आंबेडकरी साहित्यासमोरील आव्हान!
परिवर्तन हा जगाचा स्थायीभाव आहे. संपूर्ण जग सतत बदलत असते.
वर्गसंघर्ष हा प्रकार कोणत्याही समाजाला नवीन नाही. मग तो समाज युरोप-अमेरिकेतील एखाद्या अतिविकसित राष्ट्रातला असो, अथवा आप्रि*केतील एखाद्या मागासलेल्या राष्ट्रातला असो; वर्गसंघर्ष प्रत्येक ठिकाणी असतोच आणि साधारणत: त्याचे स्वरूप ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असेच असते. प्रत्येक ठिकाणी या वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे समाजघटक, वर्ग, गट किंवा लोक वेगवेगळे असू शकतात, परंतु संघर्षाचे स्वरूप ढोबळमानाने हेच असते.
पत्त्यांचे अनेक खेळ आहेत त्यात, रमी हा खेळ आपल्या जीवनाशी बराचसा निगडित आहे, म्हणून तो मला बाकीच्या पत्यांच्या खेळापेक्षा थोडा हटके वाटतो. या खेळात जीवनाची अनेक सूत्रे सापडतात. प्रत्येक खेळाडू यात पत्ते वाटतो….त्याला ते वाटावेच लागतात, याचा अर्थ त्याला जीवनाच्या सारीपाटात सूट नाही. जर हा खेळ पुढे सुरू ठेवायचा असेल तर, स्वतःची जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावीच लागते.
काँग्रेस पक्ष हा या देशातील सर्वात जुना पक्ष आहे, त्याला राजकीय परिपक्वतेची खुप मोठी पार्श्वभूमि आहे परंतू या पक्षाला काही कालावधीचा अपवाद वगळला तर सक्षम प्रतिस्पर्धी कोणीही भेटला नाही. त्यामुळे या पक्षाची वैचारीक पातळी सातत्याने हेलकावत राहिली व म्हणूनच हा पक्ष नेहमीच टिकेचे लक्ष्य तर बनलाच परंतू त्यातील वैचारिक दिवाळखोरीही चव्हाट्यावर येवू लागली परिणामी लोकांच्या विश्वासाला नेहमीच तडा गेला हे कटू सत्य.
-- अतुल तांदळीकर
याराज्याची आर्थिक परिस्थिती नक्कीच हलाखीची असली पाहिजे. शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत सरकार करू शकत नाही, यावरून हा निष्कर्ष काढलेला नाही; तर केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू केल्यानंतरही अद्याप राज्य सरकारने तो आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेला नाही, यावरून हा निष्कर्ष काढता येतो. सरकारचा आणि शेतकऱ्यांचा तसा काहीही संबंध नाही.
भारतीय विद्वानांचा विचार असा आहे कि जर सर्व नियम शिथिल केले पारदर्शकता ठेवली आणि ती लोकां पर्यंत पोहचली, तसेंच शिक्षेची योग्य अंमलबजावणी ह्या गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार थांबविणे शक्य होईल.
एकदा एका शेतकऱ्याने थेट इंद्रदेवाकडे धाव घेऊन आपल्यावरील अन्यायाविरुद्ध दाद मागितली. त्या शेतकऱ्याचा आरोप होता की, पर्जन्याचा स्वामी असलेल्या इंद्राला मुळात पाऊस केव्हा, कुठे आणि कसा पाडावा याचे प्राथमिक ज्ञानदेखील नाही. जेव्हा पिकाला पाण्याची गरज असते तेव्हा आकाशात एकही ढग नसतो आणि जेव्हा उघाड पाहिजे असते तेव्हा धो-धो पाऊस कोसळतो.
पहा ना... काय आहे हल्ली सर्वंचजण "मी खुपच बिझी आहे.... वेळच मिळत नाही..." अशी अनेक अपेक्षाभंग वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात... म्हणजे अवघड कामे विज्ञानाने तंत्रज्ञान्याच्या मदतीने सहजसुलभ ऊपलब्ध करुनसुध्दा जो-तो प्रचंड प्रमाणात व्यस्त असतो... असो...
पण या विज्ञानाचा कशा प्रमाणात गैरफायदा घ्यायचा.... हे काही अतीहुशार महाशयांना माहीती असतच... किंबहुना यांचा जन्मच यासाठीच झालेला असतो. अशा महाशयांच्या मुखातुनच पुढील वाक्यरचना आपण ऐकत असतोच....,
"अरे मी म्हणजेच अॉफीसच... ,
माझ्या शिवाय अॉफीसमधील एक काम पुर्णंपणे संपत नाही...,
आमचे साहेब न... पुर्णंपणे माझ्यावरच अवलंबून असतात...
अरे एक दिवस सुट्टी घेतली ना...साहेब जाम चिडचिड करतात...
मी म्हणजे सरांचा ऊजवा हातच.......
मी म्हणेल तस सर ऐकतात..........
हल्ली कामाचा व्याप.. म्हणजे मलाच ताप...........
हाफ डे घ्यायचा म्हणल तरी अॉफीसच दोन दिवसांच काम रखडत.........."
अशी किंवा अनेक स्वताःचा मोठेपणा सांगण्याच्या नादात ही मंडळी ईतरांना खिणवत असतात... असो....
पण खरच अस असत का हो....? म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी खरच काम अडु शकतात का हो....? [याला थोड्याफार प्रमाणात सरकारी अधिकारी अपवाद आहेच म्हणा].. पण मी पाहीलय की 99 टक्के अॉफीसमध्ये एक प्रणाली (System) कार्यरत असती.. आणि हीच प्रणाली प्रत्येक अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या कुवतीनुसार त्याच्याकडून काम करुन घेत असती...तरीपण काहीजण जर आपल्याच कामात खोटेपणाने समरसुन जातात आणि "वेळच नसतो हो..." हीच वाक्यरचना सतत बडबडत असतात..
घ्या सांभाळुन.... आपलीच माणस असतात...
असतात अशीही मंडळी सभोवताली.......
-- विवेक जोशी
प्रकाशन दिनांक :- 14/11/2004
मानव समूहाचा उल्लेख करताना ‘मनुष्य प्राणी’ हा शब्दप्रयोग केला जात असला तरी इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य कितीतरी प्रगत, विकसित असल्याने ‘प्राणी’ या व्याख्येत त्याचा समावेश निश्चितच होऊ शकत नाही. मानवाचा हा विकास केवळ बौध्दिक प्रातांतच झाला असे नाही तर ज्याला निखळ मानवी म्हणता येईल अशा मूल्यांच्या, भावनांच्या संदर्भातही तो इतर प्राण्यांच्या तुलनेत खूप पुढारलेला आहे. भूक, भय, निद्रा आणि मैथुन या प्राण्यांच्या प्राथमिक स्तरावरील गरजा आहेत.
भारताला जागतिक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्याचे प्रयत्न अगदी जोरात सुरू आहेत. येत्या पंधरा वर्षांत भारताची ओळख ‘सुपर पॉवर’ म्हणून स्थापित करण्यासाठी सगळ््या नेत्यांनी अगदी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे. अमेरिकेशी नुकत्याच करण्यात आलेल्या आण्विक कराराकडे त्या दृष्टीनेच पाहिले जात आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti