(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • “करीयर”

    प्लॅनिंग प्लॅनिंग करतांना.. आयुष्यच जगावयाचच राहुन गेल !! बेरीज कधी जमलीच नाही.. वजाबाकीच सदैव होत गेली !!

  • जीवनरंग

    जीवनरंगाचे नाविन्य रोज नवे असते, वेगळे असते आणि वैशिष्ट्येपूर्ण देखील असते. काल पाहिलेले जीवनरंग आज आपल्याला दिसत नाही, रोज ते नवे असतात. उगवणारा सूर्य तोच असतो मात्र रोज तो नवे रुप घेऊन, नवे तेज घेऊन येत असतो.

  • एक नवी जबाबदारी

    भावनिक जगातील या उलथापालथीनंतर व्यावहारिक जग माझी वाट पहात होते, भाऊ गेल्यानंतर केवळ दुसऱ्याच दिवशी या व्यावहारिक जगाच्या मैदानात मला उतरावे लागले. कारण आमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवहार सुरूच होते. माझे काका गजानन जोशी, वसंत जोशी, श्रीकृष्ण जोशी, माझे मामा सुरेश धनवटकर आणि आमच्या कंपनीचे चार्टर्ड अकाऊंटंट आणि भाऊंचे जवळचे मित्र सहदेव चौगुले यांच्या सल्ल्यानुसार माझे दुःख बाजूला ठेऊन आमच्या कंपनीचा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर झालो. कंपनीची संपूर्ण जबाबदारी मी घेतली. या कामात अनेकांचे सहकार्य मला लाभले. आमच्या कंपनीचे सप्लायर नानाकाका घाटे, प्रभाकर धामणकर, प्रकाशमामा धामणकर, भाऊंचे मित्र चिदानंद भूमकर, आमच्या कंपनीचा स्टाफ, प्रामुख्याने नामदेव फाटे, चंद्रकांत कदम, सुधीर फाटे, महेंद्र प्रसाद सिंग, संजय ठाकरे या सर्वांचा मी कायम ऋणी राहीन.

    या सर्व कामांच्या व्यापात असतानाच अजून एका जबाबदारीची जाणीव मला झाली. भाऊंनी अनेक शेअर्स आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली होती. त्याबद्दलचे काही प्राथमिक शिक्षण भाऊंनी आणि माझा मित्र विनय देवस्थळी यांनी मला दिले होते. माझे मेव्हणे विद्याधर पटवर्धन हे गुंतवणूक सल्लागारच होते. त्यांनी मला फार मोलाची मदत केली. १९९१ चा तो काळ कागदी शेअर्सचा होता. त्यामुळे शेअर्स ट्रान्सफर करणे हे फार जिकिरीचे आणि वेळ घेणारे काम होते. कंपनीच्या कामामुळे दिवसभराचा वेळ माझ्याकडे नव्हताच. मग रोज रात्री तीन वाजेपर्यंतचा वेळ मी या कामासाठी दिला. कधी कधी असे घडते की एखादे संकट किंवा एखादी अडचण आपल्यासाठी एका नव्या क्षेत्राचे दालन खुले करते, फार मोठी संधी आपल्याला उपलब्ध करून देते. माझ्या बाबतीत नेमके हेच घडले. सुरवातीला कंटाळवाणे वाटणारे हे काम हळुहळू मला आवडायला लागले. हे शेअर ट्रान्सफरचे काम मला शेअर मार्केटकडे नेऊ लागले. मी शेअर मार्केटचा अभ्यास करायला लागलो. एक-दोन महिन्यातच म्हणजे फेब्रुवारी १९९२ ला हर्षद मेहता यांच्यामुळे शेअर मार्केट खूपच तेजीत आले. माझ्याकडील शेअर्सचे भाव बरेच वाढले. शेअर मार्केटमध्ये मी अगदीच नवा होतो. शेअर्सचे भाव अजून वाढतील या मोहात न पडता मी सगळे शेअर्स विकून टाकले. मला भरपूरच फायदा मिळाला. खरे म्हणजे गुंतवणूक भाऊंनीच केली होती, पण मी शेअर्स वेळेवर विकल्यामुळे फायदा मला मिळाला. माझा निर्णय योग्य ठरला. कारण काही महिन्यातच हर्षद मेहता यांना अटक झाली आणि शेअर्सचे भाव कोसळले. मी वेळेतच फायदा घेतल्याने पुन्हा शेअर्स खरेदी करण्यासाठी माझ्याकडे पैसे होते. एकूण शेअर मार्केटमध्ये मला चांगले यश मिळाले. त्यानंतर शेअर मार्केटवरील सुमारे सत्तर पुस्तके मी वाचली. त्यांचा अभ्यास केला. शेअर्सवरील अनेक सेमिनारना मी उपस्थित राहिलो आणि माझ्या ध्यानात आले की इन्व्हेस्टर किंवा गुंतवणूकदार हे एक मोठे करिअरच आहे. आपण मराठी माणसे या क्षेत्रापासून थोडे दूर असतो. मला हे क्षेत्र अतिशय आवडले. मी इन्व्हेस्टर बनलो आणि रिअल इस्टेटमध्येही गुंतवणुकीला सुरुवात केली. व्ही.जे.टी.आय. पासूनचा माझा इंजिनीयर मित्र संजय खरे हा सुद्धा एक चांगला इन्व्हेस्टर होता. त्याच्याच भाषेत सांगायचे तर मी एक चांगला इन्व्हेस्टर आहे हे महत्त्वाचे. तशी माझी इंजिनिअरींग उपकरणे बनवणारी फॅक्टरीदेखील आहे. संजयची आणि माझी मैत्री होतीच. पण आता केवळ गुंतवणूक या विषयावर बोलण्यासाठी आम्ही महिन्यातून किमान दोन वेळा भेटायचे ठरवले. १९९२ पासून आजपर्यंत हा प्रघात चालू आहे. गुंतवणूकदार म्हणून आम्हा दोघांनाही याचा प्रचंड फायदा झाला आणि होत आहे.

    गुंतवणूकदार झाल्यावर तुम्ही नव्हे, तर तुमची गुंतवणुकीची रक्कम काम करते. तुम्हाला मोकळा वेळ जास्त मिळू शकतो. याचा फायदा माझ्या गाण्याच्या तयारीसाठी मिळाला. शिवाय गुंतवणुकीतून पैसे मिळत असल्यामुळे केवळ पैसे मिळवण्यासाठी करावे लागणारे गाण्यातील प्रोजेक्टस् मला करावे लागले नाहीत. हा सुद्धा मोठा फायदा मला झाला.

    -अनिरुद्ध जोशी

  • आजचे साहित्य प्रेरणादायी आहे का ?

    प्रत्येक साहित्य हे कोणत्या ना कोणत्या प्रेरणेतूनच निर्माण झालेले असते. ती प्रेरणा कधी रागातून, प्रेमातून, तिरस्कारातून अथवा अहंकारातूनही मिळालेली असते. काहीचे व्यक्तीगत आयुष्य त्या आयुष्यात आलेले चांगले – वाईट अनूभवही काहींच्या साहित्याची प्रेरणा ठरत असतात. त्यामुळे ढोबळ्मानाने विचार करता एखाद्या प्रेरणेतून निर्माण झालेले साहित्य वाचकांना कोणती ना कोणती प्रेरणा देतच असतात चांगली अथवा वाईट. त्यामुळे आजचे साहित्य ही प्रेरणादायी आहे असेच म्ह्णावे लागेल नाही का ?

    एखादे प्रेमावर आधारित साहित्य वाचून प्रेमात धोका खाल्लेल्याला आत्मह्त्या करण्याची प्रेरणा मिळाली तर त्या साहित्याला प्रेरणादायी साहित्य म्ह्णता येईल का ? नाही म्ह्णता येणार. जे साहित्य मणूष्यास उच्चतम ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरीत करते अथवा समाजासाठी, देशासाठी अथवा जगासाठी काही मोठे कार्य करण्यासाठी प्रेरीत करते ते साहित्य प्रेरणादायी मानले तर आजचे साहित्य किंचितही प्रेरणादायी नाही असच म्ह्णावं लागेल. मागच्या काही दशकात एक – दोन पुस्तके सोडली तर ज्याला फार प्रेरणादायी म्ह्णावे असे पस्तक वाचनात आले नाही. ज्याला अल्प प्रमाणात प्रेरणादायी म्ह्णावे असे साहित्य निर्माण झाले ही असेल पण त्यातून प्रेरणा घेऊन कोणी फार मोठे कार्य केल्याचे वाचनात अथवा पाहण्यात आले नाही.

    आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि ही स्पर्धा फक्त पैसा, धन-संपत्ती आणि सुखसाधने मिळविण्यासाठीच चाललेली आहे. या स्पर्धेतून वेळ काढून आजची पिढी स्वतःच मनोरंजन करण्याचा थोडासा प्रयत्न करते. त्यासाठी त्यांना आवश्यक असते मनोरंजन करणारे साहित्य. आजच्या जगात प्रेरणादायी साहित्य वाचण्याची गरज पडते ती जीवनात अपयशी ठरलेल्या लोकांना . अशाही लोकांना झटपट पैसा मिळविण्याचे मार्ग सांगणारे साहित्य हे प्रेरणादायी साहित्य वाटते. सर्वाधिक लोकांचा मनोरंजनाकडे कळ लक्षात घेता आता जगभरात साहित्यनिमिर्ती ही मनोरंजनाला डोळ्यासमोर ठेऊनच होऊ लागली आहे. सध्या आपल्या देशात प्रकाशित होणारे साहित्य पाहिल्यास ते सहज लक्षात येते. खर्‍या अर्थाने प्रेरणादायी साहित्य निर्माण करणारे तुरळ्क आहेत आणि त्यांचाही असं साहित्य निर्माण केल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कंबरटा मोडलेला आहे. अगदी इंटरनेटवरही एक प्रेम कविता शेअर केल्यावर तिला हजारो लाईक मिळतात पण त्याउलट प्रेरणादायी कवितेला मोजून दहा- वीस लाईक मिळतात. आज प्रेरणादायी साहित्य वाचण्याची वाचकांचीच इच्छा नाही त्यामुळे ते निर्माण करण्याच्या भानगडीतच हल्ली कोणी पडताना दिसत नाही. पूर्वी लिहिल्या गेलेल्या प्रेरणादायी साहित्यालाच आजही बाजारात बर्‍यापैकी मागणी असल्याचे दिसते. त्यामुळे आजचे साहित्य प्रेरणादायी आहे का ? या प्रश्नाचे ठोस उत्तर आज कोणालाही देता येणार नाही.

    -- निलेश बामणे

  • कालातीत

    टाइम मशीनची थिअरी तोवर सिद्ध होणार नाही किंवा आम्ही मान्य करणार नाही, जोवर मागील किंवा पुढील काळात गेलेली व्यक्ती आजच्या काळात परत येऊन तिचे अनुभव पुराव्यानिशी सादर करीत नाही.” टाळ्यांच्या कडकडाटात डॉ. देवाशीष रॉय आपले भाषण संपवून प्रेक्षागृहातील श्रोत्यांवर अभिमानाने नजर फिरवीत आसनस्थ झाले.

  • राम कहाणी !

    मोहन्याच्या पावलांचा आवाज दूर गेल्यावर , रामा अंदाजे आपल्या घराकडे वळला . हातातली काठी हलकेच जमिनीवर आपटून पहिली . उघड्या पायाच्या तळव्याने अदमास घेत सराईतपणे घरा समोरची नाली ओलांडली . चार पावलावर अपेक्षे प्रमाणे घराच्या पायऱ्या लागल्या . एक ,दोन ,तीन तो पायऱ्या चढून गेला . हात सावध पणे समोर केल्यावर हाताला लाकडी दराचा स्पर्श झाला . हलका हात फिरवून आपल्याच घराचे दार असल्याचे त्याने खात्री करून घेतली . अन मग कडी वाजवली .

  • ज्ञानमूर्ती कै गोविंद तळवलकर – जीवनपट – भाग १

    सिद्धहस्त, अभिजात लेखक, प्रतिभावान, संशोधक, इतिहासकार, उदार, मतवादी आणि द्रष्टा संपादक म्हणून सर्व परिचित, ‘महाराष्ट्र टाईम्स’ चे भूतपूर्व प्रसिद्ध संपादक श्री. गोविंदराव तळवळकर. तळवळकरांच्या विचारधनावर महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे पोषण झाले आहे. असं ‘मराठी वाङ्मय कोशात’ म्हटलं आहे आणि म्हणूनच टिळकयुगानंतर ‘ तळवळकर युग’ हे पत्रकारितेत महत्वाचे समजले जाते.

  • माणसा किती रे तुझा स्वार्थ

    एकदा एक वाघ आणि वाघीण पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली.

  • पुस्तक मिटून ठेव

    पुण्याच्या बुधवारपेठेतील भिडे वाड्यात १८४८ मध्ये जोतिराव फुले यांनी मुलींची शाळा उघडली, स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे ते पहिले भारतीय, त्या काळात पुण्यातला एक एक सनातनी ब्राह्मण म्हणजे ‘आरडीक्स पेक्षा महाभयंकर होता. सनातनी खवळले.

  • गुलकंदी’ शरद गटणे

    व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘पुलं’चा सखाराम गटणे सर्व रसिक वाचकांना परिचित आहे. तो ‘पुलं’चा आज्ञाधारी शिष्य होता, मला भेटलेल्या शरद गटणेंचा मी आज्ञाधारी ‘शिष्य’ आहे!