(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • संवाद हृदयाशी

    हृदयाशी संवाद साधणे म्हणजे नेमके काय? हृदयाशी संवाद साधणे म्हणजे दोन गोष्टी तपासणे. एक तर तांत्रिकदृष्ट्या आपले हृदय आणि त्याचे कार्य उत्तम स्थिती मध्ये आहे का हे तपासणे. आणि दुसरे म्हणजे भावनिक तसेच मानसिक दृष्ट्या दैनंदिन जीवनातील घडामोडींना सामोरे जाताना त्या घडामोडींचा आपल्या मनावर म्हणजेच नकळत आपल्या हृदयावर आपण कितपत परिणाम करून घेतोत?

  • आरोग्य

    शाळेत असताना आपण हा सुविचार एकदा का होईना फळ्यावर लिहिला असेल च कि “Health is Wealth” पण या धकाधकीच्या जीवनात खरंच आपण स्वतःची काळजी घेत आहोत का ???

  • द लास्ट सीन

    The last seen…. हेच ते तीन शब्द… बारकाईने वाचल्यास लक्षात येईल की आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या व्हाट्सअपचं एक अनमोल फीचर. हे ॲप तुम्ही शेवटचे केव्हा पाहिले त्याची नोंद दाखवणारं… पण हेच last seen जर पुस्तकांना लागू केलं तर काय असेल उत्तर…? 2 महिने…

  • बोले तैसा वागे

    शब्दाची किंमत ठेवावी वा असावी. पण आज ह्या घोर कलियुगामध्ये शब्दाची काही किंमत नाही. शपथ, वचन, प्रतिज्ञा.. हे शब्द नाहीसे होऊन गेले आहेत. संबंधामध्ये दुरावा येण्याचे हे एक कारण आहे की मनुष्य जस बोलतो तस वागत नाही. कधी कधी विचार येतो की ‘ का बरं एखादा व्यक्ति असं करत असेल?’ काही कारण नसताना ही आज मनुष्याला खोटं बोलावं लागते.

  • मातृदिन

    बऱ्याच लोकांना आज मातृदिन आहे हेच माहीत नसेल. ते सगळेजण भुवया वर चढवून विचार करतील की आज कुठून मातृदिन आला? मी अशा सर्वांसाठी सांगू इच्छितो की , ह्या मातृदिनाचा इतिहास , आपण मे महिन्यात साजरा करतो त्या मातृदिनाच्या इतिहासापेक्षा जुना आहे.

  • यशस्वी लोक हे नेहमीच यशस्वी का असतात

    मायकल जॉर्डन, थॉमस एडीसन, एलनॉर रूझवेल्ट आणि हेन्री फोर्ड अशी आणि इतर यशस्वी लोक यांच्यात काय गोष्टी आहेत ज्या त्यांना जेहमीच यश मिळवून देतात. त्या गोष्टी जर आपल्याला देखील माहीत झाल्या तर आपणही त्यांच्या प्रमाणे खात्रीलायक यश मिळवू शकतो. खालील गोष्टी या त्यातलाच काही आहेत असे आपण म्हणू शकतो.

  • व्ही सी आर ते स्मार्टफोन… बालक पालक

    बालक पालक हा चित्रपट बघताना प्रत्येकाला बरेच काही आठवत असेल जे पन्नाशीच्या पुढे आहेत विशेष करून ती जी पोरे म्हणा कार्टी म्हणा ते व्ही सी आर आणण्यापासून ते नीलचित्र म्हणजे ब्लु फिल्म बघताना ती संपेपर्यंतचे हावभाव पाहून प्रत्येकाला आपले बालपण आठवत असेल अर्थात स्कालर मंडळी सोडून पण कदाचित.

    मला आठवतंय जत्रेमध्ये दहा पैसे दिले की तंबूमध्ये एक गाणे पडयावर गाणे तर केव्हा एखादा फाईटसीन. पण घरी चोरून व्ही सी आर आणण्यापर्यंत जो काही प्रवास असे तो जीवघेणा असे आणि मग पूढे ते सम्पूर्ण बघता आले की श्रमाचे चीज का लोणी होत असे.

    मला आठवतंय आमच्याइथे भाड्याने व्हीसीआर मिळत परंतु ते एक घरातून मिळत , कधीकधी कुणी कॅसेट आणायला जात असे तेव्हा त्यांची मोठी मुलगी बघितल्यावर क्सासेट मागणारा अडखळत असे मग तीच सांगत असे वो कासेत चाहिये ना, आयसा बोलो ना आणि खुद्कन हसून ती कॅसेट देत असे मागणारा झक मारली आणि मागितली असे त्याला होत असे.

    विशेषतः A सर्टिफिकेटची सिनेमा त्यावेळी लागत से अर्थात इंग्रजी , पोस्टर भडक दिसले की कार्टी थेटरात पण कधीकधी तो पोस्टर शॉट कट केलेला असे मग सगळे चडफडत.

    तेव्हा आम्ही एक काटेकावरपणे नियम पाळत असू ते म्हणजे टॉकीजच्या बाहेर आल्या आल्या तिकीट फेकून देणे. पण काही मुलाचे तीर्थरूप पक्के चालू म्हणा अनुभवी म्हणा शर्टाच्या मागे पडलेल्या चुण्यावरून ओळखत असत ह्याने आज पिक्चर टाकलेला आहे.

    सगळे कमावते झाले , बिझी झाले. खूप काळ गेला स्मार्ट फोन आला, तरीपण ब्ल्यू फिल्म डोक्यातच होत्या..

    मला आठवतंय माझ्या ठाण्याच्या बिल्डींग मध्ये खाली दुकाने आहेत तेथे एका ब्रँडेड चष्म्याच्या दुकानाचे ओपनींग होणार होते त्यावेळी ते करायला सनी लिओन येणार होती. खाली गर्दी होती रात्री दहा वाजता ती आली मी गॅलरीतून बघितले ती दुकानात जाताना दिसली , माझे नव्वद वर्धाचे वडील पण होते, ते म्हणाले ही कोण आहे ? मी चुपचाप कॉम्प्युटर वर बसलो , सर्च मारला वडिलांना सांगितले ही ती बया ..वडील हैराण ..चूप.
    त्यावेळी इतक्या वर्षानंतर पोर्नचे दर्शन झाले. पहिल्यांदा पोर्नचे दर्शन झाले. मग मोबाईल वर सुरु. पण फारच थोडा काळ कारण त्याचे बिझनेसचे स्वरूप समजले आणि परदेशात तर सहजपणे हा व्यवसाय चालतो.

    आपल्या देशात त्या बाबतीत आपण मागासलेले आहोत अर्थात मनातून नाही ? वृत्ती आणि विकृती यांच्यामध्ये एक गोल्डन लाईन असते ती कधी पार पडतो आणि कधी नाही हे समाजातच नाही. जेव्हा crime सिरीज बघतो तेव्हा त्याचे भयानक स्वरुप दिसते. कायद्याने त्याला बंदी आहे म्हणे तर करा लॉक सगळे. आज तर ते इतके सहज आहे. पण ते का होत नाही ? याचे एकाच कारण जितका खोकला दाबून धराल तितकी उबळ जास्त.

    साधे उदाहरण घेऊ चार ताटे झाकली आहेत , मग तीन ताटावरचे रुमाल काढले. पण एक ताटावर रुमाल तसाच ठेवला , तर सगळे लक्ष केंद्रित होते ते झाकलेल्या ताटावर ?

    हे सगळे त्या बालक पालक चा फोटो बघितला आणि आठवले.

    बघा विचार करा, आत्मपरीक्षण करा काहीही करा...पण प्रामाणिकपणे?

    सतीश चाफेकर

  • प्रत्येकाची आनंदाची व्याख्या निराळी

    दैनंदिन जीवनांत आपण काहीतरी शोधत असतो. हा शोध नेमका कशाचा असतो ह्याचा अंदाज काहीवेळा येत नाही. खरं तर हा शोध आनंद प्राप्तीचा असतो. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या जशी निराळी असते, तशीच अनुभूती देखील वेगवेगळी असते. आपापल्या अनुभूती आणि प्रचीतीनुसार आपली आनंदाची व्याख्या तयार होत असते. आनंद आपल्या अंतरंगात निर्माण होत असतो.

  • वाचनसंस्कृती : कालची-आजची

    -- ठाणे येथे झालेल्या 84व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेतील हा श्री वसंत श्रीपाद देशपांडे यांचा लेख.


    वाचनसंस्कृतीबद्दल काही मत व्यक्त करावयाचे म्हटले, की लोकसंख्येच्या किती टक्के लोक आजघडीस वाचन करीत असतील? त्यातून आजच्या युवावर्गाविषयी लिहावयाचे ठरविले, की आपण पन्नासएक वर्षापूर्वीचा तरुण आणि आजचा तरुण वर्ग यातील वाचनसंख्येचा तुलनात्मक आकडा मनाशी बांधू लागतो. पण पन्नास वर्षांपूर्वीची आणि आजची परिस्थिती विचारात घेता संस्कृतीतील बदल हा अपरिहार्यपणे सर्वच क्षेत्रांत झालेला आहे. असं म्हटलं जातं की, त्रिकालबाधित सत्य म्हणजे बदल हेच होय. प्रत्येक क्षणी बदल होत राहणे हे जसे अटळ आहे तसेच ते नैसर्गिकही आहे. पन्नास वर्षांपूर्वी सातच्या आत घरात येणे व शुभंकरोति म्हणणे ही संस्कृती होती. आज अगदी अपवादानेच याचे कुटुंबात पालन होत असेल. बाकी घरात ते आउटडेटेड समजले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे संस्कार. हे मुलांना संस्कारवर्गात दाखल करून होण्यापेक्षा घरोघरी वडील माणसे कशी बोलतात आणि त्यापेक्षाही काय आचरण करतात, त्यातून ती शिकत असतात व तेच रुजलेले संस्कार तरुणपणी त्यांच्यात उतरतात. वाचण्याची गोडी लागण्यासाठी घरातील या संस्कारांचा मोठा वाटा आहे.

    साहित्य: काळाशी सुसंगत हवे

    वाचनसंस्कृती ही प्रामुख्याने त्या काळात निर्माण होणाऱ्या साहित्यकृतींवर अवलंबून असते. साहित्य हा मानवाच्या सामाजिक जीवनातील सर्जनशील उपक्रम आहे. तसेच साहित्याची निर्मिती ही विशिष्ट सामाजिक परिस्थितीचा परिपाक आहे. समाज हीच साहित्यनिर्मितीची प्रेरकशक्ती असते. म्हणूनच साहित्य हा समाज परिवर्तनातील मूलभूत व जबाबदार घटक आहे. आपण पाहतो आणि अनुभवतो, की समाजातील मूल्ये व आदर्श सतत बदलत असतात. त्यामुळे कालभान व मूल्यभान ठेवून साहित्यनिर्मिती व्हावयास हवी. तसे ते होत असेल तरच आणि तेवढेच साहित्य अधिकाधिक प्रमाणात वाचले जाते. यामुळे आजचा युवावर्ग आणि वाचनसंस्कृती याचा विचार करता प्रथम हे पडताळावे लागते, की आजच्या युवावर्गास उपयोगी वाटेल असे किती साहित्य निर्माण होते? पूर्वीच्या कथाकादंबऱ्या काही अल्प प्रमाणात वाचल्या जात असतीलही. पण त्यांची संख्या अत्यंत थोडी आहे व ते स्वाभाविकही आहे. आजचे साहित्य आजच्या काळाशी सुसंगत व तेही युवावर्गाला मार्गदर्शक वाटले तरच ते अधिकाधिक प्रमाणात वाचले जाणार. साहित्यिकांनी, आजच्या काळ काम वेग याचा ताळमेळ विचारात न घेता साहित्यनिर्मिती केवळ, आपणास अधिकाधिक पुस्तक लिहून प्रकाशित करावयाची म्हणून निर्माण केली, तरी त्याकडे युवावर्ग वाचनास उद्युक्त होईल अशी शक्यता नाही. युवावर्गास जे साहित्य आजच्या व उद्याच्या काळात उपयोगात आणता येईल, (अॅप्लिकेबल) तेच तो वाचणार हे निश्चित. म्हणजेच निर्माण होणारे साहित्य सद्यःस्थितीच्या जगण्याशी रिलेट होतेय असे म्हणजे मॅनेजमेंट, आधुनिक तंत्रज्ञान, आयटी क्षेत्र, व्यवसायाभिमुख इत्यादी स्वरूपांचे हवे असते. आणि युवावर्ग मोठ्या प्रमाणात त्याचे वाचन करीत असतो. याचा अर्थ त्यास प्रेम, विनोद, करमणूक इत्यादी विषयांचे वावडे आहे असे नव्हे. पण त्याबाबतही आजची युवापिढी प्रत्यक्ष समाजात ज्या रीतीने ते व्यक्त करते, अनुभवते, त्याचे आजचे आणि यापुढील काळात कसा बदल होत जाईल याचे तरुण पिढीस भावेल असे साहित्य आजच्या लेखकांकडून निर्माण होत गेले पाहिजे. त्यासाठी त्या त्या समाजजीवनाची वैशिष्ट्ये त्या त्या काळातील साहित्यात उमटली पाहिजेत.

    वाचनसंस्कृती: विविध पर्याय

    आजच्या युवावर्गाच्या वाचनसंस्कृतीची पूर्वीच्या काळाबरोबर तुलना करून चालणार नाही व त्या अनुषंगाने ती किती ढासळत चालली आहे असे नुसते म्हणूनही भागणार नाही. पूर्वीच्या काळी करमणुकीची इतर साधने सोडा, पण साधा रेडिओही घरी नसे. अशावेळी ज्या काळच्या युवापिढीस निरनिराळ्या साहित्यांतून व वर्तमानपत्रांतून जे वाचावयास मिळे, तीच त्यांची मुख्यत्वे करमणूक आणि ज्ञानाचे साधन होते. त्याकाळी एखादा प्रियकर अथवा प्रेयसी त्यांच्याविषयी कथा कादंबरी वाचून अनेक दिवस त्यावेळचा तरुणवर्ग त्या त्या प्रसंगाचे काल्पनिक चित्र नजरेसमोर आणून त्यात दंग होऊन जावयाचा. पुन्हा पुन्हा ती पृष्ठे किंवा संपूर्ण पुस्तकही वाचून काढीत असत; कारण वाचनसंस्कृती हेच एकमेव साधन त्यांना उपलब्ध होते. आणि त्यासाठी भरपूर वेळही उपलब्ध होता. पण आजची परिस्थिती काय आहे? कादंबरीतील अनुभवाभोवती रेंगाळत राहणारी आजची युवापिढी आहे काय? प्रेम वगैरे बाबतीत ती फार पुढे गेलेली आहे. हे फक्त प्रेमाबाबतच घडते असे नाही. समाजास भावणारे इतरही विचार आहेत त्याबाबतही असेच घडते. जे वाचनाव्यतिरिक्तही करमणूक व ज्ञानासाठी उपलब्ध आहे त्याचा वापर समाज करत राहणार.

    इंटरनेट व मोबाइल संस्कृती:

    आजच्या युवापिढीस वाचनसंस्कृतीपेक्षा कितीतरी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. रेडिओ व टीव्हीवरील अनेक चर्चा, प्रात्यक्षिके याद्वारे ज्ञान त्यांच्यापुढे अनेक प्रकारे ओसंडून वाहत असते. डिस्कव्हरी व नॅशनल जिओग्राफिक चॅनल्सचा त्यात मोठा वाटा आहे. संगणकाने युवापिढीस काय मिळवून दिले नाही? इंटरनेटपर्यंत मजल मारून जगातील कोणत्याही विषयावर क्षणार्धात हवी तेवढी माहिती त्यांच्यासमोर अलिबाबाच्या गुहेप्रमाणे उघडून मिळते. मोबाइल फोन तर मिनी संगणक बनला आहे. या माध्यमातून ज्ञानाचे असंख्य झरे त्यांच्यासमोर वाहत आहेत आणि आजची युवापिढी त्यातील हव्या-नको त्या गोष्टींचा त्यांच्या दृष्टीने तारतम्याने पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. त्यातून काही विकृत गोष्टीही त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. हा भाग वेगळा. तसं ते पूर्वीच्या साहित्यातून कळतच असे.

    आजच्या लेखकांची जबाबदारी:

    जेव्हा आपण आजचा युवावर्ग आणि त्याची वाचनसंस्कृती असा विचार करतो तेव्हा ज्ञानार्जनाचे हे वेगवेगळे मार्ग तरुणांपुढे उपलब्ध आहेत त्यांचाही विचार केला पाहिजे. आजच्या गतिशील जीवनात मोठ्या आकाराचे साहित्य वाचण्यासाठी स्वस्थता आणि वेळ दोन्हीही युवापिढीस उपलब्ध नाहीत. त्याऐवजी इ-बुकद्वारे जाळे वेबसाइटच्या मार्गाने उपलब्ध आहे. त्यातून ते अनेक ग्रंथ नजरेखालून भराभर घालून त्यातून आवश्यक ते मुद्दे टिपत असतात. अनेक चर्चासत्रे होतात, शिबिरे भरतात आणि या सर्वांतून अजचा युवावर्ग ज्ञानप्राप्ती करून घेत असतो. अशा प्रकारचे मिळत आणि मिळवत असलेले ज्ञानार्जनाचे प्रकार, वाचनसंस्कृतीला पर्याय ठरतो. आज ग्रंथ घेऊन वाचन करणे एवढीच मर्यादित व्याख्या वाचनसंस्कृतीची राहिली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे ग्रंथनिर्मिती हा खूपच खर्चिक उपक्रम झाला आहे. ३०० ते ५०० रुपये देऊन ग्रंथ विकत घेऊन वाचणारा अतिशय कमी वाचकवर्ग युवापिढीत आहे आणि आज आहे तोही पुढे पुढे कमी होत जाणार आहे. ग्रंथायात जाऊन ग्रंथ वाचन करणारे तरुणवर्गापेक्षा ज्येष्ठच जास्त आढळतात आणि तेही एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात फारच कमी. कारण बरेच ज्येष्ठ मुद्दाम संगणक आणि इंटरनेटचे ज्ञान घेऊन प्रत्यक्ष वाचनास पर्याय शोधतात. इ-बुक कमी खर्चात आणि त्याहीपेक्षा कमी वेळात मुद्द्यांच्या संदर्भात वाचता व चाळता येते. पेन्सिल लॅपटॉपद्वारे तर पुस्तकेच्या पुस्तके छोट्या उपकरणातून वाचता येतात. लॅपटॉप वाचणारा हा आजचा युवावर्ग वाचक संस्कृतीतच मोडतो. कोठेही, केव्हाही सहजगत्या बरोबर नेता येणाऱ्या साधनामुळे, अनेक विषयांचा परामर्श छोट्या मोठ्या प्रवासातही घेता येतो. कानाशी मोबाइल किंवा डोळ्यांसमोर लॅपटॉप अशी ही नवीन वाचकसंस्कृती उदयास आली आहे आणि यापुढील काळामध्ये यामध्ये आणखी क्रांतिकारक शोध लागणार आहेत ही गोष्ट लक्षात घेऊन, आजच्या लेखक मंडळींनी ब-याच गोष्टी तत्परतेने संगणकावर डाउनलोड करावयास सुरुवात केली पाहिजे. तरच वाचनसंस्कृती तरेल आणि खेड्यापाड्यातील वाचक वर्गापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी अधिकाधिक उर्जितावस्थेत जाईल.

    खेड्यापाड्यातील युवावर्गाने या संधीचा फायदा घेऊन वाचकवर्ग वाढवावयाचा असेल तर संगणकाची प्रणाली (सॉफ्टवेअर) मराठी भाषत जास्तीत जास्त प्रमाणात (आणि इतर प्रांतात त्यांच्या मातृभाषेत) उपलब्ध व्हावयास हवी. कोणत्याही भाषत का असेना, युवापिढीची वाचन संस्कृती वाढविणे हे लक्ष्य आहे. जागतिक भाषा-पसंत पडो न पडो- इंग्रजी आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. इंग्रजी भाषेचा द्वेष करण्यापेक्षा ती शिकत असताना मातृभाषेकडे लेखक व वाचक यापैकी कोणीही दुर्लक्ष करण्याची आवश्यकता नाही. ग्लोबलायझेशनच्या युगात एखाद्या मिनिटात जगातील कोणत्याही कोपऱ्यातील शहराशी संपर्क साधावयाचा असेल, तर आजतरी इंग्रजी भाषेशिवाय दुसरा पर्याय नाही. आजकाल प्रसिद्ध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचण्याकडे युवावर्गाचा कल आहे. त्यातून त्यांना ध्येय ठरविण्याची आणि गाठण्याची प्रेरणा मिळते. निमशहरी व खेड्यातूनही जे तरुण आज शिकून पुढे येत आहेत त्यांचे सध्यातरी शिक्षणाचे माध्यम मराठी असण्याची जास्त शक्यता आहे. तो युवावर्ग वाचनाकडे वळविण्यासाठी परदेशातील प्रसिद्ध व्यक्तींची आत्मचरित्रे मातृभाषेत अनुवादित करून मोठ्या संख्येने उपलब्ध झाली पाहिजेत. मगच हा समाजाचा मोठा टक्का वाचन संस्कृतीकडे आकृष्ट होईल. सध्या या दृष्टीने चांगले प्रयत्न होत आहेत ही लक्षणीय गोष्ट आहे.

    आजच्या युवावर्गाचा कल जाणणे महत्त्वाचे:

    अखिल भारतीय आणि त्याचबरोबर वर्षभर इतर साहित्यसंमेलने भरतात त्यामध्ये युवावर्गाची आवड ओळखून, त्यांच्या पसंतीचे विधायक साहित्य उपलब्ध होत राहिले तर तो वर्ग खचितच अशा संमेलनांकडे व साहित्याकडे आकर्षित होईल. ठाण्यातील ८४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात युवापिढी नजरेसमोर ठेवून अनेक उपक्रम आयोजित केले आहेत हे सुचिन्ह आहे. या प्रकारचे आयोजन भावी काळात सातत्याने होत राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर युवावर्गाचा कल लक्षात घेऊन ग्रंथाबरोबर सीडी, व्हिसीडी, होम थिएटर आणि त्याचप्रमाणे इतर वेळी खाजगी चॅनल्स, २४ x ७ बातम्या आणि मालिकांतून युवकांसाठी अधिक जाणीवपूर्वक निर्मिती व उपलब्धता होणे आवश्यक आहे. वाचक आपल्याकडे कसा अधिकाधिक आकर्षित होईल हे साधण्यासाठी आजचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक, प्रकाशक इत्यादी सर्वांनी, दरवर्षी युवावाचकांपर्यंत स्वतः आधुनिक तंत्रज्ञानासह पोचले पाहिजे. त्यासाठी शाळा, कॉलेज यांना वारंवार भेट देऊन शिक्षक व पालकांच्या साहाय्याने कार्य करावयास हवे. अशा प्रकारे बालपणी व तारुण्यात घडविलेले वाचनसंस्कृतीचे संस्कार यातून जवळच्या भविष्यात मोठा वाचकवर्ग निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

    -वसंत श्रीपाद देशपांडे

  • शरीराइतकेच मानसिक स्वास्थ्य महत्वाचे

    आपल्या जीवनात आपण मानसिक स्वास्थ्यविषयक समस्यांचा सामना करत असलो, तर आपली विचारसरणी, अंतर्मनाची भावना आणि वागणूक ह्या सर्वांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. मानसिक स्वास्थ्यासाठी समस्या निर्माण करणारे नकारात्मक विचार जरी ते सामान्य आहेत असे वाटत असले तरीही सकारात्मक विचारांच्या माध्यमातून आपण निश्चितच परिवर्तन घडवून आणू शकतो. आपल्या व्यक्त होण्यातून आपले व्यक्तिमत्वाचे वेगळेपण त्यांतच सामावलेले असते.