(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • यक्षप्रश्न

    वनामध्ये युधिष्ठिराची चारही भावंडे मृत झाली होती. तो प्रसंग असा की, महाभारतात वनपर्वाच्या अखेरीस यक्षप्रश्नांचा प्रसंग वर्णिला आहे.

  • कुकरू

    सेफ्टी व्हॉल्वमधून थोडीशी हवा सोडत कुकरने विचार केला. आतल्या आत गास्केट घट्ट करुन पाहिलं आणि म्हणाला,“तुम्हा उघड्या तोंडाच्या लोकांना नाही समजणार ते. म्हणजे “वाफ सोडूंना” आमच्या म्हणजे ‘वाफ पकडूंच्या’ अडचणी समजणं जरा कठीण.”
    परात म्हणाली.“एऽऽ कुकरू जरा सोपं करुन सांग रे.” वाफ सोडत कुकर हसला आणि म्हणाला,“अगं आमच्या डोक्यावर मध्यभागी शिटीचं सतत टांगतं वजन असतं! तर दुसऱ्या बाजूला तो सेफ्टी व्हॉल्व डोक्यातच घुसलेला असतो.

    आणि गळ्याभोवती त्या रबरी गास्केटचा फास असतो. माझ्या पोटातलं पाणी उकळू लागलं की वाफेचं “धूम मचा दे..” सुरू होतं. अशावेळी तोंड बंद करुन अन् गळा आवळून मला गरम वाफेचा धूम धमाका सहन करावा लागतो!”

  • व्यवहार

    आईला काय भुगा केलाय ह्या दारुड्यानी डोक्याचा !! राघवच्या मनात आले , त्या म्हाद्याला यथेच्छ बुकलून काढावे असे त्याला वाटू लागले . मनातल्या मनात राघवने खूप दात ओठ खाल्ले पण प्रत्यक्षात तो मूग गिळून गप बसला होता . खरं तर व्यवहाराचे सगळे पैसे देऊन झाले होते , पण म्हाद्या काही ऐकायला तयार नव्हता .

  • तू म्हणतीस तसंच

    सकाळ झाली तशी सखू उठून लगबगीने कामाला लागली.आज सक्रातरचा सण,घरी काही तरी गोड-धोड करायचे व्हते. सणावाराला कधी तरी गोड-धोड लेकरांना मिळायचं,न्हायी तर एरी घरात आठरा विश्व दारिद्र्यच व्हते.कालच सखूने बाजारातून गुळ आणला व्हता.

  • ग्रुप वरील व्यक्ती !!!

    आजकाल सोशल मिडियावर वावरणार्‍या मंडळींवर केलेली सुंदर टिप्पणी….

  • चिंकीचे ना (आवडते) सूप

    कित्येक वर्षांनी चिंकी घरी आली होती. आता ती मोठी झाली होती. वाटलं होत तिचे बालपणाचे नखरे संपले असतील. पण कुठचे काय, सौ.ने मटार आणि गाजराची सुखी भाजी केली होती. ताट वाढल्यावर भाजीतले गाजर वेचून तिने अलग केले आणि म्हणाली मावशी मला गाजर आवडत नाही. न जाणे का मला दुर्बुद्धी सुचली आणि म्हणालो. चिंकी गाजर डोक्याकरता चांगले असतात. करमचंद नेहमी गाजर खात-खात मोठ्या-मोठ्या अपराध्यांना हुडकून काठायचा. "टीवीवर सर्व खोट दाखवितात. माझे किनई १०वीत ९५ टक्के मार्क्स आले होते, ए मावशी तुझे किती आले होते ग! विचारत तिरक्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितले." तिच्या गुगलीवर माझी विकेटच उडाली. आता काय उत्तर देणार तिच्या मावशी आणि काकांचे मार्क्स मिळून हि तेवढे आले नसतील. मला धर्म संकटात पाहून सौ. लगेच माझ्या मदतीला देवाप्रमाणे धावून आली. तिने चिंकीला विचारले, चिंकी तुला कुठकुठल्या भाज्या आवडतात, एकदाचे सांगून दे, म्हणजे मला तुला आवडणार्या भाज्या बनविता येईल. चिंकी सुरु झाली, मला किनई, गाजर, दुधी, लाल भोपळा, वांग....... . तात्पर्य तिला बटाटा, गोभी, शिमला मिरची, भेंडी सोडून कुठल्याच भाज्या आवडत नव्हत्या. शेवटी, माझ्या कडे बघत म्हणाली, काका, मला मला माहित आहे, तुम्हाला भाज्या चांगल्या करता येतात, शक्कल लढवून नावडत्या भाज्या मुलांच्या गळ्यात मारतात. पण लक्ष्यात ठेवा मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, अस्सल मुंबईकर आहे मी. मुंबईकराने आव्हान दिल्यावर दिल्लीकर मागे का राहणार? च्यायला तिच्या नावडत्या भाज्या तिच्या गळ्यात मारण्याची तैयारी सुरु केली. तसे म्हणाल तर दिल्लीकर दरवर्षीच्या बजेटमध्ये नेहमीच मुंबईकरांना मूर्ख बनवितातच.

    संध्याकाळी सौ. दारावर भाजी विकत घेत होती. ठेल्यावर मस्त लाल टमाटर होते. हिवाळ्यात दिल्लीत लालसुर्ख मस्त टमाटर मिळतात. मला मौका मिळाला. मी विचारले, चिंकी तुला टमाटर सूप आवडते का? हो, ती म्हणाली. माझ्या डोक्यात त्या क्षणी चिंकीला कसे मूर्ख बनविता येईल याची आयडिया आली.

    दुसर्या दिवशी रविवार होता. सर्व ताणून झोपले होते. मी नेहमी प्रमाणे सकाळी लवकर उठलो. स्वैपाक घरात गेलो. थोडे भोपळा, दोन गाजर, २-३ टमाटर, आल्याचा एक छोटा तुकडा, ४-५ लसुणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि हुकमाचा इक्का म्हणून बीट्सचा एक तुकडा. सर्व साहित्य कापून थोड पाणी टाकून कुकर मध्ये टाकले. कुकर गॅस वर ठेऊन एक शिट्टी दिली. सर्व सबूत नष्ट करण्यासाठी भाज्यांचा कचरा एका कागदात गुंडाळून कचरा पेटीत टाकला.

    कुकर थोडा थंड झाल्यावर, थोडे पाणी टाकून सर्व शिजलेल्या मिक्सितून पातळ करून सूप एका भांड्यात काढून घेतले. एक दुसरे भांडे गॅस वर ठेवले. दोन चमचे देसी तूप टाकून, त्यात जिरे घातले. नंतर पातळ झालेले सूप त्यात टाकले. थोडी काळी मिरीची पूड आणि स्वादानुसार मीठ त्यात घातले.सकाळी सौ.ने नाश्त्या साठी उपमा केला. अर्थातच चिंकीला उपम्यात टाकलेले गाजराचे तुकडे काढून उपमा वाढला. पण टमाटरचे लालसुर्ख सूप, बीट्स टाकल्यामुळे सूपचा लाल रंग काही जास्तीस उठून आलेला. होता चिंकीने मिटक्या मारत त्या स्वादिष्ट टोमाटो सूपाचा आस्वाद घेतला. दुसर्या दिवशीतर चक्क दुधीभोपळाचे सूप फक्त २-३ टमाटर अणि बीट्सचा एक तुकडा टाकून बनविले आणि तिच्या गळ्यात मारले. अश्या रीतीने अस्मादिकांनी चिंकीच्या सर्व नावडत्या भाज्या तिच्या घश्यात ओतल्या.

    मुंबईला परतल्यावर चिंकीच्या आईने एकेदिवशी दुधीची भाजी केली. नेहमीप्रमाणे चिंकीने नाक मुरडले. तिची आई तिच्यावर डाफरली, च्यायला, काकांनी बनविलेले दुधीचे सूप तर तू मिटक्या मारीत पीत होती, आता काय झाले, गुपचूप ताटात वाढलेली दुधीची भाजी संपव मुकाट्याने. बेचारी चिंकी.

    -- विवेक पटाईत

  • तिसरा’ डोळा

    एक काळ असा होता की, चित्रपटाचं शुटिंग म्हटलं की, त्या ठिकाणी कॅमेरा, कॅमेरामन, डायरेक्टर, कलादिग्दर्शक, ध्वनीमुद्रक, नृत्यदिग्दर्शक, स्थिरचित्रण करणारा, माईक धरणारा, मेकअपमन, लाईटमन, रिफ्लेक्टर्स, हेअरड्रेसर, स्पाॅटबाॅईज, सर्व तंत्रज्ञांचे सहायक व कलाकार अशांची ‘जत्रा’ असायची.

  • वडे

    त्या वेळी मी पुण्यातल्या वाडिया कॉलेजमध्ये शिकत होतो. रविवार पेठेत मावशीकडे राहण्याची सोय होती अन् काही तरी रोजगार मिळविण्याचे प्रयत्न असत. घरचा, आई-वडिलांचा आधार नव्हता असं नव्हे; पण स्वत कमवावं आणि शिकावं अशी प्रवृत्ती होती. माझ्या मावशीच्या हाताला खूप चव होती. तिनं काहीही करावं अन् ते सर्वांना आवडावं, असं होतं. ती बटाटेवडे छान करायची. एकदा आमच्याकडे त्यांचे दीर आले होते. सहज गप्पा चालल्या होत्या. ते म्हणाले, `वहिनी, तू आमच्या शाळेत वडे का नाही विकत? छान खपतील. चार पैसे मिळतील.' तेव्हा ते मॉडर्न हायस्कूलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करीत असत. झालं, चर्चेचं रूपांतर विचारात आणि योजनेत झालं. त्या वेळी माझ्याबरोबरच माणिक भंवर नावाचा माझा मित्रही मावशीकडे राहत असे. दरमहा 20 रुपये त्यानं द्यावेत आणि जेवून-खाऊन राहावं असं ठरलं होतं. त्यालाही पैशाची गरज होती. झालं, आमचं ठरलं. मावशीनं वडे रावेत आणि आम्ही ते गरमागरम शाळेत नेऊन विकावेत. दुपारच्या सुटीत शिक्षकांना एक छान, चवदार पदार्थ या सेवेतून मिळाला होता. 25 पैशाला एक वडा. त्या वेळी रस्त्यावर तो 10 पैशात मिळायचा. आमचा घरगुती, अस्सल म्हणून 25 पैसे. चांगला, दर्जेदार पदार्थ दिला, की जास्त पैसे द्यायला णी मागे-पुढे पाहत नाही, याचा अनुभव आला. गोविंद हलवाई चौक ते मॉडर्न हायस्कूल- रोज दुपारी आमच्या सायकली अशा पळत की कोणालाही वाटावे, वड्यांचा घाणा इथंच काढलाय. आमचा रोजचा रतीब सुरू झाला. रोज 30 वड्यांवरून संख्या 50-60 वर गेली. गुरुवारी-शनिवारी त्यात साबुदाण्याची खिचडीही सुरू झाली. टिकाऊ काही असावं म्हणून ज्वारीच्या फोडणीच्या लाह्याही देऊ लागलो. एकूण धंद्याला बरकत होती. रोज हातात काहीतरी रक्कम खेळती असे. मजा येत होती. आज 80 वडे करायचं असं ठरलं. त्याच दिवशी माझे

    वडील आले. त्यांनाही हा

    पदार्थ आवडे. जरा जास्तच वडे करायचा बे
    झाला. आज त्यांच्या निमित्तानं आम्हालाही वडे खायला मिळणार होते. अन्यथा, रोज वड्यांबरोबर तयार होणाऱया छोट्या मण्यांवर आम्ही समाधान मानत असू. दुपारी एकच्या सुमारास पहिला डबा घेऊन माणिक रवाना झाला आणि अवघ्या वीस मिनिटांत मीही शाळेत खल झालो. आज शाळेत वेगळंच चित्र होतं. त्या वेळच्या शाळेच्या संचालिका जयश्रीबाई वैद्यांनी शाळेत बाहेरचा कोणताही पदार्थ विकण्यास प्रतिबंध केला होता. आता काय? हा प्रश्न आमच्यापुढे होता. बाहेर वडे विकावेत, तर इतरांचा वडा दहा पैशात; आमचा महागाचा वडा कोण घेणार? थोडा प्रयत्न ला. चार वडे विकले गेले. डबे अजून खूपच जड होते; पण आता घरी जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. खालच्या मानेनं घरी आलो. काय झालं ते सांगू लागलो. आमचे पिताश्री घरी होतेच. आपले चिरंजीव अपयशी होऊन घरी आलेले पाहताच त्यांचा संताप झाला. त्यांनी शेलक्या शब्दांत आमची संभावना

    केली. त्या साऱयाचं सूत्र एवढंच होतं, `तुम्हाला धंदा जमत नाही. तुम्ही रडे आहात. काही लाज वाटत असेल तर जा आणि वडे विकून या.' आमची परिस्थिती समजावून घ्यायला ते तयार नव्हते. त्यांना आमच्याबद्दल सहानुभूती नव्हे, तर राग होता. आम्ही डबे उचलले बाहेर पडलो. मी त्या वेळच्या मिनर्व्हा थिएटरवर गेलो, तर माणिक आर्यनला. सिनेमाच्या इंटरव्हलला वडे विकण्याचा प्रयत्न केला. विक्रेत्या स्पर्धकांची जागांवरून कशी मारामारी होऊ शकते, याचा अनुभव आला; पण गेला बाजार चार-चार वडे विकले गेले. आता काय? त्यानंतर जवळच्या विजयानंद थिएटरवर गेलो. तिथंही थोडं यश ळालं. दुपारची संध्याकाळ झाली होती. अखेरीस मंडईत येऊन स्थिरावलो. परिसरात हिंडलो. `वडे।़ गरम वडे' अशी हाळी दिली. आणखी चार वड्यांना ग्राहक मिळाले. सायंकाळच्या साडेसातचा मध्यंतर करायचा ठरवून दोघेही पांगलो. आठला परत आलो तेव्हा सर्व मिळून 40 वडे विकले गेले होते. घरी जाण्याचा धीर आला होता. माणिक म्हणाला, `तुझ्याकडे किती पैसे आहेत.' मी म्हणालो, `दोन रुपये,' तो म्हणाला, `दे इकडे.' त्यानं दोन रुपये घेतले.
    स्वतच्या खिशातून आणखी दोन रुपये घेतले आणि वड्यांच्या गल्ल्यात टाकले. आता आपण चार-चार वडे खाऊ शकतोय. मला तर खूप भूक लागलीय, सं म्हणून तो वडे खाऊ लागला. मीही घेतले. चार वड्यात पोट भरलं होतं. शांतपणे घरी आलो. एकूण अठ्ठेचाळीस वडे विकले होते (आम्ही घेतलेले आठ). तरीही डबा जड होता. तो मावशीकडे दिला. आमचा अनुभव सांगितला. आता वडील खूष होते. मी परिस्थितीपुढे हार स्वीकारली नव्हती. आम्ही प्रयत्न केले होते आणि फार नाही पण यश तर मिळालंच होतं. वडील आणि मावशी यांच्या कौतुकानं पोट आणखी भरलं होतं. आपणही काही करू शकतो, हा विश्वास मनात रुजू लागला होता. छान वाटत होतं. एवढ्यात मावशीनं आम्हा दोघांना हाक मारली, म्हणाली, `पोरं रोज कष्ट घेतात. वडे विकतात, पण त्यांच्या तोंडी काही जात नाही. चला रे आज आपण पोटभर वडे खाऊ.' मावशी आम्हाला आग्रह करून वडे वाढत होती. आम्ही एकमेकांकडे पाहत ते संपविण्याचा प्रयत्न करीत होतो. आज हे सारं आठवलं की गंमत वाटते. आता मावशी किंवा वडील हयात नाहीत; पण मावशीचं प्रेम आणि वडिलांची शिकवण विसरू शकत नाही. परिस्थिती बदलते, अडचणी येतात; पण त्यापासून मागे फिरणाऱयाला रड्या म्हटलं जातं. मी रडा नाही, हे त्या वेळी मनावर बिंबलं. आजही ते ताजं आहे. वड्यांइतकंच गरमागरम आहे.

    -- किशोर कुलकर्णी

  • भूतांपरस्परे जडो (माझी लंडनवारी – 12)

    आठ-सव्वाआठची वेळ असेल, मी परत एकटीच गाणी ऐकत बसले होते आणि अचानक दारावर पुन्हा टकटक झाली. दार उघडले तर संतोष आणि अजून दोन अनोळखी चेहरे दारात उभे! मग संतोष आत आला.

  • पर्जन्ये पातळी ओलांडे रती (सुमंत उवाच – ८९)

    सुमंत जयंत परचुरे. 

    “माझं आयुष्यात काहीच चांगलं होणार नाहीये. माझं आयुष्य नेहमी असंच सुईच्या टोकावर असणार आहे. केवळ दुःख दुःख आणि दुःख एवढचं माझ्या आयुष्यात लिहिलंय बास दुसरं काही नाही.” हे असे विचार माणसाच्या मनात नेहमी येत असतात.