(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • झगमगती चंदेरी दुनिया

    वेब सिरिज बनविणं हा खूप कठीण Task असतो. नुसती कथा लिहिली एका मित्राने हौशीसाठी कॅमेरा विकत घेतला त्याला शूटींगसाठी बोलावलं आपल्यातल्या काही फिल्मवेड्या मित्रांनी दिग्दर्शन व अभिनय केला इतकं सोपं ते नक्कीच नसतं.

  • धन्यवाद मंत्र

    वस्तु, पदार्थ, प्रकृती सर्वांची आवश्यकता आपल्याला आहे. त्यांचा शिवाय आपले जीवन नीरस आहे. म्हणून त्यांना ही हृदयाच्या निर्मळ भावनांनी धन्यवाद. तसेच ज्या ईश्वराने वेळोवेळी आपल्याला मदत केली. जिथे सगळ्या आशा संपल्या होत्या अशा वेळी जीवन सुखांनी भरून टाकले अश्या त्या परम सत्येला धन्यवाद करायला विसरू नका. हा धन्यवाद मंत्र सतत करत राहिले तर कधीच दुःखाची झळ आपल्याला लागू शकणार नाही.

  • परीस…

    भीती नावाच्या प्रकाराची मनुष्याला अगदी लहान वयातच ओळख होत असते." झोप लवकर, बागुलबुवा येईल बघ. "इथपासून सुरू झालेला आपल्यातील भितीचा प्रवास अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच मृत्यूशय्येवर पडल्यावर होणाऱ्या विलक्षण थररकापापर्यंत सुरूच असतो. भितीची कारणं वेगवेगळी असतील... प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या असतील परंतु कोणतीही व्यक्ती घ्या कशाची ना कशाची भिती तिला सदैव सतावत असतेच.. लहानपणी मला अशीच बुरुजावरच्या घुबडाची फार भीती वाटायची... आमचं घर म्हणजे फार मोठा बुरुजाचा वाडा होता.. त्याच्या प्रत्येक बुरुजावर घुबडाचे कायम वास्तव्य असायचे. संध्याकाळ झाली की सारे पक्षी आपापल्या घरट्याकडे परतायचे...आमची सुद्धा खेळून खेळून घरी परतायची वेळ तीच असायची. मी पळत पळत घराकडे निघतांना बुरुजाकडे जायच्या पायऱ्या म्हणजे आम्ही त्याला 'चोप' म्हणायचो.अर्थात उतरत्या दगडी पाय-याचा रस्ता, या चोपंवर पाऊल ठेवलं की एकदम डोळ्यासमोर एक घुबड बसलेले दिसायचे मग पुढे जायची हिंमत व्हायची नाही. वाट बघायची कोणी मोठा माणूस वाड्यात जाणारा येईल का ? म्हणजे त्यांच्या सोबत जाता येईल. खरं तर एक लहानसा खडा फेकून हाणला तरी ते घुबड उडून जाईल पण तसे करणे शक्य नव्हते कारण त्या बाबतीत अशी एक दंतकथा होती की या घुबडांना जर का खडा मारला तर ते घुबड अलगद खडा झेलते अन् समुद्रात नेऊन टाकते मग जसा जसा खडा विरघळत जाईल.. तसे तसे आपण सुद्धा विरघळून जातो... या कथेचा एवढा प्रभाव होता की कधीच आम्ही घुबडाला खडा फेकून मारू शकलो नाही..

    जागच्या जागेवर गरकन फिरणारे... लुकलुकणारे त्याचे भेसूर डोळे, टवकारलेले कान,पंखांची केलेली फडफड काही केल्या माझ्या डोळ्यासमोरून जायची नाही. मध्यरात्री केव्हातरी घुssघुss असा घुबडाचा आवाज ऐकू यायचा.. मग तर अधिकच भिती वाटायची. तोंडावर पांघरून घेतलं तरी घुबड सारखं दिसत राहायचं. खरंतर नंतर मोठे झाल्यावर कळलं की घुबड काही देशात शुभशकून मानले जाते..घुबड हे तर ज्ञानाचे प्रतिक आहे. परंतु आपल्याकडे मात्र घुबडाला अशुभ मानतात.घुबड म्हणजे कुरुप आणि अजागळ पक्षी .. आमच्या लहानपणी आमच्या मित्रांचा सगळा वाचिक व्यवहार घुबड हा शब्द घेऊनच चालायचा. 'घुबडा सारखं काय टकमक बघतोस ?' ..'घुबडासारखं तोंड करायला काय झालं..?' 'घुबड्या तोंडाच्या...?' अन् मुलगी किंवा भांडकुदळ बाई असेल तर 'ती घुबडी..' असे घुबडा बद्दलचे वाक्य उच्चारतांना त्या घुबडाची भिती तेवढी कायम होती. खेळता-खेळता आम्ही घुबडाचं एक गाणं म्हणत असू .. घुबड घुमतं, पैसा मागतं पैसा कशाला?...असं ते बरंच लांबलचक गाणं होतं.

    काही लोक सांगायचे की आपली अंडी उबवण्यासाठी घुबड सातासमुद्रा पलीकडून परीस आणतात. हा परिस लोखंडाला लावला तर त्याचं सोनं होतं. आमच्या वाड्यात बसल्यानंतर चर्चा निघायच्या आमचे एक चुलत आजोबा नेहमी तवा किंवा लोखंडी वस्तू घुबड बसायचं तिथं नेऊन ठेवायचे. परिस आणला तर तो लोखंडी वस्तूला लागेल व ती सोन्याची होईल. या आशेवर वाट बघायचे.. .. परंतु कधीच त्यांच्या लोखंडाला परीस लागला नाही. यावरून असा निष्कर्ष ते काढत असायचे की घुबड आपल्या परिसाला खूप जपते, चुकूनही लोखंडाच्या जवळ अंडी ठेवत नाही. अशा चर्चा आमच्या कानावर पडायच्या अन मनात यायचे चुकून कधीतरी आपल्याला हा परिस सापडेल काय..? मग आपण साऱ्याच लोखंडी वस्तू सोन्याच्या करून टाकू बालबुद्धीला वाटत असणारे हे विचार हळूहळू वास्तवाचा शोध घेत गेले..अन् कळून चुकलं की 'परीस' नावाची अशी कोणतीच वस्तू जगात नसते... पण एक मात्र खरं की सतत चांगलं काम, प्रेमाने बोलणं,सत्य वागणं,अभ्यास, वाचन,चिंतन,गुरुचा सहवास,ज्ञानकणाची जिज्ञासा..यासारखे किती तरी परीस‌च होते जे पुढील आयुष्यात भेटत गेले ..कसे स्पर्शत गेले नकळत कळलं सुद्धा नाही..?स्वतःच्याच आयुष्याचं सोनं कसं होत गेलं तेही समजलं नाही ? घुबडाबाबतचे ते विचार आजही आठवतात...पण प्रत्यक्षात आज घुबडंच दिसत नाहीत..अन् भिती तर केंव्हाच पळून गेली आहे..दूर. बुरुजाचा वाडा ही तसा शाबूत राहिला नाही...फक्त मनावर काही परीस राहून गेले.तेच परीस मी जपत राहतो...जीवापाड.अजून ही असेच नवनवीन परीस भेटत राहतात... नकळतपणे. तेव्हा आयुष्याच सोनं होऊन जातं...‌

    -- संतोष सेलूकर.
    परभणी
    ७७०९५१५११०.

  • सोशल मिडियाचा वापर सात्विकता वाढविण्यासाठी

    सोशल मिडियाचा वापर करून देवस्थान व्यवस्थापन अशा अनेक प्रकारच्या सेवांचा निर्देश करून आपल्या भाविकांचा लक्षात आणून देऊ शकते, सांगू शकते. योजनाबद्ध आखणी करून अनेक भाविकांना सेवा देण्याची संधी प्राप्त करून देऊ शकते. भाविकांच्या सात्विक, सकारात्मक उर्जेमुळे देवस्थानातील सात्विकतेत भरच पडेल.

  • अंतरंग – भगवद्गीता – भाग १

    एकुण काय तर एका पानावर १० श्लोक छापले तर केवळ ७० पाने; म्हणजे गीता हे एका छोट्या गोष्टीच्या पुस्तकाइतके लहान पुस्तक आहे. उत्तम कलाकृती म्हणून गाजलेले पुस्तक किंवा चित्रपटसुद्धा काही वर्षांनंतर विस्मृतीच्या पडद्याआड जातात. गाणी किंवा चित्रपटाचे संगीत तर रोज नवीन येते आणि जुन्याला मागे ढकलते. पण मग हजारो वर्षे टिकून रहाण्याइतके आणि आजही लोकांना आकर्षक वाटावे असे गीतेत आहे तरी काय? उत्तर अगदी सोपे आहे.

  • आत्मनिर्भर व्हायचं आहे ? तर मग त्या करता . . .

    आधी कोविडची साथ; त्या नंतर सीमे वर चीनची आगळिक; संतापलेल्या भारतीयांनी चीनी वस्तूं वर बहिष्कार टाकण्या करता दिलेली हांक; आणि शेवटी झालेली जाणीव की आपली अर्थ व्यवस्था चीन मधून आयात केलेल्या वस्तूंवर येवढी अवलंबून आहे की आपण फार काही वस्तूं वर बहिष्कार टाकूच शकत नाही. या सर्व घडामोडींच्या निमित्ताने काही मुद्दे अधोरेखित झाले आहेत, व त्याची नोंद आत्ताच घेणे गरजेचे आहे. कारण एकदा का सीमे वर परत शांतता झाली, कोविड संक्रमण आटोक्यात आले, की हे मुद्दे आपल्या करता महत्वाचे राहणार नाहीत.

  • मी मुंबईची लोकल बोलतेय

    आमची मुंबईच्या प्रिय मुंबईकरांनो मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोलायचं कारण म्हणजे आज मला मनातुन खूप भरून आले आहे. आणि भरून येण्याचे कारण म्हणजे मला लवकरच तुमच्या सेवेत पूर्ण क्षमतेने सामावून घेण्याची चर्चा माझ्या कानापर्यंत पोहचली आहे.

  • लहानपणातलं बालपण

    अनेकदा अगदी लहानपणापासूनच बाल मनावर आपण, कदाचित अनावधानानं असेल, पण आघात करत असतो, दबाव टाकत असतो. त्यांच्या स्वातंत्र्यावर अनेकदा आपण गदा आणत असतो. प्रत्येक बाब आपण आपल्याच मनाप्रमाणे त्यानं करावी ही केवळ अपेक्षाच नाही, तर सक्ती सुद्धा करत असतो. शिस्तीच्या नावाखाली आपण बाळाची गळचेपी करत असतो. त्यांच्या लहानपणी त्यांचं बालपण टिकवून ठेवणं आपापल्या हातात असतं.

  • सत्यनारायण पूजा – एक विश्लेषण

    लोकसत्ताच्या ‘चतु:सूत्र’ या सदरातील ‘संस्कृतीच्या वाटाघाटी’ हा प्रा. श्रद्धा  कुंभोलकर यांचा १२नोव्हें. २०२० ला ( पुणे आवृत्तीत ) प्रसिद्ध झालेला लेख आणि त्यानिमित्तानें प्रा, विजय काथरे यांची १३ नोव्हे. ची लोकसत्तामधील ‘लोकमानस’ या सदरातील प्रतिक्रियाही वाचली. सत्यनारायण व्रतावर आणखी माहिती मिळावी अशी इच्छा काथरे यांनी प्रगट केलेली आहे. त्यानुसार माझा हा लेख.

  • पाय खेचण्याची स्पर्धा!

    ही कोणती स्पर्धा जेथे एखाद्याच्या पोटावर पाय ठेवून पुढे जाण्यास मज्जा येते. जो तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. फक्त ऐकवण्याच्या गोष्टीत स्वारस्व मानतो.’आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून’ अशी भरकटलेली तसेच वाईट दृष्टीच्या विचारांचा अंगीकार करून त्रुट्या काढण्यात अनेक महाशय धन्यता मानतात. आपल्या खांद्याला खांद्या लावून चालणारा पुढे जाण्यास निघाला की, पाय खेचण्याची ओढच काही जणांना लागते.