नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
चार दिवसांची दिवाळी होऊन गेल्यावर फराळाचे डबे हळूहळू रिकामे होऊ लागतात व राहिलेला पदार्थ जेवणाच्या ताटात आग्रहाने वाढला जातो… देवदिवाळी पर्यंत फराळ संपलेला असतो व राहतात त्या फक्त गोड आणि खुसखुशीत आठवणी.
November 3, 2021
आधीच्या दोन नाटीकांत पाहिलतं ना मुखवटे कसे घालावे लागतात ते आणि ते मुखवटे कसा चेहरा मोहराच बदलून टाकतात ते? तरीही मुखवटे घालण्याची हौस कांही जात नाही. जोपर्यत मानवजात ह्या जगांत आहे तोवर तोंडाला रंग फासणे चालूच रहाणार.
September 8, 2022
कामाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध भागांना माझ्या भेटी होत. मराठवाडा हा भाग तर माझ्या विशेष जिव्हाळ्याचा. औंरगाबादेजवळ आमचं मूळ गाव, हे त्यामागचं कारण असावं. असाच एकदा औरंगाबादमार्गे पैठणला गेलो.
March 8, 2006
खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल.
October 20, 2018
गावाकडची गोष्ट………..।
.. सकाळ झाली होती झाडावरील पक्षानी आपापली घरटी सोडली होती पक्षी पूर्व दिशेला आकाश मार्गाने भरारी घेऊन पोट कसे भरेल या तयारी त होते. प्रत्येक मानवाला स्वतःचे पोट कसे भरेल याची चिंता लागलेली असते त्याच प्रमाणे मुक्या पक्षाची सुद्धा अशीच गत असते. पोटासाठी मुखे पक्षी भ्रमंती करतात त्याचप्रमाणे मानव सुद्धा वीतभर पोटासाठी भ्रमंती करतो. असे हे उदाहरण सर्वांनाच लागू आहे असे म्हणायचे वावगे ठरणार नाही. माणूस म्हणून किंवा पक्षी म्हणून अशा साठी जगणे हे मला मान्य नाही माणसाने कष्ट करावे स्वतःचे पाय हलवावेत. किंवा मुक्या प्राण्यांची हलचाल करून पोट भरावे असे मला वाटते.
December 21, 2022
भक्तीरसाने ओथंबलेल्या या गाण्यांच्या भक्तीमय वातावरणात गणोशोत्सव साजरा करुन आपली महान संस्कृती जपण्यासाठी गणपती व इतर सणांच्या काळात विविध चित्रपटांची गाणी वाजवली जातात… त्याचा अनेकांना त्रास होतो….! खरं तर या गाण्यांचा भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो… ही गाणी समजावी व आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न….
August 16, 2019
शीर्षक: क्षितिजापलीडले
प्रकरण तिसरे
एका अद्भुत प्रयोगाबद्दल चर्चा करून समीरच्या विचार चक्राला चालना मिळाली. घरी आल्यावर समीर नेहमीच्या दिनचर्येमध्ये व्यस्त झाला.अभ्यास, लेक्चर्स,सबमिशनस! आठवडा कधी संपत आला कळला देखील नाही. तरीही मनात सतत प्रयोगाबद्दलचे विचार घोळत होते. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता समीर सरांच्या घरी दाखल झाला.
सरांनीही समीरचे हसून स्वागत केले. आज सरांचा चेहरा जरा प्रसन्न वाटत होता. त्यावरून समीरने ताडले की प्रयोगाची तयारी झालेली आहे. देवीप्रसादला आधीच सांगून सरांनी काही सँडविचेस आणि थर्मासभर फिल्टर कॉफी बरोबर घेतली. म्हणजे आता पुढचे दहा-बारा तास कोणताही व्यत्यय येणार नाही अशी खबरदारी घेत दोघेही प्रयोगशाळेकडे गेले.
“समीर तुला आता अंदाज आला आहे की, आपण काय प्रयोग करणार आहोत. तुझ्या दृष्टीने हा प्रयोग करण्यासाठी काय मोड्यूल्स लागू शकतात याबद्दल काही विचार केला आहेस का?” प्रोफेसर वसिष्ठांनी विचारले.
“हो सर! मी एक आराखडा तयार केला आहे. आणि तो ह्या पेपरवर उतरवला आहे. “ असे म्हणत समीरने बॅगेतला मोठा पेपर काढून टेबलवर पसरला. त्यात त्याने खूप लहान-सहान गोष्टीही नमूद केल्या होत्या.
"ट्रान्समिटर बरोबर एक रिसिव्हर आणि एक डिकोडर लागेल.फ्रिक्वेन्सी मॉड्यूलेटर पण लागेल.आपले डोळे आणि कान खूप हाय किंवा खूप लो फ्रिक्वेन्सीसाठी तयार नसल्यामुळे डिकोडरची आवश्यकता असेल असा माझा प्राथमिक अंदाज आहे.” इतक्या तयारीने आलेला समीर ऊत्साहात बोलू लागला. त्याच्या तयारीचं आणि ऊत्साहाचं सरांना खूप कौतुक वाटले.
“अगदी बरोबर! मला माहिती होते की तू तुझा आराखडा तयार करून आणशील आणि तो बऱ्याच प्रमाणात अचूक बनवला आहेस. पण एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे.” प्रोफेसर वसिष्ठ म्हणाले.
“कुठली गोष्ट सर?” इति समीर!
“आठव! मी तुला मनाच्या मितीचे तीन पैलू सांगितले होते आणि या आराखड्यामध्ये जडत्व या पैलूबद्दल काहीही उल्लेख नाही. अर्थात आपण आत्ता ह्या विषयावर काम नको करायला. त्या विषयावर माझा अभ्यास अजून पूर्ण झाला नाही.आत्ता त्याचा प्रयोग करणे धोक्याचे ठरु शकते. आधी आपण सूक्ष्म देहाचा प्रयोग करुयात.
“पण सर! गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध शक्ती निर्माण करण्यासाठी तर मोठाली मशिनरी लागेल. ते आपण कसे करणार?”
“त्यासाठी मी एक विचार केला आहे. आपण आपल्या देहामध्ये खूप तीव्र कंपनी निर्माण करून कंपने निर्माण करुन 'अपथ्रस्ट लिफ्टिंग (गुरुत्वाकर्षण विरोधी शक्ती) च्या सहाय्याने देहासकट जाऊ शकतो. पुर्वीच्या काळी ऋषि-मुनिंनी गायत्री मंत्र किंवा अशाच खूप शक्तिशाली मंत्राचा ऊपयोग करुन ही कंपने निर्माण केली असावीत. पण आत्ता आपण फक्त मनाच्या मितिच्या दोनच पैलूंचा विचार करूयात. सखोल अभ्यास केल्याशिवाय हा प्रयोग धोक्याचा ठरु शकतो.
आत्ता आपण तुझ्या मोबाईलमध्ये ही मी आणलेली मेमरी चीप घालूयात. ह्या सगळ्या मॉड्यूल्सची एक ऍप्लिकेशन फाईल बनवूयात. आणि ती तुझ्या मोबाईलमध्ये रन करुयात.
तुझा मोबाईल हा रिसिव्हरचं काम करेल आणि ही गोल तबकडी ट्रान्सिमीटरचं, जी मी माझ्या हातात बांधीन. आपल्या लहरी जेंव्हा एका सामायिक पातळीवर येतील, तेंव्हा दोन्ही लहरी लॉक होतील आणि तुझ्या मनातले विचार मला डिकोडरच्या सहाय्याने कळतील. इथे असलेल्या ह्या मॉनिटरवर आपल्या लहरींचे आलेख उमटत रहातील. जोपर्यंत त्या एकमेकांशी बांधलेल्या अवस्थेत असतील, तोपर्यंत लहरींमध्ये सुसंगता असेल. आणि ह्या खालच्या बाजूला ज्या अनियमित लहरी उमटतील ते तुझ्या मनातले विचार असतील, जे मी डिकोडरने ओळखू शकेन. तर तू आत्ता सगळी साधने आपल्याला हव्या असलेल्या फ्रिक्वेन्सीला तयार कर.”
“ठीक आहे सर!” असे म्हणून समीर कामाला लागला. मुळातच हुशार आणि नाविन्याची आवड असलेल्या समीरने भराभर हवे असलेले कोडिंग करून सगळी छोटी मॉड्यूल्स् एका अप्लिकेशन मध्ये लिंक केली आणि स्वत:च्या मोबाइलवर घेतली.
हे सगळं करेपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेले होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती. बाहेर थोडा रिमझिम पाऊस चालू झाला. छान थंड वातावरण होते.
“आता आपण थोडा वेळ थांबुन काहीतरी खाऊन घेऊयात.” असे प्रोफेसर म्हणाले.
मग त्यांनी आधीच आणून ठेवलेली सँडविचेस आणि गरम गरम कॉफी आस्वाद घेतला. थोडावेळ दोघांनी बाहेरचा पाऊस बघत आत्तापर्यंत केलेल्या प्रयोगाच्या तयारीची उजळणी केली.
थोड्या वेळाने आत येऊन एक ओमकार करून प्रयोगाला सुरुवात केली. नाही म्हटलं तरी समीरच्या मनात थोडी धाक धुक होतीच. दोघांनी आपली ऊपकरणे चालू केली आणि एक विशिष्ट बटण दाबले. इकडे सरांनी आपल्या हातावरचे उपकरण चालू करून सिग्नल पाठवायला सुरुवात केली. एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला दोन्ही मनांची फ्रिक्वेन्सी मॅच झाली आणि समीरचे डोके हळूहळू जड व्हायला लागले. बाहेर पावसाचा जोरही जरा वाढला होता. आता विजांचा कडकडाट सुरु झाला आणि ढगसुद्धा गडगडायला लागले. मॉनिटरवर अनेक अनियमित लहरीचा आलेख उमटायला लागला. हेच समीरच्या मनात येणारे असंख्य विचार!! सरांकडे असलेल्या उपकरणाद्वारे सर ते वाचायचा प्रयत्न करत होते. अनेक विचारांची सरमिसळ स्पष्टपणे त्या स्क्रीनवर दिसत होती.
अचानक एक जोरदार वीज चमकली. त्या विजेच्या लहरीने दोन लहरींची सुसंगती बिघडली आणि तिथे वेड्या-वाकड्या लहरी ऊमटू लागल्या. एक क्षण समीरच्या हातात असलेल्या मोबाईलने विजेच्या लहरीला ही पकडायला सुरुवात केली. त्यामुळे समीरला जरा त्रास जाणवू लागला.
सरांच्या लक्षात आले आणि झटकन त्यांनी दोन्ही उपकरणं बंद केली. दोघांचेही डोके भलतेच जड झाले होते. समीरच्या ह्रदयाची धडधड वाढली होती. समीरने हळूहळू डोळे उघडले. शांतपणे थोडे पाणी प्यायले. आणि आता सर काय म्हणतायत ह्याची वाट बघू लागला.
“आपला प्रयोग थोड्याफार प्रमाणात का होईना यशस्वी झाला आहे. पण आता महत्त्वाचा प्रश्न! नको असलेल्या फ्रिक्वेन्सीला गाळणे. एकदा एक फ्रिक्वेन्सी मिळाली कि बाकीच्या फ्रक्वेन्सी फिल्टर लाऊन गाळल्या गेल्या पाहिजेत. कारण हा गोंधळ झाला तो नको असलेल्या फ्रिक्वेन्सीमुळे. त्याप्रमाणे मी डिझायनिंग आणि कोडिंग बदलतो. तू आता घरी जा. मीही जरा विश्रांती घेतो. पण त्या पूर्वी सगळ्यात महत्त्वाचे! ते ऍप मोबाईलवरुन काढून टाक.” असं सरांनी सांगताच समीरनेही मोबाईल मधून ते ऍप काढून टाकले.
त्यानंतर समीर आपल्या दैनंदिन कामात बुडून गेला. आणि सरही त्यांच्या दिनचर्येत व्यस्त झाले.
एकीकडे या विषयावर दोघांचाही अभ्यास चालू होता. आता समीरची दुसऱ्या वर्षाची परीक्षा जवळ येत होती जवळ आली होती, त्यामुळे त्याने पूर्ण लक्ष आता अभ्यासावर केंद्रित केले. समीरची परीक्षा संपली आणि त्यांनी लोणावळ्याचा प्लॅन बनवला. आणि लोण्यावळ्याला समीरला त्या विलक्षण अनुभवाला तोंड द्यावं लागलं.
आता पुढे...
आजचा दिवस!
आज सरांना भेटून गेल्यावर समीरला जाणवले, या प्रयोगाशी संबंधितच आपल्याबरोबर काही तरी घडले असावे. पण आपण तर ते ऍप सरांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधून काढून टाकले होते. मग कसं हे घडेल अशी शंका समीरच्या मनात घोळू लागली. समीर आता पूर्णपणे बरा होऊन कॉलेजला जाऊ लागला होता. थोड्याच दिवसात त्याची तब्येत सुधारून तो परत पूर्वीसारखा झाला. आता त्याला उत्सुकता होती ती, त्याच्या मनातल्या शंकेच्या निरसनाची.
एक दिवस सरांना वेळ आहे, असे बघून तो सरांकडे गेला आणि त्याने आपली शंका सरांना बोलून दाखवली. “सर, मला तुमच्याशी काही बोलायचे आहे. किती वाजता येऊ शकतो भेटायला?
सर म्हणाले,”मलाही तुझ्याशी बोलायचे आहे. फक्त तू जरा बरा होईपर्यंत मी वाट बघत होतो. आज संध्याकाळी सहा वाजता प्रयोगशाळेमध्ये ये.”
“ठीक आहे.” असे म्हणत समीर संध्याकाळी सहाची वाट बघू लागला. दिवसभराचे कॉलेज संपल्यावर कॅन्टीनमध्ये थोडेफार खाऊन समीर सरांच्या घरी गेला. सरांनी त्याला आपल्या प्रयोगशाळेत नेले.
समीरने बोलायला सुरुवात केली,”सर! मला जो अनुभव आला त्याचा आपल्या प्रयोगाची काहीतरी संबंध आहे.” असे मला राहून राहून वाटते. पण मी तर माझ्या मोबाईल मधून ते अप्लिकेशन डिलीट केले होते. मग काय नक्की काय घडले असावे. तुमचा काय तर्क आहे?”
सर म्हणाले,”मी ही गेले काही दिवस याचाच विचार करत आहे. माझ्या अनुमानाप्रमाणे जरी तू मोबाईलमधून एप्लीकेशन डिलीट केले असले. तरी त्याची नोंद मोबाईलच्या मेमरीमध्ये कुठेतरी राहिली असावी आणि जसे आपण हे प्रयोग करत आहोत, तसं आपल्यापेक्षा कोणीतरी अधिक प्रगत आणि अधिक ज्ञान असलेले असलेले जीव त्या परिसराच्या आसपास असावेत. पण ते दुसऱ्या मिती मध्ये असल्यामुळे आपल्याला दिसत नसावेत. तुझ्या मोबाईलमध्ये असलेल्या नोंदीमुळे आणि अनावधानाने तू जी बटणे दाबलीस त्यामुळे त्यांनी तुझ्या मोबाइलच्या लहरी पकडल्या असाव्यात.तू दुसर्या मितीमधे जाण्याच्या ऊंबरठ्यावर होतास.
तुझ्या शरीरात जी कंपनी निर्माण झाली ती त्यामुळेच! तुझ्या हातातून मोबाईल खाली पडून बंद झाला आणि त्यांच्याशी असलेला तुझा संपर्क तुटला. आणि तू आपल्याच मितीमधे राहिलास.
आता मी माझ्या मोबाईलमध्ये हे ऍप लोड करून लोणावळ्याला जाणार आहे.”
“सर! ते खूपच धोक्याचे आहे.” इति समीर.
“असू दे! पण आपण रिसेट प्रोग्रॅम लिहिला आहे आणि तू माझ्या प्रयोगशाळेत बसून माझ्या हालचालींवर आणि माझ्या
मोबाईल मधून निघणाऱ्या लहरींवर लक्ष ठेवायचे आहे. या मॉनिटरवर तुला दिसेल. जर का त्या लहरी खूपच अनियमित झाल्या किंवा त्या लहरी अंधुक झाल्या तर तू हे बटन दाबून रिसेट प्रोग्राम रन करायचा आहे. हे सगळं खूप रिस्की आहे, हे मला माहित आहे. पण जर का आपण यात यशस्वी झालो तर विज्ञान क्षेत्रात ही खूप मोठी झेप ठरेल आणि ही सुवर्ण संधी मी सोडू इच्छित नाही.”
“पण हे आपण कधी करायचे?”
“हे जितक्या लवकर होईल तेवढे बरे, असे मला वाटते.”
“ठीक आहे सर!”
“आपण या शनिवारी भेटूयात!”
बघता बघता शनिवार उजाडला. मुद्दामूनच शनिवारी रात्रीची वेळ निवडली होती, जेणेकरून कोणालाही कुठल्या गोष्टीची खबर लागू नये. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता समीर आणि सर प्रयोगशाळेत भेटले.
सरांनी त्यांच्या खिशातून एक किल्ली काढून समीरला दिली आणि सांगितले, “ही माझ्या कपाटाची किल्ली! ज्यात माझे आत्तापर्यंत केलेले सगळे संशोधन आणि आपला आजचा प्रयोग ह्याबद्दल सविस्तर माहिती लिहून मी सुरक्षित ठेवले आहे. त्यात माझी इतर सगळे डिटेल्स देखील आहेत. जर का मी परत येऊ शकलो नाही, तर माझा उत्तराधिकारी म्हणून तू माझे सगळे प्रकल्प पुढे नेशील ह्याची मला खात्री आहे.”
सरांच्या या सारवासारवीच्या बोलण्याने समीरच्या मनावर प्रचंड ताण आला. त्याने एकदा सरांना सांगितले, “सर! आपण परत विचार करूयात का? मला खूप भीती वाटत आहे.”
“हे बघ समीर! पहिल्यांदा प्रयोग करताना नेहमीच धोका असतो. प्रत्येक वेळेला जर का शास्त्रज्ञांनी हा विचार केला असता, तर आज आपण अवकाशात यान पाठवू शकलो असतो का? माणूस चंद्रावर उतरला असता का? तू निश्चिंत रहा. जर का प्रयोग यशस्वी झाला, तर विज्ञान क्षेत्रात एक मोठी झेप ठरेल आणि मी नाही परत येऊ शकलो तर माझे कार्य तू पुढे चालू ठेवशील अशी मला खात्री आहे.”
“ठीक आहे!” असे म्हणत पुन्हा एकदा दोघांनी प्रार्थना केली आणि प्रयोगाला सुरुवात केली.
सर समीरचा निरोप घेऊन लोणावळ्याकडे रवाना झाले. ज्या बंगल्यात समीर आणि त्याचे दोस्त उतरले होते तिथेच त्यांनी आपली गाडी लावली आणि आपला मोबाईल घेऊन समीरने सांगितलेल्या ठिकाणाच्या दिशेने चालत निघाले.जर का सरांच्या अनुमानप्रमाणे अतिप्रगत जीव तेथे असतील, तर दुसर्या मितीत जाण्याचा त्यांचा प्रयोग यशस्वी होणार होता.
सर हळूहळू चालत जंगलाच्या दिशेने निघाले. त्यांनी आपले ऍप चालू ठेवले होते. पावसाची बारीक रिपरिपही चालू होती. त्यांनी अंगावर रेनकोट चढवला आणि आपल्या रेनकोटच्या खिशात मोबाइल ठेवला. हळू हळू अंदाज घेत ते पुढे सरकत होते. तिकडे समीर मॉनिटरवर लक्ष ठेवून होता. सध्यातरी सरांच्या फ्रिक्वेन्सी आलेख नियमितपणे चालू असलेला दिसत होता. अचानक एके ठिकाणी सरांच्या फ्रिक्वेन्सी आलेख वर-खाली होताना दिसला. समीर सावध झाला. आणि एका फ्रिक्वेंन्सीवर स्थिरावला. सरांच्या फ्रिक्वेंसीने दुसरी फ्रिक्वेंसी पकडली होती. आता सरांच्या शरीरात अती तीव्र कंपने सुरु झाली. वातावरण बदलत चालले. सर्वत्र मिट्ट काळोख!कंपने अधिक तीव्र. डोके जडावत चालले होते. तेव्हढ्यात एक कानाचे पडदे फाटतील असा तीव्र आवाज आला! थोड्याच वेळात हवेत विरल्यासारखे सर तिथून गायब झाले. तिकडे समीरच्या मॉनिटरवर फ्रिक्वेंसी आलेख नियमीत सुरु झाला. सरांनी दुसऱ्या मितीमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी आपल्या मोबाईलवर डीकोडरचे बटन दाबले. आता सरांना समोर सर्व स्पष्ट दिसू लागले. त्यांचा प्रयोग यशस्वी झाला होता.
सरांच्या समोर एक वेगळीच दुनिया होती. सरांना समोरून एक अतिशय प्रखर तेजस्वी स्त्रोत येताना दिसला. त्या आक्रुतीमधून "अ...ऊ....म..., अ...ऊ....म........ ओ..म... ओम..." असे अती ऊच्च स्वर गुंजत होते. हाच तो आवाज मगाशी कानावर आदळला होता. सरांनी डोळे ताणून बघायचा प्रयत्न केला. पण डिकोडरची क्षमता कमी पडली. एका तेजस्वी प्रकाशाचा स्त्रोताखेरीज काही दिसत नव्हते.
तो तेजस्वी स्त्रोत धीर गंभीर आवाजात बोलू लागला.' या प्रोफेसर वसिष्ठ! ' आपले नाव आणि आपली भाषा ऐकून प्रोफेसर थोडे गोंधळले.
“असे गोंधळू नका प्रोफेसर. तुम्ही विसरलात, समीरच्या मोबाईल मधून तुमचे ॲप्लिकेशन काढले होते तरी आम्ही त्याच्या मनाच्या लहरी पकडल्या होत्या. आणि मनाचा मनाशी संवाद ह्याच विषयावर तुमचे संशोधन चालू आहे ना? तेंव्हा तुम्ही ताडलं होतं की आपल्यापेक्षा अती प्रगत कोणी तरी आहे इथे आसपास. मग तरीही शंका का आली तुमच्या मनात?”
सर जरा गडबडले होते.
“पण मला तुम्ही स्पष्ट दिसत नाही आहात? कोण आहात आपण? मी कोण?”
“तुला जे दिसत आहे, मी त्याच रुपात आहे. तुमच्या दुनियेतल्या मिती इथे लागू होत नाहीत.लांबी, रुंदी, ऊंची नसते इथे. असते ते फक्त तेजस्वी ऊर्जेच रुप. मी कोण? मी तुझाच एक अंश किंवा तू माझ्यातला एक अंश. आपण सगळे एकाच प्रखर कणातून निर्माण झाले आहोत. त्याला अणू म्हण.. विशुद्ध अणू म्हण... किंवा विष्णू म्हण... “
“मी सद्धया कुठल्या मितीमधे आहे? प्रुथ्वीपासून किती लांब?" सरांनी अधीरतेने विचारले.
त्याबरोबर तो ऊर्जा स्त्रोत जरा हलल्यासारखा झाला. कदाचित हसला असावा.
"तुझ्या वाचनात किंवा तुला प्रत्यक्ष देखील काही अनुभव आले असतील. देव पाठीशी होता, त्यानेच तारले. तो तारणारा हात मीच आहे. अनेकदा संत/महंतांनी प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे दर्शन दिले असं ऐकले असशील, ते रुप माझेच आहे. तू आत्ता ह्या पॉझिटीव्ह मितीमध्ये आहेस.जिथे अध्यात्माच्या भाषेत सांगायचे तर पुण्यात्मे आहेत. त्यालाच कल्याणकारी शक्ती म्हणतात. तुला मगाशीच सांगितलं तसं ह्या मितीला निश्चित स्थान नाही कारण तुमच्या मिती इथे लागू होत नाहीत. ह्या शक्तीचे घटक तुमच्याच आसपास कुठे तरी असतात. म्हणूनच घरात तुमची वडील-धारी माणसे सांगत असतात की नेहमी चांगलं शुभ बोलावं.अशुभ बोलण्याने आमची तीव्रता कमी होऊ शकते. जितकी निगेटीव्हिटी ऍड होते, तितकी पॉझिटीव्हिटी कमी होते. तुमचं विज्ञान हेच सांगते ना?” अशीच एक वेगळी निगेटिव्ह ऊर्जा असणारी वेगळी मिती आहे. त्याला तुम्ही डार्क एनर्जी किंवा डार्क मॅटर म्हणता. अनेक वेगवेगळ्या मिती आहेत. त्याचा अभ्यास पूर्वी तप साधना, तंत्र/मंत्रच्या सहाय्याने केला गेला आहे. पुढे त्यात विशुद्दता न रहाता त्याचं हिडीस रुप समोर ठेवलं गेलं. स्वार्थापोटी त्याची रुपं बदलत गेली. आणि मग प्रलयाच्या रुपात जगाचा नाश झाला. पुन्हा नवीन सुरुवात झाली. आता नवीन जीव,नवीन ग्रहावर पुरेश्या पोषक वातावरणात सुरुवात झाली. जे द्यान पूर्वी मिळवलं गेलं ते गोष्टीरुपात लोकांसमोर मांडलं गेलं. कदाचित स्वार्थापोटी. प्रुथ्वीचे सुर्यापासूनचे अंतर, ब्रम्हांडाची निर्मिती, अनेक आकाशगंगा ह्या गोष्टींचा ऊल्लेख वेद-पुराणात आहे. हे सगळं कसं मिळवलं असेल? ह्या मनाच्या मितीला जागवूनच!तुझ्या शोधाची दिशा अगदी योग्य होती.”
प्रोफेसर भान हरपून सगळं ऐकत होते. अचानक "दिशा योग्य होती... होती? हा शब्द प्रयोग का केला गेला?" अशी शंका त्यांच्या मनात आली.
परत एकदा तो ऊर्जेचा स्त्रोत जरासा हलला.
"प्रोफेसर, एक चुक झाली तुमच्याकडून!"
"काय झालं?" सरांनी दचकून विचारले.
"तुम्हालाही माहित आहे. ह्या दुनियेत काळ अनादी-अनंत आहे.आणि तुमची फ्रिक्वेन्सीची व्याख्या ही काळाच्या व्यस्त प्रमाणात आहे. काळ अनंत असेल तर तुमच्या सगळ्या लहरी आता शून्य झाल्या आहेत.”
सरांना आता त्या मागचा धोका जाणवला. घाई-घाईत त्यांनी समीरच्या ट्रान्समिटरवर सिग्नल पाठवला. दोन मितींमधल्या लहरींची सुसंगती बिघडली होती. इकडे समीर सतत मॉनिटरवर लक्ष ठेवून होता. अचानक मॉनिटरवर अतिशय वेड्यावाकड्या लहरींचा आलेख उमटायला लागला. त्याने त्यातला धोका ओळखला. आलेख जस-जसा बिघडायला लागला, तसं-तसे वातावरण अचानक बदलले. जोरदार पाऊस सुरू झाला. विजांचा प्रचंड कडकडाट सुरु झाला आणि एक अती तीव्र ऊर्जा स्त्रोत वेगाने सर्वत्र फिरला. त्या विजेच्या झटक्याने तिथली एकेक ऊपकरणे बंद पडायला लागली. सर्व ऊपकरणांचे स्फोट व्हायला लागले. हे सर्व इतक्या वेगाने घडले की क्षणभर समीरला काय चाल ले आहे ते कळेना. जेव्हा तो भानावर आला, तेव्हा एक एक उपकरण त्याला जळताना दिसत होते. आणि क्षणार्धात सर्वच प्रयोगशाळेला आग लागली. त्याही स्थितीत त्याने पटकन रिसेट प्रोग्रॅम चे बटन दाबले. रीसेट प्रोग्रॅम सुरू झाला आणि समीर आगीमुळे आणि धुरामुळे प्रयोगशाळेच्या दारातच बेशुद्ध पडला.
दहा दिवसानंतर.....
समीरने डोळे उघडले. तो एका हॉस्पिटलमध्ये होता. आजूबाजूला त्याचे मित्र, आई-बाबा उभे होते. समीरला कळेना, की काय झाले आहे?
“आता कसे वाटते आहे? “
“मी बरा आहे. सर…” असे एकदम त्याच्या तोंडून निघून गेले. पण त्याचे बोलणे अगदीच अस्पष्ट होते. चेहऱ्यावरील भाजल्याच्या खुणा होत्या. समीर घाईने उठू लागला.
“थोडा आराम कर! आता तुझ्या जखमा बऱ्या झाल्या आहेत. संध्याकाळी तुला घरी सोडणार आहेत.” समीरचे बाबा म्हणाले.
संध्याकाळी घरी आल्यावर समीर तडक प्रयोगशाळेकडे गेला. प्रयोगशाळेच्या जागी पूर्णपणे जळून खाक झालेली इमारत त्याला दिसली. सरांचे सर्व संशोधन, त्यांचा नवीन प्रयोगाची माहिती, सर्व काही बेचिराख झाले होते. तो घाईघाईत सरांच्या घरात गेला. तिथे दिवाणखान्यात सरांचा हार घातलेला फोटो बघून तो त्याला प्रचंड धक्का बसला. देवीप्रसादने सांगितले, ”सर कुठे गेले कोणालाच कळले नाही. त्यांची गाडी मात्र लोणावळ्याला सापडली.”
ते ऐकून समीरच्या मनावर खूप मोठा आघात झाला. तो विमनस्क अवस्थेत स्वत:शीच बडबड करु लागला. इतक्यात समीरच्या बाबांबरोबर एक पोलिस इन्स्पेक्टर सरांच्या घरी आला.
“तू सरांच्या प्रयोगशाळेत काय करत होतास? असे सरांच्या गायब होण्यामध्ये तुझा हात असावा असा आम्हाला दाट संशय आहे. तुला चौकशीला सामोरे जावे लागेल.” असे इन्स्पेक्टर म्हणताच, तो जोर-जोरात हसायला लागला.
"हो मीच मारलं सरांना!" असं बरळायला लागला. नाईलाजाने त्याची रवानगी वेड्याच्या इस्पितळात करावी लागली.
तिकडे सरांचा रिसेट प्रोग्रॅम अर्धवटच राहिला. ते दुसऱ्या मितीतून पहिल्या मितीत येत असतानाच सर्व संपर्क तुटला. ते दोन मितीच्या ऊंबरठ्यावर त्रिशंकूसारखे लटकत राहिले… अनादि… अनंतापर्यंत…!!!! आणि तिकडे त्या बंगल्याच्या आसपास वाईट शक्तिंचा वावर आहे ह्या अंधश्रद्देला अजूनच पुष्टी मिळाली.
समाप्त!
धन्यवाद!
-- यशश्री पाटील.
||"श्री दत्तार्पणमस्तु"||
'ईदं न मम'
#BeyondHorizon #ScienceFiction #BeyondHorizon
July 14, 2022
घरी कॅाफी व्हायची ती फक्त भजनी ग्रूप घरी येणार असेल तेव्हा!किंवा अजिबात कधीही चहा न प्यायलेले, “फक्त कॅाफीच” पिणारे पाहुणे घरी येणार असतील, तेव्हा!तेव्हाही शेजारच्या वाण्याकडून कॅाफी पावडर आणायची आणि साधी कॅाफि बनवायची!
भजनी मंडळाच्या वेळी मात्र छान दाट, ताजी वेलची , जायफळ पावडर घालून, खास कॅाफी बनवली जायची! मला ती गोड कॅाफी आवडायची, आणि जास्ती ती उकळत असतांनाचा वास आवडायचा!.. इतकंच माझं कॅाफी बद्दल प्रेम आणि ज्ञान !
जेव्हा कॅाफी बाटल्यातून, छोट्या साशा तून मिळायला लागली तेव्हा ब्रू,टाटा,नेस कॅफी अशी त्यांची नांवे कळायला लागली.
October 22, 2023
अशा मालिकेतला २०१९ चा एक चित्रपट अचानक नेटफ्लिक्स वर दिसला- The Sky is pink ! आयेशा चौधरीच्या सत्यकथेवर आधारीत हा चित्रपट आवडून गेला. नांव असं का ठेवलंय, खूप वेळ संदर्भ लागला नाही. मग ट्यूब पेटली- आजकालच्या परिभाषेत प्रसूतिगृहात बाळ जन्माला आले की मुलगा असेल तर ब्लू आणि कन्यारत्न झाले असेल तर पिंक असं म्हणायची पद्धत आहे.
January 15, 2022
काही काही माणसं स्वत:वर इतकं अफाट प्रेम करतात की त्यातुन त्यानां बाहेर येणं जमतच नाही. त्यात त्यांचे स्वत:चे असे काही अंगभूत गूण वैशिष्ठ्यही असतात त्यामुळे अशी माणसं दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यात ती जर कलावंताच्या कुळीतील असतील तर मग बोलायलाच नको !!!! अनेकदा त्यांच्या विक्षिप्त वागण्याने ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात. गमंत म्हणजे त्यांच्यावर मना पासून प्रेम करणारा एक मोठा वर्गही असतो. शास्त्रज्ञ, साहित्य, खेळाडू, कलावंत या क्षेत्रातील अनेक नामवंत त्यांच्या विशिष्ट अशा स्वभावामुळे कायम चर्चेत राहतात.
बलुचिस्थान येथे एका काश्मिरी पंडीताच्या घरात एक देखणे मूल जन्मले. इतर मुलां सारखेच शालेय व कॉलेज शिक्षण घेत मोठे झाले. १९४० च्या दरम्यान या तरूण मुलाला मुंबईतल्या माहिम पोलिस स्टेशनात पोलिस इन्स्पेक्टरची नोकरी लागली. या चौकीतला हा एकदम रूबाबदार व देखणा इन्स्पेक्टर अनेकानां भूरळ घालत असे. मग एक दिवस कुणी तरी त्याला म्हटले -‘तुम तो एकदम हिरो दिखते हो. फिल्मोमे काम क्यूँ नही करते.’ मग काय ? त्याच्याही डोक्यात किडा गेला की मी का प्रयत्न करू नये. पोलिस स्टेशनला अनेकदा चित्रपटसृष्टीतली अनेक माणसे येत असत. यापैकी एक होते चित्रपट निर्माते बलदेव दुबे. या तरूण इन्स्पेक्टरची एक खासियत होती ती म्हणजे त्यांची बोलण्याची विशेष ढब. दुबेला ती जाम आवडली. त्यांनी या तरूणाला चित्रपटात भूमिका देण्याची ऑफर दिली. ज्या क्षणाची हा तरूण वाट बघत होता ताक चालून त्याच्याकडे आला होता. क्षणाचाही विलंब न करता तो हो म्हणाला. दूबे यांनी आपल्या “शाही बाजार” या चित्रपटासाठी मूख्य नायकाची भूमिका त्याला देऊ केली.
या तरूणाचे नाव होते कुलभूषण पंडित. मागचा पूढचा फारसा विचार न करता मग त्याने चित्रपटासाठी धाडकन् नोकरीचा राजीनामा दिला. ही घटना १९५२ ची. विशेष म्हणजे पूढच्या पाच वर्षात या तरूणाला रंगीली, अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी,कृष्ण सुदामा असे चित्रपट मिळाले खरे पण सूर काही सापडेना. कलावंत असो की शाही माणूस पोट नावाचा अवयव त्याला नेहमीच आपल्या ताब्यात ठेवत असतो. नोकरी गेल्यामुळे आथिर्क परिस्थिती पण बिघडली. मग १९५७ मघ्ये मेहबूब खानचा महत्वकांक्षी चित्रपट ‘मदर इंडिया’ आला. हा संपूर्ण चित्रपट नर्गिसच्या राधा या मूख्य पात्रा भोवती केंद्रीत केलेला होता. त्यात तिच्या नवऱ्याची एक छोटीशी भूमिका कुलभूषणला मिळाली आणि त्या छोट्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटा पासून कुलभूषणचा खऱ्या अर्थाने नवीन जन्म झाला व मग सुरू झाला ‘राजकूमार’ या काहीशा विक्षिप्त अभिनेत्याचा चित्रपट प्रवास.
एस.एस. वासन या दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शकाचा १९५९ मध्ये “पैगाम” हा चित्रपट आला जो सूपरहिट झाला. या चित्रपटात राजकुमार (रामलाल) दिलीपकूमारचा मोठा भाऊ होता. खरे तर राजकुमार ज्या सामाजिक घटकात व परिस्थितीत वाढलेला होता त्याला बरीचशी छेद देणारी भूमिका पैगाम मधील रामलाल या पात्राची होती. रामलाल हा एक सामान्या मील कामगार पण आपल्या भावावर अत्यांतिक प्रेम असणारा व यासाठी अफाट कष्ट करून त्याला शहरात शिकायला पाठवणारा. ही भूमिका त्याने खरोखच मना पासून केली. दिलीप राज या दोन्ही कुमारांनी आपापल्या अभिनयात जान ओतली. त्यांची जुगलबंदी बघावयास मिळाली. पण नंतर मात्र हे दोघे एकत्र कधीच दिसले नाही. दिसले ते थेट ३२ वर्षानंतर सुभाष घईच्या ‘सौदागर’ मध्ये. मी कुठे तरी वाचल्याचे आठवते की पैगाम चित्रपटातल्या एका प्रसंगात राजकुमारला दिलीपकुमारला थप्पड मारायची होती आणि ती त्याने खरोखरीच सणकावून लगावली आणि मग दोघांचा बेबनाव झाला व कधी एकत्र आलेच नाही. असो. अभिनेत्यातील अहंकारी माणूस किंवा माणसातील अहंकारी कलाकार असे अनेकदा आमने सामने येतात तेव्हा असा बेबनाव होणे चित्रपटसृष्टीसाठी काही नवे नाही. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांतील सहजसुंदर व नैसर्गिक अभिनयाने राजकुमार यांना अभिनय सम्राटाच्या पदावर पोहचवले. मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरु झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरु राहिला.
मग त्यांच्या आयुष्यात १९६५ मध्ये आणखी एक कलाटणी देणारा चित्रपट आला. बी.आर. चोप्राचा भारतातील पहिला मल्टीस्टार चित्रपट ‘वक्त’. बलराज सहानी, राजकूमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिल टागोर, रेहमान, मदन पूरी असे सर्वच नामवंत अभिनेते यात होते. चित्रपटात भव्यते सोबत संगीताची मेजवानीही होती. विविध सुंदर लोकेशन्स वरील चित्रीकरण, श्रीमंती थाट व गरीबीचा खास भावूक ड्रामा सर्व काही यात होते. या चित्रपटातील राजकुमारची भूमिका आगोदरच्या सर्व चित्रपटापेक्ष वेगळी होती. कृष्णधवल चित्रपटातील गरीब, कामगार, मध्यमवर्गीय अश्सा चेहरा असणारा राजकूमार या चित्रपटात एकदम लॅव्हीश व्हाईट कॉलर गुन्हेगार म्हणून पडद्यावर आला. जिच्यावर आपण प्रेम करतो ती आणखी कुणावर प्रेम करते आणि योगायोगाने तो आपलाच भाऊ आहे हे समजल्यावर होणारे भावनिक ताणतणाव यात राजकुमार यांनी अप्रतिम साकार केले. या चित्रपटातील त्यांचे सर्व डायलॉग “हम” या शब्दाने सुरू होत किंवा संपत.मात्र या चित्रपटा नंतर ही “हम”ची बाधा त्यानां कायम जडली किंवा बिंबवून घेतली. राजकूमार स्वत:ला ‘हम’ या संबोधना पासून बोलायला लागले ते अखेरचा श्वास घेई पर्यंत. या चित्रपटातील त्यांच्या तोंडचे संवाद हे तुफान लोकप्रिय झाले. संवाद बोलण्याच्या त्यांच्या अंदाजावर प्रेक्षक इतके फिदा होते की ज्या चित्रपटात राजकुमार असत तो चित्रपट कसा का असेना प्रेक्षक डॉयलागबाजी ऐकायला चित्रपटाला तुफान गर्दी करायचे. याच वर्षातला त्यांचे “काजल” हा मिना कुमारी सोबतचा “रिश्तेनाते” आणि “उंचे लोग” हे चित्रपट चांगलेच गाजले.
भारतीय ग्रामीण नायकाचा चेहरा म्हणून ते अनेक चित्रपटात शोभले. भारतीय संस्कृतीत वडीला नतंर मोठा भाऊ हा वडीलाच्या ठायी असतो. हा भाऊ बहूतेक वेळा कुटूबांसाठी आपल्या अनेक इच्छा व भावनानां दडपून टाकतो. राजकुमार यांचा अशा भूमिकेतील अभिनय खरोखरच अप्रतिम असे. मनाचा होणारा कोंडमारा ते आपल्या अभिनयातुन उत्कृष्ट सादर करत. सोबत त्यांच्या आवाजाचा एक विशिष्ठ पोत आणि संवादफैकीमुळे अभिनय सहज व नैसर्गिक होत असे. खरे तर प्रत्यक्षात ते अत्यंत उजळ कांतीचे अभिनेते होते. कृष्णधवल चित्रपटामुळे त्यांचा रंग फारसा आडवा आला नाही. पण म्हणून कदाचित रंगीत चित्रपटात नंतर त्यांना तशा भूमिका मिळाल्या नसाव्यात.
चेतन आनंद या निर्माता दिग्दर्शक शिवाय अख्ख्या चित्रपटसृष्टीत या अभिनेत्याचे कुणाशी वैयक्तिक असे सूर कधी जुळले नाही चेतन आनंदच्या सर्व चित्रपटात राजकुमार आणि प्रिया राजवंश हे हमखास असत. चेतन आनंद यांचा ‘हिर रांझा’ (१९७०) हा चित्रपट एक वेगळा प्रयोग होता. या चित्रपटातील काव्यमय संवाद हा त्या चित्रपटाचा आत्माच होता. राजकुमार आणि प्रिया राजवंश या दोघांनही यातील सर्व काव्यमय संवाद अप्रतिमच म्हटले आहेत. हमराज, नई रोशनी (१९६७), मेरे हुजूर, नील कमल, वासना (१९६८), लाल पत्थर, मर्यादा (१९७१), पाकिजा, दिल का राजा(१९७२), हिंदुस्तान की कसम(१९७३), ३६ घंटे(१९७४), एक से बढकर एक (१९७६), बुलंदी व चंबल की कसम (१९८०), कुदरत (१९८१), या सर्व चित्रपटापैकी काही वगळता ते मूख्य नायक जरी नसले तरी त्यांची समातंर भूमिका लक्षणीय असे. १९९१ मधील सुभाष घई निर्मित दिग्दर्शीत “सौदागर” मध्ये ते दिलिपकुमार सोबत पुन्हा दिसले. ९० च्या दशकात चित्रपटाच्या तंत्रात लक्षणीय बदल झाले होते. या दोघांचे समोरा समोरचे प्रसंग शूट करतानां हे तंत्र कामी आले. या चित्रपटात एकाच फ्रेममध्ये हे दोघे क्वचितच दिसतात. चित्रपटात जरी दोघे एकत्र दिसत असले तरी प्रत्यक्षात या दोन्ही अभिनेत्याच्या मनातील अतंर कमी झाले होते का? माहित नाही. पण व्यावसायिक तडजोडी करतानां खाजगी आयुष्य शक्यतो मिसळू देता कामा नये हे अनुभवाने अनेकानां समजते तसे ते या दोघानाही कदाचित समजले असावे. १९९३ मधील काहीसा भडक असणारा “तिरंगा” हा मराठमोळा नाना आणि राजकुमार यांच्यामुळे चांगलाच गाजला. याती दोघांनीही आपापल्या स्टाईलने संवादाची चांगलीच फटकेबाजी केली.
८० च्या दशका नंतरच्या बहूतेक चित्रपटात त्यांच्या डायलॉगबाजीने त्यांच्यातल्या सहज सुंदर अभिनयावर मात केली. संवाद फेकीच्या नादात अभिनय लुप्त होत गेला. आयुष्यभरात ६०-६५ चित्रपटात काम करणारा हा अवलिया नट सर्वांच्या लक्षात राहिला तो संवाद फेकीमुळे आणि स्वत:च्या खाजगी आयुष्यात कुणालाच कधीच शिरकाव करू न देण्या बाबत. “दिल एक मंदीर” आणि “वक्त” या दोन चित्रपटाने त्यांना सह कलाकाराचा फिल्मफैअर पुरस्कार मिळवून दिला पण पुरस्कारात त्याना अजिबातच रस नव्हता आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी कधीच आपल्या कुटूबांला कुठल्याही सिने पार्टीत् वा शुटींग वा प्रिमियरमध्ये येऊ दिले नाही. आयुष्यभर हा अभिनेता कायम चर्चेत राहिला. अत्यंत लॅव्हिश जगला. चित्रपट सुष्टीत त्यांच्या केसां बद्दल एक चर्चा नेहमी होत असे. त्याना खूप लवकर टक्कल पडले व त्यांनी विग वापरायला सुरूवात केली. हा विग त्यांनी आपल्या केसांच्या मूळ वळणा सारखा हुबेहुब बनवुन घेतला आणि वाढत्या वया सोबत विगचे केसही पांढुरके करून घेतले. स्वत:च्या प्रेमा पडलेला माणूस ही पण त्यांची एक ओळख होती त्यामुळे ही खरीखोटी चर्चा होत असावी. जेनीफर या अंग्लो-इंडियन एअर होस्टेसशी त्यांनी लग्न केले. नंतर जेनिफरने हिंदू धर्म स्विकारला व गायत्री हे नाव घेतले. पूरू, पाणिणी हे दोन मुलगे आणि वास्तविकता ही मुलगी..पूरू ने काही चित्रपटात काम केले पण तो टिकू शकला नाही. राजकुमारने आपल्या मुलाला शेवटची इच्छा सांगितली ती अशी- ‘मौत और जिंदगी इंसान का निजी मामला होता है। मेरी मौत के बारे में मेरे मित्र चेतन आनंद के अलावा और किसी को नही बताना। मेरा अंतिम संस्कार करने के बाद ही फिल्मउद्योग को सूचित करना।’ ‘जानी’ ही दोन अक्षरे राजकुमारची ओळख होती असे म्हटले तर वावगे होणार नाही. तर अशा या झक्की अभिनेत्याचे काही खास संवाद-
# चिनायसेठ, जिनके घर शीशे के होते है…..,(वक्ता)आपके पांव देखे, बहुत हसीन हैं, इन्हेंग जमीन पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे……. (पाकीजा)
# हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। लेकिन वह वक्त भी हमारा होगा। बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी…..। (सौदागर)
# काश कि तुमने हमे आवाज दी होती तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते….। ('सौदागर')
# हम आंखो से सुरमा नहीं चुराते। हम आंखें ही चुरा लेते हैं……। (तिरंगा)
# हम तुम्हें वह मौत देंगे जो न तो किसी कानून की किताब में लिखी होगी और न ही किसी मुजरिम ने सोची होगी…¬¬। (मरते दम तक)
# हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है। दुश्मन से सीधी बात करती है………..। ('तिरंगा')
# दादा तो इस दुनिया में दो ही हैं। एक ऊपर वाला और दूसरा मैं………….।
…….आज त्यांचा जन्म दिवस. मन:पूर्वक अभिवादन..
-दासू भगत
( ८ ऑक्टोबर २०१८ )
October 17, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti