“इंडिया दॅट इज भारत”
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआम्हा भारतीयांना दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिण्याची जणू सवयच लागली आहे. कुणीतरी दुसऱ्याने कान टोचल्याशिवाय आम्हांला शहाणपण येत नाही. विविधता ही खरे तर आपल्या देशाची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणता येईल.