आपण परदेशात गेल्यावर तिथं कोणी भारतातील, त्यातूनही महाराष्ट्रातील, नशीबाने पुण्यातील माणूस भेटला की, जो आनंद होतो.. त्याचं शब्दांत वर्णन करणंही अवघड आहे. कारण त्यात एकप्रकारचा आपलेपणा, आपुलकी असते.
मागच्या पिढीतील ताई-भाऊ, काकू-बापू आणि आमच्या आई-वडिलांचे आदर्श संस्कार आमच्या सर्व बहीण भावंडांवर झालेले. रोज रात्री आम्ही सर्वजण बसून ‘रामरक्षा’ म्हटली. ‘मानसिक शांती’ हीच जमेची बाजू. माझे माहेर गिरगावांत आंग्रेवाडीत. तिथे आम्ही लहान असताना गाववाले विष्णू साठे, रघू आगाशे वगैरे मंडळी तासनतास येत व गप्पा मारीत. ती अशी कां येत असत? हयाच उत्तर कोकणात आल्यावर त्यांची बाजूचीच घरे पाहून मिळालं. कोकणातून मुंबईत आल्यावरसुद्धा एकमेकांना भेटण्याची ओढ आणि आपलेपणा.
लालबाग च्या आसपासचा हा परिसर ह्या परिसरात असलेल्या कापडांच्या गिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होता. तीन शिफ्ट मध्ये जाणाऱ्या कामगारांचा लोंढा हा परिसर रात्रंदिवस जिवंत ठेवीत असे. गिरण्यांच्या भोंग्यावरून टाईम लावला जात असे. फूट-पाथ प्रशस्त होते आणि तरीही भरलेले असत. त्यावर फेरीवाले, भाजीवाले असायचे, कामगार वर्ग आपल्या छोट्या मीटिंगी येथेच करत. दुकानांमधून गर्दी डोकावत असे. रात्री २ ते सकाळी पाच एवढा वेळ हा परिसर त्यातल्या त्यात शांत असे. गिरण्यांचा संप झाल्यावर आणि पुढे गिरण्या बंद होऊन इथला कामगार वर्ग देशोधडीला लागल्यानंतर ह्या गिरणगावाची रया गेली ती पुन्हा आलीच नाही.
इंदिरा गांधी यांनी २५ जून रोजी देशात आणीबाणी लागू केली त्या घटनेला ४२ वर्षे होत आहेत. भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ हा आणीबाणीचा २१ महिन्यांचा कालखंड तमोयुग म्हणून ओळखला जातो. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. जगमोहनलाल सिन्हा यांनी निवडणुकीतील गैरव्यवहारप्रकरणी राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्यात इंदिरा गांधी यांना दोषी ठरवून त्यांची खासदारकी रद्द केली. तसेच त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले.
पूर्वीच्या चाळ संस्कृतीत आरती म्हणजे एक मोठा इव्हेंट असायचा. त्यातही मोठी आरती म्हणजे कमालच. मोठी आरती म्हणजे विसर्जनाच्या आधल्या रात्री केलेली आरती. काही ठिकाणी तर ही मोठी आरती तब्बल तासभरच काय तर त्याहीपेक्षा जास्त वेळ चालायची.
साधारणत: ७०-८० च्या दशकात जेव्हा टेलिफोनचं संभाषण सर्वांच्या आवाक्यात आलं त्यावेळी पीं.सी.ओ. बुथच्या बाहेर किंवा बुथ नसेल तरी पण स्वकीयांबरोबर बोलण्यासाठी रीघ लागायची, हे चित्र शनिवारी रात्री आणि रविवारच्या दिवशी हमखासपहायला मिळायचं
१९९३-९४ च्या सुमारास भारतात डिजिटल क्रांती वाढू लागली घराघरात “इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे पेव फुटू लागले. खेळणी देखील याला अपवाद नव्हती. अर्थात चावी फिरवून डोलणार्या बाहुल्या, बाहुले, रॉबट्स तर एव्हाना खूप जुने झालेले, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सुद्धा अॅनिमेशन बर्यापैकी रुळलेली, त्यामुळे कार्टुन्सचा आनंद ही तेव्हांच्या लहानग्यांना घेता येत असे.
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जगात मोठी क्रांती घडत होती ज्याच्या आगमनानं येणारी सर्व शतकं, अनेक पिढ्या “टेक्नो सॅव्ही” होणार होत्या, क्लास ए, बी, च्या प्रतिष्ठेला मानाचा तुरा प्राप्त झाला, “टाईप रायटर” च्या रुपानं कार्यालयीन कामकाजात लिखापढी वाढल्यानंतर मनुष्यबळाची मर्यादा लक्षात येऊ लागल्या व लेखन यंत्राची गरज ही भासू लागली.
जवळपास दीड दशकांपूर्वी सॉफ्ट ड्रींक्स चा विस्तार झपाट्याने होत होता; वेगवेगळ्या फ्लेवर्सची आणि नामांकित ब्रॅण्ड्सची शीतपेय लोकांना आवडू लागली होती आणि त्यांच्यासाठी अशी कोल्ड्रींक्स् म्हणजे काहीतरी खास असंच होतं….
आज कधीतरी प्रदर्शनातून हिंडताना किंवा एखाद्या संग्रहालयाला भेट देतो त्यावेळी तांबा, पितळ व जर्मनच्या वस्तु विक्रीसाठी तर कुठे फक्त माहिती कळावी म्हणून ठेवलेल्या असतात. थोडसं हसू ही येतं, कारण काल परवा पर्यंत वापरातल्या गोष्टींना आता अॅन्टीकचा दर्जा प्राप्त झालेला आहे..
Copyright © 2025 | Marathisrushti