वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
त्वचेवरील पांढरे चट्टे अर्थात पांढरा कोड हा एक जनुकीय विकृतीतून होणार आजार असून, त्वचेचा रंग तयार करणाऱ्या पेशी नष्ट झाल्याने त्वचेवर पांढरे डाग उत्पन्न होतात. या आजारासंदर्भात असलेले भ्रम हे चुकीचे असून, योग्य उपचार केल्यास या आजारावर मात करता येऊ शकते.
रेल्वेशिवायचं जग ही कल्पनाही आज अशक्य वाटते; पण रेल्वे अस्तित्वात नसण्याचाही एक काळ होता. आश्चर्याची किंवा गमतीची गोष्ट म्हणजे, तो काळ `रेल्वेमुळे आपल्या सुरळीत, स्वास्थपूर्ण जगण्याचा घात होईल’ अशा भीतीदायक समजुतीचाही होता.
कार्तिक महिन्याच्या त्रिपुरारी पोर्णिमेला कनकेश्वराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे यात्रा भरते. आवास येथील नागेश्वराच्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी भरणारी यात्रा म्हणजे कनकेश्वराची यात्रा. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेतून विजय चिन्ह म्हणून ज्या पोर्तुगीज घंटा गावोगावी गेल्या, त्यातील एक घंटा या मंदिरात आली. प्रतिष्ठित अशा मारियांना डिमेलो या स्त्रीने इ.स. १६६६ मध्ये ही घंटा अर्पण केली, असा उल्लेख आहे. कनकेश्वर हे एक अतिप्राचीन स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे. कनकेश्वराचे दर्शन घेतल्याने त्रिभुवनांतील शिवलिंगाचे दर्शन केल्याचे श्रेय मिळते.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर ही तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक ऋषीमुनी व शिवभक्त येथे आराधना, साधना आणि तपश्चर्या करण्यासाठी वास्तव्य करीत असत. निसर्गाच्या सान्निध्यात परमेश्वराचे अस्तित्व असते. असे हे अलिबागच्या ईशान्येला असलेले कनकेश्वर अलिबागपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर आहे.
कनकेश्वर देवस्थान प्राचीन असून त्यास पौराणिक पार्श्वभूमी आहे. देवस्थान पर्वतावर ७५० पायऱ्या चढूनच दर्शनाला जावे लागते. या पायऱ्यांचे व पुष्करणीचे बांधकाम अलिबागच्या सरखेल राघोजी आंग्रेंचे दिवाण गोविंद रेवादास या दानशूर भाविकांनी १७६४ मध्ये स्वखर्चाने करवून घेतले. या सर्व पायऱ्यांमध्ये देवाची एक पायरी आहे. देवाने काम पाहावे, या त्यांच्या इच्छेनुसार देवाने काम पाहून येथे पावलाचा ठसा उमटवला अशी आख्यायिका आहे. या पर्वतावर अनेक देवतांची मंदिरे व धर्मशाळा आहेत. कनकेश्वर हे दर्यासारंग आंग्रे घराण्याचे कुलदैवत आहे. देवस्थानची पूजा - अर्चा व उत्सवाची व्यवस्था आंग्रे यांच्याकडून होत असे. मंदिराच्या सभोवतालचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील वनस्पतीचे उत्पन्न हे कनकेश्वर देवासाठी वापरले जात असे. सरकारी दप्तरी हा डोंगर देवाच्या नावे नोंदलेला आहे. राघोजी आंग्रेनी सवाई माधवराव पेशव्याकडून इ.स.१७७६ मध्ये पायथ्याशी असलेले सोगाव हे गाव सर्व हक्कांसह देवस्थानला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे जत्रा. ही कार्तिकातील त्रिपुरी पोर्णिमेला भरत असते. कार्तिक शु.१४ ला भरणाऱ्या श्री नागेश्वराच्या मोठ्या उत्सवाला जोडूनच हा उत्सव येतो. पूर्वी यात्रेच्या दिवशी आवास येथून गणपतीची, शिरवली येथून भैरवाची तर झिराड येथून देवीची पालखी येत असे. अलिकडे फक्त आवास येथीलच पालखी कनकेश्वरी येते. या देवस्थानची पूजाअर्चा, देखभाल करण्याचे काम झिराड येथील सालदार गुरव घराण्याकडे वंशपरंपरागत चालत आलेले आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कनकेश्वर स्थानाबद्दल दोन दंतकथा आहेत. या तपोभूमीवर कनकासूर नावाच्या राक्षसाने शिवदर्शनार्थ उग्र तपश्चर्या केल्यामुळे शंकराने प्रसन्न होऊन त्यास दोन वर दिले. त्यांनी मागितलेल्या वराप्रमाणे कनकासूर व शंकराचे युद्ध झाले. त्यातील त्या राक्षसाचे सामर्थ्य पाहून शंकराने पुन्हा प्रसन्न होऊन राक्षसाला उद्धार होईल असा दुसरा वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे कनकासूराने त्याचे व देवाचे दोघांचेही वास्तव्य या डोंगरावर कायमचे राहावे असा वर मागितला. त्यांच्या सिध्यर्थ शंकराने राक्षसाला पालथे झोपण्यास सांगून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्या यज्ञात कनकासूर भस्मात होऊन त्यास मुक्ती मिळाली. तेव्हापासून या स्थानाला कनकेश्वर हे नाव पडले. सर्व पृथ्वी जिंकून परशुरामाने ती ब्राम्हणाला दान दिली. हे दान घेतल्यावर ब्राम्हणाने परशुरामाला सांगितले की, दान दिलेल्या भूमीवर तुला राहता येणार नाही. तेंव्हा या भूमीचा तू त्याग कर. ब्राम्हणाचे हे वाक्य ऐकून परशुरामाने सह्याद्री पर्वतावर तप करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आकाशवाणी होऊन, तुझ्याजवळ असलेला परशु समुद्रात फेकून दे, तो समुद्रात जेथे पडेल तेथपर्यंत नवीन भूमी तयार होईल. या आकाशवाणीप्रमाणे परशुरामाने समुद्रात परशु फेकला. त्याप्रमाणे भूमी तयार झाली. असा हा कनकेश्वर परशुराम सृष्टीतला आहे. रेवसपासून कन्याकुमारीपर्यंत परशुरामाने प्रवास करुन अनेक ठिकाणी आश्रम स्थापन केले. त्रिपुरी पोर्णिमेला येथील दीपमाळेला दिवा लावून दीपोत्सव साजरा करण्यात येतो.
('महान्यूज'मधून साभार)

महाकवी महर्षी वाल्मिकी; ज्यांनी हिंदू संस्कृतीचा प्राण असलेल्या अजरामर रामायण या महाकाव्याची रचना केलेली आहे. त्यांच्या जन्माच्या तारखेची नोंद कुठेही आढळत नाही.प्राचीन भारतात त्रेता युगातील काळात त्यांचा जन्म व निर्वाण केव्हा झाला, या संबंधी निश्चित माहिती आढळत नाही.
पेनसिल्वेनीयातल्या पोकोनो पर्वतराजीतून जाणार्या, “माझ्या” यु.एस. रुट नंबर ६ वर, तीन वर्षे ये जा करता करता, नजरेस पडलेले निसर्गाचे ऋतुचक्र.
मार्चच्या अखेरी पासून ते एप्रिलच्या सुरुवाती पर्यंत वसंताची चाहूल लागायला लागते. साठलेले बर्फाचे ढीग वितळून पाण्याचे छोटे छोटे ओहोळ उतारावरून रस्त्याच्या कडेने वाहू लागलेले असतात. बर्फाने आच्छादलेली जमीन उघडी वागडी व्हायला लागलेली असते. सुकलेल्या पाचोळ्याचा तपकिरी रंग बर्फाच्या आवरणाखालून डोकं वर काढायला लागलेला असतो; पोपडे पडलेल्या भिंतीखालचा जुना रंग दिसावा तसा. जागोजागी वितळलेल्या बर्फाखाली, सुकलेल्या गवताचे पिवळे तुकडे इतस्तत: दिसत असतात. झाडांच्या फांद्या देखील अंगावरचं बर्फ झटकून पुन्हा तरतरीत होत असतात.
हळूहळू पिवळ्या गवतावर हिरव्या छटा चढायला लागतात. झाडांच्या बुंध्यांच्या पायथ्याशी, झुडपांच्या काटक्यांचे जंगल माजलेले असते. या उघड्या, बोडक्या, सुकलेल्या तपकिरी काटक्या, एकाएकी टोकाकडे हिरवट पिवळ्या व्हायला लागतात. काही ठिकाणी जुनाट काटक्यांच्या टोकाला नवीन पिवळ्या पोपटी नाजुक वेलांट्या उमलतात. हा पिवळा रंग अगदी डोळ्यात भरण्याएवढा गर्द असतो. आणि हे रंगायतन इतक्या अचानक होतं की काल परवापर्यंत रुक्ष, तपकिरी, वठल्यासारखी वाटणारी झुडपं, एकाएकी सजीव आणि तजेलदार दिसायला लागतात. अशातच एके दिवशी अचानक, पोपटी रंगाचे शिंतोडे पडल्यासारखी छोटी छोटी पाने अवतरतात.
झाडांच्या टोकांच्या बारीक फांद्या लाल गुलाबी कळ्यांनी (buds) मोहरून जातात. कळ्यांनी लगडलेल्या झाडांच्या दाट गर्दीमुळे, डोंगरांवर गुलाबी छटा दिसायला लागते. गुलाबी रंगाने रंगून गेलेल्या फांद्यांची टोकं आणि झाडांच्या पायतळींच्या झुडपांचा पोपटी रंग यामुळे झाडांनी गुलाबी फेटे आणि पोपटी मोजे असा मजेशीर पोशाख केल्यासारखं वाटायला लागतं. ‘वीपींग विलो’ च्या झाडाचे लोंबणारे झुपके पोपटी होतात. सर्व झाडांमधे या झाडावर वसंताचा स्पर्श प्रथम जाणवतो. वितळलेल्या बर्फामुळे बर्याच झाडांचे बुंधे आणि फांद्या, शेवाळाने माखून गेलेल्या असतात.
डोंगरकड्यांच्या दगडांच्या मधून आलेलं गवत देखील हिरवटसर व्हायला लागलेलं असतं. दगडांच्या पुढे आलेल्या टोकांखाली, जिथे थिजलेल्या बर्फाचे लोलक झाले होते, ते वितळून नुसताच पाण्याचा ओलावा राहिलेला असतो आणि त्यात शेवाळाची हिरवट झाक डोकवायला लागलेली असते.
हळू हळू रान रंगू लागतं. रुक्ष करड्या तपकिरी रंगाचा एकसुरीपणा जाऊन, हिरव्या, पोपटी रंगाच्या विविध छटा जागो जागी दिसू लागतात. झाडांच्या फांद्यांवर पिवळ्या गुलाबी रंगाची झाक गडद होऊन किरमिजी रंगाची होते. वर्षभर हिरवे रहाणारे सूचिपर्ण वृक्ष, आपले गडद हिरवे पिसारे फुलवून, नेहमीच्याच दिमाखात उभे असतात. त्यांच्या आगे मागे, नवीन पालवी फुटणारी पानगळीची झाडं, आपल्या नव्या नवलाईचं कौतुक अंगाखांद्यावर लेवून उभी असतात. झाडांच्या या सरमिसळीकडे पाहून, पिढीजात श्रीमंतांच्या वडिलोपार्जित वाड्यांच्या आसपास, नवीनच हातात पैसे खुळखुळू लागलेल्या चाकरमान्यांनी रंगीबेरंगी अपार्टमेंट कॉम्प्लेक्स उठवावेत तसं वाटतं. म्हातार्या आजी आजोबांचं सुनसान घर एकदम मुला नातवंडांनी भरून जावं, लेकी सुनांनी नव्या कोर्या साड्या नेसून लगबग करावी आणि नातवंडांनी घरभर गोंधळ घालावा तसे डोंगर गजबजून जातात.
एप्रिल मे मधे इथे भरपूर पाऊस पडतो. पण पाऊस आपल्या मान्सूनसारखा धुवाधार नाही. मधून मधून सरी तेवढ्या येऊन जातात. या सीझनमधे चेरी ब्लॉसम, क्रॅब अॅपल, मॅग्नोलिया, डॉगवूड वगैरे झाडांवर फुलांचा बहर येतो. या झाडांवर तोपर्यंत पानांचा मागमूस नसतो. नुसत्या फांद्या, काटक्या आणि फुलांची लयलूट ! पण हा बहर जेमतेम २-३ आठवडे टिकतो. हळू हळू फुलं सुकून पडायला लागतात आणि फुलांच्या भरगच्च संभारात जिथे जिथे मोकळी जागा होईल तिथे तिथे हिरवी पाने दिसायला लागतात. फुलांची आणि पानांची जणू रस्सीखेच सुरू असते. शेवटी हिरवाई वरचढ ठरू लागते. झाडाझुडपात दिमाखात डुलणारी फुले जमिनीवर लोळण घेऊ लागतात. पुढचे काही दिवस झाडांच्या पायतळी ह्या गळून पडलेल्या फुलांचे गालिचे पडून राहिलेले असतात. एकदा हे गालिचे वार्यावर उडून गेले किंवा पाचोळ्याचा भाग होऊन मातीत एकजीव होऊन गेले की सारे संपले. त्यानंतर पुढचे ५-६ महिने, नुसत्या हिरव्या पानांचा भार वागवत झाडं उभी रहातात. जणू एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमात, मोठ्या माणसांच्या आधी लहान पोराटोरांचे कार्यक्रम उरकून घेतले जावेत, तसे पानांचं साम्राज्य पसरायच्या आधी, फुलांची रंगी बेरंगी होळी उरकून घेतली जाते.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि सौदी अरब आणी रशियामधील सुरू असलेले कच्च्या तेलाचे ‘प्राईस वॉर’ याचा भारताला मोठा आर्थिक फायदा होणार आहे. कारण कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने देशातील तेल आयातीच्या खर्चात कपात होत आहे. देशातील तेल आयात खर्च २०२०-२१ मध्ये घटून ६४ अब्ज डॉलरवर येण्याचा अंदाज आहे. ही तुलना २०१८-१९ मध्ये ११२ अब्ज डॉलर तेल आयातीच्या खर्चाच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर असेल.
जेव्हा एखादी वस्तू आरशासमोर उभी केली जाते तेव्हा त्या वस्तूपासून निघणारे असंख्य किरण त्या आरशाच्या पृष्ठभागावर जाऊन पडतात. प्रत्येक किरण त्या पृष्ठभागाशी वेगवेगळा कोन करत असतो. त्यामुळं अर्थातच तिथून परावर्तित होणारे किरणही वेगवेगळ्या कोनातून परत फिरतात. अर्थात ते सर्वच किरण एका विशिष्ट नियमाच्या चौकटीतच आपली दिशा ठरवतात.
श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. पावसाने समुद्राला उधाण आलेले असते त्या प्रीत्यर्थ समुद्राला नारळ अर्पण करतात हा प्रमुख विधी आहे. या दिवशी नारळाचे पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य अर्पण करतात. या सणाचे महत्त्व विशेष करून समुद्रकाठच्या भागात जास्त आढळते. नारळी पौर्णिमेनंतर कोळी मंडळी समुद्रात मच्छीमारीस जातात. त्याप्रित्यर्थ समुद्राचे पूजन करतात.
-श्री करंदीकर गुरुजी
आपल्या समाजाच्या सर्वच थरात जात इतकी मुरली आहे, की बस्स.! कोणतीही व्यक्ती भेटली आणि तिने आपला परिचय दिला की आपल्या मनात नकळत तिच्याविषयी वेगवेगळी क्यॅल्क्युलेशन्स चालू होतात.
Copyright © 2025 | Marathisrushti