नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कानाला हेडफोन होते,सहज पंकज उधासचे ‘ वतन से चिट्ठी आयी है ‘ गाणे ऐकत असताना संपूर्ण भूतकाळातच गेलो.
आज तू इथे नाहीस , आहेस कुठे तरी परदेशात २० वर्षे झाली, सपंर्क नाही.
नायिका म्हणून तिचा पहिला चित्रपट होता, ‘रिक्शावाला’ तो काही फारसा चालला नाही. ‘यादों की बारात’ या मल्टीस्टार चित्रपटात तिच्यावर ‘लेकर हम दिवाना दिल.’ हे गाणं चित्रीत केले गेले. या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली व चित्रपट निर्मात्यांची तिच्यासाठी रांग लागली.
कथा वाचनाच्या घनदाट जंगलातून वाट काढत असताना, वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात व. पु . नावाचा एक ‘कथा’ळ पहाड लागतो. तो पार केल्याशिवाय मराठी कथा वाचनाचा प्रवास संपन्न होत नाही.
आयुष्यात पडझड केव्हा सुरू होते माहितेय ? ”
माशाने अचानक विचारले .
याची अनेक उत्तरे आहेत , पण तुला काय अभिप्रेत आहे , हे मला कसे कळणार ?
असं त्याला विचारावं , असं वाटलं .
माझ्या किचन बंदीला, मीच जवाबदार होतो म्हणा. खरेतर तो एक अपघात होता. झालं काय कि, एकदा ती कणिक मळत होती. त्याच वेळेस गॅसवरचे दूध उतू जाण्याच्या बेतात होते, आणि माझ्या दुर्दैवाने मी जवळच होतो.
एक दिवस मी एका लहान मुलाला तपासत होतो. त्याला चांगलाच ताप भरला होता. खोकलत होता. बेचैन होता. तगमग करीत होता. त्याला हा त्रास तीन दिवसापासून होता. त्याच्या वडीलानी त्या मुलाचे रक्तही तपासून व क्ष किरण फोटो काढून आणले होते. सर्व रिपोर्ट्स मी व्यवस्थीत बघीतले. माझ्या वैद्यकीय तपासणी व रिपोर्ट्स वरुन मी ह्या मतास आलो की त्या मुलास निमोनीया ( Pneumonia ) झालेला असावा. तसे मी त्या मुलाच्या वडीलांना सांगीतले.
आज काल पालक फार चोखंदळ व चिकीत्सक झालेले जाणवते. हे चांगले लक्षण आहे. फक्त डॉक्टर सांगतात म्हणून सर्व मान्य करावे हे त्यांच्या पचनी पडत नाही. मुलाच्या वडीलांनी चौकस बुद्धीने मला प्रश्न केला. " डॉक्टर तुम्ही रक्ताचा रिपोर्ट बघून कसा तर्क बांधू शकता? रक्ताचा रिपोर्ट हा निदान करण्यासाठी कशी मदत करतो. " त्यांचा प्रश्न हा साधा, योग्य व सर्वसाधारण व्यक्तीच्या मनांत येणाऱ्या शंकाच बोलून दाखवणारा होता. अर्थांत वैद्यकीय शास्त्र प्रचंड आहे. ज्या ज्या शक्यतेचे बारकावे आम्ही शिक्षण घेताना शिकलो ते सर्वच त्याना सांगणे शक्य नव्हते. व अयोग्यही होते. त्याना फक्त त्यांचा छोटासा तर्क –" रक्ताचा रिपोर्ट व निदान ह्याचा कसा संबंध ? " आणि ते मला त्याना त्यांच्या भाषेत समजेल ते सांगणे हीच मजसाठी परिक्षा होती.
मी खिडकीवाटे बाहेर बघू लागलो. विचार करीत होतो. अचानक माझे लक्ष्य वेधले गेले ते एका पोलिस गाडी मुळे. एक पोलिस Vane व्हॉन व कांही पोलीस त्याच्या भोवती उभे होते. त्यांची आपसांत चर्चा चाललेली दिसत होती. अशी पोलिस गाडी पोलिसांसह त्या जागी मी पूर्वी बघीतली नव्हती. आज अचानक ते सारे बघीतले. मी किंचीत हासत त्या मुलाच्या वडीलांना प्रश्न केला. " बघीतल ती पोलिसांची गाडी व कांही पोलिस. ते आज अनपेक्षीत असे येथे दिसतात. काय तुमचा तर्क असावा ? "
ते निरखून बघू लागले. " मला वाटते जवळपास कांहीतरी घटना घडली असावी. कदाचित् चोरी, मारामारी, आत्महत्या, खून, वा असलेच कांही असावे. "
" बरोबर आहे तुमचा तर्क. असेच असते बघा दैनंदिन जीवनाच्या प्रसंगाचे. फायर ब्रिगेडची गाडी जर आली असेल तर तर्क करता येतो की कुठे आग लागली असावी. ऍम्बुलन्स (Ambulance) जर दिसली तर कोणीतरी रुग्ण मदतीच्या आपेक्षेत आहे असे वाटते. शववाहिका ( HEARSE ) त्याच वेळी दिसेल, जेंव्हा कुणातरी मृत व्यक्तीसाठी आलेली असेल. क्वचित प्रसंगी जर मिलीटरी वाहन वा सैनिक दिसले तर जवळपास आतंकवादी अथवा शत्रु गटातील कुणीतरी त्या भागांत असावा हा तर्क माणसे काढतात. ह्याचा अर्थ निर्माण झालेली परिस्थितीचे अवलोकन, तर्क, कल्पना ह्याचा अंदाज त्या त्या परिस्थितीला काबूत आणणारी यंत्रणा बघून करता येतो. हा जरी तर्क असला तरी तो त्या कारणाच्या खूपच जवळ नेण्यास मदत करतो.
शरीराच्या आतील कार्यशाळे बद्दल असेच कांहीसे असते. रक्त शरीराचा अत्यंत महत्वाचा प्राथमिक भाग असतो. शक्ती, उर्जा, अन्न, रक्षण, सारे सारे रक्ताच्या मार्फतच होते. अनेक घटक पदार्थ असलेल्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशी हा एक घटक पदार्थ. रक्षणाची प्राथमिक जबाबदारी सांभाळण्याची त्यांची क्षमता असते. ज्या पद्धतीचा रोग प्रादुर्भाव ( जंतू मार्फत ) शरीरावर होतो, त्याला ताब्यात आणण्यासाठी, त्या रोगाचा प्रतीकार करण्यासाठी रक्तामध्ये त्वरीत बदल होतो. शरीरांत असलेला Reserve Blood stock जो कांही अवयवांत असेल तो रक्त वाहीन्यामध्ये उतरतो. पांढऱ्या रक्तपेशीमध्ये त्या त्या रोगाला अनुसरुन त्वरीत वाढ होते. बस त्या ठराविक वाढलेल्या पेशी वा रक्त बदल हा कोणत्या रोगामुळे ते शक्य झाले असावे असा तर्क काढण्यास मदत करतो.
चोरी, खून, मारामारी, इत्यादी तुम्ही प्रत्यक्ष न बघताच केवळ पोलीसांची गाडी व पोलीस याना बघून जसे अनुमान काढू शकतात, त्याच प्रमाणे रक्त लघवी इत्यादींचे रिपोर्ट आम्हास त्या रोगाचे अप्रत्यक्ष निदान करण्यास मदत करतात.
मुलाच्या वडीलांनी हासत माझ्या तर्काला व निदानाला साथ दिली. मी त्याना लिहून दिलेले Prescription घेऊन ते औषधी आणण्यासाठी गेले.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सरकारचा आदेश निघाला.. देशाच्या पंतपरधानानं सवता टीव्ही वर येऊन १८ तारखीपासून पुढं दोन आठवडे कोणी बी कामाबिगर घराबाहेर निघायचं न्हाई.. घोळका करून उभं राहायचं न्हाई..घोळक्यानं कुठं जायचं न्हाई का यायचं न्हाई.. बाहीर जाताना तोंडावर कापडाची पट्टी म्हणजी मास्क का काय ते बांधूनच जायाचं.. आसं सांगितलं..
आयुष्यात भेटलेली काही माणसे, अनुभवलेले काही प्रसंग आपल्याला बरेच काही देऊन जातात. त्यातल्या काही माणसांची आणि अनुभवांची एक झलक.
एकदा एका छोट्या कार्यक्रमात एक प्रश्न सहजपणे आला. ‘‘तुमच्या आयुष्यातला सर्वांत आनंदाचा क्षण कोणता?’’ खरे तर हा प्रश्न कोणीही कोणालाही विचारू शकतो आणि त्याचे उत्तर अनेक वेळा मिळतेही. त्या कार्यक्रमातही तसेच झाले. ‘‘माझा जन्म हाच माझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदाचा क्षण’’ असे उत्तर मी देऊन टाकले. कार्यक्रमानंतरही या प्रश्नाने माझा पिच्छा सोडला नाही. खरंच, माझा जन्म हा आनंदाचा क्षण होता का? तो मी अनुभवला का? उद्या एखाद्याने तुमच्या आयुष्यातला सर्वांत वेदनादायक क्षण कोणता, असा प्रश्न विचारला असता, तर माझे उत्तर काय राहिले असते? या प्रश्नासाठीही माझे हेच उत्तर योग्य ठरू शकले असते का? त्या वेदना तरी मी अनुभवल्या होत्या का? तसे पाहिले, तर आनंद किवा वेदना, दुःख या बद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया शाश्वत असतात का? एखाद्या प्रचंड आव्हानाला किंवा संकटाला सामोरे जाताना अनुभवल्या जाणार्या वेदना या कायमस्वरूपी वेदना तरी राहतात का? ‘त्या वेळी मी हे सहन केलं’ असे सांगताना त्या दुःखाचा नवा अनुभव घेतला जातो का? घेतला जात असेल, तर तो खरोखर दुःखद असतो की सुखद? प्रश्न छोटे असतात. ते भासतातही साधे-सोपे. प्रत्येक वेळी ते तसे असतात का? प्रश्न तेच असतात- साधे-सोपे. आपण त्यांना अवघड किवा सोपे बनवितो. अशा या घटनांचा प्रारंभच मुळी होतोयाळी होतो तो जन्मापासून आणि त्याचा गुंता वाढतो तो नातेसंबंधातून. तुमचे जीवन सुखकारक, आनंददायक बनविण्याचा सर्वांत महत्त्वाचा मार्ग आहे तो तुमचे नातेसंबंध ठीक करण्याचा, ते सुधारण्याचा. आई-वडील, सासू-सासरे, भाऊ-बहीण, मित्र आणि सहकारी यांच्या संबंधांतून तर आयुष्य पुढे सरकत जाते. एका अर्थाने रिलेशन्स म्हणजे आयुष्य होय अन् बर्याच वेळा आपणच ते वेदनादायक बनवितो. माझेच उदाहरण सांगतो. आम्ही चौघे भाऊ, एक बहीण. आमचे कुटुंब मध्यमवर्गीय. मी थोरा. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, संस्कार मिळावेत, त्याने मोठे व्हावे, ही माझ्या आई-वडिलांची इच्छा. स्वाभाविकपणे त्यांचे प्रयत्न त्या दिशेने. वयाच्या दहाव्या वर्षीच मला शिक्षणासाठी पुण्याला पाठविण्यात आले. मी पुण्यात राहिलो; पण आपल्या कुटुंबाने, विशेषत आपल्या आईने आपल्याला अव्हेरले, ही भावना जपतच. माझ्यापेक्षा इतर भावंडांवर आईचा जीव अधिकच, असे मनाच्या कोपऱयात घट्ट बसले आणि मग सुरू झाला तो आई आणि मुलाच्या अस्वाभाविक नातेसंबंधातला एक प्रदीर्घ प्रवास. ज्या ज्या वेळी आईची अन् माझी भेट झाली त्या त्या वेळी माझ्या मनातला हा दुखरा कोपरा भळभळू लागायचा. मी सहजपणे असे काही बोलून जायचो, की त्यामुळे आईने दुःखी व्हावे, तिला अपराधी वाटावे. आईच नव्हे, तर या अस्वाभाविक प्रवासात माझे भाऊ-बहीणही मग माझ्या अनुदार शब्दांचे लक्ष्य ठरायचे. त्यांना वाईट वाटले, दुःख झाले, की मी सुखावला जायचो. हे सुखावणे क्षणिक असायचे. ती विकृती जाणवायची अन् मग पुन्हा एकदा सुरू व्हायचा तो दुःखाचा प्रवास. दुःख आठवणे, ते वाढविणे, ते जपणे अन् कुरवाळणेही. हृदयाच्या गाभाऱयात दुःख असले, तर इतरांसाठी आनंद तो कोठून येणार? वर्षांमागून वर्षे गेली आणि हे दुःख हेच माझे वास्तव आहे, असे वाटायला लागले. काही वेळा तर त्याचे उदात्तीकरणही सुरू झाले; पण आई-वडील म्हणजे काय, त्यांचे नाते काय असते, त्याचे नैसर्गिक आविष्करण कसे, याचा शोध मला अचानक झाला. एका भल्या पहाटे मी पुण्याहून नाशिकला गेलो. तिथे आई असते. त्या दिवशी मी प्रथमच आईकडे आई म्हणून पाहिले. तिच्या स्नेहाचे, प्रेमाचे दर्शन व्हायला मग अवधी लागला नाही. आईच्या पायांवर डोके ठेवून मी माझ्या आयुष्यात जपलेल्या अनेक वेदनांचे ओझे कमी केले. तिची क्षमा मागितली. आईच ती. तिच्या पायांवर माझे अश्रू वाहत असताना माझ्या पाठीवर तिच्या अश्रूंचा पाऊस पडला होता. तिचा स्पर्श प्रेमाचा, वात्सल्याचा दाखला देत होता. आम्ही दोघेही अश्रूंच्या पावसात स्वच्छ होऊन गेलो होतो. आज आई म्हटले तर आनंदाची अनुभूती मी घेऊ शकतो. कारण ते स्वाभाविक आहे.
-- किशोर कुलकर्णी
नामस्मरण, ईश्वरी चिंतन, ध्यान धारणा, चांगले वाचन, लेखन, अहार, निद्रा (विश्रांति ), आणि बौद्धिक चर्चा, व्यायाम ह्य़ा अपेक्षित कार्यक्रमा शिवाय एखादा छंद जोपावा. जो मनास आनंद, समाधान, व शांतता देणारा असेल. त्यांत कोणतेही ध्येय वा फलाशा नसावी. मराठी ब्लॉग, त्यावरचे लिखाण, चर्चा, आणि रसगृहण हे मजसाठी असेच असणार नाही कां ? तो फक्त व्यस्त राहण्याचा मार्ग असावा.
Copyright © 2025 | Marathisrushti