(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • वर्‍हाडातली गाणी – ६

    नदीच्या काठी राळा पेरला

    बाई राळा पेरला

    एके दिवशी काऊ आला

    बाई काऊ आला

    एकच कणीस तोडून नेल

    बाई तोडून नेल

    सईच्या अंगणात टाकून दिल

    बाई टाकून दिल

    सईन उचलून घरात नेल

    बाई घरात नेल

    कांडून कुंडून राळा केला

    बाई राळा केला

    राळा घेऊन बाजारात गेली

    बाई बाजारात गेली

    चार पैशाची घागर आणली

    बाई घागर आणली

    घागर घेऊन पाण्याला गेली

    बाई पाण्याला गेली

    मधल्या बोटाला विंचू चावला

    बाई विंचू चावला

  • नवे क्षितीज… नव्हे आव्हान

    २००६ हे वर्ष माझ्यासाठी नवीन आव्हाने घेऊन आले. डॉ. बेडेकर विद्या मंदिर ही माझी शाळा, तर बी.एन. बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स हे माझे बारावीपर्यंतचे कॉलेज! ही शाळा आणि कॉलेज ‘विद्या प्रसारक मंडळ' या शैक्षणिक संस्थेतर्फे चालवण्यात येते. या व्यतिरिक्त कॉमर्स आणि आर्टस् कॉलेज, पॉलिटेक्निक, लॉ कॉलेज, इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच मॅनेजमेंट कॉलेज असे या संस्थेचे खूपच मोठे कार्यक्षेत्र आहे. डॉ. विजय बेडेकर हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. विद्या प्रसारक मंडळाच्या सभेमध्ये डॉक्टरांनी मॅनेजमेंट कमिटीचा सदस्य (संचालक) म्हणून माझे नाव सुचवले. सभेत ते मान्यही झाले आणि मी या संस्थेच्या मॅनेजमेंट कमिटीचा सदस्य (संचालक) झालो. डॉक्टरांनी मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. मी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. माझ्यासाठी हा भावनिक क्षण होता. ज्या शाळेत आणि कॉलेजात मी शिकलो त्याच शाळेच्या आणि कॉलेजच्या मॅनेजमेंट कमिटीचा आता मी सभासद होतो, माझ्या शाळेशी आणि कॉलेजशी मी पुन्हा एकदा जोडला गेलो. असे काही घडले की मी स्तंभित होतो आणि विचार करायला लागतो की आयुष्याची ही निराळी, काहीशी अनपेक्षित वळणे काही आपण नियोजित केलेली नसतात. मग या घटना घडतात कशा? या सर्वांचे नियोजन नक्कीच कोणीतरी वेगळी शक्ती करत असते. आपण त्याला देव म्हणतो, आपला योग आहे असे म्हणतो, नशीब म्हणतो, काहीही म्हणतो. पण त्याचे उगमस्थान अजूनही अज्ञातच आहे. घटना चांगली घडली तर आपण आनंदित होतो. वाईट घडली तर आपण दुःखी होतो. पण हेसुद्धा फार काळ टिकत नाही. कारण आयुष्य काही काळाने वेगळे वळण घेते आणि आधीचे आपण हळूहळू विसरत जातो.

    मुंबई महानगरपालिकेच्या संगीत स्पर्धेचे मी परीक्षण केले. माझ्याबरोबर संगीतकार अच्युत ठाकूर आणि प्राची देवस्थळी होत्या. हिंडाल्को स्टाफ फेडरेशनसाठी सिल्व्हासा येथे गझलचा कार्यक्रम केला. मराठी सुगम संगीताचे विविध प्रकार दाखवणारा 'मराठी सुगम संगीत एक सुरेल लेणे' हा नवीन कार्यक्रम मी तयार केला. 'संस्कार भारती' या संस्थेने गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम आयोजित केला. समीरा गुजर आणि श्रीराम केळकर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. नंतर इंडस्ट्रियल इंजिनीयरिंगच्या ऑल इंडिया कॉन्फरन्समध्ये हॉटेल फरियाज, लोणावळा येथे गझल नाईट सादर केली. कोमल करंदीकर आणि दर्शना घळसासी या माझ्या विद्यार्थिनी या कार्यक्रमात गायल्या. लायन्स क्लबच्या सुगम संगीत स्पर्धेचा परीक्षक म्हणून मी अहमदनगरला गेलो. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण माझे संगीतकार प्रभाकर पंडित यांच्या हस्ते झाले. पंडित सर आता पुण्याला राहायला गेल्यामुळे नेहमी त्यांची भेट घडत नसे. "अरे, तुला भेटण्यासाठी मुद्दाम पुण्याहून या कार्यक्रमासाठी आलो.” पंडित सर म्हणाले. ते माझ्याच हॉटेलात उतरल्यामुळे आमच्या भरपूर गप्पा झाल्या. त्यांनी सुगम संगीतावर एक पुस्तक लिहिले होते. त्याची प्रत सही करून मला देतांना ते म्हणाले, "या पुस्तकात तुझा उल्लेख केलाय. तुझ्याबद्दल लिहिले आहे. ते वाच आणि पुस्तक कसे वाटले याचा अभिप्राय द्यायला पुण्याला घरी ये." "नक्की येतो." मी म्हणालो. पण तो योग येणार नव्हता. पंडित सरांशी माझी ही अखेरचीच भेट ठरली. काही दिवसांनीच हा प्रेमळ संगीतकार रसिकांसाठी त्याच्या सर्व रचना मागे ठेऊन निघून गेला. माझ्या पहिल्या कार्यक्रमाचे, पहिल्या कॅसेटचे, पहिल्या रेकॉर्डिंगचे ते संगीतकार होते. ५००व्या कार्यक्रमालाही त्यांची उपस्थिती होती. मात्र या पुढील कार्यक्रमांसाठी माझ्याबरोबर त्यांची गाणी असणार होती.

    -अनिरुद्ध जोशी

  • पै पै चा हिशेब

    संत एकनाथ महाराजांचे जनार्दन स्वामी हे गुरू. अगदी लहानपणापासून एकनाथ जनार्दन स्वामींच्या आश्रमात राहत होते. गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम ते अतिशय आवडीने, तातडीने आणि लक्ष देऊन करीत असत. त्यामुळे त्यांना दिलेले कोणतेही काम अगदी बिनबोभाट आणि व्यवस्थित होत होते. एकनाथांचे हे कामावरील प्रेम पाहून जनार्दन स्वामींनी त्यांना आश्रमातील आर्थिक व्यवहाराचा
    हिशोब ठेवण्याचे काम दिले होते. एकनाथ महाराज न चुकता रोजच्या रोज आर्थिक हिशोब लिहून ठेवत असत. जेणे करून हा हिशोब केव्हाही उपयोगी पडत असे.

    एके दिवशी मात्र एकनाथ असाच खर्चाचा सर्व हिशोब ठेवत असताना त्यांना एक पै ची चूक आढळून आली. त्यांनी पुनः पुन्हा बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार केला तरी एका पैचा हिशोब काही केल्या लागेना. त्यामुळे एकनाथ अतिशय अस्वस्थ झाले. त्यांचे कशातच लक्ष लागेना. त्यांनी त्या दिवशी भोजनही केले नाही. त्या 'पै'ची चूक शोधण्यासाठी त्यांचा हिशोब चालूच होता. रात्र उलटून गेली तरी त्यांचा हा हिशोब काही लागेना.

    आश्रमात सर्वत्र निजानीज झाली तरी एकनाथ एकटेच एका कोपऱ्यात बसून तो हिशोब पूर्ण करीत होते. रात्री जनार्दन स्वामींना जाग आली. पाहतात तर एकनाथ एकटेच बसून काहीतरी लिहीत आहेत. त्यांनी चौकशी केली तेव्हा एका पैचा हिशोब लागत नसल्याचे एकनाथानी सांगितले.

    तेव्हा जनार्दन स्वामी त्यांना म्हणाले ' अरे, एका पै ची किंमत ती काय? जाऊ दे ना हिशोब लागत नसेल तर तिचा नाद सोडून दे. ' परंतु एकनाथांनी त्यांचेही ऐकले नाही. ते रात्रभर पुनः पुन्हा हिशोब करीत होते. शेवटी त्यांना एका पै ची चूक उमगली. तोपर्यंत सकाळ उजाडली होती. एकनाथांनी धावत जाऊन आपल्या गुरूंना पै ची चूक सापडल्याचे सांगितले, तेव्हा जनार्दन स्वामींनी त्यांना जवळ घेऊन त्यांच्या अचूक काम होण्यासाठी केलेल्या धडपडीचे कौतुक केले.

  • शिक्षण कोहिनूर (कथा)

    “साहेब ते कोहिनूर वेगळे आणि हे शिक्षण कोहिनूर वेगळे. या वर्षापासून सरकारने शिक्षण क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या शिक्षकास हा सन्मान देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अण्णागुरुजी यांची निवड झाली आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काही मूलभूत प्रयोग केले आहेत. त्यामुळे त्यांना हा सन्मान मिळत आहे.’

  • प्रपंची जो अप्रमाण (सुमंत उवाच – १०१)

    सुमंत जयंत परचुरे. 

    कर्म करताना त्याचे पडसाद भविष्यात काय होणार याची सुचकता जर जाणून ते कर्म सावधानतेने केले तर परमार्थात समाधान प्राप्त व्हायला सोप्पे जाते. कर्मच जर अपचनीय केले, दुसऱ्यास त्रास होणारे केले, कोणाच्या हातचे घास पळवून स्वार्थ साधणारे केले तर परमार्थात मोक्ष मिळण्याची आशा धूसर होते.

  • वेळेत घ्यावी निवृत्ती (सुमंत उवाच – ६१)

    सुमंत जयंत परचुरे. 

    देवाने आयुष्य दिले ते जगण्यासाठी, जागण्यासाठी नव्हे हे ज्याला कळले तो सुखी होतो. एखादा माणूस मरेपर्यंत झटत राहतो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करत राहतो त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच.

  • ८ वी ड – भाग १०

    काही मुले दिसायला साधी असतात पण प्रचंड अतरंगी, जर नीट बघितले तर त्याचा खोडकरपणा, मस्ती डोळ्यात दिसते, पण तितका वेळ शिक्षकाला हवा.

  • मुलाखत

    साठी उलटली तरी माझ्या मित्रांना माझा मामा करण्यातच धन्यता वाटते. मी मुलाखत घ्यायची आणि ती सुध्दा एखाद्या प्रथितयश रागदारी गायकाची! संगीतातल ज्ञान तर सोडाच पण ज्या विषयात मी काठावरही पोहू शकत नाही हे माहीती असुनही मुद्दाम पुण्यातील एका प्रख्यात गवयाची मुलाखत घेण्यासाठी त्यांनी माझी व त्यांची वेळ परस्पर बुक करुन टाकली.

  • सूर गवसण्याचा आनंद

    आपल्या घरात हार्मोनियम असावी अशी माझी खूप इच्छा होती. एक दिवस मी पेटी विकत घेतली आणि ती वाजवायला बसलो. याआधी मी कधीही पेटी वाजविली नव्हती. शुद्ध सूर कोणते, कोमल सूर कोणते, तीव्र सप्तक म्हणजे काय मला कशाचीही काहीही कल्पना नव्हती. मी उगाचच चाळा म्हणून पेटी वाजवत बसलो. बोटं फिरवता फिरवता पेटीतून सूर उमटू लागले. ते सूर कानावर पडताच एखादं गाणं आपल्याला वाजवता येईल का याचा मी विचार करु लागलो. एक गाणं मला सुचलं. मी ते पेटीवर वाजवता येतंय का याची चाचपणी करु लागलो. पेटीतून बाहेर पडणारे काही सूर त्या गाण्याच्या चालीशी मिळते जुळते होते, मात्र चालीशी न जुळणारेही अनेक सूर पेटीतून उमटत होते. पेटीतून हरतऱ्हेचे सूर उमटतात. त्यातील काही मोजकेच सूर चालीशी संबंधीत असतात. अन्य सूर एरव्ही मधुर भासत असले तरी चालीत बांधलेले नसल्यास कानांना कर्कश भासतात हा पहिला धडा मी शिकलो. आपण पेटी वाजवणं शिकायचंच हा निश्चय मी मनाशी केला. सध्यातरी कोणाकडे पेटी वाजवणं शिकण्याऐवजी स्वतःच्या स्वतः रोज धडे गिरवायचे असं मी मनाशी ठरवून टाकलं. मी नित्यनियमाने पेटी वाजवू लागलो.

    त्यानंतर अमुक एक गाणं आपल्याला वाजवता येतं का हे मी रोज चाचपू लागलो. ही चाचपणी सुरु असताना आपल्याला हवा असलेला नेमका सूर गवसला की मनाला अभूतपूर्व आनंद मिळतो हे माझ्या ध्यानात आलं. सुरांच्या गर्दीतून नेमका तो सूर शोधणं म्हणजेच पेटी वाजविण्याचं कौशल्य हे साधं गणित मला उमगलं. मात्र हे कौशल्य अंगी भिनविण्यासाठी सतत रियाझ करणं आवश्यक आहे हे ही माझ्या ध्यानात आलं. ती मेहनत घ्यायला मी तयार होतो. या मेहनीतून एक अवर्णनीय आनंद मला सापडत होता. त्या आनंदासाठी रोज पेटी वाजविण्याचं व्रत मी स्वीकारलं. काही दिवसांनी पेटी वाजवणं आपल्याला बऱ्यापैकी जमतंय हे माझ्या ध्यानात आलं. आता पेटीतून उमटणाऱ्या चालीशी संबंधीत बसणाऱ्या कर्कश सुरांची संख्या रोडावत होती. थोडा नेट धरला की नेमके सूर उमटतात हे मी हेरलं. त्या सुरांचा मागोवा घेत खेळत राहण्यात मी तल्लीन होऊ लागलो.

    पेटी वाजविण्यात तल्लीन झाल्यानंतर मनातले दुसरे विचार लुप्त होतात हेही माझ्या लवकर ध्यानात आलं. दैनंदिन कामकाजात आपल्या मनात सतत विचारांची आवर्तनं घोंघावत असतात. अनेकदा रात्री झोपेतही विचार करीत राहणं सुरुच असतं. कित्येकदा झोप मोडण्याची खोडी करण्यासही हे विचार धजावतात. पेटी वाजवताना मात्र हे विचार विनायास दूर पळतात हे माझ्या ध्यानात आलं. पेटी वाजवताना आपलं केवळ सुरांशी नातं जुळलेलं असतं. अन्य सर्व गोष्टी त्यावेळी नगण्य ठरतात. दैनंदिन कामाचा ताण हलका करण्यासाठी पेटी वाजवणं हा एक रामबाण उपाय आहे हे मला उमगलं आणि मी अक्षरशः प्रफुल्लीत झालो. आता बाहेरच्या जगात काय घडलं, माझ्याशी कोण कसा वागला आणि कोण काय बोलला, या क्षुद्र गोष्टींशी माझं कसलंही देणंघेणं उरलं नाही. मला माझ्या आनंदाचा मूळ स्त्रोत सपडला. त्या आनंदात हरवून जाणं मला सहजसाध्य झालं. उर्वरीत जगातील घडामोडींशी माझा कसलाही संबंध उरला नाही.

    मी जसा पेटी वाजविण्याचा छंद जोपासला तसा प्रत्येकाने एखादा तरी छंद अवश्य जोपासावा. हा छंद जोपासण्याचा आनंद मनातले सर्व ताण सहजरित्या दर लोटतो. मात्र हा छंद जोपासताना एक पथ्य अवश्य पाळावं. ते म्हणजे, या छंदातून पुन्हा आणखी काही मिळविण्याचा अट्टाहास कधी धरु नये. छंद हा केवळ छंदासाठी जोपासायचा असतो. आपण पेटी वाजविण्याच्या छंदाचंच उदाहरण घेऊ. पेटीचा रियाझ करताना मी एक दिवस जगातला सर्वोत्कृष्ट पेटीवादक होईन, माझं पेटीवादन ऐकून लोक थक्क होऊन जातील, माझ्या हार्मोनियमच्या वादनाच्या सी.डी. निघतील, माझे देशविदेशात कार्यक्रम होतील, मला उत्तम पैसा मिळेल, प्रसिद्धी मिळेल असले मनोरथ कधीही कुणी हाकू नयेत. कारण अपेक्षा ठेवली की अपेक्षाभंगही जोडीनेच येतो आणि फार मोठी अपेक्षा ठेवली की नैराश्य ! थोडक्यात पेटी वादनातून आपल्याला काही मिळवायचं आहे किंवा काही मिळणार आहे हा विचार बाजूला सारुनच पेटी वादनाकडे म्हणजेच आपल्या छंदाकडे वळायचं असतं.

    दुसरं पथ्य पाळायचं ते कुणाचंही अनुकरण न करण्याचं. अमका पेटी वाजवतो म्हणून मीही पेटी वाजवीन, तो क्रिकेट खेळतो म्हणून मी क्रिकेट खेळेन, तो स्विमिंगला जातो म्हणून मीही स्विमिंगला जाईन असं अनुकरण कधीही करु नये. आपला जीव कशात रमतो हे प्रत्येकाने स्वतःच शोधून काढायचं असतं. व्यक्ती तितक्या प्रकृती तसेच व्यक्ती तितके छंद हे ध्यानात ठेवावं. संगीत, अभिनय, खेळ अशा अनेक प्रकारच्या छंदातून आपला नेमका छंद कोणता हे आपणच हुडकून काढावं. कारण दुसऱ्याचा छंद हा कदाचित आपली डोकेदुखी ठरण्याचाही संभव असतो. म्हणून आपली नाळ कशाशी जोडली गेली आहे ते आपणच शोधावं . हा नेमका छंद सापडणं म्हणजेच अचूक सूर गवसणं असंही म्हणता येईल.

    छंद जोपासण्यासाठी दररोज ठराविक वेळ देणंही आवश्यक ठरतं. आपण सर्व आरंभशूर असतो. काहीही करायचं म्हंटलं की सुरुवातीचे काही दिवस आपण अट्टाहासाने त्याच्या मागे लागतो. मात्र काही दिवस लोटल्यानंतर मध्येच काहीतरी महत्त्वाचं काम निघतं आणि छंद बाजूला पडतो. काही दिवस लोटले की आपण अमुक छंद जोपासणार होतो याचाही आपल्याला विसर पडतो. मध्येच कधीतरी त्या छंदाची आपल्याला आठवण होते आणि मग मनाला चुटपूट लागून राहते . आपलं चुकलंच ही जाणीव पदरी दुःखाचंच दान देऊन जाते. यावर उपाय म्हणजे दररोज नियमाने छंदासाठी वेळ काढणं. वेळेचं नियोजन हा मोठा विषय आहे. दिवसातल्या चोवीस तासांतून ठराविक गोष्टींसाठी ठराविक वेळ काढता आला की बरंच काही साध्य होतं. आपण जसा नोकरीधंद्यासाठी वेळ काढतो, कुटुंबियांसाठी वेळ काढतो, जगात काय चाललंय ते घेण्यासाठी वेळ काढतो तसाच वेळ छंद जोपासण्यासाठी काढावा. असा वेळ काढता जाणून आला की आपलं छंदाशी अतूट नातं जुळून येतं.

    छंदाशी नातं जुळून घेणं म्हणजे एकप्रकारे स्वतःशीच नातं जुळून येणं. आयुष्याच्या कोलाहलात आपल्याला अनेक गोष्टींसाठी वेळ असतो. वेळ नसतो तो केवळ स्वत:साठी, वेळ नसतो तो केवळ आपला आतला आवाज जाणून घेण्यासाठी. तो वेळ काढता आला की आपल्याला स्वतःच्या सामर्थ्यांची, अंगभूत कौशल्यांची जाणीव होऊ लागते. आपला आत्मविश्वास द्विगुणीत होतो आणि आयुष्याला सामोरं जाण्यासाठी आपण सिद्ध होतो. दिवसातला केवळ अर्धा पाऊण तास आपल्याला उरलेल्या तासांशी सामना करण्याचं सामर्थ्य देऊन जातो. मी जर पेटी वाजवू शकतो तर मी परिपूर्ण आहे, माझ्यात कसल्याही उणिवा नाहीत हा आश्वासक विचार आपल्याला व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्लीच हाती देऊन जातो. ही गुरुकिल्ली हाती गवसली की अलिबाबाची गुहाच आपल्यासमोर उलगडली जाते.

    भोवतालचं तेच ते कंटाळवाणं जग आपल्याला नवं भासू लागतं. सूतावरुन स्वर्ग गाठता येतो ही म्हण कदाचित मूळात सूरांवरुन स्वर्ग गाठता येतो अशी असावी. तो नेमका सूर गवसणं म्हणजेच स्वर्गलोकीचं सुख भुतलावर उपभोगणं, जीवनाला वेगळा अर्थ मिळवून देणं आणि अक्षय सुखाचा खजिना लुटणं!

    -सुनील रेगे

  • द्राक्षे आणि आंबे!

    गेल्या आठवड्यातली गोष्ट. मी एका नातलगाकडे गेलो होतो. खूप दिवसांनी ही भेट होत होती. त्यामुळे गप्पांचे-चर्चेचे विषयही खूप होते. स्वाभाविकपणे वेळही खूप गेला. आता समारोपाचे, निरोपाचे बोलणे करावे म्हणून मी `निघतो आता’ अशी प्रस्तावना केली अन् तिथेच नव्या विषयाला प्रारंभ झाला. त्या घरात दोघे नवरा-बायको अन् त्यांचा 20 वर्षांचा मुलगा- नुकताच नोकरी करू लागलेला. आत्मविश्वास आणि अपेक्षाही वाढलेल्या. त्याला मोटरबाईक घ्यायची होती अन् त्यावर मी मुलाला समजावून सांगावे किंवा समजून घ्यावे, अशी त्या दोघांची इच्छा होती. त्या दोघांची परिस्थिती बेताचीच; पण एकुलत्या एका मुलाचा हट्ट कसा नाकारायचा, हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. हट्ट स्वीकारायचा, तर मोठे आर्थिक ओझे घ्यावे का, हा प्रश्न होता. मोटरबाईक घ्यायला त्यांचा विरोध नव्हता; पण मुलाला नव्या युगाशी सुसंगत सीबीझेड किंवा करिष्मा हवी होती. खरेतर कोणत्याही कनिष्ठ मध्यवर्गीय घरामध्ये येणारा हा प्रश्न होता.