(User Level: User is not logged in.)

बाल-साहित्य

मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पर्वताची केली छत्री

    त्या काळी अशी चाल होती की, एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तर इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करावा. त्याप्रमाणे नंद वगैरे गोपांनी यज्ञाची तयारी केली. पण इंद्राचा आणि आपला संबंध काय ? त्यापेक्षा ज्याच्याशी आपला रोज संबंध येतो त्या गोवर्धन पर्वताला नैवेद्य अर्पण करावा हे बरे, असे कृष्णाने सुचविले.

  • मोठा देव कोण बरे?

    एकदा काय झालं! अग्नीदेव, वरुणदेव, वृषभदेव आणि करहणमाता (अन्नदेवता) यांच्यात झगडा सुरू झाला. अग्नीदेव म्हणाले, ‘ते काही नाही, मीच या धरतीवरील मोठा देव आहे.’ वृषभदेव आपली मान डोलवत- डोलवत म्हणाले, ‘नाही नाही. मीच या धरतीवरील मोठा देव आहे.

  • यक्षप्रश्न

    वनामध्ये युधिष्ठिराची चारही भावंडे मृत झाली होती. तो प्रसंग असा की, महाभारतात वनपर्वाच्या अखेरीस यक्षप्रश्नांचा प्रसंग वर्णिला आहे.

  • भाजीचा प्रताप

    एक राजा होता. तो एकदा आपल्या महालाच्या खिडकीपुढं बसला होता. तिथं त्याला रस्त्यावरून एका फेरीवाल्याची आरोळी ऐकू आली.. ‘भाजी घ्या हो भाजी ! चमत्काराची भाजी! भाजी घ्या भाजी!’ राजाला नवल वाटलं. चमत्काराची भाजी म्हणजे कसली भाजी बुवा? त्यानं नोकराला सांगितलं, ‘जा, त्या भाजीवाल्याला बोलाव.’ भाजीवाला आला तेव्हा राजानं त्याला विचारलं चमत्काराची भाजी म्हणालास काय?

  • मुलास उपदेश

    बरे सत्य बोला यथातथ्य चाला ।
    बहू मानिती लोक येणे तुम्हाला ।।
    धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो ।
    बरा गुण तो अंतरामाजी राहो ।1१।।

    सदा दात घासोनि तोंडा धुवावे ।
    कळाहीन घाणेरडे बा नसावे ।
    सदा सर्वदा यत्न सांडू नये रे ।
    बहुसाळ हा खेळ कामा नये रे ।।२॥।

    दिसामाजी काही तरी ते लिहावे ।
    प्रसंगी अखंडित वाचित जावे ।
    गुणम्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे ।
    बरे बोलणे सत्य जीवी धरावे ।।३ ।।

    बहु खेळ खोटा सदालस्य खोटा ।
    समस्तासि भांडेल तोचि करंटा ।
    बहुतां जनालागी जीवी भजावे ।
    भल्यासंगती न्याय तेथे रिझावे ।।४ ।।

    प्रचितीविणे बोलणे व्यर्थ वाया ।
    विवेकेविणे सर्वही दंभ झाला ।
    बहु सज्जला नेटका साज केला ।
    विचाराविणे सर्वही व्यर्थ गेला ।।५ ।।

    भला रे भला बोलती ते करावे ।
    बहुता जनांचे मुखे येश घ्यावे ।
    परी शेवटी सर्व सोडोनि द्यावे ।
    मरावे परी कीर्तिरुपे उसवे ।।६।।

  • होळीविषयी लोककथा

    गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात. तेव्हा भृगु महाऋषी त्या द्वारपालाला शाप देतात, “तुम्ही तीन जन्म पृथ्वीतलावर उन्मत्त असे राक्षस होऊन पडाल तेव्हा द्वारपालांनी शरण येऊन भृगु महाऋषीस उःशाप मागितला. भृगु ऋषी म्हणाले “तुम्ही राक्षस होऊन पडल्यावर श्रीविष्णु तुमचा उद्धार करतील व तुम्ही पुन्हा द्वारपाल व्हाल तेव्हा ते पृथ्वीतलावर हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप असे दोन राक्षस होऊन पडले. हे दोन्ही भाऊ उन्मत्त व महाअंतुरबळी युद्धिष्ठर असे बनले.

  • कोंबडा

    कुणा आवडतो मोर पिसाऱ्याचा
    असे कोणाला छंद कोकिळेचा,
    कुणी असतो नादिष्ट पोपटाचा
    मला आहे परि नाद कोंबड्याचा ।।१॥।

    किती माझा कोंबडा ऐटदार
    चाल त्याची किति बरे डौलदार
    शिरोभागी छानसा तुरा हाले
    जणू जास्वंदी फूल उमललेले ।।२॥।

    पिसारा त्याचा किती झोकदार
    चोच त्याची चिमुकली बाकदार
    अर्धपायी पांढरीशी विजार
    गमे विहगातिल बडा फौजदार ।1३।।

    “उठा मूर्खांनो ! झोप काय घेता ?
    अरुण उदयाचा काळ असे झाला
    करा काही तरि आळसा त्यजून”
    उष:काली सांगतो ओरडून ।।४।।
    किती माझा कोंबडा हो शहाणा
    लोक कल्याणा झटतसे पहाना !
    मोर, पोपट, कोकिळा, राजहंस
    रिकाम्यांचा या बडेजाव खास ।।५।।

    अति परिचय जाहला कोंबड्याचा
    म्हणुनि करिता का मानभंग त्याचा ?
    जरी आवडला नाही तो तुम्हाला
    सदा देई आनंद मन्मनाला ।॥६॥

  • अंशुच मासेमारीची मोहीम

    अंशू हा एक विचित्र मुलगा होता. नको ते करण्यात पटाईत होता. एकदा मात्र त्याचा डाव त्याच्याच अंगलट आला. आपण फेकलेल्या जाळ्यात तो स्वत:च फसला.

  • घे कुठार !

    घे कुठार ! कर उगार
    घाव आता घाली । धृ. ।।

    धरणीने पोशियले
    रविकिरणे वाढविले
    राहियला सतत मरुत
    आजवरी वाली ।।१ ।।

    किती विहगा खांद्यावरी
    खेळविले बाळांपरि
    शांत गुरे छायेमधि
    आजवरी झाली ।॥२॥।

    प्रेमामृत तरुण तरुणि
    गेल्या ओतून इथुनि
    संकेतस्थळ होणे
    आजवरी भाळी ।।३।।

    काळाचा कठिण घात
    वस्तूचा होत पात
    आनंदे पाहत मी
    प्रकृतीच्या चाली ।।४॥।

    होऊ देत देह छिन्न
    शकलांवर शिजवी अन्न
    मन निवेल ऐकुनिया
    तृप्ती तुला आली ! ।॥५॥

  • बैल आणि खेचर

    एक श्रीमंत जमीनदार शेतकरी होता. आपल्या बायका-मुलांसह तो शेतावरच राहात असे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. फक्त हे ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगायचे नाही, असे त्याच्यावर बंधन होते. त्याने ते ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगितले तर त्याच्या वाट्याला मृत्यू येणार होता. त्यामुळे हे रहस्य त्याने कुणालाच कळू दिले नव्हते. पण या भाषिक देणगीमुळे त्याला पशु-पक्ष्यांच्या भावभावना चटकन समजायच्या. गोठ्यातले वासरू भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याच्या आईचा धावा करते आहे; घोड्याला कंटाळा आला आहे, त्याला चक्कर मारून आणली पाहिजे हे त्याला चटकन कळायचे. मांजरांची भांडणं, कोंबड्यांचा कलकलाट, पक्ष्यांचे गुंजन यातला भावार्थ त्याला समजायचा.