(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग ४

    माणूस हा जन्मतः मांस न खाणारा प्राणी आहे. शरीर रचनेचा विचार केला असता, शारीरिक आणि मानसिक स्तरावर, मांस खाणाऱ्या प्राण्यांची तुलना, माणसाशी कधी होऊच शकत नाही. तरीदेखील माणूस मांस खाऊ लागला. काहीवेळा दुसरे अन्न मिळतच नाही म्हणून, तर काही वेळा केवळ चवीसाठी, काहीवेळा हाय प्रोटीन डाएट म्हणून तर काही वेळा औषध म्हणून.

    शरीररचनेच्या विरोधात म्हणजे निसर्गदत्त नियमाच्या विरोधात जेव्हा आहार पोटात जाईल तेव्हा ते अनेक आजारांना जन्म देणारे असते.
    माणसाच्या शरीराची रचना ही मांस खाण्यासाठी, बारीक करण्यासाठी, मांस पचवण्यासाठी, शरीरातून बाहेर काढण्यासाठी योग्य नाही, हे सिद्ध झालेले आहे. तरीदेखील कोणत्याही कारणांनी जर मांस खाल्ले गेले तर ते पचत नाही. किंवा काहीवेळा तर निसर्ग पुनः विरोधात जातो. आणि या द्वंद्वात नुकसान मानवी शरीराचे होते.

    चरबी वाढणे, जाडी वाढणे, किडनीचे आजार, यकृताचे आजार, ह्रदयाचे आजार वाढलेले दिसतात, याचे एक कारण अति प्रमाणात खाल्ला जाणारा मांसाहार आहे.

    कोकणात जी मंडळी मांसाहार करतात, त्यातील बहुतांश मंडळी "दिवस पाळून" मांसाहार करताना दिसतात. म्हणजे, रविवार आणि बुधवार या दोन दिवशी मांसाहार केला जातो. इतर दिवशी मात्र शुद्ध शाकाहारी जेवण घेतले जाते. यातील रविवार आणि बुधवार हे दिवस कोणी आणि कसे शोधून काढले माहिती नाही, पण औषध सुरू करताना ते रविवारी अथवा बुधवारी किंवा पुष्य नक्षत्रावर सुरू करावे, असं कुठेतरी वाचनात आलेलं आठवतंय.

    काहीही मग जे औषध स्वरूपात घेतले जाते ते रविवारी किंवा बुधवारी घेतले जावे, या हेतुने आहार हाच औषधी स्वरूपात होण्यासाठी, मांसाहार करण्यासाठी, हे दोन दिवस गृहीत धरले गेले असावेत. असे मला वाटते.

    म्हणजेच मांसाहार हा स्वस्थवृत्तार्थ नसून, व्याधी परीमोक्षार्थ सांगितला गेलाय. निरोगी रहाण्यासाठी नसून, रोगी अवस्था कमी होण्यासाठी, फक्त औषध स्वरूपात वापरावा असे म्हटले तर ते चुक ठरू नये.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    4.10.2016

      October 4, 2016


  • नागेश मोरवेकर – एक प्रतिभावान लोककलाकार

    डोळे मिटून भूतकाळाच्या विश्वात शिरलं , की अनेक गोष्टी, आठवणी, व्यक्ती, प्रसंग डोळ्यांसमोर लख्ख उभे रहातात. त्यासोबत जोडलेल्या अनेक गोष्टी फेर धरून नाचू लागतात. आनंद, दुःख, समाधान, अशा संमिश्र भावभावनांना स्पर्श करत एक छानसा फेरा पूर्ण होतो आणि पुन्हा एकदा मी वर्तमानकाळात अवतरतो.

      February 1, 2022


  • लुटीचे नवे साधन

    खासगीकरणातून बांधण्यात आलेल्या विविध रस्त्यांवर सुरू असलेल्या अन्याय्य टोलवसुलीच्या विरोधात आता वाहनधारकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे या विषयाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मुदत संपून गेल्यानंतरही टोलवसुली सुरू असल्याचे प्रकार यापुर्वी उघडकीस आले आहेत. त्यामुळे जनतेच्या आर्थिक लुटीचे नवे साधन बनलेल्या टोलबाबत सरकार फेरविचार करणार का हा खरा प्रश्न आहे.

      October 2, 2010


  • दृष्टिकोन

    आता मी सुद्धा माझा दृष्टिकोन बदलून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसा भाग घेता येईल  असे कार्यक्रम सादर करायचे ठरविले . विद्यार्थ्यांचा आनंद हाच तर माझा आनंद होता. मुलांच्या दृष्टिकोन जाणून घेतल्यामुळे मला  अनाकलनीय असं काहीतरी साध्य केल्याचा आनंद झाला.       

      August 6, 2022


  • मरावे परी अवयव रुपी उरावे……..

    कालचा रविवार हा सोलापूर वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक ठरला कारण होते एका जेमतेम शिकलेल्या पित्याने घेतलेल्या क्रांतिकारी निर्णययाचे, ज्यामुळे चार व्यक्तींना जीवनदान मिळाले!

    गणेश उर्फ शिवपार्थ शिवशंकर कोळी हा अवघा 14 वर्षंचा मुलगा फुटबॉल खेळत असताना उष्माघाताने कोसळला,उपचारासाठी दाखल करताच डॉक्टररांनी,मेंदुला जब्बर धक्का बसल्याने त्याचे वाचणे अशक्य आहे हे त्याच्या नातेवाईकांना सांगितले,शेवटचे प्रयत्न करण्यात आले पण शेवटी रुग्णाचा मेंदु मृत झाल्यामुळे अखेर त्याला "ब्रेनडेड" घोषित करण्यात आले.ह्यानंतर जेमतेम दहावी शिकलेले मुलाचे वडील शिवशंकर कोळी यांनी मला माझ्या मुलाच्या आठवणी जपायचा आहेत त्यामुळे अवयव दानाची इच्छा बोलून दाखवली.सोलापूर वैद्यकीय क्षेत्र लगेच कामाला लागले.

    शिवपार्थ चे चार अवयव.....हृदय,यकृत,दोन मूत्रपिंड हे काढण्यात आले,हृदय हे हवाई मार्गाने पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला पाठवण्यात आले (पुण्याच्या इतिहासातील पहिले हार्ट ट्रान्सप्लांट) व एक मूत्रपिंड अन यकृत रुग्णवाहिकेने पुण्याच्या मंगेशकर व नोबेल हॉस्पिटलला पाठवण्यात आले.एका मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण सोलापुरात अश्विनी हॉस्पिटलमध्ये एका engineering शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आले जो 2 वर्षांपासून दोन्ही मूत्रपिंड निकामी असल्यामुळे डायलसीस वर होता.

    आता इथे एक जीव गेल्याची खंत तर निश्चितच आहे पण त्याहून समाधान चार जीव वाचल्याचे आहे.......सलाम त्या पित्याला व मातेला ज्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला.सोलापुरातील डॉक्टरांनी जी तत्परता दाखवली त्याबद्दल त्यांना सलाम!!अवयव घेऊन जाताना ग्रीन कॉरिडॉर करण्यासाठी पोलीस अन सोलापुरातील नागरिकांनी जे सहकार्य केले त्यासाठी सर्वांना सलाम!

    शेवटी एवढचं म्हणेन हि घटना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपली विचारसरणी बदलण्यासाठी...........नक्की विचार करा!!!

      March 15, 2017


  • श्री. जगन्नाथ पाठक ।। सद्गुरुमाऊली जगन्मित्र ।।

    सप्टेंबर २०१९ महिन्याचा गुरुतत्त्व विशेषांक दत्तमहाराजांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र गाणगापूर स्थित जय गुरुदेव आश्रम ट्रस्टचे संस्थापक ब्रह्मलीन परमपूज्य जगन्नाथ चिंतामण पाठक गुरुजी यांच्या जीवनावर आधारित आहे.

    “भक्तकामकल्पदुम" श्रीमद्गुरुचारत्र” हा पाचवा वेद म्हणून मानल्या गेलेल्या परमाण प्रासादिक अलैकिक ग्रंथाची इ. स. १९५४ सालापासून गेली ६० वर्षे सातत्याने शेकड पारायणे करुन त्याद्वारे "ग्रंथ हेच गुरु” हे तत्त्व आपल्या आचार-विचार- उच्चारांनी सिध्द करणारे तसेच श्रीगुरुचरित्र ग्रंथात सांगितलेली वैदिक साधना अंगीकृत करुन श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराजांशी तादाम्य पावून समर्पितवृत्तीने अलौकिक शांत जीवन जगणारे शांत प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री पाठक गुरुजी.

    कडक शिस्तीच्या पोलिस खात्यात सुमारे चार दशके नोकरी करत असतानाही दत्तभक्तीच्या पाऊलवाटेवर आपले संपूर्ण जीवन तन्मयतेने समर्पित करणारी परमश्रध्दाळू गुरूकृपांकित व्यक्ती म्हणजे पाठक गुरुजी पूर्वी होते महत्त्व । ब्राह्मणांसी देवत्त्व । वेदबळे नित्यत्त्व । भुसूर म्हणती त्या काजा । श्रीगुरुचरित्र अध्याय २६.२४ या ओवीची आजही सत्यता पटवून देणारे भुदेव म्हणजे परमपूज्य पाठक गुरुजी. संसारात राहूनहीप्रयत्नपूर्वक परमेश्वराची कृपा प्राप्त करून घेता येते याचे स्वानुभूवात्मक उदाहरण म्हणजे पाठक गुरुजी.

    आपल्या सर्वाच्या सहवासात राहून त्यागी, निस्वार्थी भावनेने वर्तन करीत नि:स्यीम उपासना करून झालेल्या ईश्वरी प्रेरणेने पवित्रतेची दैवी स्पंदने देऊ शकणारे नवे एकांतमय उपासना स्थान निर्माण करून त्या स्थानात वास्तव्य करणाऱ्याला निरपेक्ष ईश्वरीप्रेमाचे संस्कार मिळावेत एखादी “श्रीगुरुकृपा” महात्म्य प्राप्त केलेले महान “जगन्मित्र" म्हणजे आदरणीय पाठक गुरुजी.

    मुक्काम पोस्ट नांदेड तालुका: धरणगाव, जिल्हा: महाराष्ट्र येथील श्रीराममंदिराचे मुख्य पुजार श्री. चिंतामण आत्माराम पाठक यांचे ज्येष्ठ सुपुत्र पिढ्यानपिढ्या “श्रीराम" उपासक “पाठक" या ब्राह्मण घराण्यात श्रीदत्तमहाराजांना केलेल्या नवसामुळे पाठकगुरुजींचा जन्म झाला. बालपणापासूनच आई- वडिलांच्या धार्मिक स्कारांमुळे गुरुसेवा आणि ईश्वरभक्ती मनावर बिंबली गेली. घरच्या श्रीराममंदिरापासून सुरू झालेला अध्यात्माचा श्रीगणेशा, शिक्षणोत्तर पितृआज्ञा प्रमाण मानून केलेल्या विवाहानंतर दत्तभक्तीकडे वळला. श्रीगुरुचरित्र या परमप्रासादिक ग्रंथाची पारायणसेवा हीच लौकिक उनत्तीची आणि आपल्या अलौकिक उध्दाराची गुरुकिल्ली आहे याबद्दल अनुभूतीपूर्वक मनाची खात्री पटली. गुरुजींबद्दल त्यांच्या आईने मनी बाळगलेली नोकरी करण्याची इच्छा आणि वडिलांनी अपेक्षिलेली नोकरी करण्याची आणि वडिलांनी अपेक्षिलेली भिक्षुकी या दोन्ही इच्छांना यथोचित मान देऊन गुरुजींनी आपल्या चार दशकांच्या नोकरीच्या कालखंडात नोकरी आणि भिक्षुकी यांचा योग्य समतोल राखत दत्तभक्ती वृध्दिंगत केली. पहाटे तीन ते रात्री १२ वाजेपर्यतच्या आपल्या व्यस्त लौकिक दिनचर्येतून स्वतःसाठी मिळालेला फावला वेळ गुरुजींनी श्रीगुरुचरित्र पारायणसेवा करीत सत्कारणी लावलो. प्रथमतः नोकरीतील भ्रमंती, देवदर्शनासाठी तीर्थाटन आणि सेवानिवृत्तीनंतर ईश्वरी इच्छेने सोपवलेल्या दत्तकार्यासाठी “गगनभरारी" ही गुरुजींनी "अनवाणी” पायांनी केली. धर्मपत्नी माईंच्या गृहकृत्य दक्षपणामुळेच जगाचा संसार सांभाळणाऱ्या गुरुजींचा प्रपंच परमार्थरूप झाला.

    शंभरहून अधिक गायत्री पुरश्चरणे आणि अखंड श्रीगुरुचरित्र पारायणसेवा आपल्या आयुष्यात करणारे परमपूज्य गुरुनाथबाबा दंडवते हे गुरुजींना सद्गुरु म्हणून लाभले आणि बद्रीनाथ या प्राचीन तीर्थक्षेत्री गुरुजींना दंडवतेबाबांकडून गुरुमंत्र मिळाला. गुरुमंत्राच्या अखंड अनुसंधानाने पारायणसेवेमुळे आणि अंगकृत केलेल्या गायत्री उपासनेमुळे ईश्वरी सत्य कळण्याचे भाग्य गुरुजींना लाभले. प्रयत्नांती परमेश्वर !

    निवृत्तीनंतर दत्तभक्तीतच रममाण झालेल्या या पाठक दांपत्यांच्या घरात अक्षरक्षः स्वर्ग अवतरला. पूर्वसुकृतामुळे आणि ईश्वरकृपेने कित्येकांना गुरुजींच्या सत्संगतीचा परमलाभ झाला आणि त्यांच्या श्रध्दाशील हृदयांत दत्तभक्तीची चैतन्यमयी पाऊले उमटली.
    जयासी प्रसन्न होय गरु । तयाचे घरी कल्पतरु । चिंतिले फळ देतसे ।।
    श्रीमद गुरुचरित्र अध्याय ४६.४१

    याचे सवौत्कृष्ट उदाहरण म्हणजे शारिरीक अपंगत्त्वामुळे शाळेची पायरीही न चढलेल्या श्री. महेश मनोहर पाटील यांनी पाठकगुरुजींच्या आशीर्वादामुळे संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथ “हस्तलिखित केला! याचा प्रत्यय ज्यांनी घेतला ते खरोखरच भाग्यवान ! ही दत्तकृपेची अनुभूती गुरुजींच्या माध्यमातून दत्तदर्शनासाठी येणाऱ्या कित्येक दत्तभक्तांच्या जीवनांतही पाझरली आणि जय गुरुदेव भक्तपरिवाराचा उदय झाला. माहीम येथील स्वगृही मग दर गुरुवारी दत्तदरबार भरू लागला.

    ईश्वर डोळयांना दिसत नाही पण त्यांची ईशकार्यातून अनुभूती येते. गुरुजींची दत्तभक्तीची इमारत फळाला आली. आणि श्रीदत्तमहाराजांच्या प्रेरणेने श्री क्षेत्र गाणगापूर या त्यांच्याच युगानुयुगे असलेल्या सिध्दभूमीत दत्तभक्तांना श्रीगुरुचरित्र या दत्त सांप्रदायिक प्रमाणग्रंथाची पारायणसेवा अल्प खर्चात करणे सूकर व्हावे या उदात्त हेतूने खिशात कोणतीही आर्थिक बचत नसतानाही “श्रीगुरुदेवनिवास” या वास्तूची निर्मिती झाली.

    ऐक शिष्या नामकरणी । तू गुरुभक्ती शिरोमणी ।
    तुझी भक्ति श्रीगुरुचरणी । लीन होय निर्धारी ।।

    “निमित्त माझे करूनि लीला श्रीदत्तगुरु करिती" अशी मनाची नामधारकाप्रमाणे संपूर्ण शरणागत अवस्था ठेवून दैनंदिन लौकिक व्यवहार श्री दत्तमहाराजांच्याच इच्छेने आणि कृपाशीर्वादामुळे होत आहेत. असा भक्तीचा आदर्श लोकांसमोर ठेवणारे गुरुजी प्रसिध्दीपासून नेहमच पराडमुख राहिले. “मी चालत नाही, मला भगवंत चालवतो!” “मी दत्ताचा आहे आणि माझ्याकडून होणारे प्रत्येक कार्य हे श्रीदत्तमहाराजांचे आहे" अशी प्रबळ जीवननिष्ठा अंगी बाळगून, येणारा

    प्रत्येक क्षण, घडणारी प्रत्येक घटणा आणि दारात येणाऱ्या व्यक्तीचे आगमन श्रीदत्तमहाराजांच्या संकेतानुसारच आहे असा साक्षीभाव मनी बाळून त्याला यथोचित न्याय गुरुजी देत. “मज आवडे अथवा न आवडों । “तु” जे इच्छिसी तेंचि घडो । हे मागण्या अवघडों, जीभ माझी ! असे गुरुजी प्रार्थनेतही म्हणत.

    सद्गुरु दंडवतेबाबा गुरुजींना “जगन्मित्र” या नामाभिधानाने संबोधले. जग आणि मित्र दोन्ही शब्दांचा अर्थ व्यापक सखोल आहे. जगाचा मित्र तो जगन्मित्र ! वसुधैव कुटंबकम् या न्यायाने पाहात आपल्या प्रेमळ, संवेदनशील मनाने त्यांच्या लॉकेक - अलौकिक प्रश्नांना कवेत घेत, करुणामय वात्सल्याने त्यांना दत्तभक्तीकडे वळवला. “महाराज सांभाळतील" असे संबोधून जणू भक्तांच्या क्षेमकल्याणाची ग्वाही देणाऱ्या या “जगन्मित्राला” कोटी कोटी प्रणाम.

    भक्तगणांना तारणारा हा भूदेवच ! ज्यांच्या मनाचे निवासस्थान सदैव श्रीदत्तमहाराज श्रीक्षेत्र गाणगापूर. “अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त" हा गुरुजींचा श्वास ! श्रीगुरुचरित्र ग्रंथ हा गुरुजींचा प्राण आणि “श्रीगरुदेवनिवास" हा उपक्रम हा त्यांचा ध्यास, अगदी प्राणांपलीकडे !

    गुरुजींनी दिनांक २० ऑगस्ट २०१४ रोजी डोंबिवली येथील त्यांचे द्वितीय सुपुत्र संजय यांचे घरी देह ठेवला. मूर्तीच्या स्वरूपात गुरुजी आश्रमात पुन्हा सगुणरूपांत अवतरित आहेत. आश्रमात आजही क्तांना त्यांच्या असलेल्या चिरंतर आस्तित्ताची जाणीव होत आहे, स्वप्नदृष्टान्तामार्फत शिष्यांना अलौकिक मार्गदर्शन मिळत आहे. आणि गुरुजींमार्फत गुरुतत्त्वाच्या सोबत - सहवासाचे नित्य प्रत्यंतर आजही भक्तांना येत आहे. “श्रीगुरुचरित्र” घडत आहे !

    श्रीगुरुचरित्र पारायणाद्वारे श्रीगुरु श्रीमननृसिंह सरस्वती महाराजांच्या चरणी सेवारत व्हा आणि आपली लौकिक उनत्ती आणि पारमार्थिक उददार करून घ्या. हीच मानवी जीवनाची गुरुकिल्ली आहे. असा पाठकगुरुजींचा सर्व भक्तांसाठी संदेश आहे.

    म्हणे सरस्वती गंगाधरू । जवळी असता कल्पतरु । न ओळखिसी अंधवहिरू । वाया कष्टती दैन्यरीती ।।३७।।

    भजा भजा हो श्रीगुरुसी। जें जें काम्य तुमचे मानसी । सिध्द होईल त्वरितेंसी । आम्हा प्रचिती आली असो ।। ३८ ।।
    श्री गुरुचवित्र अध्याय ४७ वा

    “या भारताची लोकशाही । होवोनि अध्यात्मिक लोकशाही वरो आदर्शशही। कृष्णकृपे, दत्तकृपे, स्वामीकृपे” असे गुरुजींचे श्रीदत्तमहाराजांकडे मागणे आहे.

    श्रीगुरुदेवनिवास या स्थापन झालेल्या आश्रमात श्रीगुरुचरित्र पारायणसेवा अखंड चालू राहावी ही त्यांनी सांगिललेली त्यांची मनोकामना आज भक्तगणांच्या आश्रमात होण्याऱ्या पारायणसेवेमुळे फलद्रुप होताना दिसत आहे.

    ।। श्री गुरुदेव दत्त ।।

    -– श्री. संतोष शामराव जोशी

    साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ५ वा, (अंक २९)

      September 12, 2022


  • आत्मा हरवलेली पत्रकारिता !

    आत्मा हरवलेली पत्रकारिता !

    सोपान बोंगाणे 
    दै. पुण्यनगरी, पत्रकार

    मराठी पत्रकारितेची महान परंपरा तब्बल १८५ वर्षांची. बाळशास्त्री जांभेकरांनी १८१२ साली सुरू केलेल्या दर्पण या वृत्तपत्राने पत्रकारितेचा पाया घातला. त्यांनी आपल्या वृत्तपत्राला दिलेले नावही मोठे अर्थपूर्ण असेच आहे. कारण १८५ वर्षानंतर मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींच्या दर्पण मध्ये आज आपला चेहेरा निरखून पाहण्याची आवश्यकता आहे. मराठी पत्रकारितेची ही थोर परंपरा पुढे लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, निळकंठ खाडिलकर, ह. रा. महाजनी, आचार्य अत्रे, अनंत भालेराव, माधवराव गडकरी, कुमार केतकर यांनी पुढे सुरू ठेवली. या पवित्र व्यवसायाचा धंदा न करता एका समर्पित भावनेने सुरू असलेली पत्रकारिता आता तशी उरली आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    माझी पत्रकारिता तब्बल ३६ वर्षांपूर्वी सुरू झाली. बँक ऑफ इंडियाची नोकरी सांभाळीत प्रथम दैनिक ठाणे वैभवचे संस्थापक नरेंद्र बल्लाळ आणि नंतर दैनिक लोकसत्ताचे संपादक माधवराव गडकरी यांचे मला भरभरून आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले. लोकसत्ताचे तत्कालिन सहसंपादक चंद्रशेखर वाघ हे ऋषितुल्य पत्रकार माझे पत्रकारितेतील गुरु ! हाताने लिहिलेल्या बातम्यांचे कागद रोज सकाळी त्यांच्या घरी नेऊन द्यायचे आणि नंतर बँकेत कामावर हजर व्हायचे असा रोजचा दिनक्रम होता. लिहिलेल्या बातम्या, वृत्तांत ते वाचून काढायचे आणि मला समोर बसवून त्यातील चुका आणि अनावश्यक शब्द काढून टाकायचे. त्यातूनच पुढे पत्रकारितेचा प्रवास उलगडत गेला आणि गैरव्यवहार, भ्रष्टाचार अशा अनेक कुप्रथांवर कोणाचीही भिडभाड न बाळगता बिनधास्तपणे उजेडात आणायचे नैतिक बळ मिळत गेले.

      July 3, 2025


  • जागसी का रे वाया?

    रंजन दास हे SAP या मल्टी नॅशनल कंपनीचे CEO होते. भारतातल्या सर्व CEO पैकी सगळ्यात तरुण होते. वयाच्या फक्त बेचाळिसाव्या वर्षी ते ‘ही’ अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत होते. प्रचंड हुशार, वक्तशीर आणि ‘हेल्थ कॉन्शियस’ म्हणून त्यांची ख्याती होती.

      September 12, 2023


  • आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत – १

    माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी....तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेअून मी हे लेख लिहिले आहेत.

    जेव्हा मानव भोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, निसर्गातील घटना घडण्यामागं प्रचंड शक्ती आणि कमालीची सुसूत्रता आहे. मानवाचा मेंदू विचार करू लागला तसा, केलेल्या निरीक्षणांचे, त्याच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि आधी घेतलेल्या अनुभवांच्या बळावर, स्पष्टीकरणेही देअू लागला.

    पहिला विचार कोणता आला असेल तर तो हा की, हा निसर्ग कुणीतरी शक्तिमान व्यक्तीनं निर्माण केला असावा आणि त्याचं नियंत्रणही तोच अतिशय हुशारीनं करीत आहे. ....ती व्यक्ती म्हणजेच अीश्वर ही संकल्पना रूढ झाली आणि हजारो वर्षांपासून आजही मानवाचं श्रद्धा आणि पूजास्थान आहे. ही श्रद्धाच त्याला जीवनभर तारते आहे, मार्ग दाखविते आहे.

    दुसरा महत्वाचा विचार म्हणजे सजीवांच्या शरीरात कोणतीतरी दिव्य चेतना असली पाहिजे. जोपर्यंत त्याच्या शरीरात ही चेतना जागृत असते, कार्यक्षम असते तोपर्यंत तो सजीव त्याचे सर्व व्यवहार … म्हणजे आहार .. अन्न मिळविणं, त्यासाठी भटकंती, संघर्ष, आक्रमण किंवा प्रतिकार करणं, प्रजोत्पादन करणं वगैरे सुरळीतपणं करता येतात. जेव्हा ही चेतना त्या सजीवाच्या शरीरातून निघून जाते तेव्हा तो सजीव अचेतन होतो, मरतो. याच चेतनेला त्यानं नाव दिलं … आत्मा.

    अीश्वर आणि आत्मा या दोन संकल्पना, मानवाचा मेंदू विचार करू लागला तेव्हापासून रूढ झाल्या आहेत. पुढे अनेक धर्म स्थापन झाले आणि त्या सर्व धर्मात अीश्वर आणि आत्मा या संकल्पना अग्रभागी राहिल्या.

    सोमवार 26 जून 2000 रोजी, अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन आणि अिंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी संयुक्तपणे, मानवाच्या जनुकीय नकाशाचं काम पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. जनुकीय नकाशाचं काम, डॉ. जे. क्रेग व्हेंटर यांनी, खाजगीरित्या पूर्ण केलं. सरकारी यंत्रणेत हे काम 1986 साली, कॅलिफोर्निया विद्यापीठात सुरु होतं आणि ते अेप्रिल 2003 मध्ये पूर्ण झालं.

    ही बातमी वाचून माझ्या मेंदूत आनुवंशिक तत्व, सजीवांचा जन्म आणि सजीवांची शरीरं यासंबंधी, तसंच झाडांच्या बिया आणि अंकुरित झाडं या संबंधी विचार घोळू लागले.

    या विचारांचा गोषवारा मी लिहिलेल्या पुढील चार लेखात आला आहे. हे लेख, मराठी विज्ञान परिषद पत्रिका, (सप्टेंबर 2000), शिक्षण संक्रमण पुणे, (ऑक्टोबर 2000), मराठी विज्ञान परिषद पत्रिका, (दिवाळी, नोव्हेंबर 2000), किर्लोस्कर (डिसेंबर 2000) प्रसिध्द झाले. नंतर मुंबअी तरूण भारत, (25 जानेवारी 2002), मुंबअी तरूण भारत, (1 फेब्रुवारी 2002), अमृत (मार्च 2002), अमृत (जुलै 2002), असे चार, जास्त माहिती असलेले माझे लेख प्रसिध्द झाले. त्यानंतर मात्र हा विषय थोडा मागे पडला. तरी पण मेंदूत विचार चालूच होते.

    त्यानंतर नोव्हेंबर 2008 ते मे 2009 या काळात, मी अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यातील ओरलॅन्डो शहरी माझ्या मोठ्या मुलीच्या घरी वास्तव्यास होतो. त्याच सुमारास, अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्यूस्टन शहरातून श्री. दिवाकर कारखानीस,www.sawali.org हे संकेतस्थळ चालवीत होते. त्यावर मी दोन अध्यात्मिक निबंध लिहीले. अेक "अध्यात्म आधी की विज्ञान आधी अवतरले?" आणि दुसरा "अीश्वराची संकल्पना".

    ओरलॅन्डो शहरात काही भारतीय व्यक्ती, रोज संध्याकाळी 7 वाजेपासून 8 वाजेपर्यंत अेका रेडियो स्टेशनवर, भारतीयांसाठी, माहितीपर, वैचारिक आणि करमणूकप्रधान कार्यक्रम सादर करीत असत. त्यातील अेक संचालिका, शोभना डॅनियल, माझ्या मुलीची (सौ. पालवी जहागिरदार) मैत्रिण होती. शोभनाजवळ, माझी मुलगी, माझ्या अध्यात्मिक लिखाणाबद्दल बोलली. तिला माझे लेखही वाचायला दिले. ते शोभनाला अितके आवडले की तिनं नजिकच्या मंगळवारी, रेडियोवर माझा कार्यक्रम ठेवला. तो अितका रंगला की नंतरचे तीन मंगळवार असे अेकूण चार कार्यक्रम झाले.

    चौथा कार्यक्रम चार प्रतिनिधींच्या स्वरूपात झाला. सामान्य माणूस म्हणून स्वत: शोभना, विज्ञानीय दृष्टीकोनातून अध्यात्माकडे पाहणारा मी, ओरलँडो, फ्लॉरिडा येथील, हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका येथे, हिंदूधर्म आणि अितर धार्मिक ग्रंथांवर संशोधन करणारे आणि तेथे अध्यापन करणारे, मूळचे न्यू यॉर्क विद्यापीठातील संगणक अभियंता डॉ. अभिनव द्विवेदी आणि अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या तरूण पिढीला अध्यात्माबद्दल काय वाटतं याचा प्रतिनिधी म्हणून 16 वर्षांचा अतीश पटेल या चार व्यक्तीत चर्चा झाली. यातील शोभना आणि मी, रेडियो स्टेशनात, अभिनव द्विवेदी, ओरलॅन्डो शहरापासून 150 मैलावरील टांपा शहरात तर अतीश पटेल त्याच्या घरी होता.

    या कार्यक्रमाच्या निमित्ताने...विज्ञानीय अीश्वर (Science God), आत्मा, आत्म्याचं शरीरातील स्थान, पुनर्जन्म, मागील जन्मातील बरीवाअीट कर्मे आणि त्यांचा वर्तमान जन्मावरील परीणाम, पाप, पुण्य, मोक्ष, जन्ममृत्यूचे फेरे, स्वर्ग, नरक, यम आणि त्याचा मृत्यूफास, जपजाप्य, पोथ्या/मंत्र पठण वगैरे अनेक अध्यात्मिक विषयांवर चर्चा झाली. "आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत" आणि भगवत् गीतेतील काही श्लोकांचा विज्ञानीय अन्वयार्थ लावणं या अुपक्रमाचे बीज
    तेथेच रुजलं.

    या विश्वात, अमूर्त असं काहीही नसतं, सगळे घटक मूर्त स्वरूपातच असले पाहिजेत. अीश्वर आणि आत्मा हे ही अपवाद नाहीत. त्यापैकी आत्म्याचं मूर्तस्वरूप म्हणजे सजीवांच्या शरीरात असलेलं आनुवंशिक तत्व ... जेनेटिक मटेरिअल.

    हाच माझा आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत.

    गजानन वामनाचार्य, मुंबअी.

    शनिवारचा सत्संग - 1
    शनिवार 26 नोव्हेंबर 2016

    पूर्वप्रसिध्दी : आपले जग, किर्लोस्करवाडी -
    27 फेब्रुवारी 2012

      November 26, 2016


  • नॅशनल जिओग्राफिक मासिकाचा पहिला अंक

    नॅशनल जिऑग्राफिकला विषयांचे कसलेही बंधन नाही.

      September 22, 2021