महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य:- २ वाट्या सोयाबिनचे पीठ , अर्धी वाटी टोमॅटो प्युरी (उकळत्या पाण्यात घालून पाच मिनटाने थंड पाणी ओतून साल काढावे. मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.), पाऊन ते एक वाटी पाणी, तिखट, मीठ, तेल, मोहन व तळण्यासाठी , १ टेबलस्पून बेसन.
कृती:- सोयाबीन खमंग भाजून पीठ दळून आणावे. पिठात तिखट, मीठ, व तीळ घालावे. पाणी, टोमॅटो प्युरी व २ चमचे तेल गरम करावे.(उकळी येण्यापूर्वी) त्यात पीठ घालून ढवळून उतरवावे. एका तासाने बेसन घालून मळून गरम तेलात हलकेच चकली तळावी. कागदावर एकावेळी तळणार तेवढ्याच चकल्या घालून लगेच तळाव्या. टोमॅटो प्युरीएवजी मेथी, पालक, पुदिना इत्यादी वाटून त्याच्या पाण्याने पीठ भिजवता येते. थोडेसे उडदाचे पीठ घातले तर चकली खुसखुशीत होते. शिवाय करताना मोडत नाहीत. नाचणी पीठ वापरूनही चकल्या करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य : १/२ कप पनीरचे तुकडे, १/४ कप फरसबीचे तुकडे (१/२ इंच), १/४ कप गाजर (छोटे चौकोनी तुकडे), १/४ कप बटाटा (सोलून छोटे तुकडे), १/४ कप फ्लॉवरचे तुकडे, १/२ कप कांदा (छोटे तुकडे), ३ टिस्पून मटार, १ कप टोमॅटोचे तुकडे (सोललेला), १ टिस्पून टोमॅटो पेस्ट, १/२ टिस्पून जिरे, १/२ टिस्पून लाल तिखट, १/२ टिस्पून गरम मसाला, १ तमालपत्र, दिड टिस्पून दुध, दिड टिस्पून बटर, २ टिस्पून तूप, चवीपुरते मीठ.
कृती : २ कप पाण्यात फरसबीचे तुकडे, गाजर, बटाटा, फ्लॉवरचे तुकडे आणि मटार उकळवत ठेवावे. या पाण्यात १ तमालपत्र घालावे. भाज्या निट शिजू द्याव्यात. भाज्या शिजल्या कि उरलेले पाणी ठेवून द्यावे. तमालपत्र काढून टाकावे.
२ टोमॅटो पाण्यात साल सुटेस्तोवर उकळवावे. साले काढून टोमॅटोचे बारीक तुकडे करावे.
नॉनस्टीक पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरे घालावे व कांदा परतावा. कांदा परतला कि १/२ टिस्पून गरम मसाला घालावा. कांदा निट शिजू द्यावा.
नंतर टोमॅटोचे तुकडे घालावे. तूपाचा तवंग येईस्तोवर शिजू द्यावे.
नंतर उकळलेल्या भाज्या घालाव्यात, भाज्या उकळून उरलेले पाणी, टोमॅटोपेस्ट घालावी, मीठ आणि तिखट घालावे. ढवळावे.
गॅस मंद करून दुध, बटर, पनीर घालून हळूवार ढवळावे.४ ते ५ मिनीटे मंद आचेवरच झाकून शिजू द्यावे.
गरमा-गरम भाजी नान, रोटी किंवा भाताबरोबर सर्व्ह करावी.
साहित्य – 1 लिटर दुध ( मलाई न काढता ), 300 ग्राम साखर, 2 लिंबाचा रस.
कृती – एक स्वच्छ भांडे घेऊन त्यात दूध उकळून घ्यावे. जेवढा लिंबूचा रस आहे तेवढेच त्यात पाणी घाला व लिंबाचा रस हळूहळू उकळत्या दुधात , दुध फाटे पर्यन्त टाका आणि दुध हलवत रहा जेव्हा दुध चांगल्या प्रकारे फाटेल तेव्हा लिंबाचा रस टाकणे बंद करा , ह्या फाटलेले दुध एका सूती कपड्यात ओतून गाळून घ्या व ( तयार झालेल्या पनीरला ) कपड्यातच थंड पाण्याने धुवून घ्या जेणेकरून त्यातील आंबटपणा निघून जाईल.नंतर कपडा चारही बाजूंनी एकत्र गुंडाळून हाताने दाबून पाणी पूर्णपणे निथळून घ्यातयार झालेला गोळा एका ताटात काढा आणि हाताने एकजीव होईपर्यंत मळून घ्या व त्याचे लाडूसारखे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.नंतर एका पातेल्यात साखर व 4 कप पाणी टाका आणि उकळून घ्या, उकळी आल्यानंतर त्यात तयार केलेले गोळे एक एक करून सोडा.व पातेले झाकून ठेवा , 10 -15 मिनिट रसगुल्ले शिजवून घ्यातयार झालेले रसगुल्ले पाकासहित एका भांड्यात काढून घ्या व थंड होऊ द्या, 5- 7 तासानंतर हे रसगुल्ले तुम्ही सर्व्ह करू शकता.
साहित्य:- टोफू २५० ग्रॅम, दही घट्ट १ वाटी (नसल्यास दही कापडात बांधून पाणी काढून घेणे.), आलं लसूण पेस्ट २ चमचे, धणे-जिरे पावडर २ चमचे
तिखट, मीठ चवीनुसार, हळद, कस्तुरीमेथी चवीनुसार, चाटमसाला थोडा, तेल २ ते ३ चमचे, मैदा किंवा कणीक १ ते २ चमचे, सिमला मिरची, टोमॅटो, कांदे (मोठय़ा तुकडय़ांमध्ये)
कृती:- दह्यात सगळे मसाले कणीक घालून एकजीव करावे. नंतर त्यात टोकू शिमला मिरचीचे तुकडे टोमॅटो, कांदे घालावे. ३० ते ४० मिनिटे ते तसेच ठेवावे. नंतर एका सळईला प्रथम कांदा, मग टोकू - सिमला मिरची, टोमॅटो, परत टोकू या क्रमाने टोचून रुंद कोळश्याच्या भट्टीवर किंवा गॅसवर भाजून थोडा तेलाचा हात लावून चाटमसाला टाकून चटणी कचुंबरबरोबर सव्र्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तांदळाचे पदार्थ तयार करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, की तांदळाचा भात बनविताना शक्यतो शुद्ध पाणी (फिल्टर केलेले) वापरावे. त्यामुळे भात चिकट होत नाही व चवीतही फरक पडतो.
काही पदार्थ जुन्या तांदळात चांगले होतात, तर काहींना मात्र नवीनच तांदूळ लागतो.
काही तांदळाचे पदार्थ
ब्राउन राइस
साहित्य : तांदूळ २ वाटय़ा, साखर अर्धी वाटी, स्टार फुले २-३, लवंग ५-६, व्हिनेगार १ चमचा, लिंबाचा रस १ चमचा, मीठ चवीनुसार, तेल ४ चमचे, साखर अर्धा चमचा, कोथिंबीर
कृती : फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यात साखर घाला. साखर ब्राऊन झाल्यावर त्यात २-३ स्टार फुले, लवंग व पाणी घालून उकळी आणा. नंतर त्यात व्हिनेगर किंवा लिंबाचा रस, मीठ, थोडी साखर व २ वाटय़ा तांदूळ घालून भात शिजवा. वरून कोथिंबीर घालून रायत्याबरोबर सव्र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भाताचे सीख कबाब
साहित्य : शिजवलेला भात २ वाटय़ा, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, धणे-जिरे पावडर २ चमचे, आमचूर पावडर १ चमचा, चाटमसाला २ चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, मीठ चवीनुसार, कॉर्नस्टार्च २ ते ३ चमचे, उकडलेला बटाटा १ नग, तेल २ ते ३ चमचे.
कृती : भात बटाटे व उर्वरित सगळे मसाले (चाट मसाला व कॉर्नस्टार्च सोडून) एकत्र मिसळून घ्यावे. एकजीव करताना २ चमचे तेल घालावे. हे तयार झालेले मिश्रण एका सळईला लावावे. हा थर जास्त जाड असू नये. या वेळी हाताला कॉर्नस्टार्च लावून थर द्यावा. यानंतर या तयार झालेल्या सळया मंद कोळशाच्या शेगडीवर अर्धवट भाजून घ्याव्यात. सव्र्ह करते वेळी वरून पुन्हा तेलाचे ब्रशिंग करून शेगडीवर भाजून घ्यावे. वरून चाट मसाला चटणी व कचुंबरबरोबर सव्र्ह करावे.
प्रकार दुसरा : हेच मिश्रण सूप स्टिक्सला लावून कॉर्नस्टार्चच्या साहाय्याने लांबट पसरवून घ्या. नंतर गरम तेलात तळून त्यावर चाट मसाला घालून सव्र्ह करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
उडदाची डाळ ४ तास भिजत घालावी. नंतर एकत्र करून त्यात मीठ व जिरेपूड घालावी व त्याचे लहान-लहान वडे करून तळावे. तळलेले वडे बाऊलमध्ये ठेवून त्यावर थोडी चटणी घालून खायला द्यावे. वरून एक चमचा दही व थोडी
जिरेपूड घालावी चटणीसाठी प्रथम चिंच भिजत घालून कोळ तयार करावा
सर्व ऋतूंत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना सर्वाधिक काय खायला आवडते, असा प्रश्नइ जर विचारला, तर त्याचे एकच उत्तर मिळेल आणि ते म्हणजे आइस्क्रीम व कुल्फी. कुल्फी हा पदार्थच मुळी असा आहे की भारतात कोणत्याही भाषेत, कुठल्याही व्यक्तीसाठी प्रियच आहे.
साहित्य - १ वाटी मैदा - मीठ, अर्धी वाटी मटार, दोन बटाटे उकडून व कुस्करून, एक ते दीड चीजची क्युचब किसून, पाव चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, तळणीसाठी तेल.
कृती - प्रथम १ वाटी मैदा, १ चमचा तेल व मीठ व पाणी घालून घट्टसर मळून घ्या. अर्धी वाटी मटार उकळत्या पाण्यात मऊ शिजवून घ्या. बाहेर काढून मॅश करून घ्या. दोन बटाटे उकडून मॅश करा. दोन्ही एकत्र करून त्यात मीठ, मिरची पेस्ट व चीज किसून घाला व मळून छान गोळा करून घ्या. भिजवलेला मैद्याच्या गोळ्यापैकी लिंबाएवढा गोळा घ्या व छोटी चौकोनी पोळी लाटा. त्यावर वरील सारण घालून रोल तयार करा. रोलच्या कडेच्या दोन्ही बाजू पाण्याचा अलगद हात लावून बंद करा. साधारण दोन ते अडीच इंचाचा एक रोल झाला पाहिजे. कढईत तेल गरम करा व हे रोल त्यात गुलाबी रंगावर खरपूस तळून घ्या. सॉसबरोबर सर्व्ह करा. वरील रोल्स तयार करून झिपलॉक बॅगमध्ये ठेवून वरच्या डी-फ्रॉस्टच्या कप्प्यात ७-८ दिवस आरामात राहतात. ऐनवेळी तेल गरम करून तळता येतात. चीजमुळे हे मटार रोल्स खूपच चवदार लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
चारोळी हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. अनेक गोडाच्या पदार्थांमध्ये, लाडवांमध्ये चारोळी वापरली जाते. मात्र केवळ गोडाच्या पदार्थांपुरता चारोळी मर्यादीत नाही. अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठीदेखील चारोळीचा नियमित आहारात समावेश करता येऊ शकतो. त्यामध्ये अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत.
महाराष्ट्रात कोकणातील उष्ण आणि दमट हवामानापासून विदर्भातील हिवाळ्यात कडक थंडीतही चारोळीची झाडे चांगली वाढतात आणि भरपूर उत्पादन देतात. आदिवासी भागात या चारोळीच्या झाडाला चार असे म्हणतात.
चारोळीची लागवड भारतात स्वतंत्रपणे केली जात नाही. त्यामुळे चारोळी लागवडीखालील क्षेत्र आणि चारोळीचे उत्पादन यांविषयी माहिती उपलब्ध नाही. भारतात कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, ओरीसा, इत्यादी राज्यांतील जंगलामध्ये आणि डोंगराळ भागात चारोळीची झाडे आढळतात. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातील नांदेड भागातील किनवटच्या जंगलात, विदर्भातील बुलढाणा, अकोट, रामटेक आणि भंडारा मगात तर कोकणातील रत्नागीरी, राजापूर, मालवण आणि ठाणे जिल्ह्यात चारोळीची झाडे दिसून येतात. चारीळीच्या झाडाला उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानवते. उष्ण आणि दमट हवामानातही चारोळीची झाडे चांगली वाढतात. कमी पावसाचा तसेच अतीपावसाचा प्रदेशात चारोळीची झाडे वाढलेली दिसून येतात.
चोरोळीच्या झाडा पासून लागवडीनंतर ७ ते ८ वर्षानंतर उत्पादन मिळण्यास सरुवात होते. साधारणपणे दहा वर्षानंतर चारोळीच्या झाडापासून भरपून उत्पादन मिळण्यास सुरूवात होते. चोरोळीच्या प्रत्येक झाडापासून १० किलो फळे मिळतात. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यांमध्ये चारोळीच्या झाडांना मोहोर येतो आणि एप्रील-मे महिन्यात फळे पक्व होऊन चारोळी मिळण्यास सुरूवात होते. चोरोळीच्या फळांचा रंग काळा झाल्यानंतर फळे पक्व झाली असे समजून फळांची काढणी करावी. काढणीनंतर फळे पाण्यात सुमारे ३ ते ४ दिवस भिजत ठेवावीत. नंतर फळांचा काळा गर हाताने चोळून काढून टाकावा आणि बी वेगळे कराव. हे कठिण कवच असलेले बी सावलीत वाळवितात.
वाळलेली कठीण फळे जात्यावर अगदी हलकेच भरडतात. त्यामुळे कठीण कवच फूटून आतील बी वेगळे होते. यालाच चारोळी म्हणतात. चारोळीच्या चांगल्या वाढलेल्या प्रत्येक झाडापासून सुमारे दोन किलो चारोळी मिळते. जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे चारोळीचे उत्पादन वाढत जाते. चारोळीमध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात. चारोळीत प्रोटीन्स आणि फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. सोबतच यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 1, व्हिटॅमिन बी 2 आणि नियासिन घटक आढळतात. यासोबतच चारोळीत लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस घटक मुबलक प्रमाणात आढळत असल्याने त्याचा आरोग्याला फायदा होतो. शारीरिक कमजोरी दूर करण्यास चारोळी मदत करते. शारीरिक वाढीसाठीदेखील त्याचा फायदा होतो. रात्री दूधात चारोळी मिसळून प्यायल्याने सर्दी खोकल्याचा त्रास कमी होतो. पुरूषांमध्ये शुक्राणूंची कमतरता भरून काढण्यासाठीही चारोळी फायदेशीर आहे. तोंड येण्याचा त्रास वारंवार जाणवत असल्यास त्यापासून सुटका मिळवण्यासाठी ३-४ दाणे चघळा. डोकेदुखी, डोकेदुखीतून येणारी चक्कर टाळण्यासाठी चारोळीचे दाणे फायदेशीर होतात. चारोळी तुम्ही थेट खाऊ शकता. याकरिता दूध किंवा पाण्याची गरज नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मराठी माणसाच्या मराठी मुंबईत अस्सल मराठी पदार्थ किती हॉटेल्समध्ये मिळतात? खरंतर हा एक संशोधनाचाच विषय आहे. मराठी आणि महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ मिळणारी मराठी मालकीची हॉटेल्स किती आहेत? हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच……
Copyright © 2025 | Marathisrushti