गेल्या काही वर्षांत मराठी साहित्यात मोलाची भर घालणार्या महत्त्वाच्या कादंबर्या ग्रामीण भागातून लिहिल्या गेल्या आहेत. 'बारोमास', 'रौंदाळा', 'निशाणी डावा अंगठा' ही त्यातली काही लख्ख उदाहरणे. याच परंपरेतील अलीकडची महत्त्वाची कादंबरी म्हणजे, आनंद विंगकर यांची 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट'. परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीने नाडल्या जाणा-या शेतक-यांचं सनातन दु:ख मांडणा-या या कादंबरीने आनंद विंगकर यांना चांगलाच नावलौकिक मिळवून दिला आहे.
या कादंबरीला आतापर्यंत आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तिला मानाचा 'केशवराव कोठावळे पुरस्कार'ही मिळालेला आहे. अर्थात पुरस्कारांपेक्षाही विंगकर यांनी या कादंबरीतून शेतक-यांच्या दु:खाला जी वाचा फोडली आहे, ती महत्त्वाची आहे आणि खुद्द लेखकालाही तसंच वाटतं. कारण त्याचा आजवरचा प्रवासही संघर्षाचाच आहे.
सातारा जिल्ह्यातील कराडजवळच्या विंग गावातील आनंद विंगकरांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. त्यांचं तिसरीपर्यंत शिक्षण मुंबईतच झालं. मात्र त्यानंतर आनंद विंगकर आईबरोबर गावाकडे परतले आणि गावच्या शाळेत जायला लागले. त्यानंतरचं त्यांचं वास्तव्य बहुतांशी ग्रामीण भागातच होतं. शिकून नोकरीला लागल्यावर काही काळ ते मुंबईत स्टेट बँकेत नोकरीला होते. परंतु १९८५च्या दरम्यान त्यांची कराडला बदली झाली. तिथे असतानाच एकदा त्यांची बदली खटाव-माण परिसरातील चितळी गावातल्या शाखेत झाली. तिथल्या वास्तव्यात आजूबाजूच्या परिसरातील जे भयानक वास्तव त्यांनी अनुभवलं, त्यातूनच 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' आकाराला आली. प्रकाशित झालेली ही त्यांची पहिली कादंबरी असली, तरी त्यापूर्वी त्यांनी 'दस्तावेज' नावाचीही कादंबरी लिहिली होती.
आणीबाणी ते जागतिकीकरण असा प्रदीर्घ काळ कवेत घेणा-या या कादंबरीचं ते सध्या पुनर्लेखन करीत आहेत. महत्त्वाचं म्हणजे विंगकरांची पहिली ओळख सामाजिक कार्यकर्ता आणि कवी म्हणूनच आहे. गेली अनेक वर्षं ते कवितालेखन करत आहेत. तसंच 'भारत ज्ञान-विज्ञान समुदाय' या पुण्यातील संस्थेच्या माध्यमातून ते साक्षरता व विज्ञानाच्या प्रसाराचंही काम करत आहेत. त्यांचा 'आत्मटीकेच्या उदास रात्री' हा कवितासंग्रह आणि 'सुंबरान मांडलं' ही दीर्घ कविता हा त्यांचा यापूर्वीचा प्रकाशित साहित्यिक ऐवज. त्यांचे डावे विचार व त्यातून आलेले व्यापक सामाजिक भान त्यांच्या शब्दाशब्दातून पसरलेले आहे. 'अवकाळी पावसाच्या' गोष्टीतले हेच भान वाचकांना अस्वस्थ करते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
सरंजामशाही आणि जमीनदारशाहीच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारून या दोन्ही शाह्या समूळ संपविण्याचा विडा उचलेल्या सर्वहारा वर्गाचे ते एकनिष्ठ पाईक असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या घरातच दोन पिढय़ा अगोदपर्यंत या दोनही शाह्या सुखनैव नांदत होत्या. वडील राजनिष्ठ सेवक होते आणि विद्यार्थीदशेत अत्यंत आज्ञाधारक असलेला गंगाधर चिटणीस एकदम दुसऱ्या टोकाच्या विचारांचा गिरणी कामगारांच्या सुखदु:खाशी समरस होत गेला. हे अतक्र्य घडविले साने गुरूजींनी.
‘समाजासाठी आणि देशासाठी जगा’ हा साने गुरूजींचा संदेश त्यांनी आत्मसात केला आणि एका क्षणात सुखाची सरकारी नोकरी सोडून त्यांनी कामगारांशी आपले नाते जुळवले ते अखेपर्यंत! अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे १९२७ मध्ये जन्म झालेल्या कॉ. गंगाधर चिटणीस यांचे शिक्षण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झाले आहे.
सावंतवाडी, पुणे, मुंबई येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर ते पुण्याला गेले. गंगाधरचे वडील राजापेक्षा राजनिष्ठ असे होते. त्यांना आपल्या मुलानेही तसेच व्हावे असे वाटत होते. विद्रोही वातावरणापासून त्यांनी मुलांना कटाक्षाने दूर ठेवले असले तरी इंग्रजी पाचवीपर्यंत मुंबईत शिक्षण घेत असताना गंगाधरच्या एका शिक्षकामुळे त्याचा रा. स्व. संघाच्या शिवाजी पार्कच्या शाखेशी संबंध आला होता. पण संघाच्या शिकवणुकीविषयी त्यांचा भ्रमनिरास झाला आणि नंतर वडिलांच्या बदलीमुळे त्यांचा संघाशी असलेला संबंध कायमचा तुटला. पुन्हा ते मुंबईत आले पण तेव्हा त्यांच्या विचारांवर मार्क्सवाद आणि साने गुरूजी यांच्या विचारांचा पगडा होता. त्यांनी मुंबईच्या पोदार महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. वाणिज्य शाखेमध्ये अॅडव्हान्स बँकींगमध्ये ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यांना सरकारी नोकरी मिळाली तीही निर्वासितांचे अश्रू पुसणारी.
स्वातंत्र मिळाल्यावर देशातल्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये जाऊन त्यांना मदत करताना आपल्या समाजातील विषमता त्यांना सतत डाचत होती आणि त्याचवेळी साने गुरूजींच्या साहित्याचा प्रभाव त्यांच्या मनावर होत होता. एका क्षणी त्यांनी ठाम निर्णय घेतला आणि नोकरी सोडून कम्युनिस्ट पक्षात ते दाखल झाले. मार्क्सवादी साहित्य संपूर्णपणे वाचून पूर्ण विचारांती कम्युनिस्ट पक्षात दाखल झालेल्या चिटणीसांची नाळ गिरणी कामगारांच्या प्रत्येक लढयाबरोबर अधिक घट्ट होत गेली. १९५२ मध्ये पक्षात आल्यावर त्यांनी कॉ. डांगे यांच्या बरोबर आयटकच्या कामात स्वत:ला झोकून दिले आणि कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी स्वत:हून स्वीकारली.
गिरणी कामगारांच्या संपामध्ये गिरणगावातील अनेक गिरण्यांच्या दरवाजावर संपफोडय़ांचे हल्ले झेलत, कामगारांना आपली भूमिका पटवून देण्यात चिटणीसांचा हातखंडा होता. शिवसेनेच्या उदयानंतर त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी गिरणी कामगार युनियन आणि कम्युनिस्ट पक्षातर्फे काढण्यात आलेल्या ‘लाल बावटा’ या मुखपत्राचे संपादन चिटणीस यांनी केले होते. गिरणी कामगारांचे बोनसचे लढे असोत किंवा क्षणिक एखाद्या मुद्यावरून एखाद्या गिरणीत अचानक आंदोलन झालेले असो, चिटणीस तेथील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत असत.
कमला मिल असो वा मधुसूदन मिल तेथील कामगारांना आजही पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षांत चिटणीसांनी बजावलेली समन्वयाची भूमिका लक्षात आहे. अनेकदा हल्ले झाल्यावरही त्याच नेटाने आपली ‘गेट मिटींग’ पूर्ण करणारे चिटणीस पंक्षातर्गत वादामध्ये कधी पडले नाहीत. पक्षाचा आदेश कायम मानणारे आणि प्रसंगी आपल्या मनाला मुरड घालून तो आदेश शेवटपर्यंत पाळणारे, असे ते एकनिष्ठ पदाधिकारी होते. गिरणी कामगार युनियनच्या स्थापनेपासून किंबहुना त्या अगोदरपासून त्यांनी गिरणी कामगारांची लढाई पाहिली होती.
१९७१ ते २००० पर्यंत तब्बल २९ वर्षे ते मुंबई गिरणी कामगार युनियनचे कार्यवाह होते. पक्षांतर्गत मतभेद असले तरीही त्यांनी भावनिक आणि वैचारिक पातळीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाबरोबर असलेली नाळ कधीही तोडली नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणही जवळून अभ्यासलेल्या साम्यवादी नेते आणि कार्यकर्त्यांच्या पठडीतले ते होते. कामगारांच्या सर्व संघटना एकत्र करून पुन्हा एक मोठी लढाई उभारण्याची त्यांची मनीषा होती, पण ती त्यांची मंझिल दूरच राहिली.
आठ वर्षे प्रकृती साथ देत नसतानाही त्यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. काही दिवसांपूर्वी त्यांना इस्पितळात दाखल केले तेव्हाही ते आपल्या मंझिलबाबत आशावादी होते. इतक्या सरळ मनाचा, इतका नि:स्पृह आणि इतक्या निस्वार्थीपणे आपले जीवन, ध्येयासाठी पूर्णपणे वाहून टाकणारा असा हा कॉम्रेड होता. त्यामुळेच जेव्हा कम्युनिस्ट पक्षात फूट पडली तेव्हा आणि कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांना पक्षातच टीकेचे लक्ष्य केले गेले, तेव्हा त्यांना खूप वेदना झाल्या. परंतु ते वैचारिक आणि धोरणात्मक वादामध्ये सहसा पडत नसत आणि आपला लाल ध्रुव तारा कधीतरी अवघ्या जगावरती त्याची प्रभा पसरवेल असा आत्मविश्वास त्यांना अखेपर्यंत होता. त्यामुळेच अनेकदा जागतिक पातळीवरती साम्यवादी देशांना व विचारांना पीछेहाट सहन करावी लागली तरी ते खचून गेले नाहीत.
भविष्य कामगार आणि कष्टकरी वर्गाच्याच हातात आहे अशी खात्री त्यांना होती आणि ती मनात ठेऊनच ते चिरंतनात विलिन झाले.
बरखा, सीता स्वयवर, जय संतोषी मा, संपूर्ण रामायण भरत मिलाप अशा दोनशेहून अधिक पौराणीक चित्रपटात कामे केली. मनोज कुमार यांच्या शहिद या चित्रपटातील राजगुरू यांची भूमिका व हमारी याद आयेगी या चित्रपटातील त्यांची खलनायकाची भूमिका खूप गाजली होती.
अंजनीबाईकडे बेगम अख्तर, नैनादेवी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी संगीताचे धडे घेतले.
अपर्णा संत या भावसंगीत व चित्रपट संगीतावरील सांगीतिक विश्लेषणात्मक कार्यक्रम सादर करतात. संगीतकार मदन मोहन किंवा इतर अनेक संगीतकारांवरचे संगीतकारांच्या विविध सांगीतिक परिभाषेतील बद्दलचे कार्यक्रम त्या त्यांच्या विद्यार्थिनींना घेऊन कार्यक्रम सादर करत असतात.
काळू-बाळू
किस्सा तसा फारच जुना! शिवा-संभा कौलापूरकर यांचा तमाशा त्यावेळी फारच लोकप्रिय होता. कोल्हापूरमध्ये त्यांच्या तमाशाचा खेळ रंगला असताना राजर्षी शाहू महाराज तमाशा पाहायला आले. महाराज आल्याबरोबर कनातीमधले सगळे प्रेक्षक, तमाशातील कलाकार त्यांना वाकून नमस्कार करायला लागले. संभा त्यावेळी राजा विक्रमादित्याची भूमिका साकारत होता. त्याने मात्र शाहू महाराजांना नमस्कार केला नाही. लोकांना खूपच आश्चर्य वाटले आणि रागही आला. वग संपल्यानंतर शाहू महाराज कलाकारांना भेटायला गेले आणि संभाने लगेच त्यांना वाकून नमस्कार केला आणि दिलगिरी व्यक्त केली. संभा म्हणाला, महाराज माफ करा.
तुम्ही आल्याबरोबर नमस्कार केला नाही, कारण मी त्यावेळी राजाची भूमिका करत होतो आणि तुम्हाला नमस्कार केला असता तर राजाचा अपमान झाला असता. संभाचे हे उत्तर ऐकताच शाहू महाराज प्रचंड खुश झाले आणि त्यांनी संभाला शाबासकी दिली. आपल्या भूमिकेशी, तत्त्वांशी इतके प्रामाणिक असलेले कलाकार म्हणजे शिवा-संभा कौलापूरकर आणि त्यांचा तमाशाचा वारसा तितक्याच समर्थपणे पुढे नेणारे काळू-बाळू ही त्यांची पुढची पिढी. याच काळू-बाळू कौलापूरकर यांना राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाने बुधवारी पुरस्कार जाहीर होणे, हा एक चांगला योगायोग आहे. आयुष्यात बऱ्याच खस्ता खाऊनही उभ्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारी सोंगाडय़ाची जोडी म्हणजे काळू-बाळू. खरे नाव लहू आणि अंकुश खाडे. हे दोघे जुळे भाऊ. शिवा-संभा कौलापूरकरपैकी संभाची ही दोन मुले. आज २०० वर्षांची तमाशाची परंपरा या कौलापूरकरच्या घराण्याने जोपासली आहे. सातू हिरू हा या घराण्याचा मूळ पुरुष. त्यांचा तमाशा पुढे शिवा-संभा यांनी चालवला आणि पुढे काळू-बाळूने सबंध महाराष्ट्रात नाव कमावले. बालगंधर्व एकदा शिवा-संभायांचा तमाशा पाहायला गेले होते आणि त्यावेळी त्यांनी शिवा-संभा यांना तमाशात हार्मोनियम वापरण्याची सूचना केली. तेव्हापासून तमाशात हार्मोनियमची पद्धत सुरू झाली. सांगली जिल्ह्यातील कौलापूर गावात महार जातीत १६ मे १९३३ रोजी काळू-बाळूंचा जन्म झाला. दोघेही दिसायला इतके सारखे की त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, त्यांचा रंग, केसांची रचना, दंतपंक्ती, चष्म्याची फ्रेम, उंची सगळेच सारखे. त्यामुळे अनेकांची तर पंचाईत व्हायचीच परंतु त्यांच्या बायकांची पंचाईत तर जास्तच व्हायची. तमाशात याच गोष्टीचा फायदा उचलत काळू-बाळू यांनी धमाल उडवून दिली होती. त्यांची अनेक वगनाटय़े गाजली. त्यात प्रामुख्याने जहरी प्याला, राजा हरिश्चंद्र, रक्ता रंगली दिवाळी, इंडियन पिनल कोड कलम ३०२, शेराला भेटला सव्वाशेर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. वयाच्या पाचव्या वर्षीच वडिलांचे छत्र हरपले. शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालेले. तमाशा डबघाईला आलेला. अशा भीषण परिस्थितीत गरिबीचा सामना करत काळू-बाळू वाढत गेले. मात्र काही झाले तरी घराण्याने नावारूपाला आणलेला तमाशा बंद होऊ द्यायचा नाही, असा निर्धार त्यांनी लहानपणापासूनच केला होता. वयाच्या पंधराव्या वर्षी चुलतीच्या मदतीने त्यांनी पुन्हा एकदा तमाशाचा फड उभा केला आणि अल्पावधीतच त्यांनी महाराष्ट्राला वेड लावले. काळू-बाळूंना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. मात्र त्यात १९९८ सालचा महाराष्ट्र राज्याचा सांस्कृतिक पुरस्कार आणि २००१ सालचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार अधिक महत्त्वाचा आहे. दादा कोंडके हे काळू-बाळू यांचे मोठे ‘फॅन’ होते. मुंबईला काळूृ-बाळूंचा प्रयोग असला की दादा कोंडके दररोज तिकीट काढून त्यांच्या प्रयोगाला जाऊन बसायचे. इतका मोठा कलाकार दररोज येतो हे पाहून काळू-बाळू खूपच ओशाळायचे. मात्र तुमच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळत आहे, असे दादा कोंडके सांगायचे, तेव्हा काळू-बाळूंना स्फुरण चढायचे. दिसण्यात कमालीचे साधम्र्य हेच काळू-बाळू यांच्या अभिनयाचे खास वैशिष्टय़ होते. जहरी प्याला या वगात दोघेही शिपाईची भूमिका करायचे आणि त्यात त्यांची नावे काळू-बाळू अशी होती. तेव्हापासूनच लऊ-अंकुश खाडे या नावाऐवजी ते काळू-बाळू कौलापूरकर या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या विनोदाची एक स्वतंत्र अशी बैठक आहे. वगनाटय़ात जोडगोळीचा एकसूत्रीपणा दिसत असल्यामुळे लोकांना आनंद मिळायचा. आजघडीला जवळपास सगळे तमाशा फड मालक कर्जबाजारी असताना काळू-बाळू यांच्या तमाशाचा फड कधीही कर्जाच्या विळख्यात सापडला नाही हे विशेष. याचे कारण म्हणजे इतर तमाशा फडांप्रमाणे त्यांनी कधीही बडेजाव केला नाही. मोजकेच परंतु महत्त्वाचे साहित्य घेऊन त्यांनी तमाशाचा फड सुरू केला आणि त्याचे नियोजन इतके व्यवस्थित केले की त्यांची आर्थिक घडी कधीच विस्कटली नाही. अशा या काळू-बाळूंना राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने पुरस्कार जाहीर होणे हे त्यांच्या करवीर नगरीसाठी खरोखरच भूषणावह आहे.
गावकर, दादा
लोकसंस्कृतीमध्ये अश्वत्थाचा पट नावाचं एक व्रत आहे. पिंपळाच्या पाच प्रकारच्या पानांचं पूजन या व्रतात केलं जातं. त्यातलं हिरवं पान असतं सौंदर्यासाठी, कोवळं पान असतं नवजात पुत्रासाठी, पिकलेलं पान असतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी, वाळलेलं पान असतं सुख-समृद्धीच्या वृद्धीसाठी आणि फाटलेलं पान असतं अमर्याद संपत्तीसाठी. आपल्या कार्याप्रती अविचल निष्ठा असणाऱ्या आणि संघसंस्कारांनी भारल्या गेलेल्या भिवा केशव तथा दादा गावकर नावाच्या गिरणगाववासीयानं गेल्या साठ-पासष्ट वर्षांत हे व्रत कधी केलं असावं अशी शक्यताच नाही,
पण त्यानं ऐकलेली ‘पिंपळपानांची सळसळ’ मात्र आयुष्याच्या प्रवासाची धगधगती आणि रोमांचकारी कथानकं रेखाटती ठरली. कोकणच्या लाल मातीत जन्माला आलेला हा मुलगा आपल्या वाटय़ाला आलेलं आयुष्य जगत असताना दुसऱ्याच्या आयुष्याचाच विचार करीत राहिला, त्याला जगण्याची दिशा आणि बळही देत राहिला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीनं म्हणूूनच गोखले न्यासाच्या वतीनं दिला जाणारा एक लाख रुपयांचा अंत्योदय पुरस्कार देऊन गावकरांच्या कार्याला समुचित अभिवादन केलं आहे. दादा गावकर वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईत आले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी त्यांची नाळ जुळली आणि आयुष्याला नवी दिशाच मिळाली. गिरणगावातलं तेव्हाचं वातावरण पोरांच्या टवाळखोऱ्या, गुंडांच्या मारामाऱ्या यासाठी प्रसिद्ध होतं, संघ जीवनात आला नसता तर माझ्या हातात कदाचित पत्ते आले असते, दारूची बाटली आली असती, खिशात रामपुरी आला असता आणि मीही सातरस्त्यावरच्या पोरांसारखा भाईगिरी करताना दिसलो असतो हे ‘पिंपळपानांची सळसळ’मधलं गावकरांचं वाक्य त्यांच्या आयुष्याला मिळालेली दिशा दर्शविणारं आहे. गिरणगावातील विद्यार्थ्यांभोवतीचीप्रतिकूल परिस्थिती त्यांना अस्वस्थ करीत होतीच. त्यांच्याच उत्कर्षांसाठी त्यांनी अवघ्या विसाव्या वर्षी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ स्थापन केलं. गेली पंचावन्न र्वष ते अविरत कार्यरत आहे. या मंडळानं सुरू केलेली विवेकानंद व्याख्यानमाला महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, नव्हे एक ज्ञानतीर्थ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तिकिटं लावून व्याख्यानमाला आयोजित करण्याचा धाडसी उपक्रम मंडळानं मुंबईतल्या गिरणगावासारख्या वस्तीत प्रथमच सुरू केला आणि त्याचा सुवर्णमहोत्सवही गेल्या वर्षी पार पडला. गावकरांनी विद्यार्थी क्षेत्रात तर डोंगराएवढं काम केलंच, पण त्याशिवाय सामाजिक, धार्मिक आणि काही अंशी राजकीय क्षेत्रातही त्यांनी काम केलं. त्यांच्या एकसष्टीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांना जो निधी अर्पण करण्यात आला, त्यात तेवढीच स्वत:ची रक्कम घालून गावकरांनी एक प्रतिष्ठान स्थापन केलं. समाजात काम करणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून चार हात दूर राहणाऱ्या गुणवंत कार्यकर्त्यांचा सत्कार आणि गिरणगावातील महापालिका शाळांतील तसंच खाजगी शाळांमधील हुशार विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याचा या प्रतिष्ठानचा उपक्रम वाखाणला गेला आहे. गावकर फारसे शिकले नाहीत, पण त्यांनी जो सहकाऱ्यांचा-सोबत्यांचा परिवार उभा केला त्याचं वर्णन करताना डॉ. शिवाजीराव भोसले यांनाही गावकर हे चालतंबोलतं विद्यापीठच आहे, समाजसेवेची ती एक सांस्कृतिक मुद्रा आहे असं म्हणावंसं वाटलं. गावकरांनी सव्र्हेलन्स इन्स्पेक्टर म्हणून सातपुडय़ासारख्या आदिवासी भागात तीन र्वष नोकरीही केली. आदिवासी जनजीवन, त्यांच्या चालीरीती, त्यांच्यात वावरताना आलेले प्रत्ययकारी अनुभव याचं वर्णन ‘पिंपळपानांची सळसळ’मध्ये आलं आहे. त्याचा मोठा वाटा त्यांच्या जीवनातील यशाच्या आरेखनात आहे. यश काही सहजासहजी प्रत्येकाच्या वाटय़ाला येत नाही, त्यासाठी परिस्थितीशी झुंजावं लागतं, परीक्षांचे पत्थर फोडावे लागतात. शून्यातून विश्व उभं करण्याची महत्वाकांक्षा उरी बाळगावी लागते. गावकर हा असा एक समाज-विश्व उभा करणारा शिल्पी आहे, कोकणी काव्र्हर आहे. सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसाठीचं चालतंबोलतं पाठय़पुस्तक आहे. पिंपळ हा पुण्यवृक्ष मानला जातो. आदिवासी समाज तर याला राज्याचा द्वाररक्षक मानतात. गावकर हा असा पिंपळवृक्ष आहे, त्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी मन:पूर्वक अभिनंदन.
चारुहास पंडित यांची चित्रे आणि प्रभाकर वाडेकर यांची कथा यातून साकारणारा चिंटू दैनिक सकाळमधून दररोज भेटीला यायचा. भोपाळ दुर्घटनेच्यावेळी त्यांनी आणि चारूहास पंडित यांनी एक चित्रमालिका वृत्तपत्रामध्ये चालवली.
कवी, कादंबरीकार, नाटककार अनंत कदम यांचा जन्म १५ जुलै १९३५ रोजी झाला.
“बासरी” हा काव्यसंग्रह, तसेच “किडे, पाखरू, दिवसातल्या अंधारात, कॅन्सर मिळून १४ कादंबर्या त्यांनी लिहिल्या. या कादंबर्यांतून त्यांनी वास्तवतेचे भीषण चित्रण केले. “धम्मपद” हा त्यांनी पालीतून मराठीत केलेला अनुवाद प्रसिद्ध आहे.
## Anant Kadam
अनिकेत केळकर हा मराठी चित्रपट , नाट्य आणि मालिका सृष्टीत कार्यरत असलेला एक अभिनेता. त्याने हिंदी सृष्टीतही काही प्रोजेक्ट्स केलेली आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti