(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • राशी व त्यांचे स्वभाव – मकर

    राशी :- मकर
    स्वामी :- शनि
    देवता :- ब्रह्ममातृक
    जप मंत्र :- ॐ श्री वत्सायउपेन्द्राय नमः
    उपास्यदेव :- हनुमान
    रत्न :- नीलम

    जन्माक्षर :- भो ज जा जी ख खा खि खीखे खो खु ग गा ग्र गृ गी ग्रीं गि गं या राशीवर शनि (ज्योतिष) चा अंमल आहे. व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी, शिस्तप्रिय. मेंढा आणि अर्ध शरीर माझा असा याचे बोधचिन्ह आहे. मकर राशीचे लोक खूप व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी, शिस्तप्रिय, संयमी असे असतात. मकर राशीच्या लोकांना सगळ्या गोष्टींबद्दल थोडीशी निराश वृत्ती असते.

  • शुभारंभ

    नमस्कार

    मी आयडीबीआय बॅंकेच्या सेवेतून जुन २०१७ मधे निवृत्त झालो आहे. मी मुख्यतः काव्यलेखन करतो. काही वैचारिक लेखन केले आहे.ते मी आपणाबरोबर शेअर करीन. या साईटवर लेखनाची सुरुवात आमची कुलदेवता श्री. मोहीनीराज याचे मी रचलेल्या आरतीने कैलेली आहे.

    कृपया वाचकांनी अभिप्राय व पाठींबा देऊन माझे सारख्या नवोदित साहित्यिकांना ऊर्जा द्यावी ही विनंती.

    सुरेश काळे

    सातारा

  • गाण्याच्या कहाण्या – एक चतुर नार – पडोसन -१

    जुनी हिंदी गाणे मला आवडतात . 'एक चतुर नार ,करके सिंगार -- ' पडोसन (१९६८)मधील गाणे , माझ्या आवडत्या गाण्या पैकी एक . हे गाणे माझ्यासाठी 'मूड सेटर 'आहे . कधी उदास वाटू लागलं कि मी हे गाणं ऐकतो . एनर्जी मिळते . एकदम फ्रेश होतो . झोपेतून उठल्यावर ,गार पाण्याचा तोंडावर हबका मारल्या सारखा .

    या गाण्यामागे एक छानशी आठवण पण आहे . परभणीस मी प्रमोशन वर बदलून आलो होतो . दोन -तीन समान म्हणजे जुन्या गाण्यांची आवड असणारे सहकारी भेटले . मंगेश ,सुभाष ,मुकुंदा ,आणि मी असा बघता बघता एक कंपू जमला . कधी मधी विलास ,दिलीप जॉईन व्हायचे ,पण आम्ही चौघे मात्र नियमित मेम्बर . मग काय ?(यांच्या संगतीतला हा माझा 'सुवर्ण काळ 'होता याची जाणीव आत्ता होतीयय ,आम्ही सारेजण विखुरल्यावर !)एखाद्या रविवारी आम्ही सुभ्या कडे (सुभाष तेव्हा सुभ्या ,सुब्बाराव संबोधण्या इतका जवळचा होता , हल्ली सम्पर्कात नाही -रुसलाय !) जमायचो . सुभाष , मंगेश सूर तालाला पक्के . मुकुंदा ठेक्याला ! आमच्या मुकुंदाला ठेका धरायला , पत्र्याचं डबडं , पिठाचा डब्बा , लाकडी टेबल काय पण चालायचं .! मग मंगेश गाण्यात सूर मारायचा 'एक चतुर नार ---' सुब्बाराव तयारीतच असायचा ,पुढच्या ओळी अलगत उचलायचा . मुकुंदाच्या हात टेबल बडवण्यात गुंतलेला ! मी सगळ्यात भाग्यवान ,डोळे मिटून हे सर्व कालवून कानाने 'खायचो ',अधाशा सारखा !हे संपलं कि ' रामय्या वस्तावया ---' (हे सुभ्याचे पेट्ट गाणं ),खूप गाणी व्हायची . पेटी नव्हती ,तबला नव्हता ,पण खरे सांगू त्याची कधी आठवण पण व्हायची नाही (--मित्रानो , हम ऊन दिनो अमीर थे ,जब तुम करीब थे !)असो .

    विनोदी गाण्यात, या गाण्याला मी माझ्या अखत्यारीत 'अढळ पदी ,अंबरात ' बसवलंय . क्लासिकल संगीतात विनोदी जुगलबंदी ! विरळच !एक कलाकृती म्हणून हे गाणे खूप ' कठीण ' काम . या गाण्याचे लिरिक्स अफलातून आहे . अहो चक्क अ ,आ, इ, ई ----ची बाराखडी यात फिट केलीयय ! वर --अयो घोडे --नमा नामा --अन काय काय ! शिवाय सिनेमाच्या सिचुएशनला परफेक्ट मॅच आणि कलावंताच्या कॅरेकटरला एकजीव होणारे ! या लिखाणा बद्दल राजेंद्रजीना (राजेंद्र कृष्ण ) सॅल्यूट !

    तर अश्या या शब्दाना आपल्या सुरावटीवर पेलणारे , ---पेलण कसलं ?अक्षरशः नाचवलंय हो , निस्ता हैबतधुला घातलाय या महाभागांनी , किशोर कुमार ,मन्नाडे आणि मेहमूद ! किशोरकुमार म्हणजे गाणं , विनोद ,अभिनय , सगळा सिनेमाचं अंगी मुरलेला माणूस !, मेहमूद विनोदाचा 'राक्षस ' म्हणण्यास वावगे ठरू नये , आणि मन्नाडे, गाण्याची जाण आणि शास्त्रीय संगीताची बैठक असलेला , दादा ! त्या काळी मन्ना -दा ची तशी दहशतच होती !

    विद्यापती -म्हणजे किशोर कुमार, एका लोकल थेटरचा संगीतकार , भोलाला (सुनीलदत्त )पोरगी -'बिंदू ' -(सायराबानू )-पटवायला मदत करायला आलेला भोलाचा मित्र . गाण्याच्या नादापायी पोरीचा ओढा मद्रासी संगीत शिक्षक पिल्लई -मेहमूद -कडे ! भोला आणि पिल्लै यांच्या गाण्याची जुगलबंदी ठरते . भोला अन गाणं म्हणजे बोंबच ! मग भोलाचे गुरु विद्यापती,अशी तोड काढतो कि -भोलाने खिडकीत उभे राहून फक्त ओठ हलवायचे आणि मागे बसून भोलाचे गुरु -किशोर कुमार -पिल्लेच्या -मेहमूदच्या - गाण्याला उत्तर देणार ! हि या गाण्याची सिच्युएशन !या गाण्या नंतर सुनीलदत्त नि आपल्या खाजगी आयुष्यात सुद्धा, किशोर कुमारला 'गुरु ' म्हणूच संबोधिले !अगदी शेवट पर्यंत !

    सुनीलदत्त साठी किशोर कुमार आणि मेहमूदसाठी मन्नाडे गातात ,मधेच मेहमूदची वाक्ये आहेत . मेहमूदच्या पिल्लै या पत्राचा मद्रासी हेल मन्नाडेंनी लीलया सांभाळलाय . मन्नाडे तसे 'हिंदुस्थानी ' म्हणजे उत्तर भारतीय संगीतातले ,पण दक्षणात्य लय हि साध्य असल्याचे त्यांनी या गाण्यात सिद्ध केलाय . किशोर कुमार आणि मेहमूद ,जबरदस्त 'स्क्रीन प्रेझेंस 'असणारे , तेव्हा यांच्या अभिनयाची 'जुगलबंदी ' --'सिर्फ देखनेसे तालूख रखती है !'

    या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणलंतर उस्फुर्तता !किशोर कुमार आणि मन्नाडेंनी हे गाणे इतक्या उस्फुर्ततेने गायलंय कि ऐकताना असे वाटते कि आधी हे मंडळ गाऊन गेलंय अन मगच ते लिहून घेतलय ! मन्नाडे सारख्या कसलेल्या गायकाला किशोर कुमार तोडीस तोड गायला आहे . आर .डी .बर्मन (संगीतकार ) यांनी हे गाणे केवळ बारा तासाच्या सरावावर ध्वनिमुद्रित केले आहे ! फायनल रेकॉर्डिंग चालू होती . मन्नडे 'नाच ना जाने आंगन तेढा 'हे वाक्य संपवून ,'तेहहSSS डा ' ची आवर्तने करत होते . किशोर कुमार अवलिया , गीतरचनेत नसलेले ' ओय SS तेढे सीधे हो जा 'म्हणून मधेच तोंड घातले ! मन्नाडे सगट सगळे सटपटले . आर .डी नि मन्नाडेला कंटिन्यू करण्याची खूण केली आणि सावरून घेतले . गाणं झकास झालं . या गाण्याच्या वेळेस किशोर कुमारचा वारू उधळा होता हे बारीक खरं !

    गाण्याच्या शेवटच्या कडव्यांच्या आसपास 'ताल पे नाचे लंगडी घोडी ' या किशोरकुमारच्या वाक्यानंतर , मेहमूदचे 'चतुर नार ' आणि किशोर कुमारचे ' आयो SSS घोडे ' यांची रस्सीखेच सुरु होते . किशोर कुमार ज्या बेरकी पणे आपले ' आयो SSS घोडे ' मेहमूदच्या गळ्यात मारतो ते क्षणभर ऐकणाऱ्यालाही चकित करून जाते . मला येथे Tom &Jery च्या एका क्लिप ची आठवण झाली . वात पेटवलेला बॉम्ब टॉम मांजर जेरी उंदराच्या हाती देत ,उंदीर पुन्हा बॉम्ब मांजराला देते , असे हे चालू असताना मधेच डाम्बिस उंदीर तो बॉम्ब मांजराच्या हातून हिसकावून घेते , सवयीने मांजर तो बॉम्ब उंदराकडून हिसकावते चार दोन आवर्तने झाली कि उंदीर मागे हात बांधून उभारते . मांजराला काय झाले कळायच्या आत तो बॉम्ब मांजराच्या हातात फुटतो ! तसेच काहीतरी या गाण्यात घडते ! आपण गंडवले गेल्याचे मेहमूदच्या लक्षात आल्यावर तो वैतागतो . ' अरे ,ये घोडा ,चतुर ,घोडा ,चतुर क्या ?एक पे रहेना ! ग्गा ! ' मेहमूदच्या आवाजाची लय मन्नाडेंनी मस्त सांभाळी आहे . मेहमूदचे वाक्य आणि मन्नाडेचा आवाज याचा जोड कानाला जाणवत पण नाही .

    या गाण्याची प्रेरणा पण इंटरेस्टिंग आहे . याची प्रेरणा आहेत तीन गाणी ! पैकी एक -संत तुलसीदास (१९३९)साठी विष्णुपंत पागनीसांनी गायिलेले --बन चले राम रघु राई . दुसरे आहे -- १९४१ साली अशोक कुमारांनी 'झुला 'मध्ये चार ओळी गुणगुणल्या होत्या --एक चतुर नार कर कर सिंघार --- .'तेव्हा मेहमूद आणि आर .डी .बर्मन खूप तरुण होते . त्यांच्या मनात या ओळींनी घर केले . साधारण वीस वर्षांनी जेव्हा मेहमूदने 'पडोसन 'करायला घेतला तेव्हा आर .डी . ला या ओळी घेण्यास सुचवले . आर .डी नि त्या ओळी या गाण्याच्या मुखड्यासाठी उचलल्या आणि बाकी गाणे आपल्या स्टाईलने राजेंद्रजी कडून लिहून घेतले . तिसरे गाणे आहे --जिद्दी (१९४८)मधील -- चंदा रे जा रे जा रे . या तिन्ही गाण्यांची झलक 'चतुर नार --'मध्ये डोकावते .

    जेव्हा मन्नाडेंनी या गाण्याची सिच्युएशन ऐकली तेव्हा त्यांनी गाण्यास नकार दिला होता . कारण एक प्रशिक्षित गायक जुगलबंदीत एका सामान्य अ -प्रशिक्षित गायका कडून मात खातो हे काही हे काही त्यांना पटेना . मागे म्हणजे 'बसंत बहार ' (१९५६ )च्या वेळेस मन्नाडे आणि प. भीमसेन जोशींनी अशीच एक जुगलबंदी गायली होती . मन्नाडे' बैजू बावरा' साठी आणि प. भीमसेन जोशी' तानसेन ' या पात्रांसाठी गायले होते . 'केतकी ,गुलाब ,जुही ,चंपक बन --' त्यात तानसेन म्हणजे प. भीमसेन जोशी ,हरतात . स्क्रीन वरील पात्रांच्या हार -जीत मध्ये गायकांनी अडकायचे नसते . याची आठवण मेहमूद आणि आर .डी नि मन्नादांना करून देऊन गाण्यास राजी केले . या गाण्याचे संगीतकार जरी आर .डी . बर्मन असले तरी हे गाणे किशोर कुमारनीच कम्पोज केल्याची कबुली एकदा आर .डी नी दिली होती .

    या गाण्याचे अजून एक वैशिष्ट्य सांगण्याजोगे आहे . या गाण्यात चार राग वापरले आहेत ! खाजम ,बिहाग , देस आणि छाया नट हे ते राग , हे गाणे म्हणजे एक राग मालिकाच आहे !

    Indiatimes Movies यांनी पाहण्याजोग्या पंचेवीस हिंदी सिनेमाची यादी प्रसिद्ध केली होती , त्यात 'पडोसन ' होता . या सिनेमाची कथा अरुण चौधरी यांच्या पाशेर बारी (Pasher Bari )कथेवर आधारित आहे . या घट्ट बांधणीच्या विनोदी सिनेमाचा शेवट मात्र चटका लावून जातो . सुनीलदत्त आणि सायरा बानूच्या लग्नाचा सोहळा असतो . मांडवाबाहेर लांबलचक पिपाणी वाजवत येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करताना मेहमूद दाखवला आहे . ज्या पंगतीत हाता -तोंडाशी आलेला घास हिरावला जातो ,या दुर्दैवी जीवाला तीच पंगत वाढावी लागतेय ! क्षणभर मेहमूदच्या डोळ्यातील पाणी चमकून जाते . हा क्षण पाहणाऱ्यांचे काळीज फाडून जातो ! जुगलबंदी हरलेला मेहमूद येथे 'जिंकतो ' !

    -- सु र कुलकर्णी

    आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय , पुन्हा भेटूच , Bye

  • त्या’ पराभवानंतर भारतीय संघ कुठे होता?

    पुण्यातील पहिली-वहिली कसोटी अवघ्या अडीच दिवसांतच संपली. भारतीय संघाचा विजयरथ ऑस्ट्रेलियाने रोखला. गेले 18 महिने यशाची विविध शिखरे पादाक्रांत करणाऱ्या भारतीय संघाचे उडू पाहणारे विमान या भयानक पराभवामुळे खाडकन जमिनीवर उतरले. पण पाच दिवसांचा सामना तिसऱ्याच दिवशी आटोपल्याने दोन्ही संघांची मैदानाबाहेर गडबड झाली.

    पुढील कसोटी सामना बंगळूरला आहे. या सामन्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी दोन्ही संघ प्रवास करणार होते. त्यामुळे 'दोन दिवस पुण्यात करायचं काय' असा प्रश्‍न संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला. सततच्या क्रिकेटमुळे भारतीय संघ शरीराबरोबरच मनानेही थकला होता. त्यातून, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाच्या दणक्‍यामुळे निराशेचे ढग पसरत होते. चाणाक्ष अनिल कुंबळे यांनी संभाव्य धोका ओळखला. पुण्यातील दोन खास विश्‍वासातील मित्रांना बोलावून दोन दिवस संघासाठी काही उपक्रम करण्याचा विचार कुंबळे यांनी बोलून दाखविला. या मित्रांनी सुचविलेला उपाय कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांनी मान्य केला आणि मग योजना पक्की झाली..

    26 फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता संपूर्ण भारतीय संघ आणि सर्व सपोर्ट स्टाफ बसमध्ये बसले. रविवार असल्याने हिंजवडी परिसरात अजिबात गर्दी नव्हती. हिंजवडीतून मागच्या रस्त्याने बस मुळशी रस्त्याला लागली. मुळशी धरण पार करून बस ताम्हिणी घाटाकडे निघाली. कुंबळे यांच्या मित्राने ताम्हिणी घाटाच्या अलीकडे असलेल्या 'गरुड माची'च्या व्यवस्थापनाला या कार्यक्रमाची कल्पना दिली होती. 'कुणीतरी खास व्यक्ती येत आहेत' असं 'गरुड माची'च्या कर्मचाऱ्यांना कळलं होतं. प्रत्यक्षात सगळा भारतीय संघच इथे अवतरला. संचालक वसंत वसंत लिमये यांच्या कडक सूचनांनुसार, 'गरुड माची'च्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपापले मोबाईल फोन बंद करून ठेवले. 'गरुड माची'च्या व्यवस्थापकांनी अत्यंत चोख व्यवस्था आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गोपनीयता बाळगली होती.

    संध्याकाळी सह्य्राद्रीच्या कुशीत विसावणारा सूर्य पाहताना खेळाडू मनोमन शांत झाले. सूर्यास्तानंतर अंधाराचे राज्य चालू झाले. मिलिंद कीर्तने आणि सुरेंद्र चव्हाण यांनी खेळाडूंसाठी मजेदार 'ट्रेजर हंट'चे आयोजन केले होते. हातात कंपास, टॉर्च आणि नकाशे घेऊन लपवलेल्या गोष्टी मिट्ट अंधारात शोधून काढण्यात दोन तास मस्त धमाल झाली. रात्रीचे जेवण चांदण्यात झाले. खेळाडूंच्या आहाराची काळजी लक्षात घेतच जेवण तयार केले होते.

    दुसऱ्या दिवशी बरोबर सकाळी सात वाजता महाराष्ट्राचा पहिला एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांच्यासोबत सगळे जण ताम्हिणीतील 'कॅमल बॅक'वर ट्रेकिंगसाठी निघाले. डोके चालवत सुरेंद्र यांनी तिरंगा बरोबर घेतला होता. एका तासाच्या चढाईनंतर सगळे घाट माथ्याला पोचले, तेव्हा पहाटेच्या कोवळ्या सूर्य प्रकाशातील दऱ्याखोऱ्या बघण्यात सगळे रमले. बऱ्याच खेळाडूंनी तिथेच बरेच फोटो काढले. भारतीय खेळाडूंनी सुरेंद्र चव्हाण यांना 'हिमालयातील भटकंती आणि एव्हरेस्ट मोहिमेविषयी' प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. टेकडीच्या माथ्यावर ताठ मानेने तिरंगा फडकावून त्याला घामेजलेल्या खेळाडूंनी सॅल्यूट केला.

    थकलेल्या अवस्थेत परतल्यानंतर सगळेजण ब्रेक-फास्टवर तुटून पडले. एक संपूर्ण दिवस इथे घालवला, तरीही कुणाचाही पाय 'गरुड माची'च्या कॅम्प साईटवरून निघत नव्हता. 'बऱ्याच दिवसांनी मोकळ्या आकाशाखाली हुंदडायला मिळाले. सह्याद्रीच्या सौंदर्याने आम्ही हरखूनच गेलो..', अशी भावना एका खेळाडूने व्यक्त केली.

    काही काळ खेळापासून लांब जाऊन मनाने ताजेतवाने होण्यासाठी कोहली आणि कुंबळे यांनी हा खटाटोप केला होता. याचा प्रत्यक्षात खूपच चांगला परिणाम झाला. 24 तासांच्या मजेदार सहलीनंतर सगळे जण ताजेतवाने झाले. चेहऱ्यावरची निराशा नाहीशी झाली होती. गेले 18 महिने भारतीय संघ अव्याहत क्रिकेट खेळत आहे. यामुळे सगळेच जण थकले होते. 'गरुड माची'ची सहल गोपनीय राखण्यात यश आल्याने खेळाडूंना कोणताही त्रास झाला नाही. येथील व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना कसलाही त्रास दिला नाही किंवा फोटो काढण्याचा हट्टही धरला नाही. त्यामुळे खेळाडूंना मनसोक्त दंगा करता आला.

    अखेरीस खेळाडू इतके खुश झाले, की त्यांनीच कर्मचाऱ्यांना बोलावून फोटो काढले. इतकेच नाही, तर खास प्रशस्तिपत्रकही बहाल केले. मंगळवारी सायंकाळी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुसऱ्या कसोटीसाठी खेळाडू बंगळूरला रवाना झाले.

    सुनंदन लेले

  • माझा बाप शेतकरी

    शेतकरी बाप…चारही पोर जन्माला आली ती कळती होईस्तोवर त्यांचं दवा पाणी, जर कळती झाली दोघे चालली एक मराठी शाळेत तर एक अंगणवाडीत दुसऱ्या दोघांचं आहेच ते दवापाणी..असच निसर्गाशी झुंझत करत, दिवसामागून दिवस, अन वर्षामागून वर्षे हळूहळू उलटतात,न अखेर तो दिवस उजाडतो जेव्हा पदरात जगासाठी धनाची पेटी असणारी कदाचित त्या बापासाठी पण…ती धनाची पेटी म्हणजेच बापाची बेटी जेव्हा उपवरात येते तेव्हा नकळत बापाच्या काळजात चर्रर्रर्रर्र होतं.. इथपर्यंतच शक्य होत मी केलं आता इथून पुढे मी काय करू?? असा हतबल झालेल्या बापासमोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं.

  • उपनयन विधी

    नुकतीच मैत्रिणीच्या मुलाची मुंज झाली. आपण केवढा प्रचंड खर्च केला हे ती मोठ्या कौतुकानं सांगत होती. देण्याघेण्याच्या साड्या, घरच्या लोकांचे उंची कपडे, व्हिडिओ कॅसेट… खर्चाच्या अशा असंख्य वाटा… याला पर्याय म्हणून दुसरी मैत्रीण सांगत होती ‘छे! माझा असल्या विधींवर विश्वासच नाही!’ आणि मी विचार करू लागले. जुन्या काळानुसार आठवं वर्ष हे मुलाचं विद्यार्जन सुरू करण्याचं वर्ष. या विद्यार्जनाची सुरुवात मुंज किंवा उपनयन संस्काराने होई

  • मंगलाष्टक

  • दरोडे-जोग प्रॉपर्टीज

    Darode-Jog-Properties-Pune-Edition

  • अहंभाव

    आपण आजूबाजूच्या वातावरणामुळे व परिस्थितीमुळे, तसेच शहाणपणाचा अभाव असल्यामुळे किंवा अज्ञानामुळे अहंकारी बनतो. याचा दुस-यांवर वाईट किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला ते कमी प्रतीचे किंवा हीन दर्जाचे लेखतात…………

  • आयुर्विन न्युट्रिगेन

    Ayurwin-nutrigain