कधी क्वचित मी खचून जाता
उंच भरारी घेते मी
टपकलेच जर अवचित अश्रू
नकळत त्यांना पुसते मी
थोपटते मी माझे मजला
गोंजारते मलाच मी
ऊर्मी माझ्या अंतरातल्या
नजाकतीने जपते मी
दुखता खुपता होता अगतिक
दु:ख झुगारुन देते मी
नव्या दमाने श्वास घेउनी
पुढे पुढे हो जाते मी
मीच असते तेव्हा माझी
भक्ति मी शक्तिही मी
माझ्या साठी माझी प्रेरणा
केवळ मी केवळ मी
किती गोड आणि किती गूढ भाषा
जशी चांदण्यांची नभीं राऊळे
किती खोल अशी किती भूल पाडी
तुझी शब्दगंधा, तिचे सोहळे
असे काव्य जेथे व्यथा भरजरी
किती दुःख आणि किती वेदना
असा रौद्र शृंगार हा भावनांचा
जिथे नांदते ही जुनी वंचना
तुझी सांज प्यारी तुझ्या चंद्रखुणा
तुझ्या काव्यभाषेत डोकावती
अक्षरांतूनी अर्थ जिथे वाहतो
तिथे भव्य दिव्य तुझी निर्मिती
अशी वाहणारी असंख्य काव्ये
जिथे अर्थ येतो अक्षरांपुढे
तुझी वाट शोधून मी घालतो
पाऊलखुणांना तुझ्या साकडे
© योगेश उगले
आता सारेच नावापुरते
आस्था आपुलकी नाही
हास्य केवळ तोंड देखले
मनस्वी खरा आनंद नाही
" या, या, कसे आहात ?
बरेच दिवसात गाठ नाही
सारे काही ठीक आहे नां ?
शब्दात या कुठे प्रेम नाही
सारेच आता भावशून्य
ओढ अंतरी उरली नाही
भावनांचीच पायमल्ली
नाती तशी उरली नाही
दिवस येतो आणि जातो
आपले कुणी वाटत नाही
ऋतुऋतुही सारे बदलले
चैतन्य कुठेच उरले नाही
स्वार्थापोटी नित्य धावणे
याविण जीवन उरले नाही
श्वासात केवळ उद्विग्नता
हे शल्य मनीचे संपत नाही
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र.२९९
२०/११/२०२२
शौर्य,ध्येर्य ,कर्तव्यनिष्ठा
हीच प्रभू श्री रामांची ओळख
कौशल्यापुत्र प्रभू श्री राम
दशरथ नंदन प्रभू श्री राम
सत्य,धर्म, सद्गुणांचे प्रतीक
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम
भगवान विष्णूचा सातवा अवतार
सद्गुण,करुणेचे प्रतीक प्रभू श्री राम
कौशल्यापोटी जन्म घेतला
अयोध्यापती श्री राम जन्मला
चैत्र मासातील शुक्ल पक्षाला
प्रभू श्री रामाचा जन्म जाहला
त्रेता युगात धर्म स्थापनेला
पृथ्वीवर प्रभू राम अवतरला
प्रभू श्री रामाचा जन्म सोहळा
रामनवमी म्हणून साजरा झाला .
लेखक - उमेश महादेव तोडकर
श्रीकृष्णाचे जीवन बनली एक गाथा,
यशस्वी होई तुमचे जीवन चिंतन त्याचे करिता ।।१।।
तल्लीनतेच्या गुणामध्यें लपला आहे ईश्वर,
तल्लीनतेचा आनंद लुटा शिकवी तुम्हा मुरलीधर ।।२।।
बालपणीच्या खेळामध्ये जमविले सारे सवंगडी,
एकाग्रतेने खेळवूनी आनंद पदरीं पाडी ।।३।।
मुरलीचा तो नाद मधूर मन गेले हरपूनी,
डोलूं लागले सारे भवतीं मग्न झाल्या गौळणी ।।४।।
टिपऱ्या घेवूनी नाच नाचला गोपी साऱ्या जमवूनी,
लय लागूनी जातां सारी संसार गेली विसरूनी ।।५।।
राधा तर वेडी झाली तुझ्यावरील प्रेमानें,
लुटून जावे प्रेमामध्यें शिकविले श्रीकृष्णानें ।।६।।
गीतेचे तर ज्ञान आगळे उकलेले जीवन कोडे,
आत्मज्ञान घेतां त्यातील जीवनाचे दर्शन घडे ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
देह - बाळपणीचा सुखावणारा
मातापित्यांना
घरच्यांना दारच्यांनाही
मऊ, रेशिमस्पर्शी
पहाटेच्या कोवळ्या दवबिंदूसारखा..
देह - यौवनातला ...सुखवणारा
इतरांना....स्वत:लाही
रेशिमस्पर्शी सुख देणारा
भोगणारा
भर्जरी वस्त्रालंकारांनी मिरवणारा
गर्वोन्नत - टपोऱ्या गुलाबपुष्पासारखा...
देह - मावळतीचा काहीच न सोसणारा
दुःखच नव्हे तर सुखही...
जर्जर.. सायंकालीन सूर्यफुलासारखा..
मान्य आहे, तसा कुठल्याच संबंधांना
देहावाचून अर्थ नाही
तरीही तुझ्या-माझ्यात असावं
देहापलिकडचं काही
हातात घेतलेले हात नि आलिंगन
ही असावी फक्त लिपी
पण भाषा असावी आत्म्याची..
तरच...
रिझू विझू डोळ्यांनी
एकमेकांकडे पाहताना
कडवट औषधांच्या गंधात
नि जीव वाचवणाऱ्या शस्त्रांच्या सोबतीत
जाणीव होईल
संगमरवरी सौंदर्याच्या आड
दडलेल्या रक्त-मांस-अस्थिच्याच फक्त अस्तित्वाची
तेव्हाही आपण गाऊ वसंतातली प्रीतीगीतं
त्याच उत्कटतेनं
जशी गाईली होती.
देहाला वसंताची पहिली पालवी फुटताना…..
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळ/ व्यवस्थापन समिती/ पदाधिकारी हे गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी त्यांच्यातूनच निवडून दिलेले सभासद असतात. सदर व्यवस्थापन समिती सभासद आणि संस्था यांचे विश्वस्त (Trustee) असतात. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या वर्तनाने गृहनिर्माण संस्थेला जर काही नुकसान झाले तर व्यवस्थापन समितीचे सभासद वैयक्तिक व सामूहिकरीत्या त्या नुकसानीची जबाबदार असतात. सदर लेखात खास आपणासाठी व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या काय असतात याची माहिती देत आहे.
श्रीरामा, घन:श्यामा,sssss---घनघोर या काननी,
किती पुकारु तुमच्या नावा,ssss-
लक्ष्मण भावजी गेले सोडुनी,--!!! .
अयोध्येस परतल्यावरी,
बसले मी राणीपदी,
आदर्श जोडप्याचा मान देऊनी जनतेने केले धन्य जीवनी,--
त्यातच आणखी गोड बातमी,
स्वर्गच दोन बोटे राहिला,--!!!
कुणाची नजर लागली,
ग्रहस्थिती विपरीत फिरली,
तुम्ही का सोडले मज रानी,
जावे कुठे एकाकी मी आता,--!!!
मनोरथे सगळी संपली तुमची सेवा मनी राहिली,
असे काय घडले सांगा तरी,
काय चुकले माझे, पुरुषोत्तमा--!!!
या रानीवनी मी एकटी,
काट्यांत कोवळी कळी, हिंडताना-- भरकटलेली,
या भयानक अरण्यी,
नाही मज कुणीच त्राता,--!!!
कुळाचा आपुल्या वंश पोटी,--
जीव वाढे, माझिया ओटी,--
पतीने पण सोडल्यावरी,--
काय सांगू त्या लेकराला,-!!!
उद्ध्वस्त सीता, उध्वस्त जानकी उध्वस्तताच या तिन्ही लोकी,
कुठले राज्य कुठला पती,
अर्थच जीवनात न राहिला,--!!!
हिमगौरी कर्वे©
जमीन खोदतां पाणी लागते,
हीच किमया निसर्गाची,
कमी अधिक त्या खोलवरती,
साठवण असे जलाशयाची ।।१।।
प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी,
समानता तो दाखवितो,
अज्ञानाचा थर सांचवूनी,
आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।।
एक किरण तो पूरे जाहला,
अंधकार तो नष्ट करण्या,
ज्ञान किरण तो चमकूनी जातां,
फुलून येते ज्ञान वाहण्या.....||३||
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
न्यायाच्या अपेक्षेने ग्राहक मंचाकडे तक्रार घेऊन येणार्या ग्राहकांना आता महाराष्ट्र शासनाने मोठा दिलासा दिला आहे. आता ग्राहक मंचाकडे दाखल करण्यात येणार्या तक्रारी मराठीतूनच घेण्यात येतील आणि त्याची उत्तरेही मराठीतूनच दिली जातील असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
Copyright © 2025 | Marathisrushti