वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयुष्याच्या उतारवयात आदर काय असतो आणि त्याची महती काय असते हे लख्खपणे जाणवायला लागते. या वयात आसक्ती आणि ओढ काय असते आणि त्यातून मोकळं कसं व्हायचं ते समजतं. निसर्गाचे नियम हेच जगण्याचे नियम असतात. प्रवाहासोबत वाहत राहणे, मनाचा समतोल टिकवून ठेवणे हेच यापुढचे जगणं असणार आहे.
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
सौंदर्य कशात नाही, या भुतलावरील प्रत्येक व्यक्ती प्राणी, निसर्ग या प्रत्येक ठिकाणी सौंदर्य ओतप्रोत भरले आहे फक्त तुमच्याकडे ते सौंदर्य ओळखण्याची नजर असली पाहिजे. लहान बाळाच्या प्रत्येक हालचाली मधे सौंदर्य असते ते आपण सुध्दा अनुभवू शकतो फक्त त्या साठी आपल्याला त्याच्या आईची नजर असली पाहिजे. तिच्या नजरेतून जर आपण पाहिले तर आपल्याला त्या लहान बाळात सौंदर्य दिसून येईल.
कांजिण्यांचा सामना करताना फोडांच्या जागेवर येणा-या खाजेवर व तापावर नियंत्रण ठेवणे हे एक महत्वाचे आव्हानच असते. कोमट पाण्याने आंघॊळ करताना अंगाला लावण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा डाळीचे पिठ वापरावे. हे उपायकारक व फायदेशिर असते. थंड पाण्याने आंघोळ करणे किंवा थंड वातावरणाने खाज वाढण्याची शक्यता अधिक असते.
खाजखुजलीवर उपाय म्हणून डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) किंवा हायड्रोक्सिझेन (ऍटारॅक्स) सारख्या गुणकारी औषधांचा वापर केला जाऊ शकतो. त्या त्या परिस्थितीशी अनुकुल असणारी गुणकारी लोशनही आपण वापरु शकतो. पण लहान मुलांनकडून तोंडावाटे डिफेंहिड्रामाईन (बेनाड्रील) व लोशनचा अतिसेवन किंवा अतिवापर होणार नाही याची दक्षता घेणे फार महत्वाचे आहे. स्टेरॉईडचा समावेश असलेल्या औषधांचा वापर करु नये.
लहान व तरुण मुलांसाठी ऍसप्रिन य औषधाचा वापर टाळावा कारण त्यामुळे Reye's syndrome सारखा जीवनाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता काही प्रमाणात असते. तापावर नियंत्रण आणण्यासाठी ऍसेटामाय्नोफेन औषधाचा वापर करावा. घातक आजार टाळण्यासाठी आय्ब्रुफेनचा वापर टाळावा. कांजिण्या या आजारात त्वचेला वारंवार खाज येत असते अशावेळेस हाताच्या बोटांची नखे कापावी किंवा हातमोजे वापरावे जेणेकरुन त्वचेला ईजा होणार नाही. तोंडातील जखमासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. शरिरास थंड असणा-या द्रव पदार्थाचे सेवन करावे व गरम, तिखट आणि आंबट पदार्थ (संत्र्याचा रस) टाळावेत.
हात वारंवार धुवावे व शरिरास स्वच्छ ठेवावे जेणेकरुन संसर्ग होणार नाही. जर शरिराला हानीकारक असलेल्या किटाणुंचा संसर्ग झाला असेल आणि तो वाढून ताप पुन्हा येत असेल तर डॉक्टरांना त्वरीत दाखवावे. लहान मुलांना कांजिण्या झाल्या असतील त कुटुंबातील इतर सदस्यांना दक्षता घेण्याबद्दल सांगायला विसरु नका.
त्वचेला चरे पडणे किंवा संसर्ग होणे आयुष्यभराचे दुखणे ठरु शकते. डॉक्टरांना जाऊ दाखवणे गरजेचे नाही हा दृष्टिकोन पुढे आपल्याला पेचात अडकवू शकतो.
ऍसिक्लोविर (झोविरॅक्स), हे संसर्ग रोखणारे औषध आहे. त्वचेला चरे पडण्याच्या पहिल्या दिवसापासून वापरल्याने उपयोगी ठरु शकते. लहान मुलांना या औषधाच्या वपराची आवशक्ता नसते. हे औषध बराच वाढलेल्या आजारासाठी दिले जाते. कारण कांजिण्या हा संसर्गजन्य रोग आहे. अशा संसर्गजन्य वातावरणाचा प्रभाव कमी होईपर्यंत लहान मुलांना शाळापेक्षा घरातच शक्यतो ठेवावे.
कांजिण्यांपासून बचाव.
वॅक्सिनपद्धतीने कांजिण्यापासून बचाव केला जाऊ शकतो (हे राष्टीय आरोग्य व जनता आरोग्य समुहांनी प्रमाणित केले आहे).
लहान व तरुण मुलांसाठी: १२ ते १८ महिन्याच्या मुलांपासून १२ वर्षाच्या सुदृढ बालकांवर (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर) वॅक्सिनपद्धतीने उपचार केले जाऊ शकतात. १३ वर्षे व त्याहुन अधिक वयाच्या बालकांना (जर त्यांच्या कुटुंबात कधीही कांजिण्या झाल्या नसतील तर)चार ते पाच आठवडे वॅक्सिनच्या औषधाच्या दोन मात्रा दिल्या जातात. वॅक्सिनेशन नंतर रोग प्रतिकार शक्तीची पुर्ण कल्पना येत नाही. पुन्हा दिलेल्या वॅक्सिनेशनमुळे पौढत्वाकडे वाटचाल करणा-या मुलांमधे रोग प्रतिकार शक्ती वाढते असे मानले जाते.
पौढत्वासाठी: वरिसेल्लिया वॅक्सिन औषधाच्या दोन मात्रा चार ते आठ आठवड्यांसाठी सुदृढ पौढांना प्रमाणित केल्या जातात. सामाजिक आरोग्य विभागाचे कर्मचारी, दिवसा काळजी घेणारे कर्मचारी विद्यालयाचे कर्मचारी, एकत्रित निवास करणा-यांना व संसर्ग होईल अशा जागेत काम करणा-यांना वॅक्सिनेशनसाठी प्रवृत्त करण्यात आले आहे.
ज्या पौढांना आपल्या रोग प्रतिकार शक्तीच्या पातळीविषयी माहिती नाही अशांसाठी रक्ताचे परिक्षण व निदान करणा-या पद्धती उपलब्ध आहेत. रोग प्रतिकार शक्तीच्या पातळीविषयी माहिती असणे फार गरजेचे असते.
वॅक्सिन ह्या पद्धतीची घातक आजारापासून बचाव करण्याच्या दृष्टिकोनाने निर्मिती करण्यात आलेली आहे आणि हीपद्धत खुपच प्रभावी आहे. वॅक्सिनपद्धतीचा वापर केल्यानंतर क्वचितच कांजिण्या उद्भवण्याची शक्यता असते. कधी कधी वॅक्सिनपद्धतीनेसुद्धा कांजिण्या उद्भवण्याची शक्यता असते.
वॅक्सिनचा प्रॉफेलॅक्सिस झाल्यानंतरही बचावासाठी वापर केला जाऊ शकतो. त्याची लक्षणे दिसायला लागल्यानंतर तिन दिवसात द्यायला हवे. तसेच लक्षणे दिसल्यानंतर चार दिवसात VZIG दिले जाऊ शकते जे अधिक संसर्गापासून बचाव करते.
हे स्थायी संरक्षण देणारे औषध आहे. म्हणूनच काही काळाने पण वेळीच त्याव्यक्तीची आजारातून सुटका होणे गरजेचे आहे
.कांजण्यासाठी
कडुनिंबाची २०० Gm पान +
मिरे 5 gm एकत्र करुन वाटुन चण्या एवढ्या गोळ्या करा
1 गोळी 1 कप दुध
( ७ दिवस)
@ १ चमचा कडुनिंबाचा रस +
४ चमचे खडीसाखर
@ घरातल्या दारात कडुनिंबाची पाने बांधुन ठेवा
@ कुडुनिंबाच्या पानाचा बिस्तरा बनवा वर सफेद चादर किंवा कापड टाकून त्याच्या वर आजारी व्यक्ती ला झोपवा
प्रसारणःराजयोग ग्रुपचे
-- आरोग्यदूत WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने
सध्याच्या युगात “व्यक्तिगत संवाद” खूपच कमी झालेला आहे. दुसऱ्याजवळ आपला विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी आवश्यकता असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे ही सुद्धा मनाची गरज असते. या विचारांच्या देवाणघेवाणीमुळेच आपल्या विचारांना नवी दिशा व नवा आयाम मिळतो.
१४ ऑगस्ट २०२१ रोजी ग्रीनलँडच्या बर्फाच्या शीटवर पडणाऱ्या पावसाच्या अहवालाने जागतिक मथळे बनवले तेव्हा जगभरातील शास्त्रज्ञांना धक्का बसला. ऐतिहासिक घटना अलीकडील इतिहासातील पहिली घटना होती आणि त्यानंतर पृष्ठभागावरील बर्फ वेगाने वितळत होता. संशोधकांनी आता या घटनेचे विश्लेषण केले आहे आणि उघड केले आहे की वर्षाच्या एका वेळी जेव्हा हंगामी वितळणे कमी होत असते तेव्हा उष्णतेच्या लाटेपूर्वी पाऊस पडला होता.
मनुष्य हा काळाच्या हातातील बाहूले असतो, काळ्-सुत्री बाहूले. तो बरेच काही ठरवतो पण घडतं तेच जे काळ ठरवतो.
माझ्या लहानपणापासुन पहाण्यातील एक व्यक्ती आहे,खूप कष्टाळु व मेहेनती, आता अन्दाजे वय ५८-६० असेल, पण मेहेनतीने व्यवसाय करायचे. लग्न झाले तेव्हा परिस्थिति अगदिच बेताची होती, कसेबसे खर्चाची तोंड मिळवणी व्ह्यायची, दोन वेळचे साधे जेवण कसेबसे मिळायचे त्यामुळे जीभेचे चोचले पुरवणे तर दुरच... पण मुले मोठी होत होती व संसाराचा गाडा चालू होता. हळुहळू काळ सरला, मुले मोठी झाली, कामधंद्याला हातभार देउ लागली व आर्थिक परीस्थीती सुधारू लागली. त्यातच अचानक वडीलोपार्जीत जमीनीला सोन्याचा भाव आला, पैसा अडका आला, नविन घर, गाडी ई सुखसोयी आल्या व आयुष्य सुखासिन झाले. धंद्यातपण बरकंत आली व सगळेच रुळावर आले. खाण्याची चंगळ सुरु झाली, जे जे पुर्वायुष्यात हुलकावण्या देत होतं ते ते मिळू लागलं.
एक दिवस साध्या आजाराच्या कारणाने तो मनुष्य माझ्याकडे आला व मला शंका आली म्हणुन रक्त तपासले तर मधुमेह असल्याचे निदान झाले. तो मनुष्य खेळकर स्वभावाचा असल्याने त्याने लगेच मिश्किलपणे हसंतच हे आयुष्याचे नवे वळंण स्विकारले. औषधे, पथ्य पाणी, आहार विहार याबद्दलची माहीती घेतली, मधुमेह झालाय हे कळल्यावरही तो दु:खी न होता त्याने ते लगेच स्विकारले हे बघून मला समाधान वाटले. ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तो जाण्यासाठी उठला व हसंतच मनातील एक गोष्ट बोलला ...... "तरूण वयात ईच्छा असुनही परीस्थीतेने खायला मिळंत नव्हतं व आता हवे ते खायला मिळणार तर खाऊ शकंत नाही" !
मिही क्षणभर स्तब्ध झालो, तो हसंतच खोलीबाहेर गेला, पण मी मात्र विचार करंत राहीलो की काळाचा खेळ पण काय अजब असतो ......... !!!
-- डॉ. मयुरेश जोशी
सर्वप्रथम 13 व्या शतकात कागदी नोटा चलनात आल्या. त्यावेळी चीनने या कागदी नोटा चलनासाठी वापरल्या. पण 15 व्या शतकात येईपर्यंत चीनमध्ये कागदी नोटा बंद करण्यात आल्या. त्यानंतर 17 व्या आणि 18 व्या शतकात पश्चिम यूरोपातील देशांचा व्यापार आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढला आणि तिथे खासगी बँका विकसित झाल्या.
माझे पहिले जहाज ब्राझिलच्या किनारपट्टीवर आणि अमेझॉन नदीमध्ये असलेल्या पोर्ट मध्ये ये जा करायचे. ब्राझिलच्या सागरी हद्दीत तीन महिन्यांपेक्षा जास्त वेळ जहाज थांबू शकत नसे कारण तसे केल्यास जहाजाला ब्राझिल मध्ये स्थानिक जहाज म्हणून रजिस्टर करावे लागले असते. तीन महिने पूर्ण व्हायच्या आत जहाज जर ब्राझिलच्या दक्षिण भागात असेल तर खाली उरुग्वे मध्ये जवळच्याच मॉन्टेविडियो या पोर्ट मध्ये थोडेसे इंधन भरण्यासाठी पाठवले जात असे.
सिंचन, रस्ते, वीज, पाणी या विकासाच्या दृष्टीने पायाभूत ठरणाऱ्या सुविधांचे समान न्याय तत्त्वाने वाटप झाले नाही. सगळ्याच सत्ताधाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्राला कायम झुकते माप दिले. किंवा असेही म्हणता येईल की, राजकीयदृष्ट्या अतिशय जागृत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी एकजुटीच्या बळावर राज्याची आर्थिक सूत्रे कायम आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविले.
Copyright © 2025 | Marathisrushti