वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन रोज सकाळी फिरायला जात असत. त्यांच्या रस्त्यात एक मोठा दगड पडलेला होता. हा दगड अनेकांच्या पायात येत होता. पण तो खूप मोठा आणि जड असल्यामुळे कोणीच हलवू शकत नसे. पण हरिवंशराय ह्यांनी तो स्वतःला जमेल तसा रोज थोडा थोडा हलवला आणि एक दिवस रस्त्याच्या कडेला नेला. वास्तविक त्यांचा मुलगा मेगास्टार होता. त्याला सांगून हा दगड हलवता आला असता. पण स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवायचे हा हरिवंशराय ह्यांचा स्वभाव होता. त्यांच्या ह्याच कृतीचा त्यांच्या मुलावर प्रभाव पडला आणि तोही अथक प्रयत्न करून भारतातील सर्वात मोठा अभिनेता बनला. आपण ज्या अमिताभचा करिष्मा अनेक वर्षे पाहत आहोत, त्याच्या मागे हरिवंशराय ह्यांचीच प्रेरणा आहे. अमिताभ ह्याने अनेक मुलाखती, कार्यक्रमामधून तसं व्यक्तही केलं आहे.
म्हणून अमिताभ आणि हरिवंशराय ह्यांच्यातील नाते आजच्या फादर्स डे निमित्ताने जरूर पाहायला हवे.
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १५ तारखेला “शोले” या चित्रपटाने ५० वर्षे पूर्ण करुन ५१ व्या वर्षात पदार्पण केले. सिनेरसिकांची पिढी दर १० वर्षांनी बदलते म्हणतात. या हिशेबाने सिनेरसिकांच्या जवळपास ५ पिढया “शोले “च्या अंगाखांद्यावर खेळल्या. आम्ही आमच्या पहिल्या पॉकेटमनीमध्ये आणि नवसाच्या पहिल्या वहिल्या फुलपॅण्टमधे शोले पाहिला. माहीमच्या “बादल” मध्ये तेव्हा ४ रुपये ४० पैसे स्टॉलचे तिकीट होते. आणि ५ रुपये ५० पैसे बाल्कनी.तेव्हढे पैसे तर मला वाटते आजकाल भिकारीदेखिल घेत नाहीत. मरण सोडून बाकी सगळ्याच गोष्टी मधल्या काळात कमालीच्या महागल्या.
यंदा जागतिक रक्तदान दिवसाची थीम ‘सुरक्षित रक्त, जीव वाचवते’ (Safe Blood Saves Lives) असून. ‘रक्त द्या आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा’ (Give Blood And Make The World a Healthier place) हे या वर्षीचं स्लोगन आहे.
भगवान श्रीहरीच्या पीतांबरा चे वर्णन केल्यानंतर त्यावर कसलेल्या कंबरपट्ट्याकडे स्वाभाविकच लक्ष जाते. भगवान श्रीहरीच्या कमरेवर विराजमान त्या दिव्य मेखाले चे वर्णन प्रस्तुत श्लोकात आचार्य श्री करीत आहेत.
‘जसे कराल तसे भराल ’ हा कर्माचा अटळ सिद्धांत आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय-नीती-धर्माने वागत असतो, त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अधर्म अनीतीने वागणारे, काळाबाजार आणि तस्करी करणारे, जीवनात मौज-मजा करत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते.
‘सत्यम शिवम सुंदरम’ ब्रीदवाक्य असलेला हा लोगो भारतीय दूरचित्रवाणीच्या सुवर्णकाळाचे प्रतीक असून, २०२४ मध्ये तो केशरी रंगात अद्ययावत करण्यात आला आहे. भारतीय प्रसारमाध्यमांचा इतिहास आणि कोट्यवधी भारतीयांच्या भावना ज्या एका चिन्हाशी जोडल्या गेल्या आहेत, ते चिन्ह म्हणजे दूरदर्शनचा हा गोल फिरणारा लोगो. आजच्या डिजिटल आणि शेकडो वाहिन्यांच्या युगातही या लोगोची जादू आणि त्यामागील इतिहास तितकाच रंजक आणि प्रेरणादायी आहे.
मला एक असा तरुण मिळवुन द्या की जो शरीराने तंदुरुस्त आहे, त्याच्या इच्छा व विकार त्याच्या ताब्यात आहेत. त्याचे मन आरशासारखे पारदर्शक व स्वच्छ आहे. तर मी जगात कोणताही चमत्कार करुन दाखवेन.” – थॉमस हक्सले खरं आहे, आजच्या जगाला विकसीत करणारा एकमेव सक्षम घटक म्हणून तरुणाईकडे पाहीले जाते. सामाजिक उत्थानाची जबाबदारी असलेल्या या तरुणांपुढे काय आदर्श व आव्हाने आहेत? हा प्रश्न एखाद्या वयस्कर माणसाला विचारला तर त्याचे उत्तर कदाचित असे असेल. आजच्या तरुणांना आदर्श बघवत नाहीत आणि आव्हाने पेलत नाहीत – खरीच अशी परिस्थिती आहे का? आजची तरुण पिढी ही उद्याची मार्गदर्शक पिढी असेल. त्यामुळे या तरुणांनी दूरदृष्टीने विचार करुन काही मुलभुत आव्हाने पेलणे आवश्यक आहेत.
स्वतःला उच्च स्थानावर नेण्याची ती किंमत असते. तुम्ही कळपाचे राहात नाही आणि कळपाची गरजही संपलेली असते. परिघाबाहेर तुम्हांला टाकून वर्तुळ स्वतःला सांधून घेत असते.
५७ वर्षीय शीना राणी ह्या हैदराबादमधील डीआरडीओच्या हाय-टेक लॅबमध्ये शास्त्रज्ञ आहेत . त्या १९९९ पासून अग्नि मालिकेतील सर्व क्षेपणास्त्रांच्या प्रक्षेपण नियंत्रण प्रणालींवर काम करत आहेत. पंतप्रधान मोदींनी संपूर्ण मोहिमेला ‘मिशन दिव्यास्त्र’ असे नाव दिले होते.
मानवाने जंगलं साफ करून शेती करण्यास सुरवात केली तेव्हा या पृथ्वीवर इतकी घनदाट जंगलं होती की थोड्याशा जंगलतोडीमुळे विशेष फरक पडला नाही. हळूहळू इंधन व इतर अनेक कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊ लागली व परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली. आता जर त्वरित कृती केली नाही तर ही सुंदर वसुंधरा उजाड होण्यास वेळ लागणार नाही हे जाणत्या पूर्वजांच्या लक्षात आल्यामुळे वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी उद्बोधन करत बसण्याऐवजी युक्तीचा शोध सुरु झाला आणि त्यातूनच जन्मला वटसावित्री नावाचा एक अत्यंत उपयुक्त सण.
पुरुषांनी सरपणासाठी वृक्षतोडीसारखी व जंगल साफ करून शेती करण्यासारखी मेहनतीची कामं करायची पूर्वापार पद्धत असल्यामुळे इतर सर्व वृक्षांबरोबरच मानवासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या वटवृक्षाचीही सर्रास कत्तल करण्यात येत होती. जे पुरुष वृक्षतोड करतात ते त्याचं संरक्षण करू शकणार नाहीत हे लक्षात घेऊन आपल्या थोर पूर्वजांनी ती जबाबदारी स्त्रियांवर सोपवली. माणूस पापभिरू असल्यामुळे ज्या वटवृक्षाच्या खोडाला धागे बांधून त्या वृक्षाची पूजा केल्याचे त्याने बघितले त्या वृक्षावर त्याने कधीही कुऱ्हाड चालवली नाही. माणसाची विज्ञानापेक्षा जप-तप,अंगारे धुपारे,देव, पोथ्या-पुराणं यांच्यावर जास्त श्रध्दा असल्यामुळे वृक्ष रक्षणाच्या या कृतीला सणाचं रूप देण्यात आलं आणि वटसावित्री नावाचा तो प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला.
आपले सर्व सण हे पूर्णपणे विज्ञानाधिष्टीत आहेत, पण त्यांना हेतुपुरस्सर अंधश्रद्धेचं स्वरूप देण्यात आलं आहे.
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti