नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
अंतरपाट धरताच भुतकाळात रमण्यामागचं कारणही तसच होतं. कारण हा अंतरपाट “श्रीमंतीचा ताणा”आणि “गरिबीचा बाणा”ह्या धाग्यांनी गुंफला होता.कालिंदीच्या बाबांच्या उदात्त विचारसरणीमुळे श्रीमंत-गरीब ही दरी भरून निघाली होती.
सकाळचे नऊ वाजत आले तरी पण माधुरीचे दार बंद. रोज सकाळी उठून दारात छोटी का होईना रांगोळी काढली की माझ्या कडे हसत बघणारी आज दिसली नाही. वाटलं की आज रविवार असल्याने उशिरा उठेल.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील डांग बागलाणचे महत्व
(गढवाली लोककथा)
वसंतऋतू नुकताच सुरू झाला होता. अलखनंदेच्या काठी एक अत्यंत सोयीची जागा वसंतोत्सवासाठी निवडली गेली होती. आर्य युवक युवती यांचा जल्लोष सुरू झाला होता. आपल्यायोग्य वर वधू निवडण्याची स्पर्धा वसंतोत्सवात सुरू व्हायची!
गेल्या पंधरा दिवसांपासून कावेरी ताईंची पळापळ सुरु होती. मागच्याच आठवड्यात भर दुपारी उन्हातान्हात बाजारात फिरून फिरून खणाचे परकर पोलक्याचे कापड आणले होते. तसे ते त्यांच्या मनासारखे मिळाले नव्हतेच, पण काही तरी मिळाले याचा त्यांना आनंद झाला होता

नेहमीप्रमाणे तंद्रीत चाललो होतो. तितक्यात एक गाडी माझ्या जवळून गेली आणि लगेच थाबली. मी दचकलोच. त्या कार ला नेहमीप्रमाणे बी. सी एम सी .करणार होतो.. तितक्यात ती कार मागे आली .
मनाला शांत करणाऱ्या या भजनाच्या ओढीने जेंव्हा ज्ञानमंदिराकडे मन धाव घेते तेंव्हा, अंगात चिंध्यांचा अंगरखा, एका कानात फुटक्या बांगडीची काच आणि डोक्यावर मडके घेतलेल्या एका पुरुषसिंहाचे दर्शन घडते… ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज अर्थात संत गाडगेबाबा ….
विदर्भातील अष्टविनायक’ प्रेक्षणीय आहेत. त्यांच्याशी विविध दंतकथाहि जोडल्या गेल्या आहेत. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये वैविधता आढळते.

बस्तर मधील सुरगुजा जिल्हा जंगल, नद्या. दर्याने वेढलेला, खळाळणारे असंख्य नाले, रस्त्याला रस्ता म्हणायचे तरी कसे?काही वेळा घनदाट जंगलात नक्षलवादी वस्तीस येत, आदिवासींकडून हक्काने शिधा गोळा करत, तसे पाहता हा प्रदेश इतका मागासलेला, आदिवासींचे विखुरलेले पाडे, थोडीपार शेती, गुजराण तरी कशी करणार? अर्ध पोटी जीवन चालू होते इतकेच.
संसाराच्या गाड्यात असणारा माणूस पै पै साठवून त्याच्या वृद्धापकाळाचा विचार जास्त करतो, प्रत्येक क्षण हा त्याच्यासाठी एखाद्या खड्या चढाई सारखा अवघड असतो तिथे तो आयुष्य जगण्या पेक्षा आयुष्य बनवण्याकडे जास्त लक्ष देतो.
Copyright © 2025 | Marathisrushti