(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • बालविवाह ; विकासातील अडथळा

    बालकांनी शिकावे. जीवन जगण्याची कौशल्य प्राप्त करावीत.अनेक क्षेत्रात यश मिळवावे. देशाचे भले व्हावे. या देशाचे सुजान नागरिक व्हावे या अपेक्षेने येथील शिक्षणव्यवस्था चालते . सहा ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांच्या शिक्षणासाठी कायदा (आरटीई अॅक्ट-2005 ) करण्यात आलेला आहे. कायदे आहेत.यंत्रणा आहे . ज्या स्तरावर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे तिथे मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. विवाहाचे योग्य वयाचे देखील कायदे आहेत .वयाचे मुलासाठी एकवीस आणि मुलीचे अठरा वर्षे वय योग्य असते . मुलांमुलींची शारीरिक वाढ या वयात पुर्ण होते असे समजले जाते . शहरी , सुशिक्षीत समाजात, उच्च वर्गात हे घडतही असेल. ग्रामीण भागात , झोपडपट्टी , अशिक्षीत समाजात , दुर्लक्षित भागात उलट घडत असते .बालविवाह लावला जातो.त्याची वाच्यताही कुठे होत नाही .सारे काही अलबेल आणि गोपनिय असते .शाळेत पाचवी ते दहावी - बारावीपर्यंतच मुलींचे लग्न उरकले जातात. कोणतेही सबळ कारण त्यामागे नसते .त्या लेकराला नीट कळतही नसते .बैठक बसते.लग्न ठरते . बोभाटा होत नाही .सारे काही चुपचाप . कुणाचं वाटोळं नको म्हणून प्रशासकिय यंत्रणा याकडे रितसर डोळेझाक करते .गावातील कर्तीधर्ती मंडळी मूग गिळून गप्प असते . समाजप्रबोधन करण्याची भाषा ज्या सेवाभावी संस्था करतात. त्यासुद्धा या प्रश्नापर्यंत पोहचू शकत नाही .अशा घटना उघडकीस आल्या की त्या चक्रव्यूहात पालक , कर्मचारी सापडतात.त्यामुळे ' सपादलं तर सपादल ' अशी भावना वाढीस लागते . अनेक शिकलेली माणसं बालविवाहाच तोटे समजत असूनही न समजल्यासारखे करतात आणि शिंगे मोडून वासरात ... अशी गत होते .आजकाल संकरित अन्नधान्य यासारख्या इतर कारणांनीदेखील मुले वयात यायची प्रक्रीया लवकरच घडते .त्यामुळे पालक चिंताक्रांत होतो आणि सामाजिक भीतीमुळे म्हणा किंवा अन्य कारणांमुळे बालविवाहास प्रवृत्त होतो. अमुक एका व्यक्तीने असा बालविवाह केला त्याचे कुठे काय झाले म्हणून आपले काय होणार आहे अशी प्रवृत्ती बळावते .खेळण्याच्या , शिक्षण घेण्याच्या बालवयातच असा आघात बालकांच्या माथी मारला जातो . कित्येक समाजात आता मुलीची वानवा जाणवू लागली आहे . पाशाची आमिष दाखवून सर्रास बालविवाह लावले जातात. मुलगा तीस वर्षाच्या पुढील आणि मुलगी अल्पवयीन ! ही मानसिकता बदलायला हवी .कोणत्याही व्यक्तीने किंवा सामाजिक संस्थेने प्रथम सत्र फौजदारी न्यायालयात तक्रार केली किंवा न्यायालयास इतर प्रकारे संभवित बालविवाहाची माहिती मिळाली तर सदर न्यायालय त्या बालविवाहास मनाई करणारा आदेश जारी करू शकते. या आदेशाची पूर्तता करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यासाठी न्यायालयास बालविवाह प्रतिबंधाचे सर्व अधिकार असतात. याची जाणीव असायला हवी .
    आता तर मालिका , चित्रपटांतूनदेखील अल्पवयीन बालविवाह दाखविले जातात .प्रेमप्रकरण दाखवितात. एवढेच नाही तर बालनायिकेला आंतरजातीय विवाहाचा ब्रँड अँबेसिटर बनविण्याची तयारी करताहेत . कला आणि वास्तव यात कुठेतरी गल्लत होते. मुलांच्या कलेचे कौतुक आहे . ते असायला पाहिजे. दुनिया त्यास डोक्यावर घेते . यातून काय बोध घ्यायचाय तो घ्यावा पण बालविवाह हे समर्थनिय मुळीच नाहीत . कोणतीही शारीरिक , मानसिक परीपक्वता नसताना विवाह लावणे योग्य नाही . लगीनसराईच्या धामधुमीत काही गुपचूप बालविवाह लावून दिले जाता. त्यातून भविष्यातील अनेक जटील समस्या निर्माण होतात.बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जाणीवजागृती , जनजागृती मोठ्या प्रमाणात होणेही तितकेच गरजेचे आहे. पालकाचे प्रबोधन केले पाहिजे .बालविवाहाचे तोटे सर्वसामान्यापर्यंत पोहचले तरच ते विचार करणार आहेत . आजही कितीतरी बालविवाह होत आहेत . यापुढील बालविवाह जरी थांबले तरी सशक्त भारत निर्मीतीसाठी ती मदतच ठरणार आहेत .एकीकडे आपण खूप प्रगती केली असे म्हणतो दुसरीकडे बालविवाहाकडे दुर्लक्ष करतो हे कितपत योग्य आहे . या कायद्याअंतर्गत असलेले गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत. बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्यामुळे समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे.आवश्यक आहे . काही समजात जातपंचायती बालविवाहास संमती देतात . तेथे प्रबोधनाची गरज आहे. नाट्य, कला, जनजागरण यातून हे शक्य आहे . समाजहितासाठी प्रशासन , सेवाभावी संस्था , समाजसेवक , सुजान नागरिकांनी पुढे यायला पाहिजे ती काळाची गरज आहे बालविवाहाचे दुष्परिणाम सांगून त्यामुळे समाजात होणाऱ्या घातक परिणामांबद्दल जाणीव आणि जनजागृती निर्माण करणे.
    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार (बीड)
    मो. ९४२१४४२९९५

  • आंदोलन नव्हे, प्रतियोगिता परीक्षांची तैयारी करा

    जन्मापासून दिल्लीत रहात असलो तरी महाराष्ट्रात जावेच लागतेच. एकदा नागपूरला गेलो असताना सहज नाक्यावर उभ्या काही तरुणांशी चर्चा केली.  बहुतेक मराठी तरुण सरकारी परीक्षांची तैयारी करतच नाही. काही तरुण  कालेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, सरकारी नौकरीचा विचार करतात. फार्म भरल्यानंतर ३-४  महिन्यांच्या अर्धवट तैयारीवर, परीक्षा पास करण्याचे स्वप्न बघतात, जे संभव नाही. मग सुमार बुद्धीचे इतर भाषिक परीक्षा पास होतात आणि हुशार मराठी तरुण, पूर्ण व नियमित तैयारी नसल्यामुळे, असफल होतात.

  • चोर कृष्णाची दही हंडी

    मराठी भाषा किती प्रगल्भ आहे पहा. पंढरीच्या विठुरायाला कृष्णाचे रूप मानून अभंग गायला जातो,
    ” गळा बांधुनिया दोर, धरला पंढरीचा चोर”
    देवाला चोर म्हणून त्याची पूजा केली जाते. कृष्णालाही माखन चोर म्हणतात. कृष्ण दही-लोणी चोरत असे. त्यासाठी गोकुळातील सवंगड्याना एकत्र बोलवी आणि गोकुळातल्या महिलांनी वर बांधून ठेवलेल्या मटक्यातील दही किंवा लोणी चोरून वाटून खात असे.

  • मेनका गांघींचे भूतदयेचे नाटक

    हिवाळा चरमसीमेवर पोहोचला आहे. थंडीचा कडाका सुरु आहे. दूरवरच्या रशियातील सैबेरियन पक्षी स्थलांतर करुन दिल्लीपासून अकोल्याजवळच्या कापशीपर्यंत पोहोचले आहेत.

  • होय मी सुरक्षित आहे (वैचारिक)

    माझ्या दृष्टीकोनातून…. होय मी सुरक्षित आहे…. कारण…..

  • पुरस्कार आणि तिरस्कार

    प्रकाशन दिनांक :- 09/11/2003
    जगात भारताची ओळख भारतातील नानाविध वैशिष्ट्यांमुळे अनेक प्रकारे स्थापित झाली आहे. अर्थात ही सगळीच वैशिष्ट्ये आपल्यासाठी भूषणावह आहेतच असे नाही, उलट बहुतेक वैशिष्ट्यांनी भारत जगाच्या पाठीवर कुचेष्टेचाच विषय ठरला आहे. सर्वाधिक सुट्ट्या घेणारा देश ही आपली एक ओळख आपल्या आळशी आणि बेपर्वा वृत्तीचे जसे जाहीर प्रदर्शन ठरते, तद्वतच विपुल नैसर्गिक साधन संपत्ती, मनुष्यबळ असतानादेखील देशात असलेली गरिबी आपल्या नियोजनशून्य कल्पकतेला उघडे पाडीत असते.

  • आत्महत्या ते नक्षलवाद!

    एक भुकेलेला मुलगा काहीतरी खायला दे असे म्हणत आईकडे जातो. खरेतर कोणत्याही मातेसाठी लेकराच्या भुकेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नसते. ते नसायलाही नको असे समाज समजतो.

  • चार दोन मिनिटे आम्हालाही द्या

    भाकरी मिळत नाही तर या लोकांनी ब्रेड खावा, केक खावा; रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची काय गरज आह!’ रशियाच्या झारने भाकरीसाठी आंदोलन करणाऱ्यांना सुनावलेल्या या उत्तराची इतिहासाने दखल घेतली आहे. आजही कुणी राज्यकर्ता जनतेच्या प्रश्नांकडे उर्मट दुर्लक्ष करीत असेल तर त्याला या झारची उपमा दिली जाते.

  • ओरड की पोटशूळ?

    ज्या ज्या वेळी महागाई भडकल्याने लोकांचे जीणे हराम झाल्याचे चित्र उभे केले जाते, त्यावर आंदोलने केली जातात, सरकारला महागाई रोखण्यासाठी पावले उचलणे भाग पाडले जाते त्या त्या वेळी या महागाईचा संबंध केवळ कृषी उत्पादनांशी असतो. भाजीपाला, कांद्याचे वगैरे भाव वाढले की लगेच लोकांचे जीणे दुष्कर होऊन जाते, विरोधी पक्षांच्या घशाखाली घास उतरत नाही आणि सरकारलाही नीट झोप लागत नाही. या उत्पादनांचे भाव वाढून चार पैसे शेतकऱ्यांच्या घरात गेले तर किती मोठे संकट उभे राहणार, या विचारानेच सगळे अस्वस्थ होतात.

  • सोप्या शब्दांत चाणक्य तत्त्वज्ञान

    तत्त्व पटवून देताना तत्त्वज्ञाने तर्क लढवले नाहीत, तर ते तत्त्वज्ञान रटाळ होतं. तत्त्वज्ञान अंगिकारण्यास लोक तयार होत नाहीत.