नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
आजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर येतो चड्डी घालण्याचा काळ. त्याची जागा घेतो लेंगा. अर्थात पुढे पँट, इत्यादी हे सारे वर्णन केवळ गम्मत म्हणून. करण कपड्यावरुन वयाचा अंदाज हे कालबाह्य होत आहे. आतातर स्वातंत्र्य ह्या शब्दाची जशी व्याख्या बदलते, तशी ती सांगणारे बदलतात. सांगणारे स्वतःलाच महान समजतात. त्यामुळे व्यक्त होणारे विचार खरे समजावे लागतात.
February 20, 2019
१९६५ आणि १९८५ साली मानव्य आणि प्रियकर-प्रेयसी यांच्यातील प्रेम किती जिवंत,हळुवार, रसरशीत, नाजूक आणि भिडून जाणारं होतं याचा प्रत्यय काल “सीता रामम ” बघताना आला. मूळ भाषा तेलगू असली (with English subtitles) तरी दर्जेदार कलाकृती कायम भाषेच्या अडसरांना ओलांडून “ये हृदयीचे ते हृदयी ” पोहोचविते याचा हा दुसरा अनुभव.
September 27, 2022
आम्हाला बाळाविषयी काहीतरी लिहावं असं नेहमी वाटत होतं. कधीतरी विचारशृंखलेत असलो कि काय लिहावं माझ्या बाळाविषयी ? असा प्रश्न नेहमी डोळ्यांसमोर उभा राही.अगदी काही दिवसांचे असताना त्याला आम्ही आमच्या घरी आणले होते.दुपारची वेळ होती.त्याला कपड्यात असं गुंडाळल होतं की,अगदी गाठोडं करकचून बांधावं ,तसं परंतु इतर अवयवाची हालचाल नव्हती डोळे भिरभिरत होते..मी कुठेतरी वाचले होते 'ते फुल तृणातील इवले 'त्याप्रमाणे वाटले मला. आज ही आठवतं की,आमचा राहुल आणायला गेला.माझ्या सौ नी बजावून सांगितलं होतं,बारा संडासा कडून आणू नको बरं का?दुसऱ्या वाटेने घेऊन ये. सांभाळून आण.कितीतरी प्रश्नांचा भडीमार ..... दुसरं कोण असतं तर म्हटले असते, तुच जात का नाही? पण राहुल ला बाळाची फार आवड..हुं हुं करीत आणावया गेला.जवळच राहत असलेल्या माझ्या मेहुणीला कन्यारत्नाचा लाभ झाला.त्यांच्या कुटुबियापेक्षा सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असेल तर माझ्या सौ.ला. बाळाची आई बाबा जवळच दोन तीन चाळी सोडून असलेल्या एका छोटेखानी घरात राहत होते.सोबत काका- काकी, आजोबा, सारे एकत्रच.बाळाची आई म्हणजे सौ च्या भगिनी.बाळ जन्मल्या पासून त्याची...म्हणजे बाळाची विचारपूस घटको-घटकी सौ नी केली नसेल तर नवलचं. एकदा बाळ आल्या पासून रडत होत मला त्याच्या रडण्यामुळे माझ्या मनाची घालमेल सुरु होती काय करावे सुचेनासे झाले? भूक लागली नाही न? कि काही दुखत असावे ? आईचं दूध सुरु होतं त्यामुळे घरातल दुध नको. ज्या प्रमाणे कोंबडी आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन ऊन,वारा,थंडी,पाऊस यापासून संरक्षण करते त्या प्रमाणे माझ्या बाळाचं पालनपोषण मावशी (सौ) करते. हवं नको ते आमच्या हिला फार कळते. रडण्याच कारण क्षणात शोधून नाही काढेल ती मावशी कसली ?एक हलकेशी चापटी मारली अन रडणारा तो बेसुरा आवाज क्षणात बंद झाला.इवल्याश्याला मावशीची चापटी..... वर परत येथे आणणार नाही! असा दम देखील भरला.मावशीची सवय जडलेल्या बाळाला ....इतुके पुरे ... जेव्हा रांगू लागलं तेव्हा मात्र त्याचं दुडु दुडु पळताना पायातील पैंजणाच्या नाद मधुर स्वरानी कानाला वेगळ्या संगीताची सवय जडू लागली होती. हो हो म्हणता बाळ एक वर्षाचे झाले. पहिला वाढदिवस स्टुलावर मांडलेल्या केककडे कुतुहलाने पाहत,हळूच डोळे मिचकावीत होते.त्यांच्या छोट्याश्या घरात सरासरी बाळाच्या वयाचीच अन्य मुलांनी गर्दी केली होती. केक कापला, ठो करून फुगा फुटला.त्या भयंकर आवाजांनी बाळ रडू लागले. मग मात्र समजावीत बाळ राहीना. आलेल्या गिफ्ट चे आमिष दाखविले गेले तरीही बाळ मावशीला घट्ट बिलगून होते.
आई मरो, मावशी उरो ! हे का म्हटले जाते.याचा उलगडा आज मला झाला.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
December 5, 2014
आठवणींच्या झडीत चिंब झालेलं मन.. हरखुन गेलेलं असतं.. स्वत:ला, भोवतालाला विसरलेलं असतं. त्याला आठवत राहतं.. लहानपणापासुन आईनं केलेलं संस्कार.. बाबांनी दिलेली लढण्याची जिद्द… शाळेत गेल्यावर पाटीवर काढलेलं पहिलं वेडवाकडं अक्षर.. चुकल्यानंतर गुरूजींनी पाठीत हाणलेला धपाटा.. पाठीवर वळ उमटला तरी त्यातही गंमत असल्याची जाणीव नंतर होऊ लागते.
April 4, 2020
आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले.
खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले.
त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे हे सर्व मला अपराधीपणा आणत होते. पण तो एवढा मनाला भुरळ घालायचा की त्याच्या पासून दूर राहणे दिवसेंदिवस मला अशक्य वाटत होते.
त्याच्या जास्त नादी लागल्या चांगले नाही हे सर्वांनी मला समजावून सांगितले आणि यावरून भरपूर टोमणेही मारले. पण मी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
कारण नाही म्हटले तरी त्याच्या मैत्रीमुळे मला एक सामाजिक ओळख आणि प्रतिष्ठा मिळाली होती. त्याचा मित्रपरिवार एवढा मोठा होता की त्याच्यामुळे खूप मित्र-मैत्रिणी झाले होते.
माझ्या अबोल मनाला त्यानेच बोलणे शिकवले. फक्त बोलणेच नाही बरं का, तर त्याने मला अगदी जाहीरपणे किस देणे घेणे, डियर , लव यू, मिस यू असे शब्द बिनधास्तपणे वापरायला शिकवले. एरवी असे काही बोलताना लाजून चूर होणारे मी त्याच्या संगतीने मात्र ह्या गोष्टींना खूप सरावली गेले. घरातले सर्व आपापल्या व्यापात व्यस्त असताना चाळिशीनंतरचा तो मला लाभलेला खरा सोबती होता. ' ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते चलते' असे काहीसे नाते आमच्यात निर्माण झाले होते.
माझ्यासाठी जरी तो फक्त जवळचा मित्र होता तरी त्याच्यासोबत जरा जास्त राहू लागल्यावर सर्वांच्या नजरेत येऊ लागले. आणि माझाही त्याच्यासमवेत जरा जास्तच वेळ जात होता. तो मला इतर काही सुचू देत नव्हता.
शेवटी मग मी चिडून त्याच्याशी संपर्क तोडून टाकला. संपर्क तुटल्यानंतर पहिल्या दिवशी तर मला खूप शांत आणि छान वाटले. त्याच्या सततच्या टीवटीवीपासून दूर झाल्याने मन शांत झालं. त्याच्यासोबत वेळ घालवून आपण घोडचूक करत होतो याची मनाला जाणीव झाली आणि आता त्याच्याशी पूर्णतः संबंध तोडायचे असा निश्चय पक्का झाला.
कसेबसे दिवस ढकलले. तिसऱ्या दिवशी मात्र मन खूप बेचैन झाले. खुप आठवण येऊ लागली. तो नाही तर आपले सामाजिक जीवनच नाही या विचारांनी मन दुःखी झाले. मग सगळे विरह गीत मुखी येऊ लागले.
याद आ रही है, तेरी याद आ रही है
याद आने से तेरे जाने से जान जा रही हैं
किंवा
तू छुपा है कहाँ मैं तड़पती यहां
तेरे बिन फीका फीका है दिल का जहां
अशी काहीशी मनाची अवस्था झाली.
शेवटी ठरवले की त्याच्याशी अगदीच ब्रेक अप करण्यापेक्षा थोडीफार मैत्री राहू द्यावी.
पण जास्त नादी लागायचे नाही.
मग त्याच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळेना!!
त्याचे काय झाले असेल, तो ठीक तर असेल ना या विचारांनी मन हुरहूरले. त्यात आज व्हँलेंटाईन डे आला. आजच्या महत्त्वाच्या दिवशी तो नसल्याने सेलिब्रेशन करताच येत नव्हते. नवऱ्याने तर अतिशय सुंदर मेसेज पाठवून मला विश केले. पण मी तो मेसेज वाचू शकले नाही. मन आणि तन फक्त त्याचाच शोध घेत होते. अखेरीस व्हॅलेंटाईन डे संपत आला. तशीच दुःखी मनाने अंथरुणात शिरले. काय आश्चर्य तो माझ्या उशी जवळ निवांत पहुडला होता. मी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि भराभर त्याचे मुके घेतले. आपल्याकडे कोण पाहतेय, कोण काय म्हणतील कसलेच मला भान उरले नव्हते. दिसत होता फक्त तो आणि तोच..... म्हणजे माझा मोबाईल हो.........
त्याला बघून मी म्हटले,
तुम जो मिल गये हो
तो ये लगता है, के जहाँ मिल गया
मग मात्र त्याच्याकडून वचन घेतले,
वादा करले साजना
तेरे बिना मै ना रहू, मेरे बिना तू ना रहे
ना होंगे जुदा, ये वादा रहा
शेवटी व्हॅलेंटाईन डे संपायच्या आधी म्हणजे रात्री बाराला पाच कमी असताना मला माझा मोबाईल मिळाला आणि नवर्याचा मेसेज वाचून त्याला आय लव यू म्हणत मी माझा व्हॅलेंटाईन डे साजरा केला.
@मंजुषा देशपांडे, पुणे.
February 16, 2020
रमेश पोतदार आणि सविता पोतदार यांची एकुलती एक मुलगी, सधन कुटुंबात लाडात वाढलेली, आजच्या ग्लोबल जगात हि तिने मर्यादा व सुसंस्कृत पण सोडला नव्हता, तसे दोघांनीही तिच्यावर केलेल्या संस्काराचा विसर पडला नव्हता तसे सर्व गुण तिच्या अंगात मुरलेले होते. तिचे पाय नेहमीच जमिनीवर होते
August 5, 2023
शब्दकळेच्या प्रवासाला निघायचं ठरतं. दिवस ठरलेला असतो. हळूहळु सगळे जमायला लागतात. तहानलाडू भूकलाडू सोबत घेऊन लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळ्या वयोगटातील शब्दकळेच्या प्रवासाला निघालेले प्रवासी एकत्रित होतात. आज एका नव्या प्रवासाला जायचं असतं. आजचं रमणीय विषयस्थान कोणतं असणार याची कुजबुज सुरु असते, किंवा ज्ञात असेल तर उत्सुकता असते
January 24, 2022
या अनाकलनीय अशा स्वरूपाचे वर्णन विष्णु सहस्रनामात केले आहे ते वर्णन सूक्ष्म स्वरूप व स्थूल स्वरुप आहे gravitational waves, पृथ्वी ते धृव यातील forces, waves याचं ही वर्णन अतिशय त्रोटक स्वरूपात आहे. जसे अतिसूक्ष्म quantum तसेच नवनवीन ब्राह्मण्ड गोल जे आपल्या सूर्यमालेतील ग्रह-तारे यांच्या 100 पट आहेत. कुठले देव ? कुठून आले वेद?
January 27, 2022
आपल्या दुर्दैवाने आजवर आपल्याला सावरकरांबद्दल पाठ्य पुस्तकातून फक्त दीड पान माहिती दिली गेली. त्यांच, लंडन मधील कार्य,जगप्रसिद्ध बोटीतील उडी,आणि अंदमानातील दोन काळ्या पाण्याच्या शिक्षा. पुस्तकातील सावरकर एव्हढ्यावरच जाणूनबुजून संपवले गेले. गेली ७० वर्षे सावरकरांवर जाणूनबुजून अन्याय केला गेला. केवळ अन्यायच नाही तर बदनामी व उपेक्षा केली आहे.सावरकर हे केवळ क्रांतिकारक,द्रष्टे, समाजसुधारक किंवा भाषासुधारक नव्हते.तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते.त्यातील काही पैलू माझ्या लिखाणातून क्रमिक लेखात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण पुढील पिढीला व ज्यांना सावरकर आणखी समजून घ्यावसे वाटतात त्यांच्यासाठी मी हा अल्पसा प्रयत्न करत आहे,तरी तुम्हाला लिखाण आवडेल अशी मी आशा करतो.
September 17, 2022
ऋषी, संत महात्मे, थोर व्यक्ती, ध्यान धारणा, समाधीयोग यांची महती अनुभवाने गातात. जागृत राहून याचा आनंद घ्या म्हणतात. सत्य आहे. परंतु सामान्यांसाठी कठीण. निसर्गानेच कदाचित् सर्व जिवीत प्राण्यासाठीं गाढ निद्रेच्या मार्गातून, अवस्थेतून धान परिणाम साध्य करण्याचे योजीले नसेल कां ?
April 1, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti