‘अस्सं माहेर’ सुरेख बाई …..
Category:
नॉस्टॅल्जिया लेखसंग्रहमागच्या पिढीतील ताई-भाऊ, काकू-बापू आणि आमच्या आई-वडिलांचे आदर्श संस्कार आमच्या सर्व बहीण भावंडांवर झालेले. रोज रात्री आम्ही सर्वजण बसून ‘रामरक्षा’ म्हटली. ‘मानसिक शांती’ हीच जमेची बाजू. माझे माहेर गिरगावांत आंग्रेवाडीत. तिथे आम्ही लहान असताना गाववाले विष्णू साठे, रघू आगाशे वगैरे मंडळी तासनतास येत व गप्पा मारीत. ती अशी कां येत असत? हयाच उत्तर कोकणात आल्यावर त्यांची बाजूचीच घरे पाहून मिळालं. कोकणातून मुंबईत आल्यावरसुद्धा एकमेकांना भेटण्याची ओढ आणि आपलेपणा.