(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • मुक्ती दूत

    मी चोचीने पंखात अडकलेली ती शुष्क काडी काढून टाकली. चोचीनेच पंखाची पिस सारखी केली. तेव्हड्यात माझे लक्ष समोर गेले. तो लिंग देह एका वृद्ध स्त्रीचा होता. मी माझ्या एकुलत्या एक डोळ्याने निरखून पहिले. तीने साधारण साठी ओलांडलेली होती. म्हणजे बऱ्यापैकी जगलेली होती. खात्यापित्या घरची असावी. तरी पण ती दुःखी दिसत होती.

  • विस्मयो आनंदवनभुवनी

    अयोध्या नगरीचा अवघा आसमंत रंगीत दीप आणि दीपमालांनी प्रकाशमान झाला होता. आकाशातील द्वितीयेचा चंद्र आज जरा जास्तच तेजस्वी जाणवत होता. शरयूच्या तीरावरून येणाऱ्या सुखद गारव्यामुळं वातावरण प्रसन्न वाटत होतं. सर्वत्र उभारलेल्या राहुट्यातून , मंदिरांच्या प्रांगणातून , शरयू नदीच्या किनाऱ्यावरून केवळ आणि केवळ राम धून ऐकू येत होती.

  • नाईट ड्रेस

    काही वेळानी गाडी चालवता चालवता बाबांनी आरशातून मागे बघितलं … तर दोन्ही मुलं कंटाळून झोपलेली … आईस्क्रीममुळे चिकट झालेली दोघांची तोंडं , खेळून मळलेले कपडे , हातात धरून ठेवलेली नाईट ड्रेसची पिशवी आणि चेहऱ्यावर निरागस भाव … ते बघून कसल्याश्या विचारानी तो गालातल्या गालात हसला.

  • बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ११ – अस्पृश्यता निवारक सावरकर

    सत्यशोधक समाजाचे बागल म्हणाले “जे कार्य आम्ही कोल्हापुरात करू शकलो नाही ते सावरकर यांनी रत्नागिरीत करून दाखवले. असा नेता आम्हाला मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो.” सावरकर यांनी आदेश दिला की माझा  वाढदिवस अस्पृश्यता निवारण म्हणून पाळा.” व कार्यकर्ते यांना सूचना केली की घरोघर जाऊन पत्रके भरून घ्या की “मी  सार्वजनिक व खाजगी जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही.”

  • रेव्हनची गोष्ट

    सुरुवातीच्या काळात रात्रीच्या वेळी सूर्य, चंद्र आणि तारे नव्हते. रेव्हन हा सर्वशक्तिमान होता. त्याने सगळ्या प्राण्यांना, माशांना आणि माणसांना निर्माण केले होते. तरी ते सगळे प्राणी अंधारातच राहत होते. कारण त्याने अजून सूर्य तयार केला नव्हता.

  • “स्पेस, पॉझ आणि आपण “

    दोनेक वर्षांपूर्वी कुठल्याश्या news channel वर काही सेकंदांसाठी एक news flash झाली ती अशी होती …. “ ऐनसणा सुदीच्याकाळात सोनंम हागणार………. आता ही “सोनम” कोण ?? हा विचार करायला लागणार एव्हढ्यात सुधारित बातमी आली …. “ऐन सणासुदीच्या काळात सोनं महागणार” ….आणि मला हायसं वाटलं …….. SPACE चुकीच्या ठिकाणी आल्याचा परिणाम.

  • भुताचे बाप

    गावदरीच्या वेताळ ओढ्यात दर अमावास्येला भुतं खेळतात हे साऱ्या पंचक्रोशीला माहीत आहे भुते खुर्द आणि भुते बुद्रुक अशा दोन गावांमधून हा वेताळाचा ओढा गेला आहे . पूर्वी अलीकडे म्हणजे डोंगर बाजूला असणारे भुते खुर्द हेच गाव होते पण ओढ्या पलीकडील शेती कसायला ओढा ओलांडून जावे लागे .

  • बुडत्यास आधार काठीचा (सुमंत उवाच – ९३)

    सुमंत जयंत परचुरे. 

    हे सगळं विश्व माझ्यामुळे आहे. या सगळ्याचा कर्ता-सवरता मीच आहे. या भावनेला एकदा का मनुष्याने मनात जागा दिली की समोरचं क्षितिजही माझ्यामुळेच उजळून गेल्याची भावना निर्माण व्हायला सुरुवात होते. पण विश्वास हा असा धागा आहे जो मनुष्याला या मी पणाच्या चक्री वादळातून बाहेर पडायला मदत करू शकतो.

  • बहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी

    डॉ.अनिरुद्ध जोशी ते परमपूज्य बापू हा प्रवास एक विलक्षण दैवयोग आहे आणि असा सगळ्याच व्यक्तींच्या नशिबी येत नसतो त्यासाठी काहीतरी पूर्व पुण्याई किंवा नियंत्याची योजना असतेचं. त्यांचे लाघवी व्यक्तिमत्व, मर्यादा राखणारा स्वभाव, करारी बाणा, जनमानसावर आईसारखे निर्व्याज प्रेम करण्याची सवय, दुसऱ्याला मदतीला प्रथम धावून जाण्याचे संस्कार, जाती, धर्म, पंथ, लिंग यात त्यांनी कधीच भेदाभेद केला नाही हे सर्व लेखांतून वेळोवेळी प्रगट होतांना दिसते आणि आता परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू झाल्यावरही अजून ते सर्वांना आपले श्रद्धावानमित्र व आप्त मानतात.

  • जीए !

    जीए कुलकर्णींनी ज्याक्षणी लेखणीला हात घातला तो क्षण मराठी सारस्वताच्या भाळी कायमचा गोंदला गेला. रूढार्थाने गावकुसाबाहेर राहून त्यांनी मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले. साहित्याचे सगळे लिखित – अलिखित नॉर्म्स न पाळता ते स्वतःच्या उंचीवर पोहोचले.