(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • प्राणवायू – शिवशक्ती

    सारेच आहे प्रभूमय,
    अणूपासून ब्रह्मांड होय...१,

    ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा,
    आकाश भाग हा ब्रह्मांडाचा....२,

    सर्वत्र व्यापले आकाश,
    न जाणती त्याचे पाश, ....३,

    वायूचा होवून संचार,
    जीव जंतू जगविणार....४

    वायू असे शक्तीचे रूप,
    पेटवी तो प्राणदिप....५,

    प्राण आपल्या अंतरी,
    तोच असे रूप ईश्वरी....६

    जसे शिव आणि शक्ती,
    तसे प्राण व वायू असती...७,

    बाहेरची वायू शक्ती,
    अंतरिच्या प्राणास भेटती....८,

    जाता दोन्ही एक होवूनी,
    चेतना मिळते जीवनी...९

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कवितेचे मूल्यमापन

    काव्य रचनेचा छंद लागूनी, कविता करू लागलो
    भाव तरंगाना आकार देवूनी, शब्दांत गुंफू लागलो....१,

    एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो
    वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो...२,

    अचानकपणे खंत वाटूनी, निराश मी झालो
    निरर्थक तो वेळ दवडिला, हेच मनी समजलो....३,

    बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल
    वेडेपणा वा शहाणपणा, काळ हाच ठरवील...४,

    करूनी घेतले तुज कडूनी, कोणत्या तरी शक्तीने
    कर्तेपणाचा भाव तुझ्यातील, सोडून दे तू मनाने....५,

    असेल हे जर कृत्य त्याचे, काळजी त्याला यशाची
    सैनिक तू लढत रहावे, आशा सोडून जिंकण्याची....६

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • खरे श्रेष्ठत्व

    कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला । मानव हा आत्मस्तुती करतो ।।

    कुणा न येती भाषा बोली । हीच गोम हा जाणून घेतो ।।

    निसर्गाने उधळण केली । अनेक गुणांची ।।

    मानवाच्या हाती लागली । 'कला' कल्पकतेची ।।

    विचारांच्या झेपामधूनी । आकाश पातळ गाठले ।।

    प्रगतीच्या ह्या छलांगानी । श्रेष्ठत्व ठरवियले ।।

    दुर्बल केले इतर प्राणी । आणि त्यांच्या कलेला ।।

    विचारांना प्राधान्य देऊनी । ज्ञानी तो समजला ।।

    मानवा लाभले विचार कल्पना । त्यातून आले शब्द भांडार ।।

    स्वतःला श्रेष्ठ समजत । गाजू लागला अधिकार ।।

    आधार न घेता शस्त्र अस्त्राचा । सिंह बनला जंगल राजा ।।

    युक्ति चपलाई आणि विश्वास । हीच त्याची लक्षणे समजा ।।

    घारीच्या द्दष्टीतील तिक्ष्णता । आणि सर्पचपळता ना अंगी आली ।।

    कोळी विनतो कलात्मक जाळे । श्वान शोधी श्वसानी जे हरवले ।।

    नृत्य बघा तुम्ही मोराचे । आणि आवाज ऐका कोकीळेचे ।।

    उलट्या सुलट्या मर्कट लीला । करमणूकीत परि मानव हरला ।।

    आकाशातील भरारी पक्षांची । जात इंद्रधनुष्याखाली जेव्हां ।।

    दुर्बलतेची जाणीव देतो । मानवाला निसर्ग तेंव्हां ।।

    सर्व कला विखुरल्या गेल्या । प्राणी जगतामाजी ।।

    हास्तगत त्या केल्या त्यांनी । हीच मानवी नाराजी ।।

    जर कंठ फुटला, वाणी मिळाली । जिव्हां चलली प्राणी जगती ।।

    मानव होईल निर्वासित । आणि पळून जाईल मंगळावरती ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९०४०७९८५०

  • अवमूल्यन

    उत्साहाने करित होता, सारे कांहीं इतरांसाठी

    क्षीण होवूनी जाता शरीर, आधार तयाला झाली काठी...१,

    धनाचा तो प्रवाह वाहतां, गंगाजळीचे पाणी पाजले

    दुजाकरिता त्याग करूनी, समाधानी ते इतरा केले....२,

    धन संपत्तीचे झरे आटतां, प्रेमळपणाचे शब्द राहीले

    कालक्रमणाच्या ओघामधल्या, दुर्बलतेस कुणी न जाणले...३,

    अपेक्षा ती सदैव असते, मिळत रहावा सहयोग

    अवमूल्यन ते केले जाते, दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • मायेचा स्पर्श

    दिवाळीच्या सुंदर दिव्यांवर
    अती उत्साहाने फूंकर घातली
    ...
    आणि फटाक्यांची माळ
    माझ्या हातातच फूटली

    जखम पाहुन सारी हळहळली
    वेदना मला ती असह्य झाली
    छोटी अनु जरी घाबरली
    धीर दिला मला,नाही ती रडली

    अगदी शांतपणे येऊन
    माझ्या उशाशी ती बसली
    मांडीवर डोकं घेऊन

    मायेने हात फिरवु लागली

    मी बळेबळे हसलो
    पण ती नाही फसली
    माझी वेदना तिच्या डोळ्यात
    स्पष्ट मला दिसली

    पप्पा, उगी उगी म्हणत
    मला थोपटू लागली
    संयमाने आसवांना
    पापण्यात दडवू लागली

    कोवळ्या त्या स्पर्शाने
    मनाला शांती मिळाली
    तळमळनाऱ्या वेदनेलाही
    हळूहळू झोप लागली

    शमलेली माझी वेदना
    माझ्या चेहऱ्यावरुन तिला कळली
    बघून माझ्याकडे
    अगदी गोड होती हसली

    सारे म्हणु लागले,
    कशी हिला ऐवढी समज आली ?
    तेंव्हा पहिल्यांदा वाटलं
    छोटी अनु मनानं खूप मोठी झाली.

    - डॉ.सुभाष कटकदौंड

  • नातं

    नातं जिवा-भावाचं
    सढळ.....अढळ !

    नातं प्रिती-प्रेमाचं
    रसाळ .....मधाळ !

    नातं राग-लोभाचं
    खट्याळ.....स्नेहाळ !

    नातं दुःख - हर्षाचं
    उदास .....उधाण !

    नातं विरहात
    एकटे व्याकुळ !

    नातं मनांत
    सूर गात्रात !

    नात्याची गुंफण
    रेशमी....रेशमी !

    बंध रेशमाचे
    अखंड....अतूट !

    कस नात्याचा
    झळाळे सुवर्ण !

    पाईक नात्याचा
    पवित्र ....पावन !

    बाज नात्याचा
    मस्त उनाड !

    साज नात्याचा
    प्रेम ....आदर !!

    © अरविंद टोळ्ये
    ९८२२०४७०८०
    आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
    आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.

  • निसर्गाचे चक्र

    सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे
    उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे ।।धृ।।

    एक एक पाकळी
    लहानशी कळी
    जाई उमलून
    फूल त्याचे बनून
    सुगंधी टपोरे फूल
    कांही वेळ राहील
    कोमेजून जाई
    देऊनी रुप बीजाचे
    परत अंकूरण होई
    दुजा एका झाडाचे ।।१।।
    सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे

    एक एक पाऊल
    टाकते मुल
    वाढते हसून
    बनते यौवन
    एटदार तो दहधारी
    कांही काळाची उभारी
    देह होई विलीन
    पेटवूनी दिवे वंशाचे
    होई अवतरण
    नव्या एका मानवाचे ।।२।।
    सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • ध्यास पाऊलांना

    चिरंजीवी स्मरण तुझे

  • स्वप्न अन् सत्य

    कल्पनेच्या इमल्याहूनी खररीखूरी झोपडी बरी

    स्वप्नातल्या पर्‍यापेक्षा लग्नाची बायको खरी !!

  • विठ्ठल विठ्ठल

    अवघ्या जगाचा संसार पेलून,
    विटेवरी उभा तू कमरेवर हात ठेवून,
    समाधान दिसे डोळ्यात,
    दिसे स्मित हास्य तूझ्या ओठी,
    काळा सावळा विठू तू माझा,
    कीर्ती अथांग तुझी मोठी….

    – श्वेता संकपाळ.