तू किती पारदर्शी,
दाखवशी आरपार,
तुझ्यापासून कोण लपवी,
आपुले रे निखळ अंतर, --!!!
माणसा, तू कसा असशी
बघ एकदा निरखून,
काय चालले तुझ्या चित्ती,
भावनांचेच चढ-उतार, --!!!
वरून पाहता प्रतिमा देखणी, लक्षपूर्वक पहा वरील रूप,
आत खळाळत्या खोल समुद्री, मनाची डचमळे कशी लाव,
रूप, रंग, गंध ,स्पर्शी,
कुठलेही नसे संवेदन,
संवाद साधावा आरशाशी,
राहून स्थिर अगदी निश्चल,--!!!
स्वतःकडे पहा माणूस म्हणुनी स्थान आपुले आहे काय,
मग ठरवावे विचारांती,
महत्त्व तेही, नक्की काय--!!!
तू खरे चित्र दाखवी,
मनुजा करीत आवाहन,
रूप त्याचे फक्त वरपांगी,
रंग खरे आत विलक्षण,
जीव अस्वस्थ तुझ्या भेटी,
आत कुठे चाले खळबळ,
काय लपवले मी हृदयी,
विचार करतो असा निव्वळ,--!!!
आरशां, तू खरा मुनी,
शांत स्थिर स्थितप्रज्ञ,
माणूस असता विमोचनी,
तारक नसतो कुणी अन्य,--!!!
हिमगौरी कर्वे©
सुरम्य सप्तरंगलेले जीवन
फुले, पाने, काटेही संगती
शब्दभावनां! वैखरीवरती
कृपाच! आगळी भगवंती
सुखदुःख,वेदनांचे मोहोळ
भावनांतुनी गुंतलेली प्रीती
सत्य! हेची मर्म जीवनाचे
हृद्य वास्तव, सदैव सांगाती
मनाचा कोंडमारा जीवघेणा
घुसमट मौनी, छळे एकांती
भळभळणाऱ्या, दग्ध वेदनां
तरीही सोबती सांत्वनी प्रीती
प्रवास श्वासांचा, थांबा मृत्यू
कालचक्राचा अदृश्य चालक
ललाटीचे अलिखित भाकीत
साक्ष! हीच कृपाळु भगवंती
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०.
१० - १ - २०२२.
तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला
प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला.....१,
जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती
धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती...२,
हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी
ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी....३,
वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे
उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला । मानव हा आत्मस्तुती करतो ।।
कुणा न येती भाषा बोली । हीच गोम हा जाणून घेतो ।।
निसर्गाने उधळण केली । अनेक गुणांची ।।
मानवाच्या हाती लागली । 'कला' कल्पकतेची ।।
विचारांच्या झेपामधूनी । आकाश पातळ गाठले ।।
प्रगतीच्या ह्या छलांगानी । श्रेष्ठत्व ठरवियले ।।
दुर्बल केले इतर प्राणी । आणि त्यांच्या कलेला ।।
विचारांना प्राधान्य देऊनी । ज्ञानी तो समजला ।।
मानवा लाभले विचार कल्पना । त्यातून आले शब्द भांडार ।।
स्वतःला श्रेष्ठ समजत । गाजू लागला अधिकार ।।
आधार न घेता शस्त्र अस्त्राचा । सिंह बनला जंगल राजा ।।
युक्ति चपलाई आणि विश्वास । हीच त्याची लक्षणे समजा ।।
घारीच्या द्दष्टीतील तिक्ष्णता । आणि सर्पचपळता ना अंगी आली ।।
कोळी विनतो कलात्मक जाळे । श्वान शोधी श्वसानी जे हरवले ।।
नृत्य बघा तुम्ही मोराचे । आणि आवाज ऐका कोकीळेचे ।।
उलट्या सुलट्या मर्कट लीला । करमणूकीत परि मानव हरला ।।
आकाशातील भरारी पक्षांची । जात इंद्रधनुष्याखाली जेव्हां ।।
दुर्बलतेची जाणीव देतो । मानवाला निसर्ग तेंव्हां ।।
सर्व कला विखुरल्या गेल्या । प्राणी जगतामाजी ।।
हास्तगत त्या केल्या त्यांनी । हीच मानवी नाराजी ।।
जर कंठ फुटला, वाणी मिळाली । जिव्हां चलली प्राणी जगती ।।
मानव होईल निर्वासित । आणि पळून जाईल मंगळावरती ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९०४०७९८५०
आत्म्याला ओढ असते
ईश्वराच्या मिलनाची
जाण सदैव राहते
प्रभुमय स्वरुपाची ।।१।।
अंशात्मक भाग असे
आत्मा हा परमात्म्याचा
उत्कंठ ते आकर्षण
गुणस्वभाव तो त्याचा ।।२।।
आत्म्यास पडले असे
बंधन ते शरीराचे
जीवन कार्ये करुनी
प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।।
मुक्त होई त्या क्षणीं
अनंतात समावतो
परमेश्वरि रुपांत
विलीन होऊन जातो ।।४।।
आत्मा मुक्त होत असे
देहकर्म फळावर
चांगले कर्म नसता
नविन देह घेणार ।।५।।
दोन प्रकारांनी आत्मा
प्रभू समर्पण होतो
देह मृत वा सजीव
असतांना हे साधतो ।।६।।
ध्यान साधना करणारे
उतरती समाधीत
त्याच क्षणी शरिराला
आत्मा असे सोडीत ।।७।।
देह सोडूनी भुवरी
आत्मा येई बाहेरी
क्षणिक काळा करितां
मिलन होई ईश्वरी ।।८।।
समाधी असे साधन
प्रभू मिलन होण्याचे
देह समाधीत जाणें
सार असते जिवनाचे ।।९।।
जिवंतपणीच तुम्हीं
प्रभूमय होत असे
आनंदी नितांत क्षण
खराखुरा तोच असे ।।१०।।
आत्म चिंतन करुनी
आत्म ज्ञान प्राप्त होई
तोच ईश्वर असूनी
दुजा ठिकाणीं तो नाहीं ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दिवस रात्र मम नयनी वसते
स्वप्नात येऊनी मला छळीते
सांग रमणी हे सांग मला ग
तुझे नी माझे हे कसले नाते ।
जरी न दिसशी मला कधी तू
सैरभैर मन हे होऊनि जाते
तुला पाहिल्यावर मन हे माझे
सांग का ग आनंदीत होते ।
असशी जरी दूरवर तू तेथे
मम हृदयी तुझेच रुप येथे
आहे खरोखरी किती मधूर
तुझे नी माझे हे प्रेमळ नाते ।
-- सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
२१ आक्टोंबर २०१८
बदलून गेले जीवन
अर्थ कळल्यानंतर
परिस्थितीची आली जाण
जाग आल्या नंतर ।।१।।
श्रीमंतीच्या नादानें
ऐषआरामी झालो
पैशाच्या गर्वाने
माणुसकी विसरलो ।।२।।
तारुण्यातील उर्मीने
अहंकारी बनविले
शरिरातील गुर्मीने
निर्दयी मज ठरविले ।।३।।
धंद्यामध्ये येता खोट
निराश अति झालो
गरिबीची चालतां वाट
प्रेमळ मी बनलो ।।४।।
देह बनला दुर्बल
विकार तो जडूनी
जर्जर- पिडीतां बद्दल
सहानुभूती आली मनी ।।५।।
अनुभवासारखा
शिक्षक नाहीं कुणी
शहाणा करी अनेका
परिस्थीती समजावूनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
का असा धांवतोस तूं , नशिबाच्या मागें मागें
यत्न होता भगिरथी, नशिब येईल संगे...१,
प्रयत्न होतां जोमाने, दिशा दिसताती तेथें
यशाचे ध्येय सदैव, योग्य मार्गानें मिळते.....२,
प्रयत्न करूनी बघा, ईश्वर देखील मिळेल
इच्छा शक्ति प्रभावानें, नशीबही बदलेल...३
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तुझ्या माझ्या मिलनी,गंधाळली रातराणी,
वारा सांगे गुजगोष्टी,
तुझी माझी प्रेम कहाणी,
चाफा वरती वरती फुले,
त्याचे झुळकांवरी झुले,
जाईजुईचे मांडव खाली,
मोगऱ्याचे त्यास विळखे
सायलीचा नाजूक मंद,
गंध सुवासिक करे धुंद,
अबोलीचे झुबके केवढे,
कानोकानी सांगते गुपित,
उधळीते बकुळ आपुली,
सुगंधित फुले चहूकडे,
दरवळू दे प्रीत सुगंधी,
घालते कुलदेवां साकडे,
शैया गुलाबांनी फुलली,
बहरून ये पाकळी, पाकळी,
जिवलगासमवेत आज,
रात,सारी खुलली निराळी,
वरून पाहते शुक्र चांदणी,
तमांतील मिलाफ गोड,
चंद्र करतो प्रेमक्रीडा,
चांदण्याभोवती धरून फेर,
दिवसाहूनही रात्र मोहक,
बेभान नशिली प्रणयी,
पाहून आपल्याकडे मात्र, भास्करासाठी झुरे यामिनी---!!!
हिमगौरी कर्वे ©
Copyright © 2025 | Marathisrushti