नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
“सकाळी मला जाग आली ती दारावर कुणीतरी जोरजोरात धक्के मारत होते त्या आवाजाने. मी जागी झाले आणि मनात पहिला विचार आला तो ह्यांचा. आम्हा दोघांना एकत्र पाहिले तर आमची धडगत नाही या विचाराने माझा थरकाप झाला. मी चटकन शेजारी सूर्यकांत राजेंना उठवावे म्हणून पाहते तर तिथे कुणीच नाही! या सगळ्या विचारात एखादा क्षण गेला असेल नसेल तो पर्यंत दरवाजा आता मोडतोय की काय असे प्रचंड धक्के बसू लागले. मी घाईघाईने उठून दरवाजा उघडला तो समोर राणीसाहेब, म्हणजे माझ्या सासूबाई! त्यांनी एकदम हंबरडा फोडला आणि माझ्या अंगावर खेकसून ओरडल्या, “ही! ही! चांडाळीण, पांढऱ्या पायाची अवदसा! हिने खाल्ले माझ्या पोराला. चल चालती हो माझ्या घरातून!” असे म्हणून त्यांनी माझा हात धरला आणि मला ओढू लागल्या. लोकांनी त्यांना आवरले. खाली दिवाणखान्यातून प्रचंड रडारडीचा आवाज येत होता. मी अगदी भांबावून गेले. मला कळेना हा काय प्रकार आहे? जिन्यावरून धावत धावत खाली आले तर हॉलमध्ये पांढऱ्या चादरीत सूर्यकांत राजेंना झाकून ठेवलेले! आसपास शिकारीला गेलेली सगळी मंडळी माना खाली घालून उभी!
त्यांनी पुण्याच्या केईएम रुग्णालयात कुटुंबनियोजनाचे पहिले केंद्र काढावयास भाग पाडले आणि दुसरी गोष्ट “ज्या देशातील लोक पंढरपूरच्या वारीला येतात, तो महाराष्ट्र“ अशी व्याख्या त्यांनी केली. पावसातील संगीत ऐकणारं कविमन, त्याच वेळी मानवाच्या हाडांचे सांगाडे तपासणारी एक शास्त्रज्ञ. दोन्ही गोष्टी त्यांच्या देहातच होत्या, त्या संपूर्ण आयुष्य कान आणि डोळे उघडे ठेवून जगल्या.
तर रोजा घरात पुरती रुळली होती. निगडीहून पुण्यात आणि पुण्यातील या घरातून त्या घरात ती आमच्यासोबत होती. स्कूटरवर बसायला घाबरणारी रोजा कारमध्ये ऐटीत बसे. आता घराला अंगण होते, मोठे फाटक होते, छोटा बगिचा होता, तिला बांधून ठेवणे मला आवडायचे
नाही; पण आता तिला मोकळे
सोडण्यासारखे वातावरणही होते. ती घराच्या मागे जाऊन प्रातर्विधी उरकीत असे. काहींच्या प्रवेशावर नाराजी, तर काहींबद्दल आनंद व्यक्त करीत असे. अशात ती मोठ्या फाटकाच्या फटीतून बाहेर पळायला लागली होती. कोणी मारेल, स्कूटरचा धक्का लागेल, कोणी घाबरेल म्हणून आम्ही काळजी घेत असू; पण ती वेळ मिळताच पळायची. नंतर स्वतहून परत यायची. दार उघडण्यासाठी आवाज द्यायची. रागावून तिला घरात घ्यायचो तेव्हा तिचा चेहराही अपराधी वाटायचा. अखेरीस एके दिवशी नेमके काय झाले असावे याची जाणीव झाली मला. पोरीने तोंडाला काळे फासले होते आमच्या. कुठे तरी जाऊन ती व्यभिचार करीत होती अन् आम्हाला पत्ताच नव्हता. हिचा संताप सुरू झाला. पोटच्या मुलीपेक्षा तिला जपले तिने हे असे करावे हे तिला मान्य होणे कठीण होते. शिवाय या अनौरस पिल्लाचे करायचे काय हा प्रश्न होताच? आता आमचे घर पुन्हा तिघांचे झाले. आम्ही तिच्या पिलांविषयी बोलू लागलो. काय करायचे? गर्भपाताचा विषय डॉक्टरांनी फेटाळला. तिला धोका होता. बाळंतपण होणे आवश्यक होते; पण तो उत्साह नव्हता, आनंद नव्हता, कौतुक नव्हते, होती ती अपरिहार्यता. मनात चीड, संताप अन् तिरस्कारही. काय वाट्टेल ते झाले तरी पिल्ले नकोत. फेकून देऊ, हा विचार वाढू लागला. पक्का होऊ लागला. कोण करणार हे काम? मी का पराग? अखेरीस परागने हे काम करावे असे ठरविले. अखेर तो दिवस आला. कोणाच्याही नशिबी येऊ नये असे दुर्लक्षित बाळंतपण तिच्या नशिबी आले. डॉक्टर नाही की औषध नाही. रोजाने चार पिलांना जन्म दिला. त्यापैकी एक जन्मतच गेले. उरले तीन, त
यांनाही लांब कुठेतरी टाकून द्यायचे होते. आम्ही तिघेही एकमेकांना बजावत होतो. आता दयामाया नको. तिने पाप केलेय, ते आपल्याला नको. तीनही पिलांना मी पाहिले. पिलासारखी पिले. डोळे मिटलेले आता कायमचे मिटणार. त्यांना कावळे खातील की घार नेईल? कोण नेईल त्यांना? कितीवेळ जिवंत राहतील? पण त्यांनी का मरावे? त्यात त्यांचा काय देष? असे प्रश्न बहुधा तिघांपुढेही होते अन् म्हणूनच आम्ही एकमेकाला आपल्या निर्धाराची आठवण करून देत होतो. बागकामाला लागणारी पाटी आणली. त्यात रद्दी पेपर ठेवले. त्यात तिघांना ठेवले. अगदीच निर्दयी होता येत नाही म्हणून एक फडके टाकले. आता रोजाचे लक्ष नाही असे पाहून परागने ती पाटी टाकून द्यायची होती. इकडे रोजा निश्चिंत होती. परागने विचारले, बाबा
-- किशोर कुलकर्णी

स्थळ : ठाणे ते पुणे एक्सप्रेस हायवे , पुणे ते रत्नागिरी व्हाया कोकरूड , थोडक्यात मुंबई गोवा महामार्गावरील प्रचंड खड्डे आणि दरवर्षीची अपरिहार्य असणारी ट्रॅफिकमधील घुसमट टाळण्यासाठी ठाणे पुणे रत्नागिरी असा मार्ग धरलेला . एका अर्थानं ट्रॅफिक जॅमला कात्रजचा घाट दाखविण्याचा प्लॅन . मुंबईहून जाणाऱ्या चाकरमान्यांसारखी आपली अवस्था होऊ नये म्हणून माझ्यामते दूरदृष्टीने घेतलेली काळजी.

मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘ ऊठ लेका, जागा हो, तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे, त्यांना म्हणावे, हे आमचे सर्वसामान्यांचे अपेक्षापत्र आहे. ते वाचण्याची कृपा करावी. तत्पूर्वी तूही ते नजरेखालून घालावेस, हे बरे. म्हणजे वादविवाद नामक प्रेमळ संवादासाठी तुला तयारी करता येईल.’
एक न्यायमूर्ती होते. अतिशय निःस्पृह व कर्तव्यकठोर म्हणून त्यांची ख्याती होती. खुनाचा आरोप सिद्ध झालेल्या प्रत्येक खुन्याला कोणीतीही दयामाया न दाखविता त्यांनी फाशीची शिक्षा ठोठावली होती. कोणताही खून खटला त्यांच्या न्यायालयात असला की, आरोपीला फाशी होणारच हे जवळजवळ निश्चित झालेले असायचे.
आपल्या कर्तव्यकठोर स्वभावामुळे प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती घरातही तसेच वागायचे. त्यामुळे त्यांच्या मुलाला लहानपणापासून प्रेम मिळाले नाही. त्यामुळे तरुणपणी मुलगा वाईट संगतीने बिघडला. त्याच्याच हातून एकाचा खून झाला व तो खटला चालविण्यासाठी नेमका याच न्यायमूर्ती समोर आला.
एरवी प्रत्येक खुन्याला फाशी देणारे हे न्यायमूर्ती समोर आपला मुलगा आरोपी असल्याचे पाहून कचरले. त्यांची कर्तव्यकठोरता कमी झाली. त्यांचे मुलाविषयीचे ' ममत्व' एकदम जागे झाले. त्यामुळे न्यायदान करताना ते आता बुद्धिवादाची भाषा बोलू लागले.
सध्याच्या काळात फाशीची शिक्षा अमानुष आहे. एकाने दुसऱ्याचा जीव घेतला म्हणून त्याचा पुन्हा आपण जीव घ्यायचा का? अशी भाषा त्यांनी सुरू केली. मात्र मुलानेच त्यांना अडविले. तो म्हणाला, ''माझ्यावरील ममत्वामुळे तुम्ही आता हे बोलत आहात. मात्र खुनाचा गुन्हा मला मान्य आहे. त्यामुळे तुम्ही मला फाशी दिलीच तरच ती योग्य होईल व तुमच्याही न्यायदानास 'कलंक' लागणार नाही.
मात्र न्यायमूर्तीना आपल्या मुलाकडून घडलेल्या अपकृत्यात आपणही थोडेफार वाटेकरी आहोत, असे वाटू लागले. त्यांना उपरती झाली, परंतु आता खूप उशीर झाला होता.
आपल्या हातून या खटल्याचा योग्य निकाल लागणार नाही हे ओळखून त्यांनी हा खटला दुसऱ्या न्यायमूर्तीकडे चालवावा, अशी शिफारस केली व आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते न्यायालयातून बाहेर पडले.
रफींच्या गायनशैलीचा विचार करता काही ठाम मते मांडता येतील. त्यांचे नाव बहुतेकवेळा तयार स्वरी, सुरेल पण काहीशा नाटकी गायनशैलीशी निगडित झाले. अर्थात, यासाठी त्यांचे काही रचनाकार देखील तितकेच जबाबदार आहेत, असे म्हणावे लागेल.
समोरच्या भिंतीवरचे घड्याळ रात्रीचे दोन वाजल्याचे दाखवत होते. कुठूनस एक वटवाघुळीच पिल्लू, त्या बेडरूम मध्ये घुसलं होत आणि खोलीभर भिरभिरत होत. चारदोनदा भिंतीवर धडकून ते शेवटी झिरो बल्बवर विसावले. बहुदा बेडरूमची खिडकी उघडी राहिली असावी. त्याच्या पाठोपाठ अजून चार सहा वटवाघुळे त्या खोलीत आपल्या पंखाची फडफड करत घुसली. त्या सर्वांची डोळे पेटल्या निखाऱ्यासारखी लाल भडक होते. पंखांच्य फडफडीचा आवाज होतच राहिला, कारण लाल भडक डोळ्याची संख्या वाढत होती! खोलीतील उजेड त्यांच्या पंखानी अडल्यामुळे सर्वत्र गच्चं अंधार झाला होता. त्या काळ्या पंखानी त्या खोलीतला कण ना कण व्यापून टाकला. तरी पंखाच्या फडफडीचा आवाज कमी होत नव्हता.

खरं तर नील तिच्या बाबतीत जे खरं घडलं तेच बोलत होता. त्यामुळे आता लताला त्याचा राग यायला सुरूवात झाली होती. तिला बघायचं होतं की, नीलला आपल्या बद्दल नक्की किती माहिती आहे? ती राग आवरून धरून त्याला पुढे बोल असे म्हणाली. ’गो अहेड नील.’
Copyright © 2025 | Marathisrushti