(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • भारताचे ‘साहित्यिक’ पंतप्रधान

    राजकारण आणि साहित्य ही खरंतर दोन विरुद्ध टोकं असं आपल्याला वाटतं. साहित्य संमेलनात राजकारण्यांचा वावर हा दरवर्षी चघळला जाणारा विषय. पण आचार्य अत्रे, ग दि माडगूळकर यासारख्या काही प्रतिथयश साहित्यिकांनी राजकारणातही त्यांची चमक दाखवली आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या काही राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रातही ! सावरकर तर दोन्ही क्षेत्रातले स्टार व्यक्तिमत्त्व.

    साहित्याची विशेष जाण आणि साहित्यात यशस्वी वाटचाल करणारे काही पंतप्रधान आपल्याकडे होऊन गेले.

    स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी प्रामुख्याने आत्मचरित्र आणि इतिहास यावर लेखन केले.

    पं. नेहरु ब्रिटिशांच्या तुरुंगात कारावास भोगत असताना त्यांनी कोठडीतून आपल्या कन्येला – इंदिराला - आपल्या भावना आणि विचार मोकळे करणारी विविध पत्रे लिहिली. तीच पुढे संग्रहित होऊन त्यांचे सुरेख पुस्तक तयार झाले.

    पं. नेहरुंकडे अंगभूत लेखनकला होती. मात्र त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांसाठी अन्य लोकांचे साहाय्य नेहरूंना घ्यावे लागले. Glimpses of World History हा पं. नेहरूंचा इतिहास ग्रंथ जगभर चर्चिला गेला. त्यांच्याचबरोबर कारावासात शिक्षा भोगणाऱ्या अब्दुल कलाम आझाद यांची तो लिहिण्याकरता बहुमोल मदत झाली. आझाद यांना इतिहासाचे सखोल ज्ञान होते. त्यांनी पं. नेहरूंना वेळोवेळी मूल्यवान ऐतिहासिक घटनांचे संदर्भ पुरवले.

    पं. नेहरुंशी तुलना करता लाल बहादूर शास्त्री आणि मोरारजी देसाई हे वृत्तीने थोडे कोरडे पंतप्रधान. त्यातल्या मोरारजींचा लौकिक रसहीन माणूस म्हणून होता. तरीही त्यांनी तीन खंडात आपले आत्मचरित्र लिहिले.

    पी. व्ही नरसिंहराव हे बुद्धिवंत. त्यांनी अंधश्रद्धांवर वेळोवेळी प्रहार केले. The Insider हे त्यांचे आत्मचरित्र बरेच गाजले. बाबरी मशिद प्रकरणावर त्यांनी "Ayodha – 6 December 1992" हे पुस्तक लिहिले. त्यांनी तेलगूमध्येही बरेच लेखन केले.

    अटलबिहारी वाजपेयी प्रतिभावान नेते तर होतेच पण उत्तम वक्तेही होते. त्यांच्या अंगी असलेल्या प्रतिभेला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. त्यांनी केलेली भाषणेही काव्यात्मक असायची. मेरी इक्यावन कविताऍं, क्या खोया, क्या पाया यासारखे काव्यसंग्रह, मेरी संसदीय यात्रा, गठबंधन की राजनीति ही पुस्तके गाजली.

    इंद्रकुमार गुजराल यांची गणना राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्ती म्हणून केली जाते. कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे ही सुसंस्कृतता त्यांना चिकटून आली असावी. परंतु त्यांचे आत्मचरित्र हे विशेष चमकदार ठरले नाही.

    इंदिरा आणि राजीव गांधी ही दोघेही अनुक्रमे ऑक्सफर्ड आणि केंब्रिजचे विद्यार्थी. तरीही ते पुस्तक वगैरे लिहिण्यासाठी लेखणी उचलण्याच्या भानगडीत पडले नाहीत. मात्र त्यांच्यावर बरीच पुस्तके लिहिली गेली.

    मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थ विषयाची डॉक्टरेट आहे. ते पुस्तकी विद्वान आहेत. मात्र स्वतंत्रपणे काही लिहिण्याचा त्यांना वकूब नाही. त्यांना काव्यात रस आहे. परंतु त्यांची आवड इक्बाल या उर्दू कवीपुरतीच मर्यादित आहे. त्यांचे सर्व लिखाण हे अकॅडेमिक (पुस्तकी) स्वरूपाचे आहे आणि तेही त्यांनी भारताचे अर्थमंत्री होण्यापूर्वी म्हणजे वीसेक वर्षापूर्वीचे आहे.

    सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन पुस्तके लिहिली आहेत आणि एक अनुवादित केले आहे. त्यांचे पहिले पुस्तक 'संघर्ष मा गुजरात' (गुजरातचा लढा) फार कमी लोकांनी वाचले आहे. हे त्यांनी आणिबाणीच्या काळात म्हणजे, ते आपल्या वयाच्या विशीत असताना, लिहिले आहे. त्यांची बाकी तीनही पुस्तके ही तशी स्वारस्यपूर्ण आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'पत्ररूप श्री गुरुश्री'. माजी सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या पत्रांचा हा अनुवाद आहे.

    दुसरे पुस्तक म्हणजे एक कवितासंग्रह आहे. संग्रहाचे नाव आहे 'आँख आ धन्य छे!'

    तिसरे पुस्तक पहिल्या दोन पुस्तकांपेक्षा उजवे आहे. ते चरित्रवजा आहे. स्वतः मोदींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील ज्या ज्या नेत्यांनी, त्यांच्या हाताखाली काम करीत असताना स्फूर्ती दिली, त्यांची रेखाटने या पुस्तकात आली आहेत.

    हा होता आपल्या काही पंतप्रधानांचा साहित्यिक आढावा.

    – निनाद अरविंद प्रधान

  • पुरुषार्थ

    एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता.

  • अथ: जंगल कथा: सत्तेचा संघर्ष- शेरखान आणि महाबली रेडा

    तवाकी: मूर्ख रेड्या, महाबली कधीच शेरखानला मारणार नाही आणि शेरखान ही हरीण आणि ससे खाऊन आपला मस्त राहील. ……

  • मीठाचा खडा…

    थोरला मुलगा पाचवीला असताना त्याची आई आजारपणात गेली. मास्तरांनी आपल्या मुलांना सावत्र आईचा जाच नको म्हणून दुसरं लग्न केलं नाही. कळता थोरला व मास्तरांनी स्वयंपाक, घरकाम करीत मुलांना मायेनं वाढवलं. शिक्षकांची नोकरी करताना वर्गात व घरात मास्तरांनी मुलांवर चांगलेच संस्कार केले.

  • समतोल…

    वर्तमानात जगा , भूतकाळ संपला , भविष्यकाळ कुणी पाहिलाय? हे कितीही खरं असलं तरी , वर्तमान काळ हा भविष्याची चाहूल घेऊनच येतो, म्हणूनच वर्तमानात जगत असताना भविष्याची तरतूद करणं आपल्या हातात आहे. मग तो पैसा असो किंवा माणसं. हे केवळ ज्येष्ठ पिढीने नव्हे तर प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना जमला पाहिजे तो समतोल. विचारांचा, भावनांचा, धारणांचा आणि कृतींचा..

  • समाधान

    मी सहज आईस्क्रीम पार्लर मधल्या आमच्या सकट इतर काही टेबलांवर नजर फिरवली . कुठे मित्रांच्या गप्पा , कुठे लहान मुलांचे गोंगाट , काही परिवार , वयस्कर व्यक्ती , कुणी सेल्फी काढतायत कुणी आईस्क्रीम चे फोटो काढतायत आणि बरंच काही …

  • लेखणीतला, रूपया बंदा

    पुनर्जन्मावर आधारित असलेले ‘नीलकमल’ व ‘मेहबूबा’ हे चित्रपट गुलशन नंदा यांच्या सर्वोत्तम लेखनाचे मानदंड आहेत. राजकुमार व मीना कुमारी यांचा ‘काजल’ हा भावना प्रधान चित्रपट सत्तरच्या दशकातील माईलस्टोन मानला जातो. १९७१ साली गुलशन नंदा यांची ‘झील के उसपार’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीने त्यांच्या आजपर्यंतच्या लोकप्रियतेचे रेकाॅर्ड तोडले.. तिच्या तब्बल पाच लाख प्रतींचा ‘न भूतो, न भविष्यती’ असा खप झाला!

  • व्यक्ती आणि समाज

    व्यक्ती आणि समाज परस्परपूरक असायला हवेत कारण ही राष्ट्राची दोन तोंडे आहेत. व्यक्तीने समाजासाठी, समाजाने राष्ट्रासाठी चांगल्या गोष्टी केल्या तरच त्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते. दोघांपैकी एकानेही आततायीपणा केला की राष्ट्राचे नुकसान होऊ शकते. या संदर्भात भारुड पक्ष्याचे उदाहरण देता येईल. एका मोठ्या सरोवरामध्ये भारुड पक्षी राहतात. त्याला दोन तोंडे होती, मात्र शरीर एकच होते. एकदा भारुड पक्षी सरोवराच्या काठावर आला असता, जवळच्या झाडावरून एक फळ खाली पडले. एका तोंडाने ते लगेच उचलले व ते तो खाऊ लागला. ते फळ फारच मधुर होते, त्यामुळे फळ खाताना ते पहिले तोंड म्हणाले, '' मी आजपर्यंत एवढे सुमधुर फळ खाल्ले नाही. '' ते ऐकून दुसऱ्या तोंडालाही ते फळ खाण्याची इच्छा झाली. त्याने पहिल्या तोंडाला ते फळ देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की आपल्या दोघांचे पोट एकच आहे त्यामुळे मी खाल्ले तरी ते याच पोटात जाणार आहे, असे म्हणून त्याने ते संपूर्ण फळ एकट्यानेच खाऊन टाकले.पहिल्या तोंडाच्या अशा वागण्यामुळे दुसऱ्या तोंडाला फार राग आला. त्याने पहिल्या तोंडाला धडा शिकवण्याचा निश्चय केला. दुसऱ्या दिवशी भारुड पक्षी फिरत असताना दुसऱ्या तोंडाला एक फळ सापडले. ते फळ फारच विषारी होते. दुसऱ्या तोंडाने ते खाण्यास सुरुवात केली, त्यावर पहिले तोंड त्याला म्हणाले, की, अरे हे फळ विषारी आहे ते पोटात गेल्यास आपण दोघेही मरून जाऊ. मात्र दुसऱ्या तोंडाने त्याचे म्हणणे मुळीच ऐकले नाही. त्याला पहिल्या तोंडाला धडा शिकवायचा होता. तो म्हणाला, ' 'मी हे फळ खाणारच. तू मला सांगणारा कोण?'' असे म्हणून त्याने ते संपूर्ण विषारी फळ खाल्ले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला व थोड्याच वेळात भारुड पक्षी मरून पडला. एका तोंडाने वाईट हेतूने आततायीपणा केल्याचे फळ त्याला मिळाले होते.

  • द्रौपदी आणि आर्किमिडीज (कथा)

    गी द मोपासॉ च्या A SALE या कथेवर आधारित.

  • सरी वर सरी श्रावण सरी ….!!

    प्रत्येकालाच श्रावण महिन्याचे अप्रूप असते त्यातून महिलांना जास्तच. कारण या महिन्यात मंगळागौर असते, उपवास, व्रते, आणि खूप चांगले चुंगले खायला मिळते. नवीन साड्या मग काय विचारता ! तसेच लहान लहान मुलींच्या खेळाला उत येतो. बघा कशी वाटते कविता.