शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

अमरावती हे ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहराला तटबंदी आहे. आणि त्याला असलेले दरवाजे – अंबागेट , जवाहर गेट अशा नावाने प्रसिद्ध आहेत. याच जिल्ह्यातील मेळघाट परिसरात चिखलदरा व धारणी या तालुक्यांत आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यातील ८० टक्के लोकसंख्या कोरकू आदिवासींची आहे. तसेच या परिसरात कोलाम, बसोडे, गोंड, माडिया-गोंड, ढाणका यांसारख्या आदिवासी जमातींचेदेखील वास्तव्य आहे.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे प्रमुख पर्यटनस्थळ आहे. अमरावती शहरापासून ९० किमी अंतरावर हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३६हजार फूट उंचीवर सातपुड्याच्या कुशीत आहे. चिखलदर्‍याच्या परिसरात आठ प्रेक्षणीय स्थळे असून गाविलगडचा किल्ला , किचकदरा, आणि विराटराजाचा महाल इत्यादी मुख्य आकर्षणाची ठिकाणे आहेत. वैराट हे येथील सर्वात उंच ठिकाण आहे.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

मुंबई-भूसावळ-नागपूर-कोलकाता, मूर्तिजापूर-अचलपूर, खांडवा-अकोला-पूर्णा, व बडनेरा-अमरावती हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या लोहमार्गांमुळे अमरावती हे शहर मुंबई, जळगाव, नागपूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई या मोठ्या शहरांना जोडले गेले आहे.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

उत्तम प्रतीचा कापूस या जिल्ह्यात पिकत असल्यामुळे हातमाग, यंत्रमाग, सूत गिरण्या, जिनिंग आणि प्रेसिंग मिल हा व्यवसाय जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केला जातो. तसंच सतरंजी, घोंगड्या विणण्याचा व्यवसाय जिल्ह्यात चालतो.

शहरे आणि गावे

अमरावती जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

अमरावती या शब्दाचा अर्थ पुराणातील देव इंद्राची नगरी / राजधानी असा होतो. अमरावती जिल्ह्याच्या परिसराचा संबंध महाभारताशी जोडला असल्याचे संदर्भ पौराणिक कथा दंतकथांत आढळतात. भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ही कुंडिनपूरच्या राजाची कन्या असल्याचा उल्लेख पुराणात आढळतो.

शहरे आणि गावे

अकोला जिल्हा

Category:

 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ ह्या अकोल्यातील महत्त्वाच्या संस्था व त्याचबरोबर महाराष्ट्रातील पहिले कृषी-पर्यटन केंद्र हेही याच जिल्ह्यातलं.

शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

अकोला जिल्ह्याचा लौकिक वाढवणारे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठ असून, त्याची स्थापना १९६९ साली झाली.

शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणार्‍या संत गाडगेबाबांचा मूर्तिजापूर येथे आश्रम आहे.

शहरे आणि गावे

अकोला जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

ग्रामीण भागात अधिक लोकसंख्या असलेल्या या जिल्ह्यात साक्षरतेचे ८१.४१ टक्के असे प्रमाण आहे.