एकाद्या दिवशी घडलेल्या विविध घटना, जगभरात साजरे होणारे वेववेगळे दिवस, यांची माहिती देणारा विभाग.. अजून बरंच काही येतेय इथे
१९ वर्षे हाऊसफुल्ल मनोरंजन करणारे मराठी रंगभूमीवरील नाटक "सही रे सही"
केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित 'सही रे सही' नाटकाचा पहिला प्रयोग १५ ऑगस्ट २००२ ला झाला होता. अनेक विक्रम रचणाऱ्या या नाटकाची नोंद मराठी रंगभूमीवरील एक सोनेरी पान म्हणून झाली आहे. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते. त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती.
मधल्या काळात ते नाटक रंगभूमीपासून दूर होतं. पण, 'भरत जाधव एंटरटेनमेंट' च्या वतीनं पुन्हा सही रे सही'चे प्रयोग दणक्यात सुरू झाले. रंगमंचावर आपल्या डोळ्यांसमोर एकाच वेळी चार ठिकाणी भरत जाधव दाखवण्याची किमया नाटकानं केली. भरत जाधव या नाटकामध्ये मदन सुखात्मे, रंगा ट्रक ड्रायव्हर, गलगले आणि दामू अशा चार व्यक्तिरेखा साकारतात. या नाटकामुळे भरत जाधव हे नाव महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचलं. ‘सही रे सही’ या नाटकाचे ‘अमे लई गया, तमे रही गया’ या नावाने गुजराती भाषेत प्रयोग झाले. त्यात शर्मन जोशीने प्रमुख भूमिका केली होती.
गुजराती ‘सही रे सही’ नाटकाचे २० महिन्यांत ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग होणे, हे गुजराती रंगभूमीवर प्रथम घडले होते. ‘सही रे सही’ नाटकाचे ‘हम ले गये, तुम रह गये’ या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरीने प्रमुख भूमिका साकारली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
यंदा जागतिक रक्तदान दिवसाची थीम ‘सुरक्षित रक्त, जीव वाचवते’ (Safe Blood Saves Lives) असून. ‘रक्त द्या आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा’ (Give Blood And Make The World a Healthier place) हे या वर्षीचं स्लोगन आहे.
कारवार सोडून आणखी दक्षिणेला गेलं की उत्तर कन्नडा आणि दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमधे आणि पुढे थेट केरळपर्यंत जिथे गौड सारस्वत ब्राह्मणांची वस्ती आहे, तिथे तिथे कोकणी आहेच! पण उच्चार मात्र अगदी वेगळे. त्या भागात तिची लिपी मात्र कानडी असते. किंवा केरळमधे तर मल्याळम. मजा म्हणजे कर्नाटकातले इतर लोक या गौड सारस्वत ब्राह्मणाना चक्क ‘कोकणी लोक’ असं म्हणतात. या गौड सारस्वतांची वस्ती बंगालमधे कधीच्या काळी म्हणजे गोव्यात येण्यापूर्वी होती असं म्हणतात. म्हणूनच त्यांच्या नावात ‘गौड’ शब्द आला. हे गौडबंगाल काय आहे मला माहिती नाही!
भारतात सुरु झालेल्या पहिल्या पोस्ट कार्डची किंमत फक्त ३पैसे होती, त्यावेळी पहिल्या तिमाहित रु. ७.५० लाख पोस्टकार्डांचा खप झाला होता पहिल्या पोस्टकार्डवर डिझाईन आणि छपाईचे काम मेसर्स थाॕमस डी ला रयू या लंडनच्या कंपनीने केले होते
१७ जुलै १९४७ चा तो दिवस. मुंबईहून सकाळी आठ वाजता रेवसकडे जाण्यास निघालेली ‘रामदास’ बोट मुंबई बंदरापासून अवघ्या ९ मैलांवर असलेल्या ‘काश्या’च्या खडकाजवळ प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे कलती होऊन समुद्रात बुडाली. तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणा-या सुमारे हजारभर प्रवाशांपैकी सुमारे ६२५ जण समुद्रात बुडून मरण पावले. या भीषण दुर्घटनेतून २३२ उतारूंचा सुदैवाने जीव बचावला. त्यात रामदास बोटीचा कप्तान शेख सुलेमान हा होता.
भारतीय खाद्यसंस्कृतीत असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे पूर्वी फक्त एखाद्या प्रदेशाची खासियत होते. परंतु कालांतराने ते संपूर्ण राज्याची ओळख बनून गेले. उंधियो पदार्थ याच पठडीतला. उंधियोला सुरती उंधियो म्हणूनही ओळखलं जातं.
मुंबईत ड्रीमलॅन्ड थिएटरमध्ये या चित्रपटाने खणखणीत रौप्यमहोत्सवी यश संपादले. या चित्रपटातील अमोल पालेकर यांची रामप्रसाद आणि लक्ष्मीप्रसाद दशरथप्रसाद शर्मा अशी दोन रुपे घेतलेली भूमिका आणि त्यांचा आपले कार्यालयीन बॉस भवानी शंकर ( उत्पल दत्त) यांच्याशी झालेला गंमतीदार संघर्ष या सूत्राभोवती हा खुसखुशीत मार्मिक मिस्कील मनोरंजक चित्रपट रंगला.
२०१४ पर्यंत सायबर सोमवार हा वर्षातील सर्वात व्यस्त दिवस होता, मात्र यावेळी ऑनलाइन डेस्कटॉप विक्री $2 अब्ज पेक्षा जास्त होती आणि त्यात यूएस हा इतिहासातील सर्वात व्यस्त दिवस होता.
२१ जून हा कर्क संक्रमणाचा दिवस खगोलशास्त्राप्रमाणं उन्हाळ्याची, उत्तर गोलार्धातली सुरवात मानण्यात येते. आज २१ मार्च रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ०३ वाजून ०७ मिनिटांनी सूर्य खगोलीय विषववृत्तावर येईल. यालाच "वसंत संपात" (इंग्रजीत March equinox,spring equinox, किंवा Vernal equinox) असे म्हणतात.
त्यानंतर सूर्य उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. २३.५° उत्तर अक्षांशापर्यंत जाऊन दि. २१ जूनला त्याचा परत दक्षिणेकडील प्रवास सुरू होतो.(दक्षिणायन प्रारंभ) दि. २३ सप्टेंबरला तो पुन्हा विषववृत्तावर येतो , यालाच "शरद संपात" म्हणतात.इंग्रजीत Autumn equinox, September equinox असे म्हणतात.
खगोलशास्त्रानुसार उत्तर गोलार्धात उन्हाळ्याची सुरुवात २१ मार्चपासून समजण्यात येते. मात्र, मोसम विज्ञानानुसार उत्तर गोलार्धात त्याचा कालखंड जून, जुलै, ऑगस्ट असा मानण्यात येतो. त्यामुळं खगोलशास्त्रानुसार भारतात २१ जून हा ऋतुमध्ये दिवस असतो. २१ मार्च रोजी सूर्य जिथं असतो, त्या स्थितीला "वसंत संपात' आणि २१ सप्टेंबर रोजी तो जिथं असतो, त्यास "शरद संपात' म्हणतात. या दोन्ही दिवसांना विषुवदिन (इक्विनॉक्सअ) असं संबोधलं जातं.
२१ सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडं जाऊ लागतो. २१ डिसेंबर या दिवशी तो त्याच्या दक्षिणतम मर्यादेपर्यंत म्हणजे मकरवृत्तावर येतो आणि त्यानंतर त्याचं पुन्हा एकदा उत्तरेकडं भ्रमण चालू होतं (उत्तरायण). भारतात या चक्राची विभागणी वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर अशा सहा ऋतूंत केलेली आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. फेलिडी या मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti