नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
दात दुखी अन कानदुखी या दोन दुखण्याचं सूर्यनारायणाशी काय वैर्य आहे माहित नाही. हि दोन दुखणी सुर्यास्थानांतर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर, जेवण खाण करून अंथरुणाला पाठ टेकवली कि डोकं वर काढतात! कानातला ठणका आणि दाढेची कळ साधारण रात्री अकरा नंतर जोर धरते! का माहित नाही. आमच्या लहानपणच्या सगळ्या गोष्टी बदलून गेल्यात. पण या दोन दुखण्याच्या वेळात काडीचाही फरक पडलेला नाही!
उत्सव हा नात्यांचा असतो पण आता नातीच टिकत नाहीत तर उत्सव कसला आणि उत्सवासाठी उत्साह कुठला.
दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचा मी बालवर्गापासूनचा विद्यार्थी. शाळेचा प्रचंड आभिमान बाळगणारा. 1971 मध्ये (म्हणजे सहावी इयत्ता पास झाल्यावर) दादर सारखं मध्यवर्ती ठिकाण सोडून ठाण्याला राहायला आल्यावर सर्वप्रथम वडिलांनी माझ्या शाळा प्रवेशाचं काम पूर्ण केलं, आणि ठाण्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मला प्रवेश मिळाला.

एच. जी. वेल्स हे वैज्ञानिक वाडमय लिहिणारे लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. टाईम मशीन ही त्यांची कादंबरी खूप गाजली. तिच्या कल्पनेवर चित्रपट निर्माण झाले. इनव्हीजिबल मॅन ही देखील तितकीच गाजलेली कादंबरी. ‘फर्स्ट मेन ऑन द मून’ आणि इतर वैज्ञानिक कथांमधून त्यांनी जणू कांही भविष्याचा वेधच घेतला. त्यांनी कल्पिलेल्या अनेक गोष्टी पुढे वास्तवांत आल्या. त्यांनी जगाचा इतिहासही लिहिला आणि आदर्श जग कसं असावं ह्याच्या कल्पनाही कथा कादंबऱ्यांतून मांडल्या. त्यांच्या अनेक कथाही लोकप्रिय झाल्या. ब्लाईंड मॅन, व्हॅली ऑफ स्पायडर, इ. कथांमधे कल्पना विलास तर आहेच पण बरोबरच शिकवण पण आहे. मॅजिक शॉप ही त्यांची जरा वेगळीच कथा. ह्या कथेत तर्कसंगत विचार करू पहाणाऱ्या बापाचा जादूवरला अविश्वास किंवा जादू म्हणजे युक्ती असे मत आणि त्याच्या लहान मुलाचा जादूवरला संपूर्ण विश्वास ह्या विरोधाभासावर कथा आधारीत आहे. बापाला आलेला अनुभव तर्कसंगत वाटत नाही. तो अजूनही त्यावर विश्वास ठेवू इच्छित नाही. त्याच्या तर्कनिष्ठेला धक्का तर बसलाय पण ते त्याला गैर वाटतय. मुलगा तेच सत्य म्हणून सहज स्वीकारतो. जेवढं आणि जसं आपण पहातो तसंच दुसरा पहात नाही. त्याची जाणीव वेगळ्या पातळीवरची असू शकते. ह्यात योग्य, अयोग्य कांही नाही.
पण आपली जाणीवच खरी व दुसऱ्याची चुकीची असा दुराग्रह असू नये. गोष्टीत जादूकडे वेगळ्या दृष्टीने पहाणारा लहान मुलगा त्याचाच असतो, म्हणून तो ते सहज स्वीकारतो, इतकेच.
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय हवाईअड्डा’ गाठले तेव्हा आठ वाजून गेले होते. एका गोष्टीची मला नेहमीच गंमत वाटते, विमानतळाला हवाईआड्डा का म्हणतात? ‘अड्डा ‘ म्हणला की, अंगात आडव्या काळ्या पट्ट्याचे टी शर्ट घातलेले, तोंडात सिगारेट धरून धूर सोडणारे चार-सहा गुंड एखाद्या गोदामात पत्ते खेळात बसल्याचे, दृश्य माझ्या नजरेसमोरयेते! तेव्हा ‘अड्डा’ गुंडाचा हि संकल्पना काही डोक्यातून जात नाही.
राजा विश्वामित्र आपल्या सैन्यासह अरण्यात शिकारीला गेला होता. फिरत फिरत तो वसिष्ठ मुनींच्या आश्रमाजवळ आला. महर्षी वसिष्ठांनी कुटित राहूनसुद्धा राजा विश्वामित्र आणि त्याच्या सैन्याचा भोजन देऊन राजेशाही पद्धतीने आदरसत्कार केला याचे विश्वामित्राला आश्चर्य वाटले.
आपल्या श्रीमतीची रेसिपीज टाईप करताना सुचलेली वात्रटिका, तशी ती माझ्या कविता कधीच वाचत नाही (माझे सौभाग्य), पण तिने ही वात्रटिका वाचली तर काय होईल…

सकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर यायची. कुत्रे भुंकायचे, तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंईऽकुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो.
सध्या राज्याच्या राजकारणात गॉडफादरची चर्चा रंगली आहे. चित्रसृष्टीत गॉडफादर असल्याशिवाय काम होत नाही हे माहीत होते पण, राजकारणात ही त्रुटी तीव’तेने जाणवत असेल असे वाटले नव्हते. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी ही गरज नुकतीच बोलून दाखवली आणि राज्याची राजकीय पृष्ठभूमी चांगलीच थरथरली.
जयसिंगपूर येथून जाहिरात विरहित व केवळ कवितांसाठी प्रसिद्ध होणा-या ” कविता सागर ” दिवाळी अंकाने उत्कृष्ट दिवाळी अंकाचे पारितोषिक पटकावले असून लवकरच ठाणे येथे होणार्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ” कविता सागर ” चे प्रकाशक डॉ. सुनील पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti