(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • ‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य : भाग – १०

    ‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य व त्या अनुषंगानें एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें यांची ओळख करुन देणारे सदर….

  • परिणाम कळों नये (सुमंत उवाच – ९९)

    सुमंत जयंत परचुरे. 

    समर्थांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी मात्र तसे सांगणे गरजेचे होते नाहीतर आपल्या भल्याचे कोण हे कळणे तसे कठीण आणि तसे कळलेच नसते तर आज हिंदुत्व किती अंशी शिल्लक राहिले असते हा विचारही न केलेला बरा.

  • सेंटेड मॅन

    हाॅलिवूड चित्रपटांची काही नावं ही अफाट लोकप्रिय ठरलेली आहेत. उदा. सुपरमॅन, स्पायडरमॅन, ॲ‍न्टमॅन, बॅटमॅन, आयर्नमॅन, इ. आमच्या संपर्कात असेच एक ‘सेंटेड मॅन’ आले आणि त्यांनी आमचा अवघा कलाप्रवास ‘सुगंधमय’ केला. पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तात्या ऐतवडेकरांच्या ‘ग्राफिना’ मधून आमच्या ऑफिसवर एक गृहस्थ आले. त्यांनी स्वतःचा परिचय करुन दिला, ‘मी एस. व्ही. इनामदार. मला तुमच्याकडून ट्रान्सपरन्ट स्टिकर्स करुन घ्यायची‌ आहेत.’ आम्ही त्यांना बसायला सांगितले.

  • एक वावटळ (माझी लंडनवारी – 13)

    खरंच सेट झालो होतो का? आमचा ग्रुप बनून उणे-पुरे ३ दिवस झाले होते. उमेश सुद्धा RCA मधेच होता. शनिवार उजाडण्याचाच अवकाश होता की, आम्ही साईटस् बघायला मोकळे! आणि ३० जुलैलाऑफिसची ती मेल बॉम्बसारखी माझ्या मेलबॉक्स मधे आदळली….

  • दानशूर बळीराजा

    बळीराजा आपल्या नगरीत सुखाचे राज्य करीत होता. धर्माचे, समृद्धीचे, दानाचे अधिष्ठान असा ह्या नगरीचा लौकिक होता. सर्व प्रजा आनंदाने नांदत होती. आपल्या राज्यात सर्वत्र आबादी आबाद असावे म्हणून नेहमीच राजा देशोदेशीच्या विद्वान दशग्रंथी ब्राह्मणांना व ऋषिजनांना बोलावून यथासांग यज्ञयाग करीत असे. अगणित दानधर्म करीत असे. विद्वानांचा आणि प्रजेचा दुवा घेत असे.

  • अन्याय

    सकाळी अकरा- साडेअकराची वेळ होती. जरा बाहेरची कामे करुन यावी म्हणून निघाले होते. घरात बाहेरची कामेच जास्त असतात. कधी लाईट बील, पाणी बील, बाजार हाट, बँकाची आणि ही सगळी कामे सकाळीच करायला लागतात. तशीच त्या दिवशी पण बाजारात जायला निघाले होते. जवळच सेंट्रल स्कूल आहे. शाळा सुटली होती. सोसायटीतील लहान मुले परीक्षा संपल्या म्हणून जवळ जवळ नाचतच आनंदात घरी परत चालली होती.

  • भाकरीसाठी मिळाला मार्ग.

    रेल्वे स्टेशनलगतच्या पाऊल वाटेवरुन जात होतो. एका वयस्कर माणसाने माझे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या हातात मोठी प्लास्टीकची थैली होती. तो रेल्वेच्या मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या वेचून, त्या थैलीमध्ये जमा करीत होता.माझी ऊत्सुकता जागी झाली. त्या माणसाला थांबवून मी चौकशी केली. अनेक प्रवाशी आजकाल पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. रिकाम्या झालेल्या बाटल्या चक्क रेल्वे मार्गावर फेकून देतात. हा त्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, भंगारच्या दुकानाला नेऊन विकत असे. त्याने सांगितल्या प्रमाणे, तो दुकानदार त्या बाटल्या, प्रति किलो प्रमाणे विकत घेतो. साधारण ११० ते ११५ बाटल्याना शंभर रुपये पर्यंत त्यांत उत्पन्न होते. टाकाऊ वस्तूंचे Recycle करुन पुन्हा त्याचा उपयोग केला जातो.

    आपल्याकडे अशी अनेक धातू जसे तांबे, जस्त, लोखंड इत्यादी वस्तू टाकाऊ झाल्यास त्यानाही त्यांच्यापरी मोल असते. ते सामान्यजनाना मिळते. विकसीत झालेल्या परदेशांत ही संकल्पना नाही. भंगार खरेदी विक्री यांचे दुकान नसते. कोणतीही वस्तू नादुरुस्त झाली की ती पुन्हा वापरणे ही क्रिया तिकडे दिसून येत नाही. Use and Throw अर्थात वापरा आणि फेकून द्या. तेथील स्थानिक शासन अशा वस्तू एकत्र करुन त्याचे Recycle करीत. भंगारवाले वा मध्यस्ती नसल्यामुळे सामान्य माणसाना साऱ्या नादुरुस्त वस्तू चक्क टाकून द्याव्या लागतात. ह्या बाबतीत आपणाकडे बरे असते. असे म्हणावे लागेल. आपला विकसनशील देश आहे. गरीबी, बेरोजगारी, यांनी अनेक कुटुंबे हैराण झालेली आहेत. त्यामुळे हा भंगार व्यवसाय देखील गुंतवणूक व कामधंदा यांना पुरकच आहेत.

    कांही दिवसांत मी ती घटना विसरुन गेलो. सकाळची वेळ होती. मी फिरावयास गेलो होतो. अचानक एक अनामिक इसम माझ्या समोर उभा राहून, खाण्यासाठी दोन तीन रुपये मागू लागला. त्याच्या कपड्यावरुन, अवतारावरुन तो कदाचित् भिकारी असावा. असे वाटले. तशी त्याची शरीर प्रकृती बऱयापैकी होती. परंतु परिस्थितीने गांजला असावा. बाहेर गांवचा दिसत होता.

    मला एकदम कांही दिवसापुर्वी रेल्वेमार्गावर प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करणाराची आठवण आली. " मी तुला दहा रुपये देतो. पण त्यासाठी तुला एक काम करावे लागेल." तो एकदम तयार झाला. काम धंद्याच्या शोधांत होता. काम मिळत नव्हते. हतबल झालेला वाटला. परक्या ठिकाणी असल्याची जाणीव होती. " चल मज बरोबर. मी तुला एक काम देतो." तो मज बरोबर येऊ लागला. जवळच असलेल्या रेल्वेस्टेशनच्या परिसरांत आम्ही आलो. मज जवळ सामान आणण्यासाठी कांही पिशव्या होत्या. त्यातील एक मोठी पिशवी मी त्याला दिली.

    मला रेल्वेमार्गांत कांही रिकाम्या प्लास्टीकच्या बाटल्या दिसल्या. त्याला त्या जमा करण्यास सांगीतले. ह्याच प्रमाणे सभोवतालच्या परिसरातील पडलेल्या रिकाम्या बाटल्या गोळा करुन आणण्यास सांगितले. मी तेथे एका दगडावर बसून त्याच्या हालचालीकडे बघत होतो. त्याला हे अपरिचित असावे असे वाटले. पण आपणास दहा रुपये मीळणार ह्या आशेने तो त्या बाटल्या जमा करु लागला. अर्धापाऊण तासाने तो परत आला. त्याने जमा केलेल्या बाटल्या घेऊन आम्ही जवळच असलेल्या भंगारच्या दुकानांत गेलो. एकूण ५६ बाटल्या जमा केल्या गेल्या होत्या. दुकानदाराने त्याचे ५० रुपये दिले. मी ते पैसे त्या वेळी त्याच्या हातीं ठेवले. दहा रुपयांची अपेक्षा मनी बाळगुन असलेल्या त्या माणसाला, हाती पन्नास रुपये मिळतांच त्याचे डोळे भरुन आलेले जाणवले.

    खरा आनंद त्याला झाला होता, ते एवढे पैसे मिळाले म्हणून नव्हे. तर असे पैसे कसे कमवावे ह्याचे अत्यंत साधे मार्गदर्शन मिळाले ह्याबद्दल. परिस्थितीने तो गांजला होता. सामाजीक घडी त्याला उदरनिर्वाह करण्यास अक्षम झाली होती.
    खाण्यासाठी त्याला इतरासमोर हात पसरण्याची वेळ आली होती. अचानक भाकरीसाठी अर्थात जगण्यासाठीचा एक मार्ग त्याला मिळाला. त्याच्या आशा पुलकित झाल्या होत्या. मला अभिवादन करीत तो निघून गेला.

    -- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पापी !

    भारताच्या निकोबार बेटा पासून पूर्वेस दूर हे काळू बेट आहे. हे इतके लहान आणि नगण्य आहे कि जगाच्या भुगोलांच्या पुस्तकांनी आणि नकाशांनी याची दाखल सुद्धा घेतलेली नव्हती ! सॅटेलाईटच्या उजेडात हे जगाच्या नकाशावर आत्ताअवतरले आहे ! भारतीय आणि चीनी लोक मात्र ‘अक्षय तारुण्य ‘ देणाऱ्या वनस्पतीच्या शोधात येथे यायचे !

  • विक्रमादित्य आणि सिंहासन चार पुतळी

    विक्रमादित्य आणि सिंहासन चार पुतळी- सिंहासन बत्तीसी जुनी गोष्ट – काळ बदलला, नैतिक मुल्येही बदलली – विसाव्या शतकातली सिंहासन चार पुतळी

  • काळपुरुष

    शहापूर जिल्हा ठाणे. शासकिय ग्रामीण रुग्णातयांत वैद्यकीय अधिकारी असतानाचा प्रसंग. शवविच्छेदनासाठी एका पन्नाशीतील व्यक्तीचा मृतदेह आणला होता. पोलीस पंचनामा रिपोर्ट वाचला. त्या प्रमाणे घटनेचा तपशील अंतर्मुख करायला लावणारा खचितच असा होता.