kolumbasacha vruttant
पाऊलोपाऊल चालत जाते,
मनामधली एक वारी,
ना टाळ, ना मृदुंग हाती,
तरी भक्तीची गोड तयारी.
रस्ता नाही धुळीचा येथे,
ना दिंडींची गर्दी भारी,
अंतर्मनाच्या शांत वाटेवर,
अखंड सुरू ईश्वराची वारी.
सुख-दुःखांचे डोंगर ओलांडत,
आशा-निराशेच्या पलीकडे सारी,
प्रत्येक श्वासात नाम गुंजते,
हीच खरी जीवनवारी.
अहंकाराचे ओझे टाकून,
प्रेमाची घेऊन शिदोरी,
करुणा, श्रद्धा, सत्य सोबती,
नेते आत्म्याला प्रभूच्या दारी.
कधी अश्रूंनी पाऊल भिजते,
कधी आनंदाची फुले फुलती,
तरी न थांबे हा अंतःप्रवास,
ओढ लागलेली पंढरीची न्यारी.
शेवट नसतो या प्रवासाला,
ना थांबे कधी ही स्वारी,
ईश्वर भेटतो अंतःकरणी,
जेव्हा पूर्ण होते मनाची वारी.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
असं म्हणतात ना...
आपली शांतता समजून घेणारं एखादं मन भेटलं,
तर दुःखाला शब्दांची गरजच उरत नाही.
काही नाती अशी असतात,
जिथे नजरा बोलतात,
आणि मनाच्या खोल कप्प्यात दडलेले हुंदके
न बोलताही ऐकू येतात.
तो विचारत नाही,
"काय झालं?"
तो फक्त जवळ असतो...
आणि त्याच्या त्या निःशब्द सहवासात
मन हळूहळू हलकं होत जातं.
अश्रूंना स्पष्टीकरण द्यावं लागत नाही,
हसऱ्या चेहऱ्यामागची वेदना लपवावी लागत नाही,
कारण त्याला आपल्या शांततेत दडलेलं
प्रत्येक वादळ ओळखता येतं.
जगाला भावना समजण्यासाठी
शब्दांची गरज भासते,
पण प्रेमाला
फक्त समजूत पुरेशी असते.
आणि जेव्हा मन थकून जातं,
डोळे नकळत ओले होतात,
तेव्हा तो अलगद हात हातात घेत म्हणतो,
"काळजी करू नकोस...
मी आहे ना...
तुझ्या प्रत्येक शांततेसोबत,
तुझ्या प्रत्येक वादळासोबत."
त्या चार शब्दांतच
साऱ्या वेदनांना आधार मिळतो,
आणि दुःखही
हळूच शांत होतं.
कारण...
काही नाती शब्दांनी जपली जात नाहीत,
ती जपली जातात
समजुतीने,
विश्वासाने,
आणि न बोलताही एकमेकांना
पूर्णपणे ऐकण्याच्या अद्भुत क्षमतेने.
ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
मो:- 9011841212
e Sahitya 1
Tantunchya duniyet
“बर आहे साहेब, लवकर PUC करून घ्या, नमस्कार !” असे म्हणत त्या रुबाबदार इन्स्पेक्टरने मला खाडकन सलाम केला. मी तर चक्क उडालोच. पोलीस या जमातीला सर्वसाधारणपणे घाबरून असणाऱ्या सामान्य जनतेचा मी एक भाग. असे असून सुद्धा काही अपवादात्मक अनुभव येतात हेही खरे आणि इथे तर पोलीसाचाच मला सलाम म्हणजे फारच झाले. हो सांगतो ना काय झाले ते.
प्रेम जिथे निःस्वार्थ फुलते, तिथे विठ्ठल हसरा दिसे,
श्रद्धेच्या त्या निर्मळ ओंजळी, रुक्मिणीचे प्रेम वसे.
नसती तिथे शब्दांची भाषा, डोळेच बोलती साऱ्या कथा,
एका स्पर्शात विश्व सामावे, प्रेमच ठरते जीवनव्यथा.
अहंकाराचे गळुनी बंधन, मन जेव्हा निर्मळ होते,
विठ्ठलनामाच्या गजरामध्ये, भक्तीचे गगन उजळते.
सुख-दुःखाच्या प्रत्येक वाटे, हातामध्ये हात असावा,
रुक्मिणीच्या अढळ श्रद्धेने, विठ्ठल अंतरी नांदावा.
प्रेम म्हणजे देह नव्हे रे, आत्म्याचा तो श्वास असतो,
श्रद्धेच्या अखंड ज्योतीमधुनी, जीवनाचा प्रकाश फुलतो.
करुणा, क्षमा, समर्पण जेथे, देवत्व तेथे जागे होते,
प्रेम तिथे विठ्ठल नांदतो, श्रद्धा रुक्मिणी रूपे फुलते.
पंढरी दूर नसते कधीच, भाव जर अंतरी शुद्ध असे,
प्रेमाच्या त्या पवित्र मंदिरात, विठ्ठल-रुक्मिणी सदैव वसे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
मो:- 9011841212
Kishor PDF New Post
पहाटेच्या दवात भिजलेली एक वाट,
क्षितिजापर्यंत पसरलेली नामाची प्रभात.
खांद्यावर भगवी पताका, ओठी विठ्ठलनाम,
पाऊलोपाऊली उमलत जाते जीवनाचे गूढ धाम.
ही वाट केवळ पंढरीकडे वळत नाही,
ती माणसाला माणसाशी जोडत राहते.
हातात हात, नजरेत विश्वास,
मनामनांतील अंतर हळू हळू कमी होतं जाते.
टाळांच्या नादात केवळ लय नसते,
ती काळजाच्या ठोक्यांची भाषा असते.
मृदंगाच्या प्रत्येक स्पंदनातून
संतविचारांचा नवा सूर जन्म घेतो.
इथे पुस्तकांची पाने उघडत नाहीत,
उघडतात अंतःकरणाची कवाडे.
इथे अक्षरांपेक्षा माणसे वाचावी लागतात,
आणि शब्दांपेक्षा अश्रू समजून घ्यावे लागतात.
पायांवरील फोड सांगतात कष्टाचे सौंदर्य,
घामाचे थेंब शिकवतात संयमाचे ऐश्वर्य.
दुःखाच्या वाटेवर चालतानाच
सुखाचा अर्थ उलगडत जातो.
दिंडीत चालताना जातपात नाहीशी होते,
अहंकार धुळीत मिसळतो.
उरते फक्त एकच ओळख
"मी वारकरी... विठ्ठल माझा."
चंद्रभागेच्या वाळूत
काळही क्षणभर नतमस्तक होतो.
विटेवरच्या सावळ्या मूर्तीकडे पाहताना
डोळे भरून येतात,
आणि अंतर्मनात प्रकाश उगवतो.
वारी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ
अनुभव हा गुरु,
जीवन हे पाठ्यपुस्तक,
भक्ती ही परीक्षा,
आणि पदवी मिळते माणूस झाल्याची.
जो ही वाट एकदा मनापासून चालतो,
तो पंढरीहून कधीच पूर्वीसारखा परतत नाही.
त्याच्या पावलांनी अंतर जिंकलेले नसते,
त्याच्या अंतःकरणाने विश्व कवटाळलेले असते.
विठ्ठल भेटतो विटेवर नव्हे,
तर माणसाच्या माणूसपणात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Saudi Arabia Video
Copyright © 2025 | Marathisrushti