रक्त वाढवायचे असेल तर आहार वेगळा आणि सगळेच धातु वाढवायचे असतील तर आहार वेगळा असतो.
या अन्नाच्या दर्ज्याला आयुर्वेदीय ग्रंथकार आणि गीताकार, सत्व रज तम असे नामाभिधान करतात.
आहार सात्विक असेल तर सर्व इंद्रिये, अवयव, धातु, अगदी मन सुद्धा सात्विक बनते. आहार राजसिक असेल, तर शरीरावर होणारा परिणाम राजसिक असतो, आणि आहार तामसिक असेल तर विचार आणि कृती तामसिक होते. हेच सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी, (पटवून घेणाऱ्याला) दिव्याचे उदाहरण ग्रंथकर्ते देतात.
"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" असे तुकाराम महाराजांनी देखील म्हटलेले आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
19.06.2017
लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 7
फार बिकट अवस्था होते, रिपोर्ट अॅबनाॅर्मल आणि पेशंट नाॅर्मल असेल तर.
नेमका काय निर्णय घ्यायचा रुग्णाला कळतंच नाही. डाॅक्टर आपली जबाबदारी टाळून मोकळे झालेले असतात. आणि रुग्णाला अगतिकपणे चुकीचा निर्णय घ्यायला भाग पडते. अशी कितीतरी उदाहरणे व्यवहारात पहायला मिळतात. मुतखडे, पित्ताशयातील खडे, युटेराईन फायब्राॅईड पासून अगदी कॅन्सर च्या गाठीपर्यंत, आणि रक्तदाबापासून, ह्रदयरोगापर्यंत साऱ्या रोगाच्या निदानासाठी यंत्रावर अवलंबून रहाण्याची वेळ आली आणि आरोग्याचे आर्थिक गणितही पार कोलमडून पडले. त्यात भर पडली ती, इन्शुरन्सची. कंपन्यांकडून परतावा मिळतो आहे, मग पैशाचा प्रश्न सुटला पण आयुष्यभर औषधांचा खेळ मात्र सुरू झाला.
रोगाच्या दुष्परिणामापेक्षा, औषधांचे दुष्परिणाम जास्त दिसू लागले. आणि आहार वाटीत आणि औषधी ताटात दिसू लागली. म्हणजे आहारापेक्षा औषधांची संख्या वाढू लागली.
पूर्वीची गाणी कशी होती, गायकाला मधे श्वास घ्यायला मिळायला वेळ मिळायला हवा, म्हणून मधेच म्युझिकचा पीस वाजवला जाई. पण आता वाजंत्रीवाल्यांना थोडी विश्रांती द्यावी म्हणून गायकांना मधे मधे तेच तेच अर्थहीन शब्द आळवायला लागतात, तसं काहीसं झालंय. सतरा अठरा औषध घ्यायची. त्यानेच पोट भरते. एवढी औषधे गिळायला परत तेवढेच पाणी पण पाजवले जाते. गरज नसताना अवयवांना अनावश्यक कामाला लावले जाते. औषधे उष्ण पडू नयेत म्हणून दर दोन चार तासांनी काहीतरी खाण्याचा सल्ला शिरसावंद्य मानला जातो आणि पोटावर अत्याचार सुरू होतो.
एवढं सगळं सोसूनही मला त्याचा विशेष त्रास होत नाहीच.
कारण "तो". आपल्यापेक्षा त्याला आपली जास्त काळजी आहे.
माझं, माझ्याकडे तरी लक्ष कुठाय ? हे सगळे अत्याचार पाहिले की खरंच "तो" आहे, याची खात्री पटते. नाहीतर एवढे सगळे अत्याचार सोसूनही मी मात्र सतत धावतोच आहे. नाॅर्मल होण्यासाठी .....
तो कस्तुरी मृग कसा सैराट होऊन धावतो, कस्तुरीच्या गंधाचा ठाव घेण्यासाठी. पण शेवटपर्यंत त्याला कळत नाही. तो सुगंध माझा मीच निर्मिलेला होता. फक्त तो मला कळत नव्हता. तसं आरोग्याचं झालंय. माझं आरोग्य माझ्यातच हरवलंय, माझ्या अज्ञानामुळे हरवलंय आणि मी मात्र माझा आयुर्वेदाचा दृष्टीकोन हरवून रानोमाळ दिशाहीन भटकतोय,
सैराट होऊन....
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.02.2017
हे परमेश्वरा, मला या जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे. यासाठी मला तू अंतिम सत्य सांग. मला एवढे कळते आहे, की माझे अंतिम सत्य तूच आहेस. तरीदेखील माझी बुद्धी मला वेळोवेळी तुझ्यापासून लांब नेते. माझ्या बुद्धीला तू स्थिर बनव.
Copyright © 2025 | Marathisrushti