No Picture
लेखसंग्रह

देशबुडव्याला “भारतरत्न”?

Category:

 

सचिनचे कौतुक आणि क्रिकेटची नशा लोकांसाठी वेदनाशामक औषधीचे काम करते. क्रिकेटची ही धुंदी, क्रिकेटचे हे गारूड जोपर्यंत लोकांच्या डोक्यातून उतरत नाही आणि त्याला “भारतरत्न” देण्यात येऊ नये याकरिता आंदोलन करीत नाहीत, रस्त्यावर उतरत नाहीत, फेसबुक किंवा इंटरनेटद्वारे या विरोधात जनजागृती करीत नाहीत तोपर्यंत हा देश सुधरू शकणार नाही.

No Picture
व्यक्ती-परिचय

प्रदीप वसंत नाईक

Category:

 

प्रदीप वसंत नाईक हे भारताचे एकोणीसावे वायुदल प्रमुख होते. अनेक सैनिकी कारवायांमध्ये व अतिरेक्यांच्या शोध मोहिमांमध्ये असाधारण अस शौर्य गाजवून आपल्या तिरंग्याची किर्ती अबाधीत राखल्यानंतर ते या सर्वोच्च पदावर आरूढ झाले. ही सर्व मराठी माणसांसाठी निश्चितच गौरवाची बाब आहे.

No Picture
व्यक्ती-परिचय

डॉ. प्रमोद निफाडकर

Category:

 

अस्थमा झालेल्या रुग्णाना जगण्याची किंवा पूर्वीसारखं जीवन जगण्यासाठी उमेद आणि आत्मविश्वासाची भावना त्यांच्या मनात जागवणारी विख्यात अस्थमा व अॅलर्जी तज्ञ डॉ. प्रमोद निफाडकर.

No Picture
व्यक्ती-परिचय

पां. वा. सुखात्मे

Category:

 

मूळ संख्याशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या सुखात्मे यांनी कृषीउत्पादनाच्या तसेच पोषण आणि आरोग्य या क्षेत्रात लक्षणीय भर घातली. कृषिसंशोधनासाठी, तसेच पिकासंबंधींच्या प्राथमिक माहितीचे अचूक विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या अनेक संख्याशास्त्रीय पध्दतींचा विकास त्यांनी केला. भारतीय कृषिसंशोधन परिषदेचे संख्याशास्त्रीय सल्लागार म्हणून कृषिसंशोधनाचा पाया भक्कम करण्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. पिकांच्या संकरित जातींचा विकास करण्यासाठी लागणार्‍या संशोधनासाठी त्यांनी संख्याशास्त्राचा परिपुर्ण पायाच तयार केला. पुढे जागतिक अन्न आणि कृषिसंस्थेच्या संख्याशास्त्र विभागाचे संचालक म्हणुन काम करत असताना जगातील अन्न धान्य समस्येचा सखोल आभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातूनच जगातील दोन तृतियांश जनता उपासमारीची आणि कुपोषणाची बळी असल्याचा प्रगत, श्रीमंतदेशांचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी दाखवून दिले. पोषक आहार आणि रोगराई या दोन घटकांवर आरोग्य अवलंबून असले तरी ग्रामीण भागात आहारापेक्षाही रोगनिर्मूलनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सप्रमाण सिध्द केले. उत्तर आयुष्यात सुखात्मे यांनी आपले सर्व लक्ष पोषणाचा, विशेषतः भारतातल्या ग्रामीण भागातल्या पोषणाचा आभ्यास करण्यावर केंद्रित केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत अध्ययन करणारे सुखात्मे यांनी देशातील संख्याशास्त्राच्या शिक्षणाला आणि अध्ययनाला चालना देण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे.

No Picture
व्यक्ती-परिचय

रामदास पाध्ये

Category:

 

रामदास पाध्ये हे भारतामध्ये तसेच परदेशामध्येही या कलेमुळे नावाजले गेलेले हाडाचे कलाकार आहेत. त्यांनी बनविलेले व जीवंत केलेले अनेक बाहुले जगभरच्या रसिकांनी आपलेसे केले आहेत. टेलिव्हीजन मालिका, जहिराती, सिनेमे यांच्यातून सुध्दा ते आपल्या मनोरंजनासाठी भेटीस आले आहेत. आपल्या बाहुल्यांच्या कार्यक्रमांमधून बालविवाह, बालशिक्षण, ड्रग्स ची समस्या, जागतिक तापमानवाढ अशा महत्वाच्या मुद्दांवर ते नेहमीच भाष्य करतात. त्यांच्या जादुई बोटांचा स्पर्श झाला की त्या निर्जिव जीवांना नवं जीवनं मिळतं, ते रसिक जनांशी संवाद साधतात, त्यांना कधी हसवतात, रिझवतात, हास्याच्या कल्लोळामध्येही त्यांच्या जाणीवांचे पडदे खुले करून जातात. त्यांना प्रेम शिकव तात, संवेदनशिलतेचा मुलामा लावतात. मग तो लिज्ज्त पापड जहिरातीमधला बनी असो किंवा ‘दिल हे तुम्हारा’ मधील सर्वांना हवाहवासा वाटणारा बाहुला असो अशा निरनिराळ्या बाहुल्यांद्वारे रामदास पाध्ये प्रत्येक प्रयोगाला एखाद्या नवीन विचारांची, व कल्पनांची कुपी प्रेक्षकांसमोर उघडत असतात.

No Picture
व्यक्ती-परिचय

डॉ. जयंत विष्णू नारळीकर

Category:

 

जयंत नारळीकर हे त्यांच्या रोचक, रसदार, व सर्वांच्या मनाला भिडेल अशा लेखनशैलीत आकाशातील गुढ तारे व ग्रहांच्या गोष्टी सांगणारे लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. अनेक वैचारिक, वैज्ञानिक, तांत्रिक, काही समजायला सोप्या व काही तर लहान मुलांनाही वाचायला उपयुक्त अशा कथांमधून ते आपल्या सर्वांशी हितगुज साधत असतात.

No Picture
व्यक्ती-परिचय

नरेंद्र करमरकर

Category:

 

भारतासारख्या महासत्ता बनण्याच्या वाटेवर असलेल्या देशाला त्याच्या गरीबीवर, व बेरोजगारीवर अंकुश ठेवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणाची जेवढी गरज आहे तेवढीच गरज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होईल तेवढ्या खर्चाचा अपव्यय टाळण्याची व सुलभ तंत्रज्ञान जे सामान्य माणसाचा पैसा, वेळ व शक्ती या तिन्ही गोष्टींची बचत करेल असे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची देखील आहे. विज्ञान व तंत्रज्ञान हे उपजत गुंतागूतीचे क्षेत्र असल्याने पैश्याची, व किचकट पध्दतींची बचत करून नव नवीन शोध लावणे व विवीध तंत्रांद्वारे ते लोकामध्ये रूजवणे हे तसे आव्हानच असते. पण हे आव्हान भारतामधील तरूण शास्त्रज्ञांनी आपल्या शोधांमधे लिलया पेललेले दिसते. नरेंद्र करमरकर हे या तरूण शास्त्रज्ञांमधले एक नसले तरी पैशांची होईल तेवढी बचत करून व आपल्या संशोधन कार्याला सहजतेची जोड देवून मगच त्या शोधाला आकार व गती प्राप्त करून देण्याचा पायंडा त्यांनीच या क्षेत्रात पाडला आहे. अंकगणिताच्या लाखो आकडेमोडी, करामती व हिशेब आपला संगणक चुटकीसरशी आपल्याला करून देत असला तरी जेव्हा हजारो घटकांची गुंतागूंत झालेला प्रश्न त्याला टाकला जातो तेव्हा त्याच घोडं हे अडतच!