नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

आरूने गेल्या दोन दिवसांत नीलला अनेक प्रश्न विचारून भांडावून सोडले होते. पण ‘आज तुला डॉ. जोशींकडून योग्य ती सर्व उत्तरे मिळतील’ असे नीलने तिला सांगितले. अर्धा तासाने सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले.
राजू नावाचा एक छोटा मुलगा. चुणचुणीत आणि गोड स्वभावाचा. सकाळी लवकर उठायचा. आंघोळ करायचा. आई वडील आणि घरातील मोठ्या माणसांच्या पायी डोके ठेवायचा. नम्रपणा हा त्यांचा विशेष गुण होता. अभ्यासातही हुशार होता. मित्रांशी सहकार्याने वागायचा. घरच्या कामाची त्याला खूप आवड होती.
त्यांचे वडील त्याला खूप जीव लावायचे. सकाळी शाळेत सोडायचे.घरी आला की नाही ते पहायचे. घरी दोन एकर जमीन होती. त्यातच हे कुटुंब राबायचे. जगण्याएवढी सालचंदी व्हायची. कष्ट करून , मोलमजुरी करून पोरांचे शिक्षण चालू होते. राजूला थोडेफार समजायला लागले. सुट्टी असली की तो आई-वडिलांना कामात मदत करत असे. वडिलांसाठी रानात भाकरी घेऊन जाई. शेळ्या सोडून चालायला नेई. कधीकधी सरपण, गवर्या वेचून आणी. कळशीने घरचे पाणी भरी.जमेल तशी मदत करी.
यासाली भयंकर दुष्काळ पडला. कोणत्याच विहीर, तलावात ,हापशाला पाणी राहीले नाही. पाणी नाही म्हणून शेती पिकेना. त्यामुळे रोजगार मिळेना.ऊसतोड, वीटभट्टी कारखाना अशा ठिकाणी लोक कामाला जाऊ लागली. काही हमालीला जात होती.काही परराज्यात जात होती. राजूच्या वडिलांनी सावकाराकडून काही कर्ज घेतले.जमीन काही पिकेना. कर्ज काही फिटेना.घेतलेले कर्ज परत करावेच लागणार होते. ते परत द्यायला काही मार्ग सापडत नव्हता. तेवढ्यात गाडीवरून पडून त्यांचा हात मोडला. राजूचे वडील अधू झाले होते. काम सुटले. खाणारी तोंडे वाढली. राजूला शाळा सोडावी लागली. परिस्थिती बिकट झाली. गुरूजी घरी यायचे. ' पोराला शाळेत पाठवा. हजेरी कमी पडतीय.
परीक्षा जवळ आलीय.' असं म्हणायचे. पण नाईलाज झाला होता.पोटापाण्याचा प्रश्न होता. एका रात्री आईवडीलांचे भांडण झाले. त्याचा अर्थ राजूला काही समजला नाही . पण वडील रागाने निघुन गेले. त्यांच्या हातात कसलातरी दोर होता. राजूच्या हे लक्षात आले. त्याच्या शाळेत वर्तमानपत्राचे वाचन व्हायचे . त्यात एक बातमी हमखास असायची. 'कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या.' सर म्हणायचे " ती नका वाचू. दुसरी वाचा चांगली." राजूच्या मनात पाल चुकचुकली.
तो ताडकन उठला. अंधारात पळाला. दगडधोंडे बघितले नाही की काट्याकुट्या. बापाला गाठलच. वडीलांसमोर धाय मोकलून रडायला लागला. विनवणी करू लागला. त्यांच्या उरात माया उत्पन्न झाली. तोपर्यंत चारदोन माणसं जमा झाली. राजूच्या वडिलांनी मनातील विचार काढून टाकले. ते घरी आले. राजूला कडकडून मिठी मारली.
विठ्ठल जाधव,शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५ (दिव्यमराठी)

त्या दिवशी exactly काय घडलं ते आरू सांगत होती. “14 तारखेला आम्ही तिघं खरंतर गढी बघायला जाणार होतो. तोपर्यंत दीने गढीविषयी आम्हाला काहीच माहिती दिली नव्हती. आपण गढी पहायला गेलो की माहिती सांगेन असं ती म्हणाली. परवा आपण देवळात गेलो तेव्हा तू विचारलंस म्हणून दीने आपल्याला गढीची माहिती सांगितली.
कालची रात्र प्रचंड अस्वस्थतेत गेलेली .
मन सुन्न आणि मेंदू बधीर अवस्थेत गेलेला .
डिलीट केल्यानंतरसुद्धा अजूनही
व्हिडिओतले ते दृश्य डोळ्यांसमोर सारखं उभं राहतंय .
भयभीत करणारं .
हृदयाचे ठोके थांबवणारं .
नजरेत अंगार निर्माण करणारं.

विजयच्या आयुष्यात काय ? कोणाच्याच आयुष्यात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही ! यावर विजयचा ठाम विश्वास होता. विजयचा पाय दुखणे ! तो ही सलग चार महिने ! कोणत्याच उपचारालाही प्रतिसाद न मिळणे . ही विजयला एक सामान्य घटना नक्कीच वाटत नव्हती… या चार महिन्यात विजयासह अनेकांच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्या चार महिन्यांमुळे अनेक घटना घडणार होत्या. विजयला सध्या तो जी नोकरी करत होता ती नोकरी त्याला सोडायचीच होती पण ती सोडायला काही ठोस कारण मिळत नव्हते.

विजयच्या अनेक स्वप्नांपैकी गोव्याला जाणे हे ही एक स्वप्नच होते. पण त्याहून मोठे म्हणता येईल असे आणखी एक स्वप्न होते ते म्हणजे विमानप्रवास ! यावेळी विजय गोव्याला जाताना विमानाने गेला होता. कारण गोव्याचा संपूर्ण कार्यक्रम फक्त तीन दिवसांचा होता.

यथावकाश मला माझं भुत किंवा भुतं भेटली. आतापर्यंत मी लेखक बेसंट यांना पाठींबा देत होतो पण आता विरोध करतो. आपण त्या बंगल्याला ‘खटमल’ बंगला म्हणू. ज्याची कातडी नरम आहे त्याला डाक बंगल्यात रहायचा अधिकार नाही. त्याने लग्न करावं. तो बंगला जुना, घाणेरडा, दुरूस्ती न केलेला होता. भिंती खराब होत्या, खिडक्या काळ्या पडलेल्या होत्या. तिथे आसपास बरेच कचेरीतले मामुली अधिकारी, अर्थखात्यापासून ते जंगल खात्यापर्यंतचे, रहात पण कुणी गोरा साहेब नव्हता. वयाच्या दुप्पट वांकलेल्या खानसाम्याने हे मला सांगितलं. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा वारा आणि पाऊस होता आणि बाहेरच्या पामच्या झाडांचा हाडे आपटावीत तसा आवाज येत होता. माझं आगमन खानसाम्याला आवडलं नसावं.

सांगली जिल्ह्यातील बिसुर या खेडेगावात माझा जन्म झाला. घरची परिस्थिती अगदी बेताची, वडील सुतगिरणीमध्ये काम करुन उर्वरित वेळेत बिघा – दोन बिघा शेतजमिनीत जमेल तेवढं काम करत होते. आई आमचा सांभाळ करायची. जवळ जवळ सर्व शेती निसर्गावर अवलंबून होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वर्षभर जिकिरीनं पुरवावं लागत होतं. मोठ्या दोन बहिणींची लग्न होवून त्या सासरी गेलेल्या होत्या.
“छ्या! बाबांनी नुसता वैताग आणलाय. किती सारखं हे केलंस का? ते घेतलंस का? बॅग जागेवर ठेव. मला डॉक्टर कडे घेऊन चल. माझी औषधं आण वगैरे वगैरे…
एक श्रीमंत जमीनदार शेतकरी होता. आपल्या बायका-मुलांसह तो शेतावरच राहात असे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. फक्त हे ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगायचे नाही, असे त्याच्यावर बंधन होते. त्याने ते ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगितले तर त्याच्या वाट्याला मृत्यू येणार होता. त्यामुळे हे रहस्य त्याने कुणालाच कळू दिले नव्हते. पण या भाषिक देणगीमुळे त्याला पशु-पक्ष्यांच्या भावभावना चटकन समजायच्या. गोठ्यातले वासरू भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याच्या आईचा धावा करते आहे; घोड्याला कंटाळा आला आहे, त्याला चक्कर मारून आणली पाहिजे हे त्याला चटकन कळायचे. मांजरांची भांडणं, कोंबड्यांचा कलकलाट, पक्ष्यांचे गुंजन यातला भावार्थ त्याला समजायचा.
Copyright © 2025 | Marathisrushti