शिक्षणातील क्रांतीचं पाऊल: ग्राममंगल
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिककोणत्याही नवीन शैक्षणिक धोरणाची खूप चर्चा होते, त्याच्यावर लेख छापून येतात; पण आपल्या मुलांना कशां प्रकारचं शिक्षण कसं, केव्हा, कधी, कुठे द्यायचं याबाबतीत स्वातंत्र्य कुठे आहे? बहुतेक पालक शिक्षणप्रक्रियेबद्दल अनभिज्ञ असतात. मुलांना फक्त शाळेत घातलं की झालं, पालकांनी नुसती प्रगतीपुस्तकावर सही करणं आता अपेक्षित नाही. मुलं किती शिकली, काय शिकली, केव्हा शिकली हे पाहाणे आवश्यक झालं आहे. कोविडने ऑनलाईन, ऑफलाईन दोन रस्ते ठरवून दिले. दोन्हीचे टोल वेगवेगळे. ज्यांच्याकडे पैसा आहे ते ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. ज्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही, असले तरी ते वापरायचं ज्ञान नाही, त्यातही तंत्रज्ञानाला नेट नसेल तर ते धूळ खात पडतं आणि ग्रामीण भागात हीच परिस्थिती आहे.