(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • विरहार्त रात्र ही

    विरहार्त रात्र ही,चांदणी नभी चमचमते,
    भासे तीही एकटी,
    चमकण्यात कमी जाणवते,--!!!

    चेहरा तिचा उतरुनी,
    निस्तेज ती दिसते,
    का बुडाली कुणाच्या विरही,
    कोडे मजला वाटते,--!!!

    असंख्य तारे तारकापुंजी, अवकाश चांदण्यांनी भरलेले,
    चंद्र दिसे ना कुठे जवळी,
    रजत किरणांचे लेऊन शेले,--!!!

    समूहातून दूरच उभी,
    अंतरी कोलाहल उठलेले,
    लांबूनही ती दिसते "दुःखी*,
    पाणी डोळां साठलेले,--!!!

    वाट बघे सुधाकरांची,
    जीव पहा कसा लावते,
    तळमळत आत आत सारखी, सख्याची कल्पना करते,--!!!

    मिलन दूर,- दर्शन नाही, अधिकाधिक उदास वाटते,
    वाट पाहत साजणाची, चमचमण्याचा देखावा करते,--!!

    गायब माझा राजा कुठे,
    विचार करते अंतर्यामी ,
    स्थानाहून ना ढळणे,
    धोरण तिचे मनोमनी,--!!!

    इथे धरणीवरती मी,
    राजसा, तुझी वाट पाहते,
    कढ पचवत विरहाचे, जिवाशिवांचीच ओढ लावते,--!!

    © हिमगौरी कर्वे

  • दिवाळीच्या फराळाचे राशीवार खाद्यभविष्य

    दिवाळीच्या पदार्थात आधी गोडात हात जाणारे साधारण तुल ,धनु राशीचे .

    चकलीवाले मेष,वृश्चिक,सिंह

    आधी चहाचा घोट घेणारे कर्क राशीचे

    वृषभ प्रत्येकाची थोडी थोडी चव घेतील

    मिथुन वाले चिवड्यातील काजू ,शेंगदाणे हळूच फस्त करतील .

    कन्यावाले आधी थोडा क्यालरीचा विचार करतील .

    मकरवाले चिवडा घेतील पण नेमका पहिलाच दाणा यांना कुजका मिळतो !

    कुंभवाले लाडू हवा असताना अनवधानाने कडबोळ चावायला सुरवात करतील .

    मीनवाले कायम गोंधळात, यांचा नक्की काय घ्यायचं हे ठरेपर्यंत मेषेच्या चार चकल्या फस्त झालेल्या असतात !

  • नाभिकेंद्रांत आत्मा

    आत्मा कोठे असतो, नाभी केंद्रात शोधाल का ?

    तो तर दिसत नसे, मग त्यास जाणाल का ?....१,

    सर्व इंद्रिये वापरली, परि न झाला बोध,

    कोठे लपला आहे, न लागे कुणा शोध....२,

    विचार आणि भावना, संबंध त्याचा ज्ञानाशी

    मेंदूत आहे इंद्रिय, संपर्क त्यांचा सर्वांशी....३,

    मेंदूवरी ताबा असे, नाभीतील मध्य बिंदूचा

    समजून घ्या सारे, तेथेच आत्मा देहाचा...४,

    मातेचे अपूर्व देण, बाळाच्या नाभीत जमते,

    आत्मा हेच ते रूप, जीवन कार्य चालवितो.....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • आठवण सेवाधन रसेलची

    कधी न पाहीले आजपावतो
    तरीही येई आठवण कैसी
    सभोवतालच्या खाणाखुणा
    चित्रीत करीती त्यासी

    जेंव्हा बघतो कलाकृती ही
    नाविण्याने बहरली
    दुर द्दष्टी मज त्यांत दिसे
    कल्पकतेने भरलेली

    दुःख दुजांचे शितल करणे
    मानवतेच्या जीवनधीरा
    व्यसनमुक्तीच्या अनुशंगाने
    रसेल दाखवी मार्ग खरा.

    (रसेल- सेवाधन व्यसनमुक्ती केंद्राचा संस्थापक)

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail – bknagapurkar@gmail.com

  • एखाद्या मध्यरात्रीपासून….

    एखाद्या मध्यरात्रीपासून रदद् व्हावी बेईमानी वागण्यातली
    आणि चलनात यावी सच्चाई...

    एखाद्या मध्यरात्रीपासून बंद व्हावा अविश्वास मनामनातला
    आणि नवीन ताजातावाना विश्वास भरावा ह्र्दयात...

    एखाद्या मध्यरात्रीपासून रद्दबातल व्हावा स्वार्थीपना संकुचित मनातला
    आणि मनात उठावेत तरंग निःस्वार्थ भावनेचे....

    एखाद्या मध्यरात्रीपासून संपून जावा द्वेष घाणेरडा
    आणि हृदय ओथंबून वहावे निर्मळ प्रेमाने...

    एखाद्या मध्यरात्रीपासून वाईट भावना ठराव्यात अवैध
    आणि सद्भावना रुजावी प्रत्येक मनामनात...

    एखाद्या मध्यरात्रीपासून बेकायदेशिर व्हावी धोखेबाजी
    आणि आपलेपणा अंकुरावा माणसाच्या अंत:करणात...

    एखाद्या मध्यरात्रीपासून नष्ट व्हाव्यात सर्व चिंता
    आणि ऊगवावी एक सकाळ सकारात्मक विचारांची...

    एखाद्या मध्यरात्रीपासून माणूस बनावा
    अगदीच माणसासारखा...

    जुन्या वाटा बदलायला त्याने घ्यावा काही दिवसांचा वेळ अधिकृतपणे
    पण त्याने बदलावी आपली नियत एखाद्या मध्यरात्रीपासून ....

    आणि एकदा त्याच्या नियतीने वाटा बदलल्या की मग
    पुन्हा पुन्हा नाही पडणार गरज नोटा बदलण्याची...

    हे मात्र घडावेच अगदी एखाद्या मध्यरात्रीपासून....

    Forwarded Post

  • पूर्णेच्या परिसरांत !

    जेंव्हा ठरले गावी जाणे,हूर हूर होती मनी
    बराच काळ गेला होता,आयुष्यातील निघुनी

    काय तेथे असेल आता,सारे गेले बदलूनी
    काळाच्या प्रवाहामध्ये,राहिलं कसे टिकूनी

    चकित झालो बघुनी,सारे जेथल्या तेथे
    उणीवता न जाणली,क्षणभर देखील मानते

    बालपणातील सवंगडी,जमली अवती भवती
    गतकाळातील आनंदी क्षण,पुनरपि उजळती

    आंबे चिंचा पाडीत होतो,झाडावरती चढुनी
    आज मिळाला तोच आनंद,झाडा खालती बसूनी

    मळ्यामधली मजा लुटली,नाचूनी गाऊनी
    विहिरीमधल्या पाण्यात,मनसोक्त ते डुबूनी

    ऐकल्या होत्या कथा परींच्या,तन्मयतेने बसूनी
    आज सांगे त्याच कथा मी,काका मुलांचे बनुनी

    वाडा सांगे इतिहास सारा,पूर्वज जगले कसे
    भव्य खिंडारी उमटले होते,कर्तृत्वाचे ठसे

    बापू, आबा, मामा, काका,मामी वाहिनी जमती
    कमी न पडली तसूभरही,प्रेमामधली नाती

    मीही बदललो, गांवहीं बदलले,काळाच्या ओघांत
    आनंद मात्र तो तसाच होता पूर्णेच्या परिसरांत

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • तुझ्याशिवाय

    तुझ्याशिवाय,

    दिन भासे राती सारखा,
    रात्र उजाडता भकास पसरे,
    दिन उन्हासारखा,--!!!

    तुझ्याशिवाय,

    पावसाळा अगदी कोरडा,
    वर्षाव संजीवनाचा भले,
    होत राही सारखा,--!!!

    तुझ्याशिवाय,

    हेमंत ऋतू येता,
    उदासपण भरलेले,
    जीवन अव्याहत चालता,--!!!

    तुझ्याशिवाय,

    आगमन होते शिशिराचे,
    मन पालवी गारठून जाते,
    दूर -- दूर तू राहता, -!!!

    तुझ्याशिवाय,

    ग्रीष्म ही भासे रुक्ष पहा,
    अधिक अधिक करत राहे,
    काहिली जिवाची माझ्या,--!!!

    तुझ्याशिवाय,

    ऋतू सगळे निष्काम बनतां,
    आससून मी वाट पाहते,
    माझ्यात मीच नसतां,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • नाते

    तुझे नी माझे कसले नाते
    अजून मला ते कळले नाही
    एकदा तरी तुज पाहिल्यावीना
    मजला काही करमत नाही ।
    ऊजाडताच दिवस नवीन
    रोज नव्याने तुला पाहतो
    रम्य त्या गत आठवणीने
    का पुन्हा रोमांचित होतो ।
    आता तरी तू सांग मजला
    काय आहे आपुले नाते
    का आजही तव आठवणीने
    मन माझे ग मोहीत होते ।

    सुरेश काळे
    मो. 9860307752
    सातारा.
    दि. ३ आक्टोंबर २०१८

  • आत्मा-ईश्वर – आई

    आत्मा-ईश्वर, या शब्दांचा, अर्थ होई आई |
    त्या मायेचा, थांग न लागे, इतुकी गहराई ||१||

    आईवाचुनी, नसे वेगळा, जगात परमेश्वर |
    स्वर्ग आणि सूर्य-चंद्रही, त्यापुढती नश्वर ||२||

    सोशी वेदना, झेली यातना, नसे तया गणती |
    स्वतः जळुनी, प्रकाशणारी, ऐसी ती पणती ||३||

    चिमणचोचिने भरवी बाळा, राही स्वतः उपाशी |
    होईल याची, तुलना कैसी, सांगा बरे कुणाशी? ||४||

    लिंबलोण ती, नित्य उतारी, निजबाळावरूनी |
    कळी काळाला, यम् राजाला, लावी ती परतुनी ||५||

    काळीज कातरणारा ऐसा, कारुण्याचा स्वर |
    स्वरातुनी या, जणु हाकारी, आई रुपात ईश्वर ||६||

    कमलकरांचा, करुनी पाळणा, जोजवी लडीवाळा |
    तिला भासते, बाळ तिचा जणु, पंढरीचाच नीळा ||७||

    उत्सव कां तो, एक दिनाचा, करे साजरा कुणी ?|
    क्षण क्षण सारे, जरी वेचले, तरिही शक्ति उणी ||८ ||

    जीवन अवघे जरी अर्पिले, आईच्या चरणाशी |
    तरिहि पुर्तता, कधी न होई, ऐश्या आशिषराशी ||९ ||

    © कवी : उपेंद्र चिंचोरे
    ८ मे २०१६
    कविता-गझल

  • शिखरावरी बांधली मंदिरे

    विचारांच्या उठती लहरी,

    वलये त्यांची होत असती ।

    सुविचारांची वलये सारी,

    नभाकडे जात दिसती ।।

    पवित्र निर्मळ विचारांच्या,

    तरल अशा लहरी असती ।

    अशुद्ध साऱ्या विचारांची,

    जड लहरी तळात राहती ।।

    फार पूरातन काळी देखील,

    उकल दिसते या गोष्टीची ।

    पवित्रतेच्या सर्व स्थळांनी,

    शोधली जागा शिखरावरची ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com