वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
परवाच अहमदाबादच्या वाटेवर असताना श्रीमती अनुराधा गोरे यांनी लिहीलेलं ‘ओळख सियाचेनची’ हे पुस्तक वाचत होतो. भारत-पाकिस्तानात वाढलेला तणाव, काश्मिरात चिघळलेली (की चिघळवलेली) परिस्थिती या सर्व अस्वस्थतेच्या पार्श्वभुमीवर हे पुस्तक वाचण्याला आपोआप एक अर्थ प्राप्त झाला होता.
September 27, 2016
सरकारी कर्मचारी असो की राजकीय पुढारी त्यांनी आपली मुले नगरपालिका किंवा महानगरपालिकेच्या शाळांमधेच शिकविणे बंधनकारक करायला हवे, बघा ह्याच शाळांचा दर्जा कसा सुधारतो! हीच मंडळी जर आजारी पडली किंवा त्यांना आरोग्य सुविधा हव्या असतील तर न.पा., मनपा किंवा शासकीय रुग्णालयातूनच घेणे अनिवार्य करावे. हे झाल्या बरोबर बघा ह्या सर्व गोष्टी कश्या झपाट्याने सुधारतात. ब्रिटिशांच्या काळात आणि नंतरही बराच काळ तहसिलदार, मामलेदार टांग्यात फिरायचे, आता नाही टांग्यात तर किमान एसटीतून त्यांना फिरायला लावा, त्यांच्या एसी गाड्या बंद करा, पहा सगळ्या एसटीच्या बसेस एसी होतात की नाही? उपाय सोपे आहे बघा सरकारला सूचवून!
June 9, 2010
जयाचेनि नामे महा दोष जाती | जयाचेनि नामे गती पाविजेती |
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||71||
न वेचे कदा ग्रंथिचे अर्थ कांही | मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही |
महा घोर संसार शत्रु जिणावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||72||
देहेदंडणेचे महादुःख आहे | महादुःख ते नाम घेता न राहे |
सदाशीव चिंतीतसे देवदेवा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||73||
बहूतांपरी संकटे साधनांची | व्रते दान उद्यापने ती धनाची |
दिनाचा दयाळू मनी आठवावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||74||
समस्तामध्ये सार साचार आहे | कळेना तरी सर्व शोधूनि पाहे |
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||75||
नव्हे कर्म ना धर्म ना योग कांही | नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही |
म्हणे दास विश्वास नामीं धरावा | प्रभाते मनी राम चिंतीत जावा ||76||
करी काम निष्काम या राघवाचे | करी रुप स्वरुप सर्वा जिवाचे |
करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता | हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ||77||
अहो ज्या नरा रामविश्वास नाही | ताया पामरा बाधिजे सर्व कांही |
महाराज तो स्वामि कैवल्यदाता | वृथा वाहणे देहसंसारचिंता ||78||
मना पावना भावना राघवाची | धरी अंतरी सोडि चिंता भवाची |
भवाची जिवा मानवा भूलि ठेली | नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ||79||
धरा श्रीवरा त्या हरा अम्तराते | तरा दुस्तरा त्या परा सागराते |
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते | करा नीकरा त्या खरा मत्सराते ||80||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
January 4, 2016


माझे पुणे स्थित ज्येष्ठ मित्र श्री.संजीव वेलणकर (आकाशी रंगाचा अर्ध्या बाह्यांचा शर्ट घातलेले) व त्यांचे बंधू श्री. दीपक वेलणकर (कलेक्शन खरं यांचं) ह्या बंधूद्वयांनी प्रेमाने जीवापाड जपलेल्या त्यांच्या 'खानदानी ओल्ड ब्युटीज..!!'
सर्व 'महाराण्या'चालण्यात आजही तेवढ्याच डौलदार आहेत, जेवढ्या त्या त्यांच्या तारूण्यात होत्या..
मरून आणि पिवळ्या रंगाच्या 'हर हायनेसां'चं वय ८० वर्षांच्या आसपासचं आहे..
सोबत आमचे रसिक दोस्त..काळा टी-शर्ट व गॉगलधारी मधू साठे, काळसर निळ्या प्रिंटेड शर्टात संजय प्रभुघाटे व लाल रंगातल्या टी-शर्टातले मजबूत बांध्याचे मनोज सावंत..
-- गणेश साळुंखे
August 11, 2016
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी अर्जुनविषादयोग नावाचा पहिला अध्याय
April 11, 2022
अगदी छोट्या (चार-पाचशे वस्तीच्या) गावांमधे तर सगळेजण एकमेकांना ओळखतात. थोड्या मोठ्या (दोन-चार हजार वस्तीच्या) गावांमधे सगळ्यांच्या ओळखी नसल्या तरी ओळखीचं हास्य तरी असतं. गाडीतून, पिक-अप ट्रकमधून जाता येताना एकमेकांना हात वर करून ओळख दाखवणं, हा सर्वसाधारणपणे शिरस्ता असतो. नवीन लोकांना देखील गाडीतून जाताना ओळखीचं हास्य किंवा हात वर करून दाखवणार. गावातल्या छोट्याश्या पोलीस ठाण्यामधे मोजून असणार दोन किंवा तीन पोलीस. त्यामुळे प्रत्येक पोलिसाला गाववाले ओळखतात. मग अगदी कोणत्या वीकएंडला कोणत्या पोलिसाची ड्युटी आहे, तो नवशिक्या आहे की तीस वर्षे खात्यात काढून मुरलेला आणि आजोबांसारखा प्रेमळ आहे, हे देखील सगळ्यांना ठाऊक. प्रत्येक पोलीस कुठे रहातो हे देखील सार्या गावाला माहीत. त्यामुळे शक्यतो त्याच्या घराच्या आसपासच्या रस्त्यावर आरडा ओरडा किंवा धिंगाणा न घालण्या एवढी पोराटोरांना देखील अक्कल आलेली असते. अगदी छोट्या गावांमधे तर सारा गावच जणू पोलीसाचे काम करत असतो. गावातल्या उंडारणार्या पोरांवर सगळ्या गावाचं लक्ष असतं. त्यामुळे वाह्यात पोरांच्या उनाडक्या आई बापांच्या कानावर जायला वेळ लागत नाही आणि त्यात काही गैर आहे असं आई बापांनाही वाटत नाही.
छोट्या गावांमधले रस्ते देखील छोटे आणि रहदारी देखील तुरळकच. अशा गावांमधे ट्रॅफिक लाईट्स देखील जेमतेम एक दोनच असतात. काही ठिकाणी उघडझाप करणारे (blinking) लाईट्स असतात. त्याच्या अनुसार तिथे आलं की गाड्या हळू करायच्या, आजूबाजूचा अंदाज घ्यायचा आणि मग पुढे जायचं. बहुतेक ठिकाणी stop signs असतात. त्याच्या अनुरोखाने गाड्या बरोबर थांबून मगच पुढे जातात. गाववाल्यांची पत्ते सांगायची पद्धत देखील विशिष्ट असते. सगळा उल्लेख, डांबरी रस्ता (black top) किंवा कच्चा रस्ता (gravel or dirt road) या संदर्भात होणार. दिशांचा अदमास तर यांच्या अंगी अगदी लहानपणापासूनच मुरलेला असतो. Go two blocks east on black top, then go two and half blocks on the dirt road अशा सूचना सर्रास ऐकायला मिळतात. अशा प्रकारे सूचना देऊन कोणी पत्ता सांगायला लागलं की सुरवातीला आम्ही अजागळासारखे बघत रहायचो, मग समजल्यासारखं दाखवून मुंडी हलवायची आणि हळूच उघड्यावर येऊन आकाशात सूर्य कुठे दिसतोय ते बघायचं आणि त्यावरून आडाखे बांधून दिशेचा अंदाज घ्यायचा. पुढे पुढे मग आपल्या परिसराचा अंदाज आला की त्यांच्या दिशादर्शक सूचना आपल्या संदर्भात बसवायच्या. म्हणजे मुख्य रस्त्यावरून चर्चच्या दिशेला वळलं की आली ईस्ट किंवा गॅस स्टेशनवरून उजवीकडे वळले की झाली साउथ वगैरे. तरी देखील गोंधळल्यासारखं व्हायचं ते होतंच. (आपल्या सारखं “गांधी रोड वरून वंदना टॉकीजच्या बाजूच्या गल्लीत वळायचं किंवा मारुतीच्या देवळावरून खाली आलं की कट्ट्यावर बसलेल्या कुणालाही विचारा – कुलकर्णी कुठे रहातात ते”. असा प्रकार नाही). Enter from the east or west entrance at the south end of the building, असल्या सूचनादर्शक पाट्या पाहून लिहिणार्याला गदगदून हलवून सांगावसं वाटतं “अरे बाबा, असं कोडं सांगितल्यासारखं का सांगतोस ? सरळ सांग ना की गॅस स्टेशनच्या बाजूला जे दार आहे तिकडून आत शिरा किंवा पोस्ट ऑफिसच्या जवळच्या दरवाजाचा वापर करा” म्हणून.
छोट्या गावांमधे downtown म्हणजे मोठा मजेशीर प्रकार असतो. एका रस्त्याच्या दोन बाजूंस असलेली काही दुकानं म्हणजे downtown. त्यात एक दोन बॅंका, दोन चार रेस्टॉरंट्स, गॅस स्टेशन्स, काही अॅंटीक शॉप्स, एखादं दुसरं ग्रोसरी स्टोअर, बार्बर शॉप, छोटसं पोस्ट ऑफिस, dairy queen सारखं एखाद आईस्क्रीम शॉप, अशी सारी दाटीवाटीने बसलेली. या दुकानांना पार्कींग लॉट नसतो. त्यांच्या समोर रस्त्यावरच गाड्या लावायच्या आणि उतरून दुकानात जाऊन कामं उरकायची. एक काळ होता जेंव्हा छोट्या गावांमधे घरगुती स्वरूपाची दुकानं म्हणजे जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. त्यात किराणा मालापासून घरगुती वापरायच्या वस्तूंपर्यंत बरंच काही मिळायचं. गावातली पोरं उन्हाळ्यात आईस्क्रीम खायला किंवा गोळ्या चॉकलेट खायला तिकडे यायची. घरात कधी गरज लागलीच तर विजेचे दिवे, खिळे, शाळेच्या वह्या वगैरे लहान सहान गोष्टींसाठी लोक तिकडे धाव घ्यायचे. चकाट्या पिटण्यासाठी, घडीभर टेकण्यासाठी, पंचक्रोशीतल्या भानगडी ऐकण्यासाठी, स्थानिक राजकारणावर गरमा गरम चर्चा करण्यासाठी, ते एक हक्काचं ठिकाण असायचं. मुलांना उधारीवर खाऊ देतांना कुणी त्यांच्याकडे ओळखपत्र मागायचं नाही आणि दुकानदाराच्या उधारवहीत नुसतं नाव लिहून त्याच्यापुढे पैसे लिहून ठेवले तर चालायचं. एखाद्या न्हाव्याच्या दुकानात, दर्शनी काचेमधे “आज संध्याकाळी आपल्या शाळेची टीम जिंकली तर उद्या जे कोणी येतील त्यांचा हेअर कट फुकट” असा आपुलकीचा आणि गावातल्या शाळेबद्दलचा जिव्हाळा दाखवणारा बोर्ड दिसायचा.
पण हळू हळू हे चित्र बदलत आहे. वॉलमार्टने अमेरिकेच्या आतल्या भागांमधे देखील आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचंड स्टोअर्समधून सारं काही उपलब्ध असतं. भाजीपाला, इतर खाद्यपदार्थ, कपडे, औषधं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, घरातल्या वापरातल्या सार्या वस्तू, जे म्हणावं ते. त्यांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर चाललेल्या उद्योगामुळे वॉलमार्ट जितक्या स्वस्त दरात वस्तू विकू शकते, तितक्या स्वस्त दरात ही जुनी दुकानं विकू शकत नाहीत. वॉलमार्टच्या जगडव्याळ पसार्याला टक्कर देऊन टिकून रहाणं या छोट्या दुकानांना शक्यच नसतं. त्यामुळे ही छोटी दुकानं धडाधड बंद होऊ लागतात. उदाहरणार्थ नुसत्या आयोवा राज्यामधेच १९८३ ते १९९३ च्या दशकामधे वॉलमार्टच्या आक्रमणामुळे ७३०० छोटी दुकानं बंद झाली. एकंदर पाहणीवरून असा निष्कर्ष निघतो की वॉलमार्ट किंवा तत्सम एखादं मोठं दुकान एखाद्या आतल्या भागात सुरू झालं की पुढच्या ४-५ वर्षांत आसपासच्या २० मैल अंतरापर्यंतच्या छोट्या गावांत साधारण २०% धंदा कमी होतो. वॉलमार्ट भले नवीन रोजगार निर्माण करण्याच्या वल्गना करत असेल पण आजवरचा अनुभव असं सांगतो की वॉलमार्टने निर्माण केलेल्या दर १०० रोजगारांमागे, आजूबाजूच्या छोट्या दुकानांतील १५० लोकांच्या रोजगारीवर गदा आलेली असते.
लोक देखील एकदा वॉलमार्ट संस्कृतीची चटक लागली की आपल्या छोट्या गावातल्या छोट्या दुकानांमधे जाणं टाळायला लागतात. हे सारं अपरिहार्यच आहे. या मोठमोठ्या super market chains जसजशा आपले पाश अमेरिकेच्या अंतर्भागातल्या छोट्या आणि मध्यम गावांभोवती आवळायला लागल्या आहेत आणि जागतिकीकरण हे जसजसं दिवसेंदिवस प्रखर सत्य होत चाललं आहे, तसतसं ग्रामीण अमेरिकेच्या ह्या जुन्या जीवनातल्या एका पर्वाचा अंत जवळ येत चालला आहे.
-- डॉ. संजीव चौबळ
February 17, 2016
दोन समाजात तेढ निर्माण करणे, प्रसंगी दंगली घडवून आणणे किंवा दंगली होतील अशी परिस्थिती निर्माण करणे आणि त्यातून आपले राजकारण साधणे हा इथल्या राजकीय पक्षांचा धंदा झाला आहे. हा करतो म्हणून तो करतो किंवा तो करतो म्हणून हा करतो, असे तर्क दिले जात असले तरी, शेवटी सगळेच पक्ष कमी-अधिक प्रमाणात जातीचे, धर्माचे राजकारण करतात ही वस्तुस्थिती आहे.
September 8, 2012
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी दुसरे व पूर्ण शक्तीपीठ आहे. श्रीमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर या जिल्ह्याचे ठिकाणी आहे .कोल्हापूरला प्राचीनकाळी गौरवाने दक्षिणकाशी म्हटले जाते असे. महालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती परीसरात पश्चिमाभिमुख आहे या मंदिराचे उल्लेख ईस च्या सुरवाती पासून मिळतात. या मंदिराच्या चारी दिशांना प्रवेश दरवाजे आहेत ईस ११७८ ते १२०९ या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकीर्दीत दक्षिण दरवाजा व येथील अतिबलेश्वर मंदिर यांचे काम झाले.
पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला ’महाद्वार’ असे म्हणतात ईस 1218 मध्ये यादव तौलम याने हे महाद्वार बांधले. मंदिराबाहेरील खांबांवर केलेलं कोरीव काम अत्यंत रेखीव आहे . मुख्य मंदिरचे काम दगडी असून मंदिर बाहेरुन तारांकित आकाराचे आहे. सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इ. स. ६०० ते ७०० या शतका मधील असुन. नवव्या शतकाच्या कालावधीत राजा गंडवादिक्ष याने मंदिराचा जीर्नोधार केला. व येथील महाकालीचे मंदिर बांधले. मुख्य महालक्ष्मी मंदिरास एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराचे मंडपास अनेक खांब आहेत. मुख्य मंदिराला जोडून गरूड मंडप आहे. मंदिराच्या गर्भगृहात दगडी चबूतऱ्यावर श्रीमहालक्ष्मीची मूर्ती उभी आहे. मूर्ती पश्चिमाभिमुख असून ती चक्रावर उभी आहे, मूर्ती काळ्या रंगाच्या शिलेपासून बनविलेली आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असुन मूर्ती चतुर्भुज आहे तिचे वरच्या उजव्या हातात गदा तर डाव्या हातात ढाल आहे. खालच्या उजव्या हातात मातुलिंग व डाव्या हातात पानपात्र आहेत. मस्तकावर मुकुट असून त्यावर शेष नागाने छाया धरली आहे. उत्तराभिमुख योनी व लिंग आहे मागील बाजूस सिंह आहे. मागील बाजूचे चांदीची प्रभावळी वर चंद्रसूर्याच्या दोन आकृत्या आहेत.
महालक्ष्मी विषयी काही कथा प्रचलित आहेंत
गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णू चे भेटीस आले, विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला, बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णू जवळ जावून बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाची होशील असा शाप दिला.हर ऐकून क्रोधीत झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीण होशील असा शाप दिला. हत्तीण रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्ती साठी तपचर्या सुरु केली. ब्रह्मदेवानी तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले. या स्थाना विषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे.
पुरातनकाळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्याचे पुढे हतबल झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने बह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. अश्विन पंचमीस त्याचा वध झाला. मृत्यू समयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं. त्याचे नावा वरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले.कोल्हासूराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता,ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूवेर्कडच्या टेकडीवर भेटायला गेली. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीरक्षेत्री जा. माझा राग गेला, पण मी येणार नाही. असं तिने सांगितलं. व तिने तेथेच वास केला
तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते.
मंदिराचा प्रदक्षिणेचा मार्ग जवळपास स्वस्तिकाच्या आकाराचा असून सोळा काटकोनातून प्रदक्षिणा घालावी लागते. मुख्य मंदिराच्या दोन्ही
बाजूला श्रीमहाकाली व श्रीमहासरस्वती या देवींची मंदिरे आहेत.
या परिसरात सूमारे २५० देवी-देवतांची मंदिरे आहेत.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेपासूनचा नवरात्र उत्सव मोठा असतो. प्रतिपदेला बैठीपूजा, द्वितीयेला खडीपूजा, त्र्यंबोलीपंचमी दिवशी हत्तीच्या अंबारीतील, रथारूढ पूजा, मयुरारूढ पूजा, अष्टमीला महिषासूरमदिर्नी, सिंहवासिनी अशा रूपातील देवीच्या पूजा साकार होतात.
अष्टमीला घागरी फुंकण्या पद्धत आहे मध्यरात्रीपर्यंत धामिर्क सोहळे होतत. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीही होमहवन, शस्त्रपूजा होते. तिरुपती मंदिराकडून आलेला शालू त्या दिवशी नेसवला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवी हत्तीच्या अंबारीत बसते. संध्याकाळी तोफेची सलामी मिळाल्यावर देवीची पालखी निघते. दसरा चौकात शिलंगणाचा होणारा हा सोहळा संपन्न होतो. तिथे सोनं लुटण्याचा कार्यक्रम झाल्यावर देवीची पालखी परत मंदिराकडे निघते. व नवरात्र सोहळा संपन्न होतो.
-- निखिल आघाडे
October 5, 2016
आजच्या संगणकाच्या युगातही जे जुने तंत्रज्ञान अजूनही टिकून आहे ते म्हणजे फॅक्स मशिन. ॲलेक्झांडर ग्रॅहम बेलने १८७६ मध्ये मिस्टर वॉटसन, कम हियर आय वाँट टू सी यू हे शब्द टेलिफोनवर उच्चारले, तेव्हा तो दूरसंचार क्रांतीचा पितामहच ठरला. नंतरच्या काळात याच तंत्रज्ञानाचे अनेक आविष्कार आपण पाहिले.
August 20, 2023
भारताच्या अतिपूर्वेकडील प्रांतात म्हणजे आसाम, बिहार , पश्चिम बंगाल या भागात काही वर्षांपूर्वी रेल गाडीची धडक लागून ६५ हत्तींचा मृत्यू झालेला आहे. बरेचसे मृत्यू रात्रीच्या अंधारात घडलेले असून, बरेच वेळा इंजिनांचंही नुकसान होत आहे.
February 13, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti