(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माझा चड्डी यार – भाग २

    आम्ही दोघे एकाच वर्गांत व एकाच शाळेत. जिल्ह्याचे ठिकाण बीडचे. असे ऐकले की बीडचे पुर्वीचे नाव चंपावती नगरी होते. तेथेच चंपावती विद्यालय ही शाळा स्थापन झाली होती. त्याच शाळेंत आम्ही दोघे आठवीच्या वर्गांत होतो. त्या वेळी तोच शाळेमधला सर्वांत मोठा वर्ग समजला जाई.

  • पहिल्या सिंथेसायझरची गोष्ट

    अमेरिकन मूग सिंथेसायझर बाजारात येण्यापूर्वी खोलीभर पसरतील एवढे अवाढव्य आकाराचे सिंथेसायझर असायचे.

  • समज

    आमच्या शेजारीचे दोन तरुण मित्र, भास्कर व अविनाष एका खोलीत रहात होते. सारखी विचारसरणी व स्वभाव. धर्मा बद्दल प्रचंड जागरुकता बाळगत होते. आपलाच धर्म महान व श्रेष्ठ ही संकल्पना मनांत द्रढ झालेली जाणवत होती. तसा त्यांचा मित्र परिवार मोठा असल्याचे दिसून येत होते. कोणीही धर्माबद्दल वेडा वाकडा शब्द उच्चारला तर ते मिळून त्याच्यावर हल्ला करीत. धर्म रक्षण व देवाची सेवा हे जणू त्यांचे ब्रिद होते. सारे ज्ञान फक्त कुणाकडून ऐकलेले, वा साधारण पुस्तके वाचलेले. अनुभव संपन्नता त्यांत मुळीच नव्हती. कोणतेही धर्माचे ग्रंथ वा अध्यात्म यांचा अभ्यास नव्हता.

    एकदा कुणीतरी चित्रकाराने देवीचे चित्र रंगवले. त्यांत त्याने देवीला माकडाच्या पाठीवर बसून जात असल्याचे दर्शविले. अर्थांत हे अत्यंत अयोग्य व विक्षीप्त होते. झाले ते चित्र बघतांच या दोन्ही मित्रांचे टाळके फिरले. त्यानी मित्रांचे टोळके जमवून ते भितीचित्र काढून फाडून टाकले. शिवाय त्या चित्रकाराचा मागवा घेत त्याची पिटायी पण केली. पोलिसांना त्यात लक्ष घालावे लागले.

    आम्ही सोसायटीची मंडळी एकत्र जमून जवळच असलेल्या एक तिर्थक्षेत्री सहलीला गेलो होतो. आमच्या सोबत भास्कर व अविनाष दोघेही होते. सहल छान झाली. एक गोष्ट मात्र खूपच खटकली. तिर्थक्षेत्राजवळ एक मोठे कुंड होते. जे पाण्याने भरलेले होते. परंतु अनेक वर्षे त्या पाण्याला उपसाच नसल्यामुळे पाणि स्थिर झालेले होते. परिणामी अत्यंत दुर्गंदीयुक्त वाईट स्थितीत होते. सर्वानी फक्त ते पायावर घेतले. दोन थेंबे डोक्यावर शिंपडले. मात्र कुणीही ते तिर्थ म्हणून समजून प्राशन केल नाही. भास्कर व अविनाष यानी तर तिथे कुंडाच्या पाण्याला स्पर्श देखील केला नाही.

    कोणत्या धार्मिक भानाना ते प्रभावित करु बघत होते. कोणत्या धार्मिक तत्वाना ते साथ देत होते. धार्मिक संकल्पने मधील कोणत्या अनिष्ठ गोष्टीवर आपली उर्जाशक्ती वापरुन त्यांत सुधारणा करुं इच्छीत होते. सत्य आणि मनातील विचार यांची सांगड कोणती, ह्याचा गंभीरपणे विचीरच केलेला जाणवत नाही. फक्त मलाच वाटते ते सत्य असावे. ह्या वैचारीक व भावनेंत गुंतलेली ही मंडळी. आणि अशीच विचारसरणी बाळगणारी व्यक्ती फक्त भावनिक लाटेत वाहात जातात.

    वाईट व विक्षीप्त चित्रकला ही केंव्हाही निषीद्ध. ह्यास सर्वांचीच सहमती असेल. त्याला समजदारीने, विचारानीच विरोध केला पाहीजे. त्याच प्रमाणे जर ते तिर्थकुंड समजले गेले असेल तर त्याची स्वच्छता, उपसा, सभोवताल, ह्यावर खुप विचार व्हावा. कांही माणसे कुणीतरी धर्माची, देवाची थट्टा केली हा समज करुन घेऊन आग्रेसर होतात. तोडमोड करुन सामाजीक स्वास्थ बिघडवतात. जसे आमच्यातले भास्कर वा अविनाश. अशा ठिकाणी अशानी उर्जा खर्च करण्याची खरी गरज वाटते. कोणतेही धर्म स्थळ असो तेथे स्वच्छता, टापटीपपणा नैसर्गिक आकर्शकता, प्रसन्न वातावरण याचा खूप अभाव जाणवतो. अत्यंत दुर्भाग्य व निराशजनक बाब म्हणजे त्यांच्या व्यवस्थापनेकडे लक्ष्य देण्यास कुणासच फुरसत नसते. ह्याचे कारण देवत्वाविषयी गैरसमज व अज्ञान.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • अपण्णक जातक

    वाराणशीचे राज्य. राजाचे नाव ब्रह्मदत्त. या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या
    कुळात बोधिसत्त्वाचा जन्म झाला. बोधिसत्त्व मोठा झाला. देशोदेशी हिंडून
    व्यापार करू लागला.

  • मी तो भारलेले झाड !……

    महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना ‘गदिमा’ या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे ‘अण्णा’ तर आम्हा नातवंडांचे ‘पपा आजोबा’ अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर….

  • लेट व्हॅलेंटाईन

    बाबा, दरवर्षी आम्हाला या दिवशी वेगळं काहीतरी करावंच लागतं. पत्नीवर आपलं ‘प्रेम’ आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागतं. व्यक्त व्हावं लागतं. तुम्हाला हे नाही कळणार, कारण तुम्हाला खात्री होती की, आई तुम्हाला सोडून कधीही कुठे जाणार नाही. कधीतरी ती थकलेली दिसली की, तुम्ही कोपऱ्यावर जाऊन चटकदार ओली भेळ सर्वांसाठी घेऊन यायचा. तेवढ्यानेच ती खुश होऊन जायची. तुम्ही कधी तिला ‘आय लव्ह यू’ म्हटलं होतं का? की तुमच्या भावना न बोलताच तिच्यापर्यंत पोहचत होत्या?

  • फुलपाखरे

    धरू नका ही बरे,
    फुलांवर उडती फुलपाखरे । धृ. ।।

    काल पाकळ्या रात्री निजल्या
    सकाळ होता सगळ्या उठल्या
    आणि त्याच का उडू लागल्या
    पंख फुटुन गोजिरे,
    फुलांवर उडती फुलपाखरे ।।१॥।

    मजेमजेचे रंग तयांचे
    संध्याकाळी जसे ढगांचे
    ऊन कोवळे त्यावर नाचे
    सकाळचे हासरे,
    फुलांवर उडती फुलपाखरे ।।२।।

    फुलाफुलाशी हासत खेळत
    फिरती भवती पिंगा घालित
    बघा दुरूनच त्यांची गंमत
    दृश्य मनोहर खरे,
    फुलांवर उडती फुलपाखरे ।।1३॥।

    हात लावता पंख फाटतिल
    दोरा बांधुन पायहि तुटतिल
    घरी कशी मग सांगा जातिल ?
    दूर तयांची घरे,
    फुलांवर उडती फुलपाखरे ।।४।।
    उगाच धरिता त्यास कशाला ?
    अपाय करिता मुक्या जिवाला ?
    आवडेल का हे देवाला?
    ही देवाची मुले,
    फुलांवर उडती फुलपाखरे ! ।५॥।

  • लख लख चंदेरी ऽ ‘पेना’ची दुनिया ऽऽ

    त्या वेळचा शाळकरी मुलगा, जो आज ज्येष्ठ कलादिग्दर्शक म्हणून सुप्रसिद्ध आहे.. त्या सुबोध गुरूजींनी ‘शेफर’ या अमेरिकन कंपनीचं ते ‘चंदेरी पेन’ जिवापाड जपून ठेवलंय.

  • पद्य आणि मृत्युविचार : भाग-४/११

    आधुनिक जपानी संस्कृतीवर निश्चितच ‘हिरोशिमा-नागासाकी’चा परिणाम झाला असणारच, आणि तो काव्यात उमटलेला असणारच. त्यामुळे, हल्लीच्या जपानी काव्यात  मृत्यूचा उल्लेख येणें अटळ आहे. जपानीत मृत्यूकाव्याला ‘जिसेई’ ( Jisei ) म्हणतात, व अशा काव्याच्या बर्‍याच anthologies जपानीत आहेत.

  • साठाउत्तराची कहाणी-पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप प्रोजेक्ट

    त्या बुटक्याचे काय झाले असेल? युद्धात बुटक्याचा एक डोळा फुटला आणि एक पाय तुटला…..