नाक दाबावेच लागेल.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखन
प्रकाशन दिनांक :- 06/03/2005
बिहार, झारखंड विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उद्भवलेली राजकीय परिस्थिती आणि त्यानंतर सुरू असलेला लोकशाहीचा तमाशा बघता निवडणूक पद्धतीत आमूलाठा सुधारणा करणे अत्यंत गरजेचे ठरले आहे. या दोन्ही राज्यात आणि याआधी केंद्रात तसेच इतर राज्यातदेखील खंडित जनादेशामुळे जी काही राजकीय साठमारी झाली अथवा होत आहे ती नक्कीच लोकशाहीचा गौरव वाढविणारी नाही. केवळ सत्तेसाठी आपल्या विचारधारा, श्रद्धा वेशीला टांगून राजकीय पक्षांमध्ये अक्षरश: अनैतिक सौदेबाजी होत असते.