नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कोणताही समाज हा राष्ट्राभिमानी होण्यासाठी तो प्रथम स्वभाषाभिमानी असावा लागतो. स्वभाषाभिमानाविषयी महाराष्ट्राची, तसेच राजभाषा मराठीची स्थिती काय आहे, हे सर्व जण जाणतात. बहुतांश मराठी जनांकडून दहा शब्दांच्या एका वाक्यात इंग्रजी, अरबी, फारसी आदी परकीय भाषांतील एक-दोन शब्द सहजपणे वापरले जातात. अन्य भाषेतील शब्दांची सरमिसळ करून मराठीत बोलणार्या किंवा ते बोलणे ऐकणार्या मराठी माणसाला त्याची खंतही वाटत नाही. राजकीय लाभासाठी मराठीची ढाल पुढे करणारे पुष्कळ आहेत, मराठीसाठी वर्षातून एकदा होणार्या साहित्य संमेलनात गळा काढणारेही उदंड आहेत; पण खरोखर मराठी जिवंत ठेवण्यासाठी, मराठी भाषेला अभिजात भाषेचा स्तर (दर्जा) देण्यासाठी झटणारे मराठीप्रेमी अल्प आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे या अल्प मराठीप्रेमींपैकीच एक आहेत. प.पू. डॉ. आठवले यांनी मराठी भाषेच्या रक्षणासाठी `भाषाशुद्धीचे व्रत’ या एका मार्गदर्शक ग्रंथाची निर्मिती करून मराठी भाषेच्या रक्षणाची चळवळ अत्युच्च वैचारिक स्तरावर पोहोचवली आहे. प.पू. डॉ. आठवले हे अध्यात्मक्षेत्रातील सर्वश्रुत नाव. अध्यात्माशी निगडित १६० हून अधिक ग्रंथांचे लिखाण त्यांनी केले आहे. थोर विभूतींनी निर्मिलेले वाङ््मय सर्वच दृष्टीकोनांतून मौलिक असते. म्हणूनच डॉ. आठवले यांनी निर्मिलेल्या `भाषाशुद्धीचे व्रत’ या ग्रंथाच्या माध्यमातून `मराठी भाषाशुद्धीच्या चळवळीला अध्यात्माचा स्पर्श झाला’, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचा मी बालवर्गापासूनचा विद्यार्थी. शाळेचा प्रचंड आभिमान बाळगणारा. 1971 मध्ये (म्हणजे सहावी इयत्ता पास झाल्यावर) दादर सारखं मध्यवर्ती ठिकाण सोडून ठाण्याला राहायला आल्यावर सर्वप्रथम वडिलांनी माझ्या शाळा प्रवेशाचं काम पूर्ण केलं, आणि ठाण्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मला प्रवेश मिळाला.
बायको अशिक्षित किंवा कमी शिक्षण घेतलेल्या अनेक जणी आहेत पण त्यांचा संसार उत्तम झाला आहे याची अनेक उदाहरणे आहेत ती केवळ विचारसरणी या मुळेच आणि तसेही नवरा बायको पेक्षा कमी शिकलेला नसावा असा नियम आहे का?
गाण्याची संधी मिळावी म्हणून माझे अनेक प्रयत्न सुरू होते. त्यातलाच एक भाग म्हणून ऑल इंडिया रेडिओच्या मराठी सुगम संगीत आणि हिंदी गीत-भजन अशा दोन ऑडिशन टेस्टस् मी दिल्या होत्या. या दोन्ही परीक्षांमध्ये मी पास झालो आणि मला बी ग्रेड मिळाली. रेडिओच्या ऑफिसला गेल्यावर मला कळले की सुरूवातीला कोणत्याही कलाकाराला 'बी' ग्रेडच मिळते. नंतर त्याने अपग्रेडेशनसाठी पुन्हा टेस्ट द्यायची असते. ऑल इंडिया रेडिओने दोन्हींसाठी माझ्याशी पाच वर्षांचा करार केला. या ऑडिशन्स देतांना गाणारा कलाकार आणि परीक्षक यामध्ये पडदा असतो. त्यामुळे कलाकार परीक्षकांना पाहू शकत नाही. मराठी सुगम संगीताची ऑडिशन दिल्यानंतर मला थांबवण्यात आले. परीक्षकांना मला भेटण्याची इच्छा होती. आपण गातांना मला भेटण्याची इच्छा होती. आपण गाताना काही चूक तर नाही ना केली अशा विचारात मी होतो, तोच परीक्षकांच्या खोलीतून संगीतकार सी. रामचंद्र बाहेर पडले. त्यांना पाहून मी तर आश्चर्याने थक्कच झालो. लता मंगेशकर, आशा भोसले, तलत मेहमूद यांनी गायलेली अण्णांची अनेक गाजलेली गाणी मला ऐकू येऊ लागली. या थोर संगीतकाराच्या पाया पडून मी धन्य झालो. संगीतकार सी. रामचंद्र यांना माझा आवाज आवडला होता आणि त्यांनी एक गाणे गाण्यासाठी मला बोलावले होते. आता मात्र मला वेड लागण्याची पाळी आली. या संगीताच्या प्रवासात असे अनेक टप्पे आले की जिथे मला वाटले की याहून तुला अधिक काय हवे आहे? प्रत्येक टप्प्यावर जवळ जवळ पूर्णतेचा आनंद देणारा असा हा आनंददायी प्रवास आहे. पण गंमत 'या जवळ जवळ पूर्णतेची' आहे. कारण शंभर टक्के पूर्णता तुम्हाला कधीच मिळत नाही आणि त्या पूर्णतेच्या आशेने तुमचा प्रवास सुरूच राहतो. एक गोष्ट याठिकाणी नक्कीच सांगेन की हा प्रवासच फार मजेशीर आहे. The journey is more joyful than destination. सफर खूबसूरत है मंजिलसे भी। पण हे डेस्टिनेशन काय आहे हे मला अजूनही कळलेले नाही. आनंददायी प्रवास मात्र चालू आहे.
- अनिरुद्ध जोशी
मला जे प्रिय ते देवाला अर्पण होऊ लागले. माणूस स्वार्थी झाला आणि आपल्याला सर्वाधिक प्रिय आपणच आहोत ही भावनाही लोप पावली. आनंदाचा धनी मी आणि दुःखाचे प्राक्तन दुसऱयाचे यात अस्वाभाविक काही आहे, असे वाटेनासे झाले. माझ्याऐवजी कोंबडा, बोकड एवढेच काय दुसर्या माणसाचा बळी देण्याएवढा माणूस स्वतला सक्षम मानू लागला, स्वतच्या अंतरात्म्याला गाडून टाकले, की इतरांची काय पत्रास? हा निसर्ग, ही वृक्षवल्ली, हे प्राणी-पक्षी माझाच अंश आहेत, ही भावना लोपली आणि मग परमेश्वर हा धाक दाखविण्याचाही एक मार्ग होऊन गेला. शनिच्या डोक्यावर थोडे तेल ओतले, की आपली इतिकर्तव्यता संपली, असे मानण्यात धन्य होता येते, हा अनुभव माणसाला येऊ लागला. कुठे तेलाच्या नद्या, तर कुठे कोंबड्यांचा पिसांचा उकिरडा, कुठे बोकड, तर कुठे मनुष्यबळी-माणसाच्या विद्वेशाच्या अभिव्यक्ती सर्वत्र साकारू लागल्या. त्याला संस्कृती म्हटले जाऊ लागले. त्याला धार्मिक आधार मिळू लागला. काहीवेळा भीतीने, तर काहीवेळा धर्माच्या धाकाने माणूस आपल्यातल्या परमेश्वराला जिवंतपणी ठार करू लागला. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट, खरेतर खूप भीषण, माणसाच्या मनाचा थरकाप उडविणारी; पण वास्तव मांढरदेवीच्या नवसपूर्ती यात्रेत शेकडोंचा बळी गेला. बोकड, कोंबड्या नव्हेत, तर बाया-बापड्यांचा, लहान पोरांचा, थोर-वृद्धांचा आणि कमावत्या शरीराच्या तरुणांचाही. माणसाने माणसाला तुडवले. ठार मारले. त्यात माझे, आपले कोणाला दिसले नाही. प्रत्येकाला स्वतच्या पलीकडे काही पाहता आले नाही. पाहिले ते देव होते, स्वत जिवंत राहण्यासाठीचे आधार होते, त्यात मुले होती, बायका होत्या; पण मला मी जगणे आवश्यक वाटले. त्यांना तुडवत माझ्यातल्या `मी'ने जिवंत राहण्याचा आनंदसोहळा साजरा केला. एवढ्यावरच भागले तर तो माणूस कसला? त्याने मृतदेहावरच्या चीजवस्तू लुबाडल्या. आपल्याच आया-बहिणींच्या अंगावरच्या साड्या ओढताना त्याने आपल्यातल्या दुःशासनाला तृप्त केले. तिथे कृष्ण कोणी अवतरला नाही. कारण तशी आर्त हाकच त्याच्यापर्यंत पोहोचली नाही. मांढरदेवीचे रूपच असे होते, की तिला आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकायची होती. त्यांना कौल द्यायचा होता. भक्तांची मागणी हीच होती, ``माझ्या शत्रूचा नायनाट कर'', ``त्याचे तळपट होऊ देत'' एक भक्त दुसऱयाबद्दल हीच कामना करीत असेल, तर त्याच्या देवाने काय करावे. त्यालाही कंटाळा आला असावा, या मत्सराचा, द्वेषाचा, त्यालाही खऱया प्रेमाची तहान लागली असावी. देवाने मग माझा-तुझा न पाहता सर्वांना `तथास्तू' म्हटले. मांढरदेवीचे पठार लाल होऊन गेले.
-- किशोर कुलकर्णी
मुळात भुविकाचा दोष काय होता??? ती सुंदर होती हा तिचा दोष??? की तिने समीरला नकार दिला हा तिचा दोष…अद्याप समीर फरारच…आपल्या कायद्यात एवढ्या पळवाटा आहेत, तो सापडला तरी त्याला शिक्षा होणार का??? हा मोठा प्रश्न आहे. भुविका सारख्या अनेक निष्पाप तरुणींचा बळी घेणारे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत……
आर्थिक अडचणी वाढू लागल्या की नातेसंबंध बिघडू लागतात, ते सावरायचे कसे याचा विचार करताना स्वतःची प्रकृती ढासळू लागते.संकट येऊ लागली की एकाच वेळी अनेक बाजूनी येतात आणि अनेकांचे सल्ले मानून मी मारुतीला दर मंगळवारी लवंगांचा हार आणि शनिवारी शनिमंदिरात बाटलीभर तेल घालू लागतो.
लहानपणी माझा आजा म्हणजे माझा बा सांगायचा . नंतर आई सांगायची ,नारायण टिनपट्याबद्दल .’टिनपट्या ‘ या विचित्र नावानं उत्सुकता वाढवली होती . शालेय जीवन …कॉलेजमुळे हा विषय मागे पडला .जरा मोठा झालॊ . नोकरीतून सुट्टीच्या काळात शेगाव बु ,म्हणजे माझ्या गावी गेलो की आई नातवंडाना कथा सांगायच्या वेळी ……आम्ही तिला टिनपट्याबद्दल सांगायला आग्रह करायचो .
कुठलाही प्रसंग किंवा परिस्थिती असली तरी याच्या चेहऱ्यावर कायम एक प्रकारचं हसू असायचं . मध्येच वेगवेगळे आवाज काय काढेल ,लिहिता लिहिता एकटाच वाकुल्या करेल , साध्या विनोदावर सुद्धा उगाच हसेल , शिक्षकांनी उभं करून प्रश्न विचारला आणि उत्तर येत नसेल तर चित्रविचित्र तोंडं करेल असा खुssशालचेंडू होता तो … आपल्या अश्या वागण्यामुळे इतरांनाही हसायला भाग पाडायचा. .. म्हणूनच तर शाळकरी मित्रांनी त्याचं नामकरण “जोकर” केलं होतं.
रोज सकाळी सूर्योदयाच्या समयी फेरफटका मारणे व नंतर घराजवळच्या बागेत जाऊन शांतपणे चिंतन करीत बसने, हे नित्याचेच व नियमित झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शरीर व मन ताजे तवाने ठेवण्यात खूप आनंद वाटत असे. बागेमध्ये विविध रंगांची अनेक फुलझाडे होती. प्रातःसमयी उमलणाऱ्या त्या फुलांचे सौंदर्य मनास मोहून टाकीत होते. एक दिवस माझे मित्र श्री एकनाथराव यांची भेट झाली. हातात पिशवी घेऊन ते हलके हलके फुले तोडून जमा करु लागले होते. माझे लक्ष जाताच मी त्यांच्याजवळ गेलो.
” काय पूजेसाठी फुले गोळा करीत आहात वाटते? परंतु ही फुले देवाला कशी चालतील? “ माझ्या विचत्र वाटणाऱ्या वाक्याने त्यांना एकदम आश्चर्य वाटले. काहींच उलगडा न झाल्यामुळे त्यांनी मला त्या वाक्याचा अर्थ विचारला. मी म्हणालो ” थोड्या वेळापूर्वी मी समोर बसून मानस पूजा केली होती. ही सारी उमललेली टपोरी फुले स्पर्श न करता, त्या ईश्वराचे चरणी अर्पण केली. मनानेच वाहिली. आता माझ्या द्रीष्टीने ती निर्माल्य झालेली आहेत. ही फुले तुम्ही कशी देवाला वाहणार? “ विचित्र आणि न पटणारे. परंतु तर्कज्ञानाच्या विश्लेषणाने मान्य होणारे हे तत्वज्ञान. एकनाथरावनी क्षणभर विचार केला व ते किंचित हसले. ” मी पण मानस पूजेचा विचार करीन. कदाचत निसर्गाच्या फुलण्यातल्या आनंदात, मला पण सहभागी होता येईल.” असे काहींसे पुटपुटत ते निघून गेले.
मला अचानक माझ्या अमेरिकेतील काही दिवसाची आठवण झाली. मी मुलाकडे गेलो होतो. अतिशय स्वछ आणि सुंदर वातावरण होते. मनाला प्रसन्न व आनंदित करणारे. मोठे व अरुंद सिमेंटचे रस्ते. मध्य भागात Devider असून रंगी बिरंगी फुलांनी सुशोभित केलेले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी गवताचे मखमली गालिचे असून विविध रंगांची मनोहर फुले फुलली होती. गुलाबांची टवटवीत मोठी फुले भरपूर प्रमाणात फुललेली होती. रस्त्याच्या कडेला आपल्यासारखी काश्मिरी गुलाबांची ताटवे ह्याचे मानस आश्यर्य वाटत होते. असे चित्र भारतामध्ये केव्हांच बघण्यात आले नव्हते. गुलाबाची टपोरी फुले, कुणाच्या घरातील बागेमध्ये किंवा एखद्या सार्वजनिक बागेमध्ये असतीलही. परंतु त्याच्यावर नजर ठेवणारे, निगा राखणारे असतीलही. अमेरिकेत कुणीही केव्हाही फुले तोडताना बघितले नाही. किंवा ” फुले तोडू नका ” ही सूचना देणारी, सूचनाफलक कोठेच दिसला नाही. इकडील सर्व सामान्या मध्ये ही जाणीव इतकी रुजली आहे कि कुणीही रस्त्याच्या कडेलगतची फुले सार्वजनिक बागेतील फुले किंवा घरातील फुले देखील झाडावरून काढीत नसतात. झाडावरच फुलाने उमलणे, बहरणे, आणि गळून पडणे ही नेसर्गिक प्रक्रिया त्यांच्यात घडताना दिसते.
मला ठाण्यात सकाळी फिरावयास गेलो असताना जे दृश दिसत होते ते आठवले. बरीचशी वयस्कर मंडळी सकाळी फिरण्यास जाताना दिसते. काही घरामधली बागेमाधली जास्वनदिची, कन्हेरीची, पारिजातकाची, गुलाबाची वा इतर काही मोठी झाडे, घर कुंपणाच्या बाहेर फांद्या वाढून बहरलेली दिसत. कित्येक महाभाग हाताला येतील तेवढी सर्व फुले तोडून पिशवीत जमा करतात. त्यांना त्यात आनंद वा धन्यता वाटते. पुजेसाठी ती सर्व फुले कशी मिळतील हे बघण्यातच ती प्रयत्नशील होती. मला अद्याप कळले नाही कि आपण निसर्गाने अर्थात त्याच ईश्वराने निर्माण केलेले सौंदर्याचे प्रतिक सुंदर फुल का तोडतो. तोडून ते देवमुर्तीवर वाहून त्याच परमेश्वराला आपण आनंदी वा समाधानी करतो आहोत. ही भावनाच विचीत्राशी वाटते. भावनेला जर विचाराची साथ मिळाली तर बरेच गैरसमज दूर होऊ शकतील. ईश्वरावर नितांत श्रधा असावी हे सत्य आहे. त्याच्याशी जवळीक साधण्याच्या मार्गावर चिंतन व्हावे ही अपेक्षा.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti