नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
या दोन-तीन महिन्यानंतर मी गाण्याचे काम पुन्हा सुरू केले. विवेक देशपांडे यांच्या ‘निष्पाप’ या मराठी चित्रपटासाठी विश्वास पाटणकर यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये मृदुला दाढे-जोशी बरोबर एक द्वंद्वगीत मी रेकॉर्ड केले. याचवेळी विश्वास पाटणकर यांचा मुलगा मिथिलेश पाटणकर याने कवी ग्रेस यांच्या गाण्याला त्याने बांधलेली अतिशय सुंदर चाल ऐकवली. मिथिलेश त्यावेळी शाळेत होता. सातवी-आठवीत असेल. पण उत्तम संगीतकाराचे गुण वडिलांकडून जन्मजातच त्याने घेतले होते
आपण जे कर्म करतो, त्याची परतफेड याच जन्मात करावी लागते. म्हणून म्हटले जाते की जेवढे पाप करावे तेवढे मरण सोपे नाही.
पावसाळ्यातल्या एका संध्याकाळी तो निवांत बाल्कनीतल्या खुर्चीत बसला होता.. पाऊसही सगळ्या परिसीमा ओलांडून बरसत होता.. अगदी त्या रात्री सारखाच !!…त्यामुळे तो जुना प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहणं सहाजिकंच होतं …
त्या वेळी जागतिकीकरणाचे वारे एवढ्या वेगाने वाहत नव्हते. भारतीय अर्थव्यवस्थाही खुली व्हायची होती. मी जपानला गेलेलो होतो. तिथलं जीवन, सुबत्ता, सांस्कृतिक आणि सामाजिक बदल पाहत होतो. अनेकांना भेटत होतो. जपानी माणसांची घरं लहान; पण ते अशी सजवितात की ती मोठी वाटावीत. अर्थात, तिथं पाहुण्यांना घरी बोलावून मेजवानी करावी, अशी पद्धत नाही. स्वतचं खासगीपण अत्यंत निष्ठेनं जपणारी ही माणसं. जपानच्या या दौर्यात घरचं जेवण मिळायला हवं असं वाटत होतं अन् त्यासाठी आम्ही गळ घालीत होतो ती आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नेमलेल्या मुलीला. खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर ती आम्हाला निमंत्रित करायला राजी झाली. तिचं घरही छोटसंच होतं. दोन खोल्या, बाल्कनी आणि स्वच्छतागृह. घरात येतानाच तिनं प्रत्येकाला सपाता दिल्या. घरात वापरण्यासाठी. प्रत्येक घरात असतातच त्या. घराच्या सजावटीत एक निसर्गचित्र असं लावलं होतं, की घरालाच एखाद्या बगिचाचं स्वरूप यावं. तिनं आमच्यासाठी `सुशी' केली होती. सुशी हा जपानमधला खास लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ. वेगवेगळ्या प्रकारचे मासे कच्च्या स्वरूपात खायचे असतात, हे सारं आता आठवावं, याला कारणही तसंच आहे. कालच एक बातमी वाचली... आता भारतीय आंबा जपानला निर्यात होण्याची शक्यता वाढलीय. भारतीय आंब्यांच्या उत्पादन पद्धतीपासून घटक नियंत्रणापर्यंतची तपासणी केल्यानंतर या हंगामात काही प्रमाणात आंबे जपानला जाऊ शकतील, अशी ती बातमी होती. तर, त्या वेळच्या आमच्या जेवणाच्या टेबलावर सुशी होत्या, ब्रेडचे वेगवेगळे प्रकार होते आणि एक मद्याची बाटली. सहज पाहायची म्हणून ती बाटली पाहिली. `इंडियन हनी' असा ठळक उल्लेख त्यावर होता. स्वाभाविकपणे चर्चा सुरू झाली ती भारतीय पदार्थांवर. जपानच्या छोट्या-मोठ्या उत्पादनावर आणि दोन्ही देशांच्या संबंधावर. सहजी विषय निघाला आंब्याचा. मी म्हटलं,`तू हापूसचा आंबा खाल्लायस?' उत्तर नकारार्थीच होतं. आंबा हा काही वर्णन करून सांगायचा प्रकार नाही. तो अनुभवायचा असतो. त्याचा स्वाद सांगायचा नसतो, घ्यायचा असतो. आंबा खाल्ल्यानंतर हाताला दरवळणारा गंध साठवायचा असतो; पण त्या दिवशी आंबा हा आस्वादाचा नव्हे, तर गप्पांचा विषय होता. त्या वेळी लक्षात आलं, की बोलण्यासारखं खूप आहे, आंब्याबद्दल. जगात फळांचा राजा म्हणून त्याचं असलेलं निर्विवाद स्थान आम्हाला आंब्याविषयी बोलताना अभिमानाचा विषय वाटत होता. आमच्या चौघामध्ये मी मराठी, तर मालविका संघवी ही मुंबईत राहिलेली पत्रकार होती. आमच्या या गप्पात आमच्या यजमानबाईच्या मनात आंब्याविषयी कौतुकमिश्रित उत्सुकता निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. कारण आता आंब्याविषयीचे प्रश्न पलीकडून येत होते. आंबा न खाताही आणि सुशी खाऊन दात आणि दाढांची कसोटी लागलेली असतानाही आम्ही तो आस्वाद घेतला होता. ज्या वेळी समारोपाचं बोलणं सुरू झालं तेव्हा आमच्यापैकी एक जण म्हणाला, `तुझा पत्ता आहे माझ्याकडे. भारतात गेल्यानंतर आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी काही पाठवून देऊ. म्हणजे आंबा आणि त्यातही हापूसचा आंबा काय असतो, ते कळेल.' आता यजमानबाई पुढे आल्या. धन्यवाद म्हणाल्या; पण तेवढ्यावरच थांबलं नाही. त्या म्हणाल्या, `कृपा करा आणि आंबा काही पाठवू नकात. मी त्याचा स्वीकार नाही करू शकणार.' काही तांत्रिक अडचण असेल तर दूर करता येईल, असं कोणी म्हणालं; पण त्यावर त्या म्हणाल्या, `तसं नाहीये. मीच नव्हे पण अनेकांनी हापूस आंब्याविषयी ऐकलं आहे. काहींनी भारतात तो खाल्लाही आहे; पण आम्ही तो भेट म्हणूनही नाकारतो. कारण तो जर इतका छान असेल तर त्याचा मोह नाही टाळता येणार. आणि एकदा आवड आणि मोह वाढला की भारतातून तो आयात करावा लागेल. आम्हाला तसं काही व्हावं, असं वाटत नाही.' आता अवाक् होण्याची वेळ आमच्यावर आली होती. जपानमधील एक महिला. सुशिक्षित महिला आपल्या देशाच्या अर्थकारणाचा, त्याच्या हितसंबंधांचा इतक्या व्यक्तिगत पातळीवरही विचार करीत होती.
-- किशोर कुलकर्णी
पंतप्रधान निघून गेले. पण कर्मचार्यां सोबत अशा रितीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर बीरबलची कहाणी सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल….
शिवसेनेने पुण्यातील झुणका भाकरला मिळालेली लोकप्रियता पाहून १९९५ सालापासून संपूर्ण महाराष्ट्रात झुणका भाकर केंद्रं सुरू केली.
मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. इंग्रजांना ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला आणून स्थानबध्द केलं. राजाचा मोठा डामडौल होता. राण्यांवर तो खूप खर्च करावयाचा. आपल्या राहणीमानाला पूरक व्हावं म्हणून त्याने पोत्यांमधून जडजवाहिर बोटीत बसायच्या आधी टाकून घेतलं होतं. रत्नागिरीला आल्यावर जवळचे जडजवाहिर विकून ते आपला थाट करीत होते. रत्नागिरीला त्यांच्यासाठी 'थिबा पॅलेस' बांधण्यात आला. घरातील अंतर्गत बाबींचा यात अंतर्भाव केलेला आहे.
राजा थिबा
लेखक : मधु मंगेश कर्णिक
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १३०/- रुपये
पाने : १२८
प्रत्येक साहित्य हे कोणत्या ना कोणत्या प्रेरणेतूनच निर्माण झालेले असते. ती प्रेरणा कधी रागातून, प्रेमातून, तिरस्कारातून अथवा अहंकारातूनही मिळालेली असते. काहीचे व्यक्तीगत आयुष्य त्या आयुष्यात आलेले चांगले – वाईट अनूभवही काहींच्या साहित्याची प्रेरणा ठरत असतात. त्यामुळे ढोबळ्मानाने विचार करता एखाद्या प्रेरणेतून निर्माण झालेले साहित्य वाचकांना कोणती ना कोणती प्रेरणा देतच असतात चांगली अथवा वाईट. त्यामुळे आजचे साहित्य ही प्रेरणादायी आहे असेच म्ह्णावे लागेल नाही का ?
एखादे प्रेमावर आधारित साहित्य वाचून प्रेमात धोका खाल्लेल्याला आत्मह्त्या करण्याची प्रेरणा मिळाली तर त्या साहित्याला प्रेरणादायी साहित्य म्ह्णता येईल का ? नाही म्ह्णता येणार. जे साहित्य मणूष्यास उच्चतम ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरीत करते अथवा समाजासाठी, देशासाठी अथवा जगासाठी काही मोठे कार्य करण्यासाठी प्रेरीत करते ते साहित्य प्रेरणादायी मानले तर आजचे साहित्य किंचितही प्रेरणादायी नाही असच म्ह्णावं लागेल. मागच्या काही दशकात एक – दोन पुस्तके सोडली तर ज्याला फार प्रेरणादायी म्ह्णावे असे पस्तक वाचनात आले नाही. ज्याला अल्प प्रमाणात प्रेरणादायी म्ह्णावे असे साहित्य निर्माण झाले ही असेल पण त्यातून प्रेरणा घेऊन कोणी फार मोठे कार्य केल्याचे वाचनात अथवा पाहण्यात आले नाही.
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि ही स्पर्धा फक्त पैसा, धन-संपत्ती आणि सुखसाधने मिळविण्यासाठीच चाललेली आहे. या स्पर्धेतून वेळ काढून आजची पिढी स्वतःच मनोरंजन करण्याचा थोडासा प्रयत्न करते. त्यासाठी त्यांना आवश्यक असते मनोरंजन करणारे साहित्य. आजच्या जगात प्रेरणादायी साहित्य वाचण्याची गरज पडते ती जीवनात अपयशी ठरलेल्या लोकांना . अशाही लोकांना झटपट पैसा मिळविण्याचे मार्ग सांगणारे साहित्य हे प्रेरणादायी साहित्य वाटते. सर्वाधिक लोकांचा मनोरंजनाकडे कळ लक्षात घेता आता जगभरात साहित्यनिमिर्ती ही मनोरंजनाला डोळ्यासमोर ठेऊनच होऊ लागली आहे. सध्या आपल्या देशात प्रकाशित होणारे साहित्य पाहिल्यास ते सहज लक्षात येते. खर्या अर्थाने प्रेरणादायी साहित्य निर्माण करणारे तुरळ्क आहेत आणि त्यांचाही असं साहित्य निर्माण केल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कंबरटा मोडलेला आहे. अगदी इंटरनेटवरही एक प्रेम कविता शेअर केल्यावर तिला हजारो लाईक मिळतात पण त्याउलट प्रेरणादायी कवितेला मोजून दहा- वीस लाईक मिळतात. आज प्रेरणादायी साहित्य वाचण्याची वाचकांचीच इच्छा नाही त्यामुळे ते निर्माण करण्याच्या भानगडीतच हल्ली कोणी पडताना दिसत नाही. पूर्वी लिहिल्या गेलेल्या प्रेरणादायी साहित्यालाच आजही बाजारात बर्यापैकी मागणी असल्याचे दिसते. त्यामुळे आजचे साहित्य प्रेरणादायी आहे का ? या प्रश्नाचे ठोस उत्तर आज कोणालाही देता येणार नाही.
-- निलेश बामणे
माझ्या बापाने नेहमीच छोटी स्वप्ने पाहिली आणि मोठी स्वप्ने पाहणाऱ्या माझी पंख छाटली, माझी आई तिने नेहमीच मोठी स्वप्ने पाहिली पण बांडगुळ बनून… माझी भावंडे ती तर बांडगुळाला खाऊन जगणाऱ्याच्या भूमिकेत होते.
श्री शांतपणे सोफ्यावर कॉफीचा मग घेऊन बसला होता . ‘मानसी इंडस्ट्री’चा मालक श्रीकांत, हजारो नसली तरी शेकडो कोटीची उलाढाल असलेली स्टील इंडस्ट्री . वय फक्त सत्तावीस ! स्वप्नांच्या मागे धावणारा एक वेडा , अशी त्याच्या मित्रात त्याची ओळख होती .
Copyright © 2025 | Marathisrushti