आज लोपले शब्द ओठचे, भावनाच्या आकाशीं
प्रखर बनतां त्याच भावना, विचार जाती तळाशीं....१,
भावनेला व्यक्त करण्या, सांगड लागे शब्दांची
थोटके पडती शब्द सूर ते, गर्दी होता विचारांची...२,
भावनांचे झरे फुटूनी, विचार जलाशय झाले
विचारांचे बनूनी धबधबे, वाहू मग लागले.....३,
आकार देती शब्द भाषा, बांध घालूनी विचाराला
निश्चीत होतो वेग नी मार्ग, आकार देता भावनेला....४,
भाषेमधली शक्ती जावूनी, मूक बनविले तिने
उंचबळणाऱ्या विचार भावना, टिपल्या मात्र चेहऱ्याने....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
उगवलेला दिवस
सावलीसह सरकतो
जगंलात गेली गुरढोर
रस्ता घराचा धुंडतो
ओढ लागुन पिल्याची
चिमणी ही परतते
काटा रूतयो पायी तरी
अलगद असा काढते
गाय हंबरते मनात
दुधाचा ओवा पान्हावते
थांब रे बाला थोडं
लवकरच मी पोहोचते
पावले झपाझप पडती
घराच्या लागल्या ओढीन
दिस गेला दुराव्याचा
हाक दिली लेकरानं
-- शरद शहारे
कळ्या नाजुकशा,
फुलल्या तुझ्यासाठी,--!!!
गगनी चांदण्या,
आल्या तुझ्यासाठी,--!!!
घमघमणाऱ्या केवड्या,
सुगंध तुझ्यासाठी,--!!!
आरक्त प्राजक्ता,
पखरले तुझ्यासाठी,--!!!
दिमाखदार चाफ्या,
लुटले तुझ्यासाठी,--!!!
मदमस्त मोगऱ्या,
खुडले तुझ्यासाठी,--!!!
बकुळां,अर्धमिटल्या,
वेचले तुझ्यासाठी,--!!!
सायलीच्या सुगंधा,
मोहित तुझ्यासाठी,--!!!
अबोलीच्या वेण्या,
माळल्या तुझ्यासाठी,--!!!
मंद- मंद रातराण्या,
उमलल्या तुझ्यासाठी,--!!!
यामिनीला ढळत्या,
मातले तुझ्यासाठी,--!!!
आलिंगनात तुझ्या,
सहज विरघळण्यासाठी,--!!!
© हिमगौरी कर्वे
गोव्याच्या मंगेशीच्या देवळात १९६६ साली अवघ्या सहा वर्षांच्या ज्ञानेश पेंढारकरच्या हस्ते 'जय जय गौरीशंकर' या नाटकाचा मुहूर्त पार पडला आणि तिथून या नाटकाच्या प्रवासाला सुरुवात झाली. पं. राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार,, जयश्री शेजवाडकर यांसह आणखी तीन कलाकारांसोबत विद्याधर गोखले लिखित या नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली. नाटकाचे दिग्दर्शक होते नटवर्य मामा पेंडसे तर संगीत दिग्दर्शन होते ख्यातनाम संगीतकार वसंत देसाई यांचे.
तीन महिने तालीम केल्यानंतर १४ ऑगस्ट १९६६ रोजी 'जय जय गौरीशंकर' चा शुभारंभाचा प्रयोग भालचंद्र पेंढारकरांच्या 'ललितकलादर्श' या संस्थेतर्फे बिर्ला मातोश्री सभागृहात रसिकांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडला. दोन दिवसांत पाच हाउसफुल्ल प्रयोग करणाऱ्या या नाटकाची कीर्ती वाऱ्यासारखी पसरत गेली आणि अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले. ललितकलादर्श यांच्या संस्थेने या नाटकाचे २२५० प्रयोग केले, हाही संगीत रंगभूमीवरचा विक्रमच आहे. भालचंद्र पेंढारकर आणि पं. राम मराठे या दोन्ही दिग्गज कलावंतांच्या गायन-अभिनयाने आणि वसंत देसाईंच्या संगीताने हे नाटक गाजत राहिले. प्रस्तुत नाटक मुख्यत: शिवलीलामृतांतील १४व्या अध्यायातील शंकर-शबरी कथेवर आधारलेले असून, त्याला स्कंदपुराणांतर्गत सह्याद्रि-खंडातील 'मांगरीश महात्म्या'तील कथाभागाची जोड दिली आहे.
'सप्तसूर झंकारत बोले गिरिजेची वीणा' या दोन विभिन्न तालांमध्ये बांधलेल्या नांदीने नाटकाची सुरुवात होते. पुढे चटपटीत संवाद, राजकीय उपहास यांमुळे नाटक अधिक रंगतदार होत जाते. 'नारायणा रमा रमणा', 'प्रियकरा नसे हा छंद बरा' निराकार ओंकार, शिवशक्तीचा अटीतटीचा, सावज माझं गवसलं, भरे मनात सुंदरा, कशी नाचे छमाछम, रमारमण श्रीरंग यांसारखी एकूण सरस अशी चौदा गाणी या नाटकात असून, पार्श्वसंगीतासाठी १६ विविध ताल वाद्यांचा वापर करण्यात आला होता. ह्या नाटकाचे अप्रतिम नेपथ्य पु श्री काळे (कथा लेखक व पु काळे ह्याचे पिताश्री ) ह्यांनी केले होते व कैलासाचा रम्य देखावा गोमांतवनांतील निसर्ग त्यांनी सुंदर उभा केला होता.
या संगीत नृत्यमय खेळकर नाटकातील कलावंत होते. पं राम मराठे, प्रसाद सावकार, सुकुमार, आ. दे. पाटील, लीलावती, जयश्री आणि निर्माते भालचंद्र पेंढारकर ही सप्त सूर कलाकार मंडळी ह्यात होती.
लेखक / गीत-रचना: विद्याधर गोखले.
नाट्य दिग्दर्शन नटवर्य मामा पेंडसे
संगीत दिग्दर्शन: वसंत देसाई.
नेपथ्य: पु श्री काळे
रंगभूषा: शांताराम विचारे
साथसंगत
ऑर्गन, गोविंदराव पटवर्धन / विश्वनाथ कान्हेरे, तबला दामूअण्णा पार्सेकर/ भोजराज साळवी
व्हायोलिन: मधुकर बर्वे
त्यानंतर काही प्रयोग विश्वनाथ बागुल, माया जाधव, प्रकाश घाग्रेकर, चंदू डेगवेकर, शहाजी काळे, शिवानंद पाटील आदींनी देखील केले.
आता हे नाटक 'आर्यादुर्गा क्रिएशन्स' या संस्थेतर्फे केले जाते.
९० प्रयोग होऊन शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या ह्या नवीन टीमचे निर्मिती सुप्रसिद्ध नाट्यकर्मी सुनील जोशींनी केली असून दिग्दर्शन ही त्यांनीच केले आहे.
संगीत मार्गदर्शक मुकुंद मराठे आणि विलास हर्षे हे आहेत.
आनंदाची बाब म्हणजे ह्या पुनरुज्जीवित नाट्यकृतीला नाट्याचार्य काकासाहेब खाडिलकर आणि देवल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मूळ प्रयोगात शंकराची भूमिका साकारणाऱ्या पं. राम मराठे यांचे सुपुत्र श्री.मुकुंद मराठे त्याच तडफदार गायकीने आणि समर्थ सकस अभिनयाने पुनरुज्जीवित नाटकात शंकराचीच भूमिका साकारत आहेत, पार्वतीची भूमिका पूनम पंडित / गायत्री दीक्षित तर भालचंद्र पेंढारकर यांनी अजरामर केलेली नारदाची भूमिका आता डोंबिवलीचे नाट्यकर्मी गायक नट सुनील दातार अत्यंत सार्थपणे खुसखुशीत सादर करत आहेत. त्यांच्यासोबत सुनील जोशी प्राजक्ता मराठे, अनुराग गर्गे संदीप राऊत हे सहकलाकार विविध भूमिकांत आहेत....
नेपथ्य प्रकाश सुधीर ठाकूर श्याम चव्हाण ह्यांचे आहे. आजही ह्या संगीत नाटकाला रसिकांची अमाप मागणी आहे. विशेष करून मुंबई पुणे कोंकण गोवा तसेच झाडीपट्टी मध्ये हे नाटक खूप लोकप्रिय आहे
संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=ICBN1XJNUCg
https://www.youtube.com/watch?v=6XH7fi-mEXI
https://www.youtube.com/watch?v=m27iFmDiBWM
मनाचिया, शांत डोही
पर्जन्यबिंदू, भावनांचे...
स्वाती, नक्षत्रांत पड़ता
मोती होती शब्दफुलांचे...
गीतात मधुर प्रीतचांदणे
निष्पाप स्पर्श भावनांचे...
हितगुज अव्यक्त अबोल
सहजी उमलते अंतरीचे...
शब्दात गंधाळ भावनांचा
जीवनी श्वास सारे सुखाचे...
सभोवार तृप्तीचे कारंजे
दृष्टांत, विवेकी चिंतनाचे...
मनाचियाच, शांत डोही
परिस्पर्ष सारेच धन्यतेचे...
–वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. २१९
२९/८/२०२२
वाट कुणाची बघतो आम्हीं, ठावूक असते ते सर्वांना
मृत्यू हा तर अटळ असूनी, केव्हांही येई अवचित क्षणा....१,
आगमनाचा काळ तयाचा, कल्पनेनें ठरविला जातो
अचूक जरी ते शक्य नसले, विचार त्यावरी करिता येतो...२,
जीवन म्हणती त्या काळाला, जगणे आले मृत्यू येई तो
जगण्यापुढे पर्याय नसतां, सुसह्य करण्या प्रयत्न होतो...३,
तन मनाला सुख देवूनी, जीवन काल वाढविती कांहीं
सद्उपयोग तो केला जावा, हीच इच्छा सदैव राही...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
काही गोष्टी कधी
लक्षात येत नाहीत..
तिला काय हवे ते
ती कधी सांगत नाही..
फक्त सूचना देते...
आणि आपण मात्र
वेध घेत असतो
भोळसटपणे....
प्रेमात हे असेच असते
पटकन ओळखता आले पाहिजे
प्रेमाला खरे तर शब्दांचा भार
सोसवत नाही त्याला त्याची
सवय नसतेआणि जिथे सवय
असते तेथे प्रेम नसते
असतो
तो फक्त
व्यवहार....
दोन देहाचा
दोन भोगांचा...
-- सतीश चाफेकर.
धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी,
तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी...१,
बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे
यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे...२,
नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने
सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे...३,
जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी
पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी...४,
प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची
आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची....५,
मृत्यूच्या दाढे मधूनी, एक सुटून जातां
मृत्यूपाश टाकी दुजासाठी, स्व जगण्या करिता....६,
जगण्यासाठी मृत्यू आणि मृत्यूमुळेच जगणे
निसर्गाचे चाले अविरत हेच खेळणे....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
https://youtu.be/UpXfirUuSHE
मित्रांनो, "तुला पाहताना " ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.
मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका.
"माझी डायरी " या आपल्या youtube चॅनलला अवश्य Subscribe करा.
"माझी डायरी" आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti