वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अंतर्मनावर प्रतिबिंबित झालेले प्रत्येक विचार आपल्या वर्तन आणि व्यवहारांमध्ये परिवर्तन करत राहतात. अनेकदा मनांत येणारे विचार आपल्या गत अनुभवांशी निगडीत असतात तर ते काहीवेळा नजीकच्या भविष्यात काय, कसं आणि कधी घडावं ? याबद्दलचे असतात
हा जरा वेगळा विषय आहे. नुकताच मी बालक पालक हा चित्रपट बघितला खूप छान वाटलं , जुन्या आठवणी जाग्या झाल्या, त्यावेळी इतके सगळे बिनधास्त नव्हते. पण एक जगण्यात मजा होती. त्यात एक सीन आहे मुले चोरून निळे चित्रपट बघतात ते ,
सोळाव्या शतकात त्याकाळचा गोवा म्हणजे तिसवाडी, बार्देस व सालसेत या तालुक्यात जबरद्स्त प्रहार हिंदू संस्कृती वर झाला. जे काही हिदू संस्कृती म्हणून असेल ते नामशेष करायचा त्या काळी क्रिस्ती मशिनरी व राजकर्तां वीडाच उचलला होता. रुई गोम्स पेरेराच्या संशोधना प्रमाणे एकूण ५५६ (तिसवाडी ११६, बार्देस १७६ व सालसेत २६४) मोठी देवळ जमीनदोस्त करण्यात आली. यातील काही देवतांच्या मुर्ती नदी पलिकडील शेजारच्या प्रदेशात स्थापित झाल्या
मी आणि माझं, आपण आणि आपलं या वैचारीकतेमुळे कुटुंबातील सदस्यांनी आपल्या स्वतः भोवती जणू लक्ष्मणरेषा आखून घेतल्याप्रमाणे वर्तन आणि विचार अंगीकारल्याचं दिसत आहे. सामाजिकदृष्ट्या आपणच आपलं अध:पतन तर करत नाहीत ना, हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपल्या घराचं अंतरंग सजवण्यात आणि खुलवण्यात आपल्या मानसिकतेचा संबंध असल्यामुळे अंतर्मनाचा त्यांत मोठा वाटा असतो. आपल्या अंतर्मनाच्या सहभागाशिवाय केलेलं अंतर्गत सजावटीचं काम आपल्याच घरात आपल्याला परकेपणा निर्माण करायला कारणीभूत ठरू शकतं. अर्थात, अशी एखादीच सजावट अपवादात्मक असू शकते, की जी आपल्या अंतरंगात न डोकावता केली गेली आहे.
विषय विचित्र म्हणा , गरजेचं काहीही म्हणा! परंतु आज जगभर या व्यवसायात करोडो डॉलरची उलाढाल होते हे मान्यच करावे लागेल. फार पूर्वी फ्राईड ने संगितले होते २०२१ किंवा त्यानंतरचे शतक मानसोपचार तज्ञांचे असणार आहे . आज ती वस्तूस्थती निर्माण झाली आहे कारण कोरोनाच्या काळात एक तर सवांद तुटलेला आहे आणि काहींच्या डोक्यात पुढे काय ? हा यक्षप्रश्न निर्माण झाला असणारच ह्यात शंका नाही.
जवळपास १२०० पुस्तके लिहिणाऱ्या , मराठीतील वाचक प्रिय लेखक ,गुरुनाथ नाईक यांना आयुष्यात अखेेरीस का होईना परंतु अ.भा.साहित्य संमेलनात सन्मान पुर्वक आमंत्रित करून व्यासपीठावर सत्कार करावयास काय हरकत असावी?
प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात; त्यातील काही गुण इतरांसारखे देखील असतात, तर काही गुण इतरांपेक्षा वेगळे, निराळे असतात. खरे तर ह्या वेगळ्या गुणांमुळेच ती व्यक्ती ओळखता येते. म्हणूनच, व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीमधील वैविध्यपूर्ण गुणविशेषांचा वैशिष्ट्यपूर्ण संच होय.
अनेक उपयुक्त मंत्र ( ज्याला आपण tailor made म्हणतो) जसे दत्तमाला,गुरुचरित्र,पद्मपुराण,नवनाथ, “दुर्गासप्तशती “मध्येही आहेत.मला सर्विस मध्ये विपदा यायच्या तेंव्हा “ॐरिम सर्व बाधा प्रशमन,…..वैरी विनाशनम रिम ॐ ” मंत्राचा खुप चांगला अनुभव आला. माझ्या वाचनात आलेल्या अन्य संदर्भात उपचारांसंबधीत काही मंत्र/ स्तोत्रांच्या उल्लेख आहेत ,त्यांचा प्रयोग म्हणा, उपयोग म्हणा, करून बघता यावा म्हणुन शेअर करतो आहे :
कोरोनामुळे जग बदलत आहे, अजूनही बदलणार आहे. जगण्याच्या विविध क्षेत्रांवरच नाही तर सामाजिक परंपरा आणि चालीरीतीवरही याचा परिणाम होत आहे, यापुढेही तो होणार आहे. मात्र, हा बदल महाराष्ट्रातील जनता लढाऊ वृत्तीने आणि सामाजिक जाण भान जपत स्वीकारत आहे, ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल. आषाढी एकादशी आणि वारीच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला. लाखो विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत जवळपास पंधरा दिवस साजरा होणारा पंढरीच्या वारीचा महोत्सव यंदा सरकारी नियम पाळून अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
Copyright © 2025 | Marathisrushti