नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
एक सुंदर बाग होती. बागेत एक तळे होते. तळ्याकाठी दोन बेडूक रहायचे. दोघे अगदी जिवाभावाचे मित्र. एकाचे नाव राम, दुसऱ्याचे श्याम. राम शूर, तर श्याम भित्रा. आजुबाजूला थोडा खुट्ट आवाज झाला तरी श्यामराव तळ्यातल्या पाण्यात लपून बसायचे. श्यामरावांच्या या भित्रेपणाला तळ्यातले मासे, कासव हसायचे. ‘भित्रे मंडुकराव’ म्हणून चिडवायचे. रामने श्यामला भिऊ नको म्हणून खूप वेळा सांगून पाहिले. पण त्याचा काही उपयोग होईना. तळ्यातले इतर जलचर राम बेडकाला म्हणायचे, ‘माणूस लोकात मुलांनी भिऊ नये म्हणून त्यांना हनुमान चाळीशी म्हणायला शिकवतात. तसा हा राम बेडूक श्यामला ‘मंडुकोपनिषद” शिकवतो.
मरेंगे लेकिन किसीको मानलेली बहीण नहीं करेंगे! जे मजसंग हुलालतं ते पैली बार हुलालतं का हुलालता? कुणामुळं हुलालतं ? अन आकिरला झालं त झालं काय ? तेच समदं लिव्हलं हाय
या नंतरचा काही काळ मात्र मी स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीच्या जडणघडणीसाठी दिला. सुगम संगीताचे सर्व प्रकार मी शिकवत होतो. पण रागदारी संगीत, हार्मोनियम, तबला, गिटार अशी अनेक वाद्ये शिकण्यासाठी लोक चौकशी करायला लागले. माझ्या काही निपुण विद्यार्थ्यांनाच मी शिक्षक बनवले. अल्पावधीतच श्रीरंग टेंबे, सागर टेमघरे, प्रज्ञा टेंबे, मनिषा शहा, मनोज कांबळे, समीर टेमघरे, अमेय ठाकूरदेसाई, कुलकर्णी असे अनेक शिक्षक हे सर्व प्रकार शिकवायला लागले.
बराक ओबामांची भारताची ट्रीप पक्की झाली आणि आमच्या कॉलनीत उत्साहाचे वातावरण पसरले.अर्थात ओबामांच्या ट्रीपचा आणि आमच्या नवजीवन कॉलनीचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही .ओबामा आमच्या कॉलनीला सोडाच पण आमच्या शहरालाही भेट देणार नव्हते.पण जगात कुठलीही घटना घडली की आमच्या कॉलनीत अत्यंत उत्साहाचे वातावरण पसरते.तसा अमेरिकेचा आमच्या कॉलनीशी तसा काही विशेष संबंध नाही ,फक्त आमच्या कॉलनीचे सेक्रेटरी कुलकर्णींचा मुलगा दोन महिने कंपनीतर्फे अमेरीकेला जाउन आला ,एवढाच संबंध . पण एवढ्याशा संबंधावरपण आमच्या कॉलनीतले लोक अमेरिकेविषयी अत्यंत अधिकारवाणीने बोलतात. फक्त बोलण्याचा शेवट ” अहो , कुलकर्ण्यांच्या मुलाने बघितलय ना हे सगळ . हो अगदी अस्सच, अगदी खर ” असा करतात. ते जाउ द्या . कुलकर्ण्यांनी रात्री कॉलनीची मिटिंग बोलावली , आणि आपण आपल्या कॉलनीतर्फे बराक ओबामांच्या स्वागताचा एक जंगी कार्यक्रम करावा असा प्रस्ताव मांडला . देशपांड्यांनी त्यांना लगेच दुजोरा दिला . कुलकर्ण्यांनी अगदी काहीही म्हटल तरी देशपांडे त्याला लगेच दुजोरा देतात .( यांची मुलगी लग्नाची आहे आणि त्यासाठी त्यांना कुलकर्ण्यांचा फॉरिन रिटर्न मुलगा डोळ्यासमोर आहे ) आता कॉलनीतील दोन प्रतिष्ठित मंडळींनी ठरवल्यावर मोडता घालायचे काही कुणाला कारण नव्हते . शेवटी शनिवारी संध्याकाळी आठ वाजता गणपती मंदिरात कार्यक्रम करायचे ठरले आणि सभा संपली.
आमच्या कॉलनीचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बरीचशी मंडळी कलाकार आहेत. अर्थात ती नुसतीच कलाकार नाहीत , तर पोटापाण्याची नोकरी सांभाळुन कलाकार आहेत. नुसत्या कलाकाराला त्या कलेशिवाय दुसरे काही येत नाही . पण आमच्या कॉलनीतल्या कलाकारांना आपल्या कलेशिवाय पोटपाणी सांभाळण्याची कलाही पार पाडावी लागते . त्यामुळे समोरचे पांडेकाका बॅंकेत कॅशियर कम कवी आहेत , आणि बाजुच्या ढोलेकाकु एलायसीत क्लर्क कम नर्तिका आहेत. पांडेकाकांचा तर “ नोटा मोजा पटापटा ” नावाचा कवितासंग्रह प्रकाशित झाला असुन त्यांच्याकडे गेलेल्या सर्वांना तो ते सही करुन देतात. ढोलेकाकुंच्या नाचाचा प्रोग्रामपण कॉलनीत नेहमीच होतो .
आता या कलाकार असण्याला माझा मात्र अपवाद आहे. मी बॅंकेत अकाउंटंट असल्याखेरीज काहीही नाही . त्यामुळे चेक पास करणे किंवा लेजरला डेबीट टाकण्याखेरीज मला दुसरे काहीही येत नाही . तसे लहानपणी माझ्या वडीलांनी मला तबला शिकविण्याचा बराच प्रयत्न केला . दररोज मला ते तबल्याच्या क्लासला घेउन जायचे . पण इतरांच्या तबल्यातुन तिरकीट , धा , कत्ता , त्रक , धिन असे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायचे तसे माझ्या तबल्यातुन कधीच आले नाहीत . माझ्या तबल्यातुन फक्त ” ढुम्म “ असा एकच आवाज यायचा . शेवटी कंटाळुन माझा क्लास बंद झाला. या गोष्टीनंतर मला आयुष्यात दुसरी कला किंवा छंद कधीच जमला नाही . नाही म्हणायला टिव्ही बघण्याचा छंद मला पुढच्या आयुष्यात जडला पण या छंदाचे स्टेजवर प्रदर्शन करता येत नसल्याने त्याचा काहीच उपयोग नव्हता.आमच्या हिला मात्र उखाणे म्हणण्याचा छंद आहे . प्रत्येक कार्यक्रमात तिचा एकतरी ऊखाणा असतोच .
शनिवार उजाडला , संध्याकाळ झाली , आणि गणपति मंदिरात मंडळी जमायला चालु झाली . कलाकार मंडळींची गडबड दुपारपासुनच चालु होती. आम्ही मात्र प्रेक्षक असल्याने जेवण वगैरे करुन आरामात समोरच्या खुर्चीवर जाउन बसलो. एलायसीतले सराफ माझ्याच ‘अ’कलाकार लायनीतले. तेही माझ्याशेजारी येऊन बसले. आम्ही सिक्स्थ पे कमिशन वगैरे गप्पा मारीत बसलो. आमच्या बोलण्याचे विषय काहीही प्रसंग असला आणि जागा कुठलीही असली तरी सारखेच असतात . उद्या समोर लता मंगेशकर गायला बसली काय किंवा माधुरी दिक्षित नाचायला बसली काय आम्ही आपले “ पे रिव्हिजन , सॅलरी हाइक बॉसची लफडी ” या विषयामधेच असतो . काही वेळाने समोर स्टेज म्हणुन एक सतरंजी अंथरण्यात आली.पुर्वी असे काही कार्यक्रम असताना आम्ही लाकडी स्टेज अरेंज करायचो. पण काही वर्षांपुर्वी बिल क्लिंटन भारतात आले असताना त्यांच्या स्वागतार्थ केलेल्या कार्यक्रमात ढोलेकाकुंनी कथ्थक डान्स केला , त्यावेळी तो स्टेज कोसळला. तेव्हापासुन फरशीवरच सतरंजी अंथरुन त्याला स्टेज म्हणुन आम्ही कार्यक्रम करतो. अर्ध्या तासात तयारी पुर्ण झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरवातीला कुलकर्णी काकु अमेरिकेची आपल्याला थोडक्यात ओळख करुन देतील असे सांगण्यात आले आणि नउवारी साडी , मोठे कुंकु ,केसांचा अंबाडा या वेषातल्या काकु बोलायला उभ्या राहिल्या.काकु भुगोलशिक्षिका म्हणुन रिटायर झाल्या असल्या तरी त्यांचे भुगोलाचे ज्ञान पुस्तकीच होते. त्या स्वतः औरंगाबाद जिल्ह्याच्या बाहेर कधी गेल्याच नाहीत. अपवाद एकदाच . मुलाला एअरपोर्टवर सोडायला. काकुंनी अमेरिकेची ओळख करुन द्यायला सुरुवात केली.
” अमेरिका हा अत्यंत खंडप्राय देश असुन त्याचे श्रेत्रफळ सुमारे दहा हजार चारशे चौरस किमी आहे. उत्तरेकडे पॅसिफिक समुद्र असुन दक्षिणेकडे अटलांटीक समुद्र आहे .पुर्वेकडे मेक्सिको आणि पश्चिमेकडे कॅनडा आहे.एकुण पन्नास प्रदेशांनी बनलेला हा देश जगातला अत्यंत बलाढ्य देश आहे . “
काकुंची अमेरिकेची पुस्तकी ओळख सुमारे अर्धा तास चालली .त्यानंतर पांडेकाका ओबामांच्या स्वागतार्थ आपल्या कविता गातील असे समजले. पांडेकाका चालु झाले.
ओबामांच्या घराचे
नाव व्हाइट हाउस
ओबांमांपुढे नतमस्तक
चायना फ्रान्स व रुस
ओबामांच्या विमानाचे
नाव एअरफोर्स वन
ओबामांचे मात्र
भारतावर जडले मन
अशा कवितांचा रतीब चालु झाला . सर्व प्रकारची यमके जुळवुन झाली.” मिशेल ,स्पेशेल “, ” बराक नाक ” अशा पंचवीस तीस कवितानंतर कवितावाचन संपले. काकांनी नंतर भाषण केले . त्यात आपल्या “ नोटा मोजा पटापटा” या काव्यसंग्रहाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. आता आपण सध्या एक थ्रिलर सस्पेन्स कादंबरी “ बंद दरवाजा ” लिहित असल्याचे सांगितले . हा ” बंद दरवाजा ” बॅंकेच्या एका लॉकरचा असुन आपल्या पुर्वीच्या मालकाच्या खुन्याचा हे लॉकर कसा प्रतिशोध घेते ह्यावर ही कादंबरी आधारित होती . ह्यावर सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
त्यानंतर ढोलेकाकुंचा नवीन हिंदी गाण्यावर डान्स झाला , शेजारच्या गौरीचे ( वय चार ) गाणे झाले , एकंदर खुप कला सादर झाल्या . बराक ओबामांच्या येण्याचा आणि ह्या हिंदी गाण्यांचा कसा संबंध ? हा प्रश्न पडला असता , हे ओबामांना भारतीय संस्क्रुतीचे दर्शन आहे असे उत्तर मिळाले .
कार्यक्रमाच्या शेवटी आमच्या हिचा उखाणा घेण्याचा प्रोग्राम होता. आता या प्रकाराला मी फार भितो. आमच्या हिला कसला पाचपोचच नाही . मागे बिल क्लिंटन आले तेव्हा ” क्लिटनच्या घरी मोनिकाचा मुक्काम , – रावाचे डोके दुखले की मी लावते बाम ” असा उखाणा घेतला .आता या उखाण्यात कशाचा कशाला काही संबंध आहे का ? पण नाही . स्टेज दिसले की उखाणा झालाच पाहिजे . आतासुध्दा ” मिशेलला म्हणतात सगळे फर्स्ट लेडी , —- रावांशी बांधली मी लग्नाची बेडी .” हा उखाणा घेतला . आता आमच्या लग्नाचा आणि मिशेलला फर्स्ट लेडी म्हणण्याचा काही संबंध आहे का ? पण असंबध्द बोलण्यात बायकांचा हात कोणी धरु शकत नाही . त्यातल्या त्यात एक बरी गोष्ट म्हणजे आमच्या कॉलनीत माझ्या ऑफिसमधले कोणी रहात नाही . नाहीतर माझे ऑफिसमधे जाणे लोकांनी मुश्कील करुन टाकले असते.
कार्यक्रम संपल्यावरचे जेवण ही एकच जरा त्यातल्यात्यात बरी गोष्ट होती. बाकी जाऊ द्या , चांगल्या जेवणामुळे आणि त्यातल्या त्यात जिलेबीमुळे कार्यक्रमाचा शेवट अत्यंत गोड झाला.
-- निखिल नारायण मुदगलकर
खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग.
लैला मजनूच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या होत्या. मजनूच्या पाठीवर पडणार्या कोड्यांचे व्रण लैलाच्या पाठीवर उमटायचे. कारण शरीराने अलग-अलग असले तरी त्यांचे ह्रदय एक होते. लैला मजनूच प्रेम हे खरं प्रेम होत. आजच्या तरुण पीढ़ीच्या प्रेमाच्या कल्पना काय?
तो स्मार्ट - ती सुन्दर, त्याला ती आवडली आणि तिलाही तो आवडला. त्यानी एकत्र सिनेमा पाहिला, एकमेकांच्या गळ्यात हात घालून फिरले आणि बहरलेल्या यौवनाचा आनंद घेतला. त्याना वाटले ते प्रेमात पडले. त्यानी प्रेम विवाह केला. एकत्र एकाच घरात राहण सुरु झाल. एकमेकांच्या आवडी-निवडी वादाचे विषय होऊ लागले. शुल्लक गोष्टींवरून भांडणे सुरु झाले. दोघांचाही अहंकार मोठा होता. परिणाम -
"देहाचा आकर्षणाने दोघ जवळ आले
प्रेमा अभावी ते शीघ्र डायवोर्सि झाले"
'ती' - मी प्रेमात आंधळी झाली होती, 'तो' -मी मूर्ख होतो म्हणून हिच्या प्रेमात पडलो. पडनारच! कारण याना प्रेमाचा अर्थ कळलेला नव्हता.
काहींची प्रेमाची गाड़ी विवाहा पर्यंत ही पोहचत नाही. कारण देहाचे आकर्षण क्षणभंगुर असते व ते संपल्यावर प्रेम ही संपते. तो किंवा ती कोणी तरी एक प्रेमभंगाला कारणीभूत ठरतो. आपण वर्तमानपत्रांत रोज वाचतो प्रेमभंग झाल्याने कोणी आत्महत्या करतो तर कोणी खून सुद्धा. कारण यानाही प्रेमाचा अर्थ कळलेला नसतो.
काही आपापला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी प्रेमाचा देखावा करतात. मी ही डॉक्टर -ती ही डॉक्टर, आपण एकत्र आलो तर चैनित आयुष्य जाईल. किंवा दोघही नौकरी करणारे - स्वार्थ मनात ठेउन प्रेम करतात. याला काय म्हणायच -
प्रेमाचा देखावा आज फायद्याचा सौदा आहे,
विवाह सुध्दा आज देह भोगण्याचा करार आहे.
स्वार्थापोटी केलेल प्रेम भंग पावणारच. मग घटस्फोट हा होणारच यात आश्चर्य नाही. कारण यानाही प्रेमाचा अर्थ कळलेला नाही.
मग प्रेम म्हणजे काय?
आपल्या सोंदार्याचा अभिमान बाळगून पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती कामदेवाच्या मदतीने शंकराचे प्रेम जिंकायला निघाली. परिणाम काय झाला - शंकराने आपले तीसरे नेत्र उघडले व कामदेव भस्म झाला. पार्वतीला आपली चूक कळली. तिने तपस्येचा मार्ग धरला. आपला अहंकार, अभिमान इत्यादि तपस्येच्या अग्नित भस्म केले. अखेर शंकर प्रसन्न झाले. पार्वतीलाही प्रेमाचा अर्थ कळला. आपण पहातोच, वसंतात बहरलेल्या कच्च्या कैरीला ही ग्रीष्माच्या उन्हात तपावे लागते, मगच रसाळ-मधुर असा आम्बा आपल्याला खायला मिळतो. आपल्या मनातिल विकाराना अग्नित भस्म केल्या शिवाय प्रेमाचा अर्थ कळणे अशक्य म्हणूनच एका उर्दू शायरने प्रेमाबद्धल म्हंटले आहे "इक आग का दरिया है तैर के जाना है" आणि आगीचा दरिया पार करण्यासाठी डोळे उघडे असायला पाहिजे. आंधळ्या माणसाचे हे काम नव्हे.
एकदा शेजारच्या एका आजीला विचारले -तुम्ही कधी प्रेम केले आहे का? प्रेमाचा अर्थ काय? आजी म्हणाली प्रेमाच तर सोडा त्या काळी लग्नाआधी मुलाला मुलगी दाखविण्याची पद्धत ही नव्हती. बायको म्हणजे - आईच्या मदतीला घरकामासाठी आणलेली हक्काची बाई. ती आपल्याला देह सुख ही देते व घराला वारस ही. त्या काळी बायकाना कष्ट हे करावे लगायचेच. कधी -कधी मार ही खायला मिळायचा. आपले माहेरचे अस्तित्व विसरून नवर्या साठीच आपल आयुष्य आहे हे मनात ठरवून सासरी संसार सुरु केला. काही वर्षात चित्र बदलले. एका दुसर्याची सवय लागली. त्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला. माझ्यासाठी त्यानी आपला स्वभाव ही बदलला. माझ्या आवडी -निवडीकड़े ते जातीने लक्ष देऊ लागले. मला काय हवे त्याना न सांगताच समजू लागले होते. आज एका दुसर्याच्या मनात काय आहे हे न बोलताच आम्ही समजू शकतो. आता ही त्यांच्या मनात काय विचार चालला आहे, हे मी सांगू शकते. त्यागाशिवाय प्रेम सम्पादित करता येत नाही हेच खरं. संसाराचे चटके बसल्या शिवाय प्रेमाचा अर्थ कळने अशक्यच. आजीचे बोलणे मला पटले. आजीने खरोखरच तपस्या केली होती म्हणून तिला प्रेमाचा अर्थ कळला होता. असे प्रेम पाहूनच अमीर खुसरो ने म्हंटले आहे-
खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग.
शरीराने अलग-अलग असले तरी प्रेम रंगात भिजुन दोघांचे ह्रदय एक झाले होते. कारण प्रेमात द्वैत नाही. सूफी संतांच्या मते लौकिक प्रेम ही अलौकिक प्रेमाची पायरी आहे. कारण ज्याच्या हृदयात प्रेम आहे तोच ईश्वराला प्राप्त करू शकतो.
याचा अर्थ लग्ना आधी प्रेम नाही केले पाहिजे असा नाही. प्रेम अवश्य करा, पण आपण प्रेमात पड़त आहो असे वाटत असेल तर आपले डोळे उघडा - स्वत:लाच प्रश्न विचारा- हे देहाचे आकर्षण तर नाही ना? यात आपला स्वार्थ तर नाही ना? कुठल्याही परिस्थितीत आपण त्याचा/ तिचा साथ देऊ शकतो का? त्याच्या/ तिच्या साठी आपण आपल्या सर्वस्वाचा अर्थात आपला अहंकार, अभिमान इत्यादींचा त्याग करू शकतो का? याचे उत्तर होय असेल तरच पुढे पाऊल उचला. अन्यथा प्रेमात पड़नारच. खर्या प्रेमाच्या प्राप्ति साठी तपस्या ही करावीच लागते. दोघाना शरीराने आणि मनानी एक व्हावे लागते. तेंव्हाच प्रेमाची प्राप्ति होते, म्हणूनच कवीरदासानी म्हंटले आहे -
जब मै था तब हरि नाही, जब हरि है मैं नाही,
प्रेम गली अति सांकरी, ज्यामे दो न समाई.
*******
(प्रेम करण्या पूर्वी किंवा प्रेमात पडलेल्यानी, हा लेख अवश्य वाचावा. आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा).
पोस्टमन काका वास्तव्यास असलेल्या इमारतीच्या बरोब्बर खाली असलेल्या स्वीट्सच्या दुकानात नेहमीप्रमाणे गिऱ्हाकांची वर्दळ..तोचं फोनची रिंगची ट्रिंगट्रिंग..कॉऊंटरवर पैशाची देवाणघेवाण..फोनपेवर लक्ष ठेवून बसलेले..
आयुष्यात कोणत्याही वेळी काय करायचे हे कसे ठरवायचे? मग लहान मूल असो किंवा पूर्ण वाढ झालेला माणूस त्याला कोणीतरी उपदेश देणारा लागतोच.
ताजमहल’ हा बीना राय सोबतचा चित्रपट त्यातील सुमधुर गीतांइतकाच, अप्रतिम होता. १९४१ साली प्रदर्शित झालेल्या ‘चित्रलेखा’चा रिमेक १९६४ साली झाला. हा चित्रपट भव्य सेट्स व मातब्बर कलाकारांमुळे नेत्रदीपक ठरला. नर्गिस सोबतचा ‘रात और दिन’ हा नायक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या..
मंजिरी आणि राघव नुकतच लग्न झालेल एक नवं कोर जोडपं. लग्नला नुकताच महिना होत आला होता. अश्याच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलाच्या बाहेर पडले. कार जरा लांब पार्क केली होती म्हणुन फुटपाथच्याकडेने मस्त एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडी कडे जात होते……
संक्षिप्त गुरुचरित्र वाचायला ३५-४० मिनिटे लागतात. तेवढा वेळ , थोडा कमी तो कुत्रा तिथेच बसून होता. माझा शेवटचा अध्याय सुरू झाला.मग तो उठून मागच्या बाजूने बाहेर गेला किंवा गेला असावा. माझं वाचन झाल्यावर नमस्कार करून मी उठले आणि कुत्र्याला शोधायचा प्रयत्न केला. पण तो कुठे ही परत दिसला नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti