(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • इमाम आणि देवदूत

    (इराणची लोककथा)

    शेकडो वर्षांमागची गोष्ट. इराण देशातील एका पहाडाजवळ एका विस्तीर्ण
    तलावाच्या काठी एक लहान झोपडी होती.

  • रुद्रा – कादंबरी – भाग २५

    आज साडेदहा पासूनच कोर्ट प्रेक्षकांनी भरले होते. कारण आज रुद्राचा बचावासाठी युक्तिवाद होणार होता. खुनाचा भक्कम पुरावा विरोधात असून हि, ‘मी खून केलाच नाही!’ या विधानावर रुद्रा ठाम होता! डॉ. रेड्डीच्या उलटतपासणी नंतर अडोव्हकेट दीक्षितही गांगरल्याचे जाणकारांच्या नजरेतून सुटले नव्हते. एकीकडे करोडोची संपत्ती आणि एकीकडे फाशीचा दोर! मोठी विचित्र केस होती आणि ती शेवटच्या टप्प्यावर होती. दैनिकाचे रिपोर्टर्स, चॅनलचे प्रतिनिधी यांचा प्रेक्षकात भरणा अधिक होता.

  • मनमवाळ

    फार वर्षांपूर्वी नायर हॉस्पिटलच्या मागे “लाल चिमणी कंपाऊंड ” मधे असलेल्या मोकळ्या जागेत एका गोडाऊन शेजारी युनुसभाईंचे गॅरेज होते. गोडाऊन च्या भिंतीला बसवलेले लोखंडी स्टँड, त्यावर गाड्यांचे छोटे सुटे भाग , हातोड्या , पान्यांचे खोके आणि गॅरेजचे इतर सामान लावलेले.

  • इस्टेट एजंट गोमु (गोमुच्या गोष्टी – भाग ५)

    आधी मुंबईमध्ये आणि नंतर नव्या मुंबईत जागांच्या किंमती कशा आणि किती पटींत वाढल्या याच्या गोष्टी आम्हाला कोणी ना कोणी ज्येष्ठ नेहमीच ऐकवत असतो. त्या अरेबियन नाईटस् मधल्या गोष्टीप्रमाणे सुरस आणि चमत्कारिक वाटतात. सीबीडीला आजच्या रद्दीच्या किलोच्या भावाने म्हणजे एक चौरस फुटाला दहा बारा रूपयेप्रमाणे लोकांनी जागा चाळीस वर्षांपूर्वी घेतल्या आणि आजच्या सोन्याच्या भावापेक्षा जास्त किंमतीत विकून पैसा केला. अशा त्या गोष्टी.

  • आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ९

    बोलता बोलता रोहन आणि निशाने चढाचे वळण पार केले.  आता ते उताराच्या रस्त्याला लागले.  हे ठिकाण थोडं उंचीवर असल्याने या ठिकाणावरून झाडांमधूनही पुढचा बराच परिसर नजरेत पडत होता. आत्तापर्यंत चंद्र अगदी माथ्यावर आला होता, त्यामुळे लख्ख चांदणं पडलं होतं.  तेव्हड्यात निशाचं समोर लक्ष गेलं…. आणि तिनं  आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली. …….

  • ९५० पूर्ण

    पुढील कार्यक्रम आयोजक अशोक शेवडे यांच्यासाठी दिवाळी पाडव्याला डोंबिवली येथे झाला. ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्याबरोबर मी गायलो कार्यक्रमाचे निवेदन प्राची देवस्थळी आणि अशोक शेवडे यांनी केले. रोटरी क्लब आयोजित अंध विद्यार्थ्यांसाठीच्या शिबिरात ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या सोबत माझी प्रकट मुलाखत घेण्यात आली. या विद्यार्थ्यांनी गाण्यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. त्यांचा गाण्याबद्दलचा इतका अभ्यास पाहून मला आश्चर्य वाटले. परमेश्वर जेव्हा एका शक्तीपासून वंचित ठेवतो, तेव्हा दुसऱ्या क्षमता वाढवून देतो. ही मंडळी अतिशय बारकाईने गाणे ऐकतात हे माझ्या ध्यानात आले. त्या दिवसापासून मी डोळे बंद करून गाणे ऐकायला लागलो.

    २०१३ या वर्षाची सुरुवात एका सुगम संगीत स्पर्धेने झाली. जोशी-बेडेकर महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे मी परीक्षण आणि गायन केले. या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग या स्वतः उत्तम गायिका असल्याने त्यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. यानंतर पुढील कार्यक्रमांसाठी मी अहमदाबाद, औरंगाबाद, इंदूर आणि बडोदे येथे जाऊन आलो. ठाण्याला परतल्यावर एका मोठ्या कार्यक्रमाची तयारी आम्ही सुरू केली. १३ फेब्रुवारी २०१३ रोजी माघी गणेश चतुर्थीनिमित्त कळवा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

    माझी विद्यार्थिनी नेहा नामजोशी या कार्यक्रमात माझ्याबरोबर गायली. विशेष म्हणजे या कार्यक्रमानंतर पाच हजार लोकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. माझ्यासाठीही हा कार्यक्रम फारच विशेष होता. कार्यक्रमानंतर सर्व वादकांनी माझे अभिनंदन केले. आयोजकांतर्फेही माझा सत्कार करण्यात आला. कारण माघी गणेश चतुर्थीच्या रात्री त्या वक्रतुंड महाकाय श्रीगजाननाच्या कृपेमुळे मी ९५०वा जाहीर कार्यक्रम पूर्ण केला होता.

    घरी प्रियांका, मुली आणि आई माझी वाटच पहात होत्या. आईने माझी दृष्ट काढली. गाणे माझ्याकडे आईकडूनच आले होते. माझी पहिली गुरुदेखील आईच होती. प्रत्येक कठीण प्रयोगाच्या वेळी आई भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी राहिली होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. प्रियांका आणि मुलींनी माझे अभिनंदन केले. “अरे हो हो! इतके माझे कौतुक का करताय? मी अजूनही माझ्या ध्येयाच्या ५० कार्यक्रम मागे आहे." मी म्हणालो.

    “असा विचार करू नका. इतके कार्यक्रम करणेदेखील खूप कठीण गोष्ट आहे.” प्रियांकाने पत्नीच्या अधिकारात मला समजावले. एक हजार कार्यक्रमाचे माझे ध्येय गाठण्याच्या नादात मी ९५० कार्यक्रम पूर्ण केल्याच्या या क्षणाचा आनंद घेऊ शकत नव्हतो. आत्तापर्यंत कधी असे घडले नव्हते. मग आत्ताच असे काय होत होते? मला एकदम जाणवले की आता मी माझ्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. एक हजार कार्यक्रम पूर्ण करण्याची मला घाई झाली होती. मी मोठी चूक करत होतो. मी धीराने घ्यायचे ठरवले. असेही ठरवले की, आता समोरून येणारे सगळेच कार्यक्रम करायचे नाही, तर काही निवडक कार्यक्रमच हाती घ्यायचे. आता मी दुसरी मोठी चूक करत होतो. माझ्या या निर्णयामुळे माझ्याच कार्यक्रमांचा वेग मंदावणार होता. पण त्यावेळी मला हे समजत नव्हते. पन्नास कार्यक्रम करणे हे देखील किती कठीण काम असू शकते याचा प्रत्यय मला पुढील काळात आला.

    -अनिरुद्ध जोशी

  • संथ वाहते कृष्णामाई 

    खळाळून वाहणारी कृष्णा नदी, तिच्या तीरावरील सुंदर दगडी घाट व रेखीव देवळं त्यात चितारली होती आणि त्या पेंटिंगच्या खाली १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या एका मराठी चित्रपटातील गीताच्या दोन ओळी लिहिल्या होत्या……..

  • रामायणातील कांहीं स्त्रिया : थोडें विवेचन

    सीता ते कैकेयी, शूर्पणखा ते मंदोदरी, अहिल्या ते तारा, सार्‍या स्त्रियांची स्थिती समाजात कुठेतरी ‘खालची’ असलेली दिसते. या लेखात, त्यांच्या एकूण-आयुष्याचें या बाबतीतील अल्प-विवेचन आहे.

  • भय (अलक)

    पहाटे आई देवा घरी गेली.
    वैकुंठात सोपस्कार आवरून घरी परतलो.

    दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले. माझ्यासाठी दार उघडून, कांही तरी पुटपुटत, मोकळे केस सोडलेली, आई देवघराकड़े जात होती.

    -- © अरविंद टोळ्ये

  • होळी

    घड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …