(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माध्यमांची भाषा

    कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात ‘मराठी भाषा दिन’ साजरा होतो. या दिनानिमित्त मराठी भाषेचे वैभव, सौंदर्य, प्राचीन परंपरा, मराठी भाषेची थोरवी आणि मराठी भाषेतील संपन्न साहित्याचा वारसा यावर गोडवे गाणारे लेख प्रसिध्द होतात. व्याख्याने होतात. आम्ही मराठी भाषक आहोत, असेही टाळ्यांच्या गजरात वक्ते सांगतात.

      December 7, 2023


  • श्रावणी (उपाकर्म)

    श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्राचे दिवशी करावयाच्या वैदिक विधीला श्रावणी म्हणतात. यालाच उपाकर्म असेही म्हणतात. श्रवण नक्षत्र श्रावण पौर्णिमेच्या जवळपास येते, त्या दिवशी किंवा पंचमीला, हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी श्रावणी करावी. श्रावण पौर्णिमा यजुर्वेद्यांचा मुख्य काळ, भाद्रपद महिन्यातले हस्त नक्षत्रावर सामवेदी श्रावणी करावी. हे सामान्य नियम आहेत. यांत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा धर्मशास्त्रानुसार निर्णय करावा लागतो.

    श्रावणी कशाकरिता करावी? सांप्रत या दिवशी यज्ञोपवित फक्त बदलतात. हे योग्य नाही. यज्ञोपवित (जानवे) बदलल्याने श्रावणी होत नाही. जे वेदांचे अध्ययन केले आहे त्याचा शिळेपणा नष्ट करणे, तसेच म्हणताना काही दोष झाले असतील तर ते नाहीसे करण्यासाठी हा विधी आहे. नूतन उपनयन झालेल्यांची प्रथम श्रावणी गुरु-शुक्रास्त, सिंहस्थ गुरु असता, करू नये असा शास्त्र संकेत आहे.

    -- विद्याधर करंदीकर

      August 3, 2016


  • वटपौर्णिमेला वडाचीच पूजा का करायची?

    आपल्याकडे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची प्रथा आहे.

    ज्येष्ठ महिन्यात वडाच्या पारंब्याना कोंब फुटायला सुरवात होते. पावसाळ्यात हे कोंब चांगले मोठे होतात. पावसाळ्यात हवेतील बदलामुळे पचन शक्ती मंदावते,अशक्तपणा असतो. त्यामुळे ह्या दिवसात काही वेळा जुलाब होतात. वडाच्या पारंब्या ह्या जुलाबाचे उत्तम औषध आहे. वडाच्या पारंब्या हाताशी असल्याने मुले,मोठेसुध्दा लोंबकाळून झोका घेतात. त्यावेळी हे कोंब नष्ट होण्याची शक्यता असते. पूजा करताना झाडाला दोरा बांधण्याची प्रथा आहे. खरे पाहता दोरा पारंब्याना बांधायला पाहीजे. म्हणजे पारंब्याच्या कोंबाचे रक्षण होईल.आणि पावसाळ्यात होणारे जुलाब थांबवायला वैद्य लोकांना मिळतील. हे त्या पूजेच्या मागचे शास्त्र आहे.

    हल्लीतर शहरात वटपौर्णिमेला वडाच्या छोट्या फांद्यांचे तुकडे विकले जातात.आणि बायका घरीच वडाची पूजा करतात. ही सोय झाली.

    माझी सर्व भगिनीना विनंती आहे की, तुम्ही वडाच्या फांदीची जरूर पूजा करा. पण दुसरे दिवशी ती फांदी टाकून देऊ नका. फांदीचे स्वच्छ धुऊन पाना सकट शक्य होईल तितके बारीक तुकडे करा व ते वाळवून त्याची मिक्सरमधे जमेल तशी पावडर करून ठेवा पावसाळ्यात घरातील कोणाला जुलाब झाल्यास त्या पावडरचा काढा करून द्या. ह्यामूळे जुलाब लागले की हाॅस्पिलटमधे अॅडमीट होणे, वेगवेगळ्या टेस्ट करणे, सलाईन, इंजक्शने वगैरे न लागण्याची व पैसेही वाचण्याची शक्यता आहे.

    अरविंद जोशी
    B.Sc.
    पुणे

      June 8, 2017


  • अशी आई नको गं बाई !

    एका हायवेवरील मॉलच्या समोरील बसस्टॉपच्या मागे ( लाज वाटते म्ह्णून नाही तर सार्वजनिक ठिकाण आहे म्ह्णुन असेल कदाचित आणि एका बिझनेस पार्कच्या खाली असणार्‍या पानाच्या टपरीसमोर बर्‍यापैकी अधुनिक पोषाख परिधान केलेल्या सुंदर दुखण्या तरूणी ऐटीत सिगारेट ओढताना पाहिले की भल्या भल्या पुरुषांची बोटे तोंडात गेल्याखेरीज राहात नाहीत. आंम्ही तर कधी विजलेला सिगारेटही बोटात पकडला नाही पण सिगारेट ओढून झाल्यावर आपल्या उंच टाचेच्या सॅन्डल खाली सिगारेट विजविण्याची कला पाहिल्यावर तर मी स्वतः ही आवाक होतो. एक तरूणी सिगारेट ओढतेय आणि एखादा तरूण लायटरने तिचे सिगारेट पेटवतोय हे चित्रपटात शोभणार दृष्यही हल्ली उगडया डोळ्यांनी पाहताना डोळे अक्षरशः तृप्त होतात खेदाने. आपल्या देशात कॅन्सर रुग्णांच प्रमाण वाढत असतानाही सिगारेट ओढणार्‍या अधुनिक तरुणी पाहिल्या की मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. चारचौघात आपल्या वडिलधार्‍यांसमोर सिगारेट ओढताना काही पुरुषांनाही संकोच वाटतो तिथे आजच्या तरुणी चार सिगारेट न ओढणार्‍या परुषांच्या मधे उभ राहून ऐटीत सिगारेट ओढताना हल्ली सर्रास दिसतात. भर रस्त्यात आरामात सिगारेट ओढणार्‍या हया तरूणी काही कोणी अशिक्षित तरूणी नसतात त्या असंस्कृत असतील असे ही खात्रीने सांगता येणार नाही. पण बहुदा हया तरुणी नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबापासून दूर राहणार्‍या असतात. मानसिक ताण कमी करण्यासाठी त्या सिगारेट ओढत असाव्यात हे पटण्याजोगे नाही. फक्त एकच प्रश्न पडतो आपल्या देशाचं भविष्य ज्या पिढीच्या हातात आहे त्या पिढीला घडविणारी जन्माला घालणारी स्त्रियांची पिढी या पिढीच्या हातात खरंच आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित आहे का ?

    सिगारेट ओढण्याचे दुषपरिणाम माहित झाल्यावर आपली आई सिगारेट ओढणारी असावी असे कोणत्याही बाळाला वाटणार नाही. तो तर गर्भात असतानाच म्ह्णेल कदाचित अशी आई नको गं बाई ! आमच्या लहानपणी आमच्यावर झोपडपट्टीत राहात असतानाही सिगारेट ओढणे ही वाईट गोष्ट आहे हे आमच्या अशिक्षित आईने आंम्हाला समजावले होते. तिच्या हातात जोपर्यंत होते तिने आमच्यावर कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाण्याचेच संस्कार केले होते. पण आजची आईच जर व्यसनाधीन असेल तर ती आपल्या मुलांवर काय खाक संस्कार करणार ? पूर्वीच्या स्त्रियांची पुरूषांच्या बरोबरीने कोणतीच व्यसन करण्याची हिंमतच नव्हती. आज स्त्री - पुरुष समानतेमुळे स्त्रियां पुरुषांच्या बरोबरीने व्यसनही करू लागल्या आहेत. पुरूषांच्या व्यसनाधीनतेचा परिणाम फक्त कुटुंबावर होतो पण स्त्रियांच्या व्यसनाधिनतेचा परिणाम देशाच्या भविष्यावर होतो. अधुनिकता फक्त स्त्रियांच्या अधिकारा पुरती मर्यादित होती तोपर्यंत सारे ठिक होते पण आता स्त्रियांना इतर व्यसनांबरोबर सर्वच बाबतीत पुरुषांची बरोबरी करण्याच एक नवीन व्यसन जडू लागलं आहे जे फारच भयंकर आहे याचे फार भयंकर परिणाम आपल्या देशाला भविष्यात भोगावे लागणार आहेत. आजच्या तरूणी उच्चशिक्षित आहेत, पुरुषांच्या तोडीच्या आहेत, सारं जग त्यांनी पादाक्रांतही केलेले आहे, पण आता त्या एक चांगली आई होण्याची क्षमता कदाचित गमावून बसल्यात की काय अशी शंका मनात निर्माण होऊ लागली आहे... स्त्रियांनी पुरुषांची बरोबरी करण्यात काहीच वावगे नाही पण व्यसनांच्या बाबतीत स्त्रायांनी पुरूषांची बरोबरी करण्याचा मोह टाळायला हवा. फक्त सिगारेट ओढल्यामुळे स्त्रिया असंस्कृत असभ्य अथवा व्यभिचारी ठरत नाही पण जी गोष्ट चुकीच आहे ती गोष्ट स्त्रियां करता आहेत म्ह्णून त्याचे समर्थन नाही ना करता येणार. आजच्या अधुनिक स्त्रियांनीही शक्यतो सिगारेटच्याच नव्हे सर्व प्रकारच्या व्यसनांपासून शक्यतो दूरच राहायला हवे. पुरुष कितीही अधुनिक असला तरी त्याला व्यसनी मैत्रिण अथवा प्रेयसी आवडतही असेल पण व्यसनी पत्नी मात्र शक्यतो त्याला नकोच असते हे सत्य बदलणार नाही. व्यसनाने मानसिक ताण कमी होण्याऐवजी हल्ली तो अधिक वाढून काही लोक आत्महत्या करण्यापर्यंतच्या निर्णयापर्यंत पोहचताना दिसत आहेत. आपल्या देशाच्या भविष्याचा विचार करता आपल्या देशाला व्यसनी आईची नाही तर निर्व्यसनी आईची जास्त गरज आहे ती गरज आजच्या प्रत्येक तरुणीने ओळखून व्यसनाधिन तरूणींनी आत्मपरिक्षण करायला हवे नाही का ?

    लेखक – निलेश बामणे

    202, ओमकार, जलधारा एस.आर.ए. गृहनिर्माण संस्था मर्यादित, गणेश मंदिरा समोर, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई - 400 065. मो. 8652065375

      June 30, 2016


  • निरंजन – भाग १३ – दृष्टी तसे दृश्य

    एक सुंदर असे टुमदार एक गाव होते. त्या गावाच्या वेशीवर एक गुरुकुल होते. गुरुकुलामध्ये ज्ञान देणारे एक ॠषीमुनी होते. या गुरुकुलामध्ये नित्यनियमाने शिष्य येत असत. आपल्या गुरुंकडुन ज्ञान घेत असत. गुरुंसोबत गप्पागोष्टी करत असत. असा उपक्रम गुरुकुलामध्ये नित्यनियमाने होत असे.

      June 25, 2020


  • खंडोबाची थोडी माहिती

    " आगडदुम नगारा सोन्याची जेजुरी " ह्या ओळी गाणे बनून सगळे कडे घुमत आहेत, Groups वर गाणे share होत आहेत . पण ह्या ओळी नक्की काय आहेत हे समजून घेउ...

    जेजुरी ला गेल्यावर तळी-भंडार हा आवशक विधी त्याचे हे बोल/ मंत्र आहेत. दर्शन झाल्यावर कुळाचार म्हणून तळी भरली जाते. एका तबकात किंवा मोठ्या कपड्यात , विड्याची पाने , खोबरं , लाह्या , सुपार्या , दक्षिणा , भंडारा इत्यादी घेऊन त्याला विषम संख्येतील पुरुष हाताने उचलून सतत वर खाली करतात हि कृती सदानंदाचा येळकोट म्हणत केली जाते . येळकोट हा कानडी शब्द आहे कानडी मध्ये येळू म्हणजे ७ आणि कोट म्हणजे कोटी , खंडेराया सोबत मणि-मल्ला शी युद्ध करताना ७ कोटी सैन्य होते , सदानंद हे खंडेरायाचेच एक नाव . ह्या सात कोटी सैन्या वरून संदानादाचा येळकोट हा गजर रूढ झाला .

    हे झालं तळी भंडार .

    आत्ता खंडोबा विषयी थोडेसे ,

    खंडोबा हे भगवान परमशिवाचेच स्वरूप होय मार्तण्ड भैरव असेही म्हंटले जाते. खंडोबा हा मुळचा कन्नड प्रांतातला , वीरशैव पंथातील दैवत . कानडीत खंडोबाला मैलार किंवा मैलारलिंग संबोधले जाते. ह्याचा सासर नेवासे गावचा . लग्न ठरलेलं असताना सुद्धा खंडेरायाने स्वतःच्या होणार्या पत्नी ला पळवले आणि तिच्याशी गांधर्व-पद्धतीने विवाह केला.

    पुढे शिकारी ला गेल्यावर देव खंडोबा धनगरांच्या वस्तीत आला . तिथे त्याच प्रेम बाणाईशी जडले. तिच्याशी लग्न करून खंडेराय जेजुरी ला आले, पण म्हाळसाबाई ला हे लग्न मान्य नव्हते त्यांच्यात भांडण सुरु झाले , खंडोबा त्यांचे भांडण बघून हसू लागतो , ह्या प्रसंगाला अनुसरून बरीच लोक-गीते आणि जागरण गीते लिहली गेली आहेत , पुढे ,बाणाईची स्वतंत्र व्यवस्था खंडेराय जेजुरगडावर लावून देतात, अधून मधून भेटी ला जातात.

    खंडोबाची राजधानी म्हणजे आत्ताची जेजुरी नगरी . खंडेराया ला बेल - दवणा आणि भंडारा-खोबरे वाहायची पद्धत आहे .
    दवणा हि एक सुगंधी वनस्पती आहे, खंडोबाला वाहिलेला बेल-भंडारा हातात घेवून आण म्हणजे शपथ खायची पद्धत मराठा समाजात रूढ आहे.

    खंडोबाने जेव्हा मणी-मल्लाचा पराभव केला तेव्हा मणी-मल्ल दैत्य खंडोबाला शरण आले , मणि च्या मस्तकावर खंडेरायाचा पाय होता त्याने विनंती केली कि "मला तुझा वाहन होऊ दे" आणि मल्लाने विनवणी केली "तुझ्या नावा आधी माझा नाव लागू दे" त्यामुळे अश्वरूपी मणी खंडोबाचे वाहन झाला , आणि मल्लासुराला खंडोबाने हरवले म्हणून तो "मल्हारी" ठरला .

    खंडेरायाची मूर्ती जर निट पहिली तर काळ-भैरवाच्या मूर्तीशी भयंकर साम्य आढळेल फक्त शस्त्रांचा क्रम बदलला कि दैवत वेगळं ठरतंय . म्हणजे हे दोन्ही अवतार एकच आहेत . पण कालभैरव हा ब्रम्हचारी दाखवला गेला आहे . ज्योतिबाची मूर्ती उभी आहे आणि खंडोबाची मूर्ती बैठी आहे , ज्योतिबाला गुलाल-खोबरं तर खंडोबाला भंडार-खोबरं वाहिला जाता . कोकणात रवळनाथ तर घाटावर खंडेराय कोल्हापुरात जोतीबा असा भोळा शंकर .

    खंडोबा हा कडक शिस्तीचा आहे . एक सेना-प्रमुख म्हणून शिस्त प्रिय असणे रास्तच आहे . ह्या खंडोबाची काही स्थाने जागृत मानली गेली आहेत , त्यात मणीचूळ पर्वत म्हणजे आत्ताचे जेजुरी , पाली-पेम्बर , नेवासे-पारनेर आणि मंगसुळी .
    खंडोबा हा सैन्याचा अधिपती असल्यामुळे युद्धकाळात रात्रीचे जागे राहणे खूप महत्वचे होते , त्यासाठी रणवाद्य वाजवून रात्र जगती ठेवली जायची त्यातूनच "जागरण-गोंधळ " ह्या लोक-कलेचा उगम झाला . सेनापती खंडोबाला त्यामुळेच जागरण अतिशय प्रिय आहे .

    लग्न झालेल नवीन जोडपं खंडोबाचा गोंधळ घालतात आणि त्याची कृपा प्राप्त करतात,, ह्या प्रसंगी कडी-लंगर तोडायची प्रथा आहे. कडी-लंगर म्हणजे एक लोखंडी साखळी असते ती गोंधळात पूजेच्या ठिकाणी ठेवली जाते आणि गोंधळ समाप्ती च्या वेळी तोडली जाते .

    मल्हारी मार्तंडाला बोली भाषेत खंडोबा म्हणतात कारण ह्याच्या हातात कायम "खंड" म्हणजे खड्ग / तलवार आहे. खंड धारण करणारा म्हणून खंडोबा .

    -- संकलन : शेखर आगासकर
    सोशल मिडियातून येणारे चांगले लेख जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझा उपक्रम. लेखकाचे नाव मला माहित नाही.

      July 26, 2017


  • रॅगिंग आत्महत्या का कायदा !

    सासूने सूनेला सावत्र आईने मुलांना छळावे कैदेतून पळालेला किंवा सुटलेल्या कैद्याने मनातील उट्टे किंवा सल पूर्ण कारावी तसे रॅगिंग पीडीतांच्या बाबतीत होत आहे. समाजात सगळयाच क्षेत्रात बेशिस्त व अमर्यादा वेगाने वाढत असल्याने रॅगिंग ही दहशतीची झेरॉक्स प्रत झाली आहे. रॅगिंग हा संसर्गजन्य रोग आहे व त्यावर प्रभावी लस किंवा इंजिक्शनचीच गरज आहे.

      January 15, 2011


  • वात दोषाचे पथ्यापथ्य

    असं म्हणतात, वाताला मित्राप्रमाणे जिंकावे, पित्ताला जावयाप्रमाणे सांभाळावे आणि कफाला शत्रूप्रमाणे वागवावे.

    वाताच्या पथ्यामधे सर्वात महत्वाचा आहारीय पदार्थ म्हणजे तेल.
    आपण ज्या प्रदेशात रहातो, त्या प्रदेशातील तेलबियांपासून घाण्यावर काढलेले तेल, अनरिफाईंड तेल कच्च्या स्वरूपात जेवणात घेणे म्हणजे वाताची अर्धी चिकित्सा आहे.

    हे तेल प्रदेशानुसार ठरवावे. जसे कोकणात खोबरेल तेल, घाटावर शेंगतेल, युपी मधे सरसोंका तेल, पण प्रदेश बदलून घेतलेले तेल पचायला जड होते.

    अंगाला तेल लावले की, त्याला बाह्य स्नेहन, अभ्यंग म्हणतात.
    आणि जेवणात वापरायचे ठरवले की ते होते, आभ्यंतर स्नेहन.

    स्नेह म्हणजे तेल.
    जेवणात आणि जीवनात हे कमी झालंय म्हणून रूक्षपणा, कोरडेपणा वाढलाय.

    त्याला उतारा?

    आतून बाहेरून स्नेहन. स्वेदन.
    वात प्रकृतीच्या रुग्णांनी तेल तूप खाल्ले तरी कोलेस्टरॉल वाढत नाही. वाढणार नाही.
    असे तेल कच्च्या स्वरूपात वापरत असताना वर गरम पाणी प्यावे. म्हणजे तेल पचायला सोपे जाते.

    तेल वेगवेगळ्या प्रकारे का होईना, पण ते पोटात जावे यासाठी ग्रंथात तब्बल चौवीस प्रकार वर्णन केले आहेत. एवढे त्याचे महत्व लक्षात घ्यावे.

    आताच्या माॅड मेडीकल नुसार तेल, तूप, नारळ, शेंगदाणे म्हणजे आरोग्याचे मोठे शत्रू.

    काय दिवस फिरवले गेले आहेत पहा, जे उत्तम आहे ते जीवनातून आणि जेवणातून काढून टाकले आणि नको ती विषारी औषधे मरेपर्यंत घ्यायची सवय लावली.

    नेहेमी नैसर्गिकरीत्या, आपोआप मलप्रवृत्ती साफ राहील यावर नीट लक्ष ठेवावे. नाहीतर परत वात वाढतो. कोणत्याही रेचक औषधांशिवाय ! पण जर काही चुकीच्या पथ्याने, विशेषतः जेवणातील तेलाचे प्रमाण कमी पडल्याने, वाताच्या आजारात, उतारवयाचा विचार करून, एखादे मृदु विरेचक औषध घ्यावे लागले तर घ्यावे.

    "काय म्हणताय ?
    संडासचे औषध रोज घ्यायचे ? अहो पण आमचे ते डाॅक्टर म्हणतात, संडासचं औषध घेऊच नये, त्याची सवय लागते म्हणे !"

    "त्यांना सांगावं, म्हणावं, संडास साफ होणारं एखादे औषध निसर्गोपचार सल्ल्याने घेतल्यानंतर, आयुष्यभराची औषधं जर बंद होणार असतील तर काऽही बिघडत नाही.

    हं, अश्या साध्या उपायांनी जर वात शांत झाला तर, हाॅस्पीटलची बिल मात्र कमी होतील, ( त्यामुळे डाॅक्टरांचं पित्त वाढेल ) हे मात्र नक्की !

    -- गौरी पाटील
    निसर्गोपचार तज्ज्ञ
    9820584716

      May 17, 2017


  • मुंबईची दैना

    आज मुंबई अस्वस्थ आहे. काय करावे हे तिला सुचत नाही. कसे जगावे हे उमजत नाही. कोणाला सांगावी तिची व्यथा? कोणाकडे मांडावी तिची कथा? जगासाठी ती या देशाची आर्थिक राजधानी आहे. एक महानगरी आहे. पण काय आहे आता तिच्याकडे?

      April 15, 2010


  • सुनीताबाई – सौदामिनी !

    सुनीता बाईंशी मी दोनदाच फोनवर बोललो आहे- वालचंद ला असताना आम्ही ” तुझे आहे — ” बसविले होते. मी त्यांत “आचार्य ” ची भूमिका केली होती. मनाच्या एका तारेत पुलंना पत्र लिहिलं – ” तुमच्या या मानसपुत्राला आशीर्वाद द्या.” उत्तर आलं नाही. फोन लावला, पलीकडून सुनीताबाईंचा आवाज – ठाम नकार आणि फोन कट !

      April 30, 2021