वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सुमारे आठ वर्षांपूर्वी फ्रान्सच्या लवेरा शहराजवळील बंदरात आमचे जहाज नांगर टाकून उभे होते. आम्ही कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी येऊन थांबलो होतो. जहाजाने किनाऱ्याजवळ नांगर टाकला होता.
मानव जन्म पूर्व प्रारब्धाने प्राप्त होतो.जन्म घेतानाच त्याची कुंडली तयार असते. त्याच्या आयुष्य तीन प्रकारच्या संबंधाने बांधलेले असतात.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा व अभिनंदन. स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण आपल्या प्रत्येकाला दर वर्षी १मे रोजी होते. परंतू सध्याचे राज्यकर्ते हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी ठरवून आणि स्मरून साजेशी वागणूक महाराष्ट्रातील जनतेला देतात का ? त्यांच्या प्रश्नांची उकल करतात का ? त्यांच्या प्रश्नांना खरोखरच न्याय मिळतो का ? जर याचे उत्तर ‘होय’ असेल तर हुतात्म्यांच्या आत्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. पण उत्तर ‘नाही’ असेल तर परिस्थिती नक्कीच राजकारणी व जनतेला आत्मचिंतन करणे जरूरीचे ठरेल.
१८व्या शतकातील मराठे दिल्लीस जाऊन पोचले परंतु दिल्लीचे अधिपती झाले नाहीत, ह्या गोष्टीचा विचार करतांना दिल्लीला धडक देणार्या व्यक्ती कोण होत्या, हे पुन्हा एकदा विचारात घेणे आवश्यक आहे. आधी हा उल्लेख आलाच आहे की, बाजीराव, सदाशिवराव भाऊ व महादजी या तिघांमधील एकही जण स्वतः राजा नव्हता, ते कुणा दुसर्याचे सेवक होते, अंकित होते. सर्व निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना नव्हते.
व्हेल शार्क म्हटले की मन संभ्रमात पडते. व्हेल हा तर सस्तनी आणि शार्क कास्थिमत्स्य. मात्र व्हेल शार्क म्हणजे पृथ्वीवर जगणारा आकाराने सर्वांत मोठा शार्क, १४ मीटर लांबीचा आणि सरासरी १२ १२ टन वजनाचा कास्थिमत्स्य संकटग्रस्त ठरला आहे.
वय हा एक आकडा आहे. कोणी पन्नाशीतच म्हातारा झालेला दिसतो, तर कोणी 80 व्या वर्षीही तरुणासारखा कार्यरत असतो. मी सुमारे 50 वर्षे लेखन-प्रकाशन-ग्रंथालय क्षेत्रात अव्याहत काम करत आहे. लोकसंपर्क संपूर्ण महाराष्ट्र भारतभर आणि बाहेरच्या काही देशांमध्ये प्रवास. त्याचबरोबर व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी चालू होत्या, आहेतच. लेखकाला निवृत्ती नाही.
जम्मू-कश्मीर पुन्हा एकदा पेटले आहे. किंबहुना जम्मू-कश्मीरातील पाकिस्तान समर्थक आणि फ़ुटीरवादीनी ही आग लावली आहे. फरक इतकाच की, एरव्ही कश्मीर खोरे हिंसाचाराने धुमसत असते. यावेळी जम्मू आणि आसपासच्या हिंदूबहुल जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. सर्वप्रथम किश्तवाड हे शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
सामना नावाचा अत्यंत ज्वालाग्रही पेपर आहे. त्याचे संपादक संजय राउत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि पेपरहुन अधिक ज्वालाग्रही लेखक. मध्यंतरी त्यांनी बिहारी आणि उत्तरप्रदेशी लोकांबद्दल अत्यंत ज्वालाग्रही लेख लिहिला. संसदीय समितिसमोर त्याची चौकशी झाली आणि नेमक्या त्या दिवशी ” संजय राउतांची संसदिय समितिसमोर माफी ” अशी ब्रेकिंग न्युज वाहिन्यांनी फ्लैश केली. त्यावर लगेचच संजय राउत समोर आले आणि त्यांनी असे काही घडलेच नसल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे होते, ” मी मा्फी मागितली नाहि. फक्त खेद व्यक्त केला. शिवसैनिक किंवा आम्ही माफी मागित नसतो. माफी आणि खेद यातिल फरक समजावुन घेतला पाहिजे. “
आम्ही ही बातमी बघितली आणि विचारात पडलो. अरे खरोखरच की ! माफी मागणे आणि खेद वाटणे यातील फरक आपल्यालाही माहित नाहि. तसे आम्ही स्वतःला मराठीच समजतो. आम्ही मराठी घरात जन्मलो. आमच्याआधी आमच्या किमान दहा पिढ्या मराठी. मराठवाड्यात बालपण आजुबाजुला इतर भाषांचा संबंध नाही . इथुनतिथुन सर्व मराठीच. त्यात आमचे दहावीपर्यंत पुर्ण शिक्शण मराठी शाळेत झाले. त्यानंतर मात्र बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमातुन आणि वैद्यकिय शिक्शण ( मनसेचा जन्मच तोपर्यंत झाला नसल्याने ) नाइलाजाने इंग्रजी माध्यमातुन झाले. या गोष्टीमुळे ” आम्ही पक्के मराठी ” असा आम्हाला आत्मविश्वास होता , तो मात्र ढासळायला सुरुवात झाली, आणि आम्ही ” माफी मागणे आणि खेद वाटणे “ यातील फरक शोधायच्या मागे लागलो.
बराच विचार केल्यावर आम्हाला एक आयडीया सुचली. महाराष्टातील राजकारणी अत्यंत हुशार आहेत , आपले प्रश्न ते बरोबर सोडवतात. त्यामुळे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर राजकारण्यांकडेच सापडेल असा आम्हाला लगेच विश्वास बसला आणि राजकारण्यांची भेट घेण्याचे आम्ही ठरवले. मराठीचा विषय आल्याबरोबर राजसाहेबांचे नाव लगेच आठवले आणि त्याना भेटण्यासाठी आम्ही आमचे मनसेचे नगरसेवक गंपुशेटना भेटलो. त्यांनी जे सांगितले ते ऐकुन आमची पाचावर धारण बसली. त्यांच्यामते राजसाहेबांशी बोलताना मराठीचा वापर अनिवार्य आहे. कारण राजसाहेबांकडे चाबुक आहे , आणि आपण बोललेल्या वाक्यातील प्रत्येक अमराठी शब्दासोबत तो ते चालवतात. आता आम्ही मराठीवादी असलो तरी आमच्या बोलण्यात काही अमराठी शब्द येतात. उगीचच राजसाहेब आपल्याला विचारायाचे ” कसे आलात ? ” , आपण सांगायचो , ” रेल्वेने आलो . “ आणि “ रेल्वेने ” हा शब्द उच्चरताच सप्पकन चाबकाचा आवाज यायचा , या कल्पनेनीच आम्ही राजसाहेबांना भेटायचा विचार सोडुन दिला.
महाराष्ट्रातील दुसरे अत्यंत हुशार राजकारणी म्हणजे शरदरावजी. आपले क्रुषिमंत्री . राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष असल्याने आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्रापुरता मर्यादीत असल्याने मराठी भाषेशी संबंधित आपला प्रश्न ते सहज सोडवु शकतील असा आम्हाला विश्वास वाटला आणि लगेचच आम्ही त्यांची भेट घेतली , आणि आमची शंका विचारली.
“ शरदरावजी , खेद वाटणे आणि माफी मागणे यात नेमका फरक काय हो ? “ शरदरावजी लगेच उत्तरले , ” बाळा , डाळींचे भाव तुला माहित आहेत काय ? साखर काय भाव आहे ? भाज्या काय भाव आहेत ? ” आम्ही सांगितले , “ नाही. कारण किराणा बायकोच आणते. आम्ही फक्त पिशव्या उचलतो. पण हल्ली ती फारच कटकट करायला लागली आहे. महिन्याला पैसे पुरत नाही म्हणते. “ शरदराव म्हणाले, “ मी कारण सांगु ? कारण डाळ शंभर रुपये किलो झाली आहे. साखर चाळिस रुपये आणि भाजी दहा रुपये पाव . मिळते . “ मी विचारले , ” पण माझ्या प्रश्नाचा आणि या उत्तराचा काय संबंध ? मला माफी मागणे आणि खेद वाटणे यातील फरक हवा आहे. “ शरदराव उत्तरले , “ सांगतो. संबंध सांगतो. एवढी महागाई वाढली असताना , घरी पैसे पुरत नसताना , प्रत्येकाला दिवसा नोकरी झाल्यावर रात्री पार्टटाइम नोकरी करणे घर चालवण्यासाठी आवश्यक आहे. ती नोकरी शोधायचे सोडुन तुम्ही अशा फालतु प्रश्नात आपला वेळ फुकट का घालवता , हेच मला कळत नाही. आज प्रत्येक भारतीयाची ही गरज आहे . ”
आमचे डोळे खाडकन उघडले. असल्या फालतु प्रश्नाच्या नादी लागायला आमच्यासारख्या सामान्य माणसांना वेळ नाही. संसारपण चालला पाहिजे. पार्टटाइम नोकरी शोधायच्या आम्ही मागे लागलो. एक गोष्ट मात्र पटली , की महाराष्ट्रातील राजकारणी अत्यंत हुशार आहेत. आपले प्रश्न ते बरोबर सोडवितात.
--निखील मुदगलकर
सकाळी आम्ही सर्व अंगणात बसलेलो ,बऱ्याच विषयावर आई आणि माझ्या गप्पा सुरू होत्या. आईला विविध विषयावर चर्चा करायला फार आवडत. आमचे बोलणे चालूच होते तर अंगणामध्ये एक लहान जेमतेम १२-१३वर्षाची मुलगी आली ,तिच्या डोक्यावर झाळूचे भले मोठे गाठोडे बांधलेले. तिच्या निरागस चेहऱ्यावर ते सर्व झाडू विकायची काळजी होती. असे असताना तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होत ,आईकडे पाहून तिने सुंदर हास्य दिले. ती खूप गरीब होती इतक्या लहान वयात तिच्यावर घराची जबाबदारी येऊन ठेपली होती. आईने तिच्या डोक्यावरचे ओझे खाली ठेवले , मला पाणी आणायला सांगितले. मी पं घेऊन आले तिच्या सोललेल्या चेहऱ्यावर भुकेची छबी जाणवत होती आईने तिला जेवणाचे विचारले ,तिने नाही म्हटले पण आईने बेटा खाऊन घे दोन घास असे म्हणताच तिचे डोळे भरून आले. आईने तिला पोटभर जेवायला दिले. जेवताना तिला सजच प्रश्न केले. तू कुठे राहते ?हे काम इतक्या लहान वयात का करते?मग तिने सांगितले ते मूळचे मध्यप्रदेशचे पण तिच्या बाबाचे निधन झाले आणि घरची बेताची परिस्थिती अश्यात पोट कसे भरवे हा मोठा प्रश्न. मी तिला तिच्या शिक्षणाचे विचारले तेव्हा ती म्हणाली आम्हाला पोट भर भाकर मिळणे कठीण आहे तिथे शिक्षणाचा प्रश्न च येत नाही. ते पोटच्या भाकरीसाठी वाटेल ते काम करतात ,गावोगावी फिरून झाडू बनून विकतात तर कधी टिनाच्या डब्ब्या चे काही बनून ते विकून पैसे कमुन आपली उपजीविका भागवतात. आश्याप्रकरे त्यांच्या आयुष्याचे चक्र चालू होते. आईने तिचा वेळ न घेता दोन झाडू विकत घेऊन तिला काही पैसे आणि धान्य दिले. तिने पुन्हा स्मित हास्य देऊन आमचा निरोप घेतला. ती मुलगी गेल्यानंतर मात्र मला अनेक विषयाने घेरले खरचं माणसापेक्षा आज पैसा खूप मोठा झाला आहे ,या पैश्यामुळेच तर बिचाऱ्या त्या लहान मुलीला शिक्षण घेता आले नाही ,अगदी लहान वयात तिच्यावर घरची जबाबदारी आली. खरतर या लाहण्या जीवाला पैश्याची मदत करून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मदत केली पाहिजे कारण आज आपल्या अवतीभोवती आपल्याला असे अनेक उदाहरणे सापडतील ज्यामुळे या निरागस बालकांचे शिक्षण वाया जाऊन त्यांना घरची जबाबदारी पेलावी लागते. तर चला या मुलांना मदत करूया शिक्षण ही आपल्या समाजासाठी खूप परिवर्तनाची लाट आहे ज्यामुळे समाजातील अंधार कमी होतो. पैश्यामुळे कोणाचे शिक्षण न थांबता त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करुया.
अॅड विशाखा समाधान बोरकर
रा पातूर जी अकोला
गजानन तो संत महात्मा ह्या भूतली आला असे
मानव म्हणूनी जन्म घेतला सर्वासाठीं ईश्वर भासे ।।१।।
आला होता गरिबांसाठीं कैवारी बनूनी त्यांचा
आजही त्याचे स्मरण होतां नाश होई दुःखाचा ।।२।।
कोठूनी आला, कसा आला कळले नाहीं कुणां
जात पात धर्म बंधने त्यांच्यापाशीं नव्हत्या खुणा ।।३।।
तो तर आला सर्वासाठीं मानवातील देव बनुन
धन्य केले कित्येकांना संकटे दूर करुन ।।४।।
संदेश घेवूनी आला होता प्रभूचा पृथ्वीवरी
धर्म रक्षण्या सांगुन गेला महान कार्य तो करी ।।५।।
नास्तिकतेची चढली होती धूळ विचारावरती
झटकून देतां तिजला नविन ज्योत पेटविती ।।६।।
जागृत केला भाव प्रभूचा प्रत्येक व्यक्तीचे मनीं
आस्तित्व ईश्वर शक्तीचे दाखविले गजाननांनी ।।७।।
कलियुगीचा असे हा काळ धर्म चालला विसरुन
गजाननाच्या रुपामध्यें दिसले सर्वा देवपण ।।८।।
प्रफुल्लित करिंता ज्ञानानी फुंकार मारुनी राखेवर
भक्तीभावानें पुजितां तुम्हीं पावन होतो ईश्वर ।।९।।
लेखक नव्हता, कवि नव्हता शिकविले नाहीं ज्ञान
सामान्य अशा घटनानीं दाखवूनी दिले प्रभूपण ।।१०।।
लोकांस वाटले चमत्कार गजाननाच्या जीवनाचे
हे तर सहजची घडले आस्तित्व होते त्यांत प्रभूचे ।।११।।
आजही त्याच्या नावामध्यें आहे शक्ति प्रभूची
संसारातील दुःखे हरपती कृपा होतां गजाननाची ।।१२।।
मानव म्हणून होता साधा उघडून देई मंदीरद्वार
देई घालवूनी दुःखें सारी हलका केला पाप भार ।।१३।।
बऱ्याच घडल्या घटना दिसले ज्यामध्ये चमत्कार
प्रभूविषयीं श्रद्धा निर्मूनी केली ईशवृत्ती साकार ।।१४।।
प्रभूसी पावन करण्या पाहिजे महान तपशक्ति
कित्येक जन्माची त्याला लागत असते भक्ति ।।१५।।
कठीण असते सारे पावन करण्या प्रभूला
मोठ मोठ्या विभूती हार जाती त्याला ।।१६।।
तुरळक कांही व्यक्ति प्रभूमय जे झाले
शेगांवचे गजानन त्यांतलेच एक ठरले ।।१७।।
त्यांच्याकडे असते दिव्य शक्तीचे बळ
सहजतेनें ते जे करिती चमत्कार समजे सकळ ।।१८।।
गण गण गणांत बोते मुखी घेत होते सतत
तन्मय होऊन शब्दामध्यें ध्यान मग्न ते होऊन जात ।।१९।।
आंता कांही प्रसंग सांगतो चमत्कार भासला त्यामध्यें
ईश्वर चैतन्याची झलक दिसून आली आनंदे ।।२०।।
प्रथम येतां शेगांवी कपडे नव्हते अंगावरी
वेडा पिसा वाटूनी समजले त्यास भिकारी ।।२१।।
एका घरा पुढतीं पडल्या उष्ट्या पत्रावळी
गजानन बसून तेथें जमवी शिते सगळी ।।२२।।
तुच्छ लेखले सर्वानीं प्रथम बघतां त्याला
अन्नातील ब्रह्म जाणतां पाणी आले नयनाला ।।२३।।
वृत्ती असते लोकांची बघण्या बाह्याकडे
अंतरीच्या दिव्यत्वाची उमज त्यांना न पडे ।।२४।।
नाल्यामधले थोडे पाणी मलीनतेने साचलेले
हात लागतां गजाननाचा निर्मळ बनूनी वाहूं लागले ।।२५।।
कित्येक रोगी त्रासून गेले दुर्धर अशा व्याधींनी
आशिर्वाद मिळतां गजाननाचा सुद्दढ झाले शरिरांनी ।।२६।।
शुष्क झालेल्या विहीरींमध्यें उचंबळूनी आले पाणी
आनंदी झाले गांवकरी तहानलेल्यांची तहान भागूनी ।।२७।।
अहंकारानी पेटलेले आले होते गोसाविजन
अग्नीज्वालांत बघूनी त्यांना नतमस्तक झाले सारेजण ।।२८।।
वांझोट्या एका गाईने उच्छाद फार मांडला
क्षीर देण्यास लावूनी शांत केले तिजला ।।२९।।
अंतःकरण जाणून भक्ताचे देई त्यांना तसेच दर्शन
आनंदी केले कांहीना विठोबाच्या रुपांत येवून ।।३०।।
नावेमध्यें जात असतां गजाननाच्या सहवासे
संकट समयीं प्रत्यक्ष नर्मदा धावूनी आली असे ।।३१।।
टिळकासम थोरांना आशिर्वाद मिळती गजाननाचे
गीतारहस्य लिहूनी ज्यानी पांग फेडले भूमातेचे ।।३२।।
येथे नव्हता जादूटोणा नव्हते कांहीं गंडे दोरे
विश्वास ज्याचा प्रभूवर त्यांनाच मिळते सारे ।।३३।।
जीवनाचे असून चक्र त्यांच्या असतात मर्यादा
दिव्य शक्तीनें ओलांडतां चमत्कार भासतो सदा ।।३४।।
असेंच बघूनी चमत्कार विश्वास ठेवतो प्रभूवरी
श्रद्धा होण्या निर्माण चमत्कारच काम करी ।।३५।।
एकदा बसतां श्रद्धा प्रभूस समर्पण होई
प्रभूस पावन करितां चमत्कार विसरुनी जाई ।।३६।।
गजाननाच्या जीवनांतील बघू नका चमत्कार
श्रद्धा ठेवूनी त्यांचेवरी पावन करा ईश्वर ।।३७।।
आजही येता भक्तमंडळी दूर दूर गांवाहूनी
समाधान पावती सारे दर्शन त्यांचे घेवूनी ।।३८।।
पावन होई नवसाला हीच त्याची महती
आदर ठेवूनी भक्तजन प्रेमभावना अर्पण करती ।।३९।।
गुरु त्यांना समजोनी पूजा करा त्यांची
पारायण करा सतत गजाननाच्या पोथीची ।।४०।।
सतत करितां पारायण गजाननमय तुम्ही व्हाल
लय लागूनी ईश्वराची उद्धरुन तुम्ही जाल ।।४१।।
अवतार कार्य करुनी देहयात्रा संपविली
ईश्वर श्रद्धा मिळवून धार्मिक चेतना पेटविली ।।४२।।
संवाद करुनी विठ्ठलाशी समाधीची घेतली अनुमती
शेगांवी मुक्कामीं येवून सर्वासमोर समाधिस्त होती ।।४३।।
अठराशे बत्तिस शके भाद्रपद शुद्ध पंचमीला
समाधी घेऊनी गजाननांनी जीवन यात्रेस निरोप दिला ।।४४।।
भव्य असे मंदीर उभारले गेले शेगांवी
लाखो भक्त मंडळी त्यांचे दर्शन घेई ।।४५।।
डॉ. भगवान नागापूरकर
१८- २२०१८४
Copyright © 2025 | Marathisrushti