रेडिओवरच्या मध्यम लहरी ७९२ किलोहर्ट्झवर वर ऐकू येणारे आकाशवाणीचे पुणे केंद्र. या केंद्रात सुधा नरवणे, डॉ.प्रतिमा जगताप,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ, मंगेश वाघमारे, संजय भुजबळ, नीतीन केळकर अशा अनेकांची कारकीर्द बहरली.
त्या काळात बिकिनीकडे चुकीच्या पद्दतीने देखील पहिलं गेलं. बिकिनी परिधान केलेल्या महिलांमध्ये मादकताच जास्त दिसते असे अनेक आरोप झालेत. आणि म्हणूनच महिला बिकिनी घालण्यास फारशा धजावत नव्हत्या. अशात बिकिनीचा खप वाढावा म्हणून बिकिनी विकण्यासाठी वापरण्यात येणारी मार्केटिंग स्ट्रॅटजी बदलण्यात आली. स्त्री स्वातंत्र्य आणि मुक्तपणाच प्रतिक म्हणून बिकनीची जाहिरातबाजी केली गेली आणि त्यानंतर महिलांनी देखील बिकिनीला याच नोटवर आपलंस केलं आणि बिकीनीचा वापर करण्यास सुरवात केली.
नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आजूबाजूचे लोक यांच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसतं. स्वमग्न मुलांमध्ये प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे भाषा संप्रेषणाची, वैचारिक देवाण-घेवाणीची. सोप्या शब्दात समजावयाचं म्हणजे, जर आपल्याला एखाद्या अनोळखी प्रदेशात, अनोळखी लोकात एकटे नेऊन सोडले तर? आपण गोंधळून जाऊ, आपल्याला त्या लोकांची भाषा समजणार नाही वा आपली त्यांना! अशावेळी आपली जी स्थिती होईल नेमकी तशीच स्थिती या स्वमग्न मुलांची असते. म्हणूनच ही मुलं परिसराशी संपर्क नसल्यासारखी वागतात. बाह्य जगाशी यांचा काहीही संबंध नसतो.
चित्रपटांच्या उदयाच्या कालखंडातही संगीत नाटकांचा प्रेक्षक कायम ठेवून सर्वोत्तम सादरीकरणाचे व्रत त्यांनी अखंड जोपासले. त्यामुळे, गंधर्व नाटक मंडळीचा दबदबा राज्यासह इतर भागांतही पसरला होता. नेपथ्य, सजावट, वेशभूषा, रंगभूषा, पात्रयोजना, साथीदार आणि त्यांची वाद्ये अशा संगीत नाटकासाठी पूरक स्वतंत्र विभागांच्या रचनेस गंधर्व नाटक मंडळीपासूनच सुरुवात झाली.
पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक संकुल आहे. ४११ एकरांच्या या संकुलामधून विविध पदव्युत्तर विभाग आणि प्रशासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. विद्यापीठाच्या मुख्य शैक्षणिक संकुलामधील मुख्य इमारत ही समस्त पुणेकरांसाठी शैक्षणिक अस्मितेचे प्रतीक ठरते.

लेखाचं शिर्षक वाचून सगळ्यांना आश्चर्य वाटेल की अशा रंगाचं हृदय कसं काय असू शकतं ? तुम्हाला खरं वाटो की न वाटो अशा रंगाचं हृदय अस्तित्वात आहे. हो हो हो अहो असं घाबरून जाऊ नका , मी कुठल्या मनुष्याच्या हृदयाबद्दल बोलत नाही आहे , मी बोलतोय एका पदकाबद्दल. हे पदक खूप खास आहे. का ते जाणून घेऊ.
७ ऑगस्ट रोजी जांभळा हृदय दिन, सैन्य गुणवत्तेसाठी साजरा केला जातो. सर्वात जुनी अमेरिकन सैन्य गुणवत्ता तयार केल्याबद्दलचा हा स्मृतिदिन. पर्पल हार्ट बॅच , मिलिटरी ऑर्डरमधील पुरुष आणि स्त्रियांचा सन्मान करते. अमेरिकन क्रांतिकारक युद्धाच्या वेळी बॅज फॉर मिलिटरी मेरिटने सहा ज्ञात सैनिकांना गौरविले गेले होते.
जनरल जॉर्ज वॉशिंग्टनने १७८२ मध्ये बॅज ऑफ मेरिटची निर्मिती केली. वॉशिंग्टनने कोणत्याही एकुलत्या एक गुणवंत कृतीसाठी सैनिकांना हा सन्मान सादर करण्याचा मानस धरला. त्याच्या डिझाइनमध्ये चांदीच्या पातळ काठाने बांधलेला जांभळ्या हृदयाच्या आकाराचा रेशमाचा तुकडा होता. संपूर्ण चेहरा ओलांडून मेरिट हा शब्द चांदीमध्ये कोरला होता. हे बॅज अमेरिकन देशभक्ताचे धैर्य आणि भक्तीचे प्रतीक आहे, परंतु हा पुरस्कार कोणी डिझाइन केला हे कोणालाही माहिती नाही.
वॉशिंग्टनच्या 200 व्या वाढदिवशी पर्यंत, जांभळ हृदय क्रांतिकारक युद्धातील तळटीप म्हणून कायम राहिले. जनरल डग्लस मॅकआर्थरच्या प्रयत्नातून अमेरिकेच्या युद्ध विभागाने जांभळा हृदयाची ऑर्डर तयार केली. आज पदक जॉर्ज वॉशिंग्टनचा अभिमान आणि त्याच्या ध्वजादि चिन्हं असलेली ढाल आहे.
नावांची अचूक आणि संपूर्ण यादी यापुढे अस्तित्वात नसली तरी नॅशनल जिओग्राफिकने अलीकडेच असा अंदाज वर्तविला आहे की जवळपास १.९ दशलक्ष सेवा सदस्यांनी जांभळ्या ह्रदयांची निर्मिती केली आहे. हा सर्वात जुना अमेरिकन सैन्य सन्मान आहे जो अद्याप सेवा सेवकांना दिला जातो. १९४४ पर्यंत पर्पल हार्टने सेवा सदस्यांच्या ह्या स्तुत्य कृत्याला मान्यता दिली. त्यानंतर १९४४ मध्ये, आवश्यकतेमुळे केवळ जखमी किंवा युद्धात ठार झालेल्यांसाठी हा पुरस्कार मर्यादित होता.
आजही हा पुरस्कार अमेरिकीन सैनिकांसाठी एक फार मोठा गौरव म्हणून ओळखला जातो.
purple heart day, August 7, USA, Washington
वस्तू आणि सेवा कराची ‘ऐतिहासिक’ अंमलबजावणी सुरू झाली, त्यानिमित्त मध्यरात्री संसदेचे अधिवेशन बोलावले गेले आणि १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताचा जो ‘नियतीशी करार’ झाला त्याप्रमाणे समारंभ करून २०१७ सालच्या १ जुलैला वस्तू आणि सेवा कर – गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स- ही नवीन कर प्रणाली आणली गेली.
अन्न सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे. सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करतं. त्याचबरोबर उपासमारीची समस्या दूर करतं.
भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India-FSSAI) ने राज्यांद्वारे सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी प्रयत्नासाठीच्या संदर्भात पहिले राज्य अन्न सुरक्षा इंडेक्स (State Food Safety Index-SFSI) विकसित केले आहेत.
गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेली ही संस्था संख्यात्मक अंगाने विचार केला तर कधीच खूप मोठी झाली नाही आणि तरीही ती दखलपात्र ठरली. कारण तिच्या सदस्यांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याच नावाची दुसरी संस्था पुरस्कृत केल्यामुळे संस्थेने आपले नाव बदलले आणि‘हिंद सेवक समाज’ असे नवे नाव सरकार दरबारी नोंदवले.
८ जून १९४८ रोजी एअर इंडियाने भारत इंग्लंड हवाई सेवा सुरू केली. एअर इंडिया इंटरनॅशनल लिमिटेडने मुंबई-लंडन द्वारा कैरो व जिनीव्हा अशा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीस प्रारंभ केला. त्यावेळी एअर इंडिया जवळ कॉन्स्टेलेशन ७४९ ह्या जातीची तीन विमाने होती.
Copyright © 2025 | Marathisrushti